* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KALOKHACHE THEMB
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988734
  • Edition : 2
  • Publishing Year : 1982
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 150
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH ONE OF US IS A DROP OF DARKNESS. EACH DROP TREMBLES FOR A WHILE AS IT SHAPES THE DARKNESS WITHIN US. DURING THIS PROCESS OF GIVING MEANING IT SOMETIMES SLUMPS DOWN SOMEWHERE. NOT ALL OF US CAN UNDERSTAND THE DARKNESS IN A TRUE SENSE. THOSE FEW WHO ARE ABLE TO FEEL IT REALISE HELPLESSNESS AND INEXORABILITY OF THEIR VERY BEING. FOR THEM, THERE IS ONLY ONE WAY OUT OF THIS SITUATION. HOWEVER TEMPORARY IT SEEMS, THEY HAVE TO TRY TO REMAIN ON THE SURFACE IN AN ATTEMPT TO BE ALIVE WHILE FURTHER PUTTING THE EXPERIENCE INTO WORDS.
एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायतेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहायतेवर, तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा आविष्कार शब्दबद्ध करणं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KALOKHACHETHEMB #KALOKHACHETHEMB #काळोखाचेथेंब #SHORTSTORIES #MARATHI #PRABHAKARN.PARANJAPE "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 7-3-2016

    ‘रात्रीच्या काळोखात गाडलेल्या स्मृती एक एक करून जमा व्हायला लागतात. मनात एक वैराण वाळवंट हेलावू लागतं आणि सावलीप्रमाणे शरीरहीन असलेल्या त्या स्मृती मृगजळाप्रमाणे मला बोलावू लागतात,’ ‘उसळी मारून वर येतात अचानक डोह संपावा तशी झोप संपली,’ ‘ते सगळं अधांती हलतं, डुचमळतं वाटत होतं,’ ‘दृष्टीला गरगरवणारी रंगीबेरंगी वर्तुळे पापण्यांच्या फटकाऱ्याने उडवीत तो दरवाज्याकडे गेला,’ अशी प्रतिकात्मक आणि रुपकात्मक भाषा प्रभाकर नारायण परांजपे यांच्या या कथासंग्रहात अनुभवायला मिळते. वास्तवाला भिडणाऱ्या एकूण १६ कथांचा हा संग्रह. ‘टँहा’ ही वेगळ्या विषयावरील कथा, तर ‘मातीच्या मूर्ती’ या कथेतील धक्का तंत्राचा वापर परिणाम साधतो. संवादांपेक्षा वर्णनात्मकतेतून उलगडणाऱ्या या कथा कधी कधी गूढतेच्या वाटेनेही जातात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 5-6-2016

    १९६७ ते १९७१ या काळात लिहिल्या गेलेल्या या कथा ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘राजस’, ‘किर्लोस्कर’, ‘नवयुग’, ‘युगवाणी’, ‘मनोहर’ या त्या वेळच्या नव्या वाटेवरच्या साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नियतकालिकांत प्रसिद्धही झाल्या आहेत. विशेष हे मानायला हवे, की इतक्यावर्षांनंतरही त्या कालबाह्य वाटत नाहीत. आज भूतलावर सगळ्यात सामर्थ्यवान कोण असेल तर माणूस. त्याची विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची शक्ती, त्याची बुद्धी, नवनवीन शोधांची त्याची लालसा यामुळे त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालंय असं म्हटलं जातं. बुद्धीच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही करू शकतो असं माणसालाही वाटत असतं. पण प्रत्यक्षात हे खरं आहे का? निसर्गापुढे माणूस किती थिटा आहे हे तर आपण अनुभवतोच आहोत आणि तसंही या विश्वाच्या पसाऱ्यात एक व्यक्ती म्हणजे कुणीच नाही. जणू काळोखाचा थेंब. आपले अस्तित्व किती नगण्य आहे हे जेव्हा आणि ज्यांच्या लक्षात येते त्यांना जगण्यातला फोलपणा जाणवतो. पण आयुष्याची आसक्ती इतकी मोठी असते, की परिस्थितीवर मात करत जगायचा प्रयत्न प्रत्येक जणच करतो. काही त्यात यश मिळवतात. बाकीचे हातपाय मारत धडपड करत राहतात. या कथासंग्रहात अशाच व्यक्तीरेखा वाचकांना भेटत राहतात. ‘लाक्षागृहा’मधल्या शाळकरी सदूचे भावविश्व अशा घटनेने ढवळून निघते की ज्याचा त्याच्याशी प्रत्यक्षात काहीच संबंध नाही. पण तरीही काही नकोशा गोष्टींचा तो साक्षीदार होतो. ‘संध्याछाया’ ही अगदी परस्परविरोधी स्वभावाच्या दोन वृद्ध स्त्रियांची कथा सांगते. त्यातली एक परावलंबी आयुष्य पसंत करणारी, तर दुसरी हट्टाने स्वत:चे स्वातंत्र जपणारी. ‘काळोखाचे थेंब’ कथेची मांडणी वेगळीच आहे. नंदिनी आणि माधव यांचा एकमेकांचा अंदाज घेत बोलणे, प्रतिक्रीया देणे हे दुसऱ्यावर मात करण्यासाठी आहे. यातली तिसरी व्यक्तीरेखा अविनाश ही या दोघांच्या बोलण्यातून ‘दिसत’ राहते. या गोष्टीचा शेवट होतो तो नंदिनीसाठी जसा अकल्पित आहे तसा वाचकांसाठीही. ‘ट्याहा’ ही कथाही तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. यातल्या काही कथा गूढ वळणावरच्याही आहेत. ‘अंधाराच्या अरण्यात’मधला विश्वनाथ, ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’, ‘निर्जन किनारी’मधली ‘ती’ कथा संपल्यावरही लक्षात राहतात. माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याच्या व्यक्त अव्यक्त भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न लेखकाने ‘भोवळ’, ‘महारोगी’, ‘मन माळरान’, ‘कॅसिनो’ या कथात केला आहे. उदाहरणार्थ, ‘मन माळरान’मधला लेखक लेखनाच्या अनुभूतीचा, जीवनाच्या अस्सलतेचा साक्षात्कार घडतानाचा अनुभव सांगताना म्हणतो, ‘निर्लेप, निर्विकार व्हायचं, मरायचं मनात, कुठल्या तरी क्षणी ते जमेल क्वचित. पण तो क्षणच असायचा अनंताचा कण, इंद्रिय संवेदनांच्या पलीकडील अवकाशाचं ओझरतं दर्शन. देठ तोडून ओंजळीत घेतलेल्या कमलाप्रमाणे दिसायचं विश्व आपल्याला सामावून घेऊनही आपल्यापासून तुटलेलं.’ पुस्तकातल्या दोन अनुवादित कथांचाही उल्लेख करायलाच हवा. यातली पहिली आहे ती जेम्स जोइसची ‘द डेड’. त्यात गूढ छटा आहे. दुसरी त्याहूनही महत्त्वाची आहे ती ‘त्रयस्थ’. आंद्रेई सिन्यावस्की यांच्या मूळ कथेवर आधारलेली. ही कथा म्हणजे राजकीय रूपक आहे. त्याचबरोबर कलावंताना वाटणरी परकेपणाची, त्रयस्थपणाची भावनाही यात खूप प्रभावी पद्धतीने मांडली गेली आहे. त्यामुळेच एका बाजूला शहारा उमटवत असतानाच बराच काळ ती मनात रेंगाळत राहते. लेखकाची भाषा रुपकात्मक आहे. ‘उसळी मारून वर येताना अचानक डोह संपावा तशी झोप संपली’ अशी वाक्ये ते सहजपणे लिहून जातात. या कथा वर्णनात्मक जास्त आहेत. गाव, रस्ते, समुद्र, व्यक्ती यांची बारकाईने, तपशिलात जाऊन केलेली वर्णने आहेत. त्यामुळे तो तपशील डोळ्यांसमोर उभा राहायला मदत होते. त्यांच्या व्यक्तिरेखाही मोजक्या शब्दांत ठसठशीतपणे उभ्या राहतात. उदाहरणार्थ, ‘द रनिंग म्यान’मधली अनघा किंवा ‘लाक्षागृह’मधला विठ्ठल. अगदी ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’ आणि ‘संध्याछाया’मधल्या काकूही. आजार, पैशाची वानवा, अशांत मन, एकटेपणा यापैकी एका किंवा अनेक गोष्टींचा सामना करणारी ही सगळी माणसे. पण मग तरीही आयुष्याला बांधून ठेवणारा कुठला धागा असतो जो यांना तगवून ठेवतो? या कथांतला माणूस धडपडत, ठेचकाळत, जखमी होत का होईना पण जगत राहतो. परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करत राहतो. त्याचे माणूसपण टिकवायचा प्रयत्न करत राहतो. अशा आपल्या आजूबाजूच्या, किंबहुना आपल्यातल्याच सामान्य माणसांच्या या कथा आहेत. वाचकाला अस्वस्थ करणे हा चांगल्या लेखनाचा निकष मानला जातो. हा कथासंग्रह त्यावर खरा उतरतो. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 7-2-2016

    एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत; प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहाय्यतेवर तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा अविष्कार शब्दबद्ध करणं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more