* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABULIWALAR BANGALI BAHU
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177664492
  • Edition : 3
  • Publishing Year : MARCH 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ONE WELL EDUCATED GIRL FROM A BENGALI BRAHMIN FAMILY MARRIED A FOREIGNER MUSLIM YOUTH AGAINST THE WISHES OF HER FAMILY. SHE WENT TO VISIT HER IN-LAWS STAYING IN A SMALL VILLAGE IN AFGHANISTAN WITH HIGH HOPES AND FAITH. ONCE SHE REACHED THE VILLAGE SHE REALISED THE FACT THAT THERE WERE ROADS TO ENTER THIS COUNTRY BUT NOT TO MOVE OUT OF THE COUNTRY.ALL THE PEOPLE WERE NOT BAD BUT SOME WERE MEAN, SOME WERE SELFISH. SHE WAS IMPRISONED THERE BECAUSE OF SUCH PEOPLE. SHE SUFFERED A LOT DURING THE 8 YEARS OF HER IMPRISONMENT; SHE EXPERIENCED MANY A GOOD AND BAD THINGS. THIS STORY PRESENTS THE HAIR-RAISING EXPERIENCES WHEN SHE TRIED TO RUN AWAY TO INDIA, AWAY FROM HER STAGNANT LIFE THERE, AWAY FROM THE TALIBANI FANATICS AFTER FACING THEIR OPPOSITION COURAGEOUSLY. WE SHIVER TO OUR BONES WHILE READING HER STORY.
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #LEENASOHONI #KABULIVALYACHIBANGALIBAYAKO #MRUNALINIGADKARI #BIOGRAPHYA&TRUESTORIES#SUSHMITABANERJEE
Customer Reviews
  • Rating StarBHAUSAHEB PAWAR

    "काबुलीवाल्याची बंगाली बायको" काल हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तकं वाचूनच पूर्ण झाले. एका भारतीय महिलेली कहाणी आणि ती ही अफगाणिस्तान सारखा देशामधील खेड्यातील. बंगाल मधील हिंदू कुटुंबातील एक सुशिक्षित मुलींनी सर्वांचा विरोध झुगारून एका परदेश अफगाणिस्तान मधील तरुणाशी लग्न केलं. सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानमधील एका छोट्याशा गावात मोठ्या विश्वासाने ती तिकडे गेली आणि साधारण आठ वर्ष बंदिवासात तिला अफगाणिस्तानमध्ये राहावे लागले. तिला आलेले अनेक बरे भुरे अनुभव या पुस्तकांमध्ये सांगितले आहेत. अफगाणिस्तानतील जीवन, शेती पद्धती, जीवनमान कसे आहे.तालिबान परिस्थितीत हे सर्व या पुस्तकात सांगितलेला आहे आणि आठ वर्षानंतर परत सुस्मिता बॅनर्जी ( भारतात आलेले आहे दोन-तीन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न भारतात येण्यासाठी केलेले प्रयत्न या पुस्तकात दिलेले आहेत. ...Read more

  • Rating StarSamir Chavan

    बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो. ...Read more

  • Rating Starसंदीप रामचंद्र चव्हाण

    घरातील सर्वाचा विरोध झुगारून २ जुलै १९८८ साली बंगाली कुटुंबातील एका सुशिक्षित हिंदू मुलीने एका अफगाणी मुसलमान तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती नवऱ्याबरोबर मोठ्या विश्वासानंगेली. त्यानंतर थोड्या अवधीतच तिला काहीही पूर्वकल्पना न देता तिचा नवरा तिला अफगाणिस्तानातच सोडून भारतात आला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की या देशात येण्यासाठीचा मार्ग आहे, पण बाहेर जाण्यासाठीचा नाही. सासरच्या लोकांना भेटायला म्हणून गेलेली ती तरुणी संपूर्ण देशच जणू तुरुंग असलेल्या अफगाणिस्तानात जवळपास आठ वर्षे अडकून पडते. या बंदिवासात तिला अनेक भलेबुरे अनुभव येतात. अफगाणिस्तानातील स्त्रियांचे यातनामय जीवन, अंधारात चाचपडणाऱ्या लहानग्यांचे बालपण, मोठ्या कुटुंबातील गुंतागुंतीचे नातेसंबंध इत्यादी गोष्टी तिला समजतात. तिथल्या आठ वर्षाच्या काळात तिने अनेक हालअपेष्टा, शारीरिक मानसिक छळ सोसला तरीही तिची भारतात परत जाण्याची तीव्र आकांक्षा मात्र कमी झाली नाही. भारतात पळून जाण्याचा फसलेला तिचा पहिला प्रयत्न आणि तरीही हार न मानता जीव धोक्यात घालून पुन्हा पळून जाण्याचा केलेला प्रयत्न यातून तिच्या धैर्याची कल्पना येते. भारतात पळून जाताना शत्रू समजलेल्या (पाकिस्तानी) लोकांनी तीला केलेली मदत आणि पाकिस्तानातील आपल्या (भारतीय) लोकांनी तिला दिलेली मानहानीकारक वागणूक तिच्यासह वाचकालाही अस्वस्थ करते. तालिबानसारख्या धर्मांधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार अनुभवलेल्या सुश्मिता बॅनर्जी यांच्या जीवनचरित्रातील एक संघर्षपूर्ण भाग म्हणजे `काबुलीवाल्याची बंगाली बायको` हे पुस्तक होय. त्याकाळी अनेक बंगाली मुली लग्न करून अफगाणिस्तान गेल्याने तिथे अडकून पडल्या होत्या असे या आत्मचरित्रातून समजते. सध्या लव्ह जिहादबद्दल देशात खूप चर्चा आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तीस-पस्तीस वर्षांपूर्वीही हा प्रकार चालू होता याची खात्री पटते. शिवाय अफगाणिस्तानातील विदारक स्त्री-जीवनाच्या सत्याचे दर्शनही घडते!! अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तालिबानने ५ सप्टेंबर २०१३ रोजी अफगाणिस्तानातील राहत्या घराबाहेर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या केली. या पुस्तकात फक्त अफगाणिस्तानातून भारतात पलायन करण्यापर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे. भारतात परत आल्यानंतर काय होते? त्या पुन्हा अफगाणिस्तान का जातात? परक्या देशात सोडून गेलेल्या नवऱ्याबरोबर पुन्हा त्या का जुळवून घेतात? इत्यादी माहिती या पुस्तकात नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. ~संदीप रामचंद्र चव्हाण ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 02-05-2004

    सुस्मिता बॅनर्जी यांच्या ‘काबुलीवाला बंगाली बरू’ या बंगाली पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आपल्या आयुष्यातील काही घटना मांडल्या आहेत. एका अर्थाने हा तिच्या चारित्र्याचा काही अशं आहे. बंगालमधील या हिंदू ब्राह्मण कुुंबातील तरुणीने अफगाणिस्तानातील मुसलमान तरुणाशी विवाह केला. पतीप्रेमापोटी लेखिका सासरच्यांना भेटायला अफगाणिस्तानात गेली. पण तिथे तिची अवस्था तुरुंगातील कैद्याप्रमाणे झाली. हिंदुस्थानातील सुशिक्षित तरुणीची मानसिकता आणि आधुनिक जगापासून खूप दूर असलेल्या असंस्कृत अशिक्षित माणसांमधील संघर्षाची ही कहाणी आहे. आठ वर्षे कैद्याप्रमाणे काढून शेवटी तालिबान्यांना शौर्याने तोंड देऊन ती हिंदुस्थानात परतली. धर्माला जीवनात आणि समाजात श्रेष्ठ स्थान आहे या विचारावर लेखिकेचा विश्वास आहे. पण धर्माच्या नावाखाली पराकोटीची बिर्भत्सता आणि दहशत निर्माण करणाऱ्या निर्विकारपणे माणसांची हत्या करणाऱ्याचे खरे रूप समाजासमोर यावे या हेतूने तिने हे अनुभव लिहिले आहेत. पुस्तक वाचताना तिच्या अपार मनोधैर्याने वाचक थक्क होतो. वागणूक तिथे मिळाली त्या परिस्थितीत सर्वसामान्य स्त्री जगूच शकली नसती. परत येण्याची गोष्टच सोडा. असामान्य धैर्याने मिळेल ते सहकार्य घेत खऱ्याखोट्याचा आधार घेत घेत ती अखेर हिंदुस्थानात येऊन पोहोचते. या कथानकाचा ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपट यापूर्वीच येऊन गेला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more