* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABULIWALA ANI ITAR KATHA
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177665192
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ONE WELL EDUCATED GIRL FROM A BENGALI BRAHMIN FAMILY MARRIED A FOREIGNER MUSLIM YOUTH AGAINST THE WISHES OF HER FAMILY. SHE WENT TO VISIT HER INLAWS STAYING IN A SMALL VILLAGE IN AFGHANISTAN WITH HIGH HOPES AND FAITH. ONCE SHE REACHED THE VILLAGE SHE REALISED THE FACT THAT THERE WERE ROADS TO ENTER THIS COUNTRY BUT NOT TO MOVE OUT OF THE COUNTRY. ALL THE PEOPLE WERE NOT BAD BUT SOME WERE MEAN, SOME WERE SELFISH. SHE WAS IMPRISONED THERE BECAUSE OF SUCH PEOPLE. SHE SUFFERED A LOT DURING THE 8 YEARS OF HER IMPRISONMENT; SHE EXPERIENCED MANY A GOOD AND BAD THINGS. THIS STORY PRESENTS THE HAIRRAISING EXPERIENCES WHEN SHE TRIED TO RUN AWAY TO INDIA, AWAY FROM HER STAGNANT LIFE THERE, AWAY FROM THE TALIBANI FANATICS AFTER FACING THEIR OPPOSITION COURAGEOUSLY. WE SHIVER TO OUR BONES WHILE READING HER STORY.
रवीन्द्रनाथ टागोर हे कथाकार म्हणून आपल्याला फारसे परिचित नाहीत परंतु त्यांनी लिहिलेल्या कथा ह्या बंगालीच नव्हे तर भारतीय साहित्यातील अनमोल ठेवा आहे. भारतीय मातीतून जन्माला आलेली कालबाह्य न वाटता ताजी वाटते. वाईटावर चांगुलपणाने मात केल्यास सर्वांचेच मंगल होते हा सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी त्यांची कथा सौदर्य व प्रसन्नता ह्यांचा अनुभव देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating StarShekar Bhokare

    मानवी भावनांचे खूप छान चित्रण. नोबेल पारितोषक विजेते रवींद्रनाथ टागोर ग्रेटच......

  • Rating StarDAINIK LOKSATTA 29-05-2005

    रवीन्द्रनाथांच्या सदाबहार कथा... ‘विश्वकवी’ आणि आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कारविजेते रवींद्रनाथ् टागोर यांना कोण ओळखत नाही? ‘गीतांजली’ हा त्यांचा काव्यसंग्रह तर जगप्रसिद्ध आहे. त्यांचे आणखी मोठे योगदान म्हणजे भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकारही ते आहेत. अशा एकाहून एक सुंदर रचना करणारे टागोरही स्वत:ला कवीच म्हणवून घेतात. परंतु ते जरी स्वत:ला कवी म्हणवून घेत असले तरी ते स्वत: एक तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते. त्यांनी बंगालीतून अनेक उत्तम कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांमधून बंगाली समाजाचे दर्शन घडते. त्यांच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी माणूस असतो. तसेच त्यांच्या प्रत्येक कथेत निसर्गही डोकावतोच. त्यांची कथा म्हणजे एक कविताच आहे, असे वाटते. ‘काबुलीवाला आणि इतर कथा’ या त्यांच्या कथासंग्रहातील १५ कथा अशाच आहेत. त्यात त्यांनी समाजातील जातिभेद, ढोंगीपणा, भेदभाव, श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व दाखवले आहे. त्या काळात बंगालमध्ये जमीनदारीचा समाजावर पगडा असल्याने जमीनदार व त्यांची रयत हे बऱ्याच कथांमधून डोकावते. काबूलहून, आपल्या गावापासून लांब कोलकत्त्यात व्यापारासाठी येणाऱ्या रहमतची कथा ‘काबुलीवाला’मध्ये आहे. तेथेच त्याला एक छोटी मुलगी मिनी भेटते. ती त्याला स्वत:च्या मुलीची आठवण करून देते. एक दिवस एका गुन्ह्याखाली काबुलीवाला यास अटक करण्यात येते. जेव्हा तो शिक्षा भोगून तुरुंगातून सुटतो तेव्हा मिनी लग्नाच्या वयाची झालेली असते. त्या वेळी त्याला आपल्या मुलीची आठवण येते. या कथेत मुलगी आणि पिता यांचे नाते लेखकाने दाखवले आहे. ‘बलाई’ या कथेत बलाई हा एक छोटा मुलगा म्हणजे मानवरूपातील निसर्गपुत्रच आहे. तो जेवढे निसर्गावर प्रेम करतो तेवढे कोणी करू शकते का? हाच प्रश्न पडतो. तो जेव्हा बोर्डिंगमध्ये जातो, तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडातच त्यांची काकू त्याला पाहत असते. जेव्हा ते झाड त्याच्या काकाने तोडून टाकले तेव्हा त्याची काकू खरोखरच दु:खी झाली. या कथेत टागोरांचे निसर्गप्रेम दिसते. ‘बलाई’प्रमाणेच ‘सुटी’ या कथेतल्या केंद्रस्थानीही फटीक हा लहान मुलगाच आहे. रवींद्रनाथांच्या कथा शंभर वर्षांपूर्वीच्या जरी असल्या तरी त्या आजच्याच काळातल्या आहेत, असे वाटते. कारण अजूनही आपल्याकडे जातिभेद, दांभिकपणा आहे. त्यामुळेच त्या वाचताना कालबाह्य वाटत नाहीत. वाईटावर चांगुलपणाने मात केल्यास सर्वांचेच मंगल होते. हा सकारात्मक दृष्टिकोन मांडणारी कथा सौंदर्य व प्रसन्नता यांचा अनुभव देते. -श्रेया खरे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 26-06-2005

    रवींद्रनाथांच्या बहरातील गोष्टी… रवींद्रनाथ टागोर हे भारतीय सारस्वताला पडलेले एक सुंदर स्वप्न. त्यांच्या लेखणीतून साकार झालेल्या ‘काबुलीवाला आणि इतर कथा’ यांचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला अनुवाद वाचकांना नक्कीच आकर्षित करील. संग्रहात एकूण १५ कथा आहत. पैकी पहिली बहुचर्चित ‘काबुलीवाला’ यामध्ये रंगविलेल्या सहृदय पिता थेट हृदयाला भिडतो. ‘अपरिचित’मधला पिता प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलीला असंस्कृत घराण्यात खितपत पडण्याएवेजी मांडवात लग्न मोडून मातृभूमीची सेवा करण्याची मुभा देतो. ‘परतफेड’ मध्ये मालक-नोकर संबंधांविषयीची चर्चा केली आहे, तर ‘प्रथम तिज पाहता’ मध्ये निखळ प्रेमकथेचा सहजसुंदर आविष्कार बघायला मिळतो. रवींद्रनाथ विनोदाच्या माध्यमातून समाजदोषांवर नेमके बोट ठेवतात. कथेतील माणसे तुमच्या-आमच्यासारखी सामान्य असतात राग, लोभ, द्वेश, मत्सरयुक्त पण प्रसंगी खंबीरपणाने निर्णय घेण्याची त्यांच्यात कुवत दखविण्याचे रवींद्रनाथांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. वाईटावर चांगुलपण नेहमीच मात करते. आपल्या कथांमधून रवींद्रनाथ आशीर्वाद पेरताना दिसतात. तोही अगदी हळुवारपणाने. रवींद्रनाथांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कथा मग ती सामाजिक आशयाची असो वा ऐतिहासिक, ती काव्यात्मक असते. निसर्गाचे बहुविध विभ्रम, पदन्यास आणि प्रतिमा यांची वाचकाला मेजवानी मिळते. वाचक त्या त्या पात्राबरोबर कथानकात गुंतत जातो. संवाद साधतो आणि त्याचा पुरेपूर आस्वाद घेतो. मनोविश्लेषणाच्या अंगाने जाणारी रवींद्रनाथांची कथा मनाचा ठाव घेते, मग सहज अनुभूतीचा प्रत्यय येतो. लेखिकेने अनुवाद करताना पुरेसे भान राखले आहे. रवींद्रनाथांच्या लालित्यपूर्ण शैलीला विचारसौंदर्याला आणि वैचारिक संक्रमणाला पूर्ण न्याय दिला आहे. इतक्या त्या मराठी भाषेत उतरल्या आहेत. मुखपृष्ठावरचे काबुलीवाल्याचे सुचक चित्र आणि मलपृष्ठांवरचे रवींद्रनाथांचे तरतरीत छायाचित्र दोन्ही रसिकमान्य ठरावीत. -सुनीता नागपूरकर ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 29-10-2006

    ‘कथाकार’ रवींद्रनाथांच्या ‘माणूस’ कथा… विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हे आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते. ‘गीतांजली’ या काव्य संग्रहामुळे साऱ्या जगाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. शांतीनिकेतनचे निर्माते रवींद्रनाथ अनेकांना परिचित आहेत, पण कथाकार म्णून ते नव्या पिढीला अपरिचित होते. त्यांच्या कथांमधून त्यांनी विविध विषयांना बंगाली भाषेतून स्पर्श केला आहे. या ‘मानवी’ स्पर्श लाभलेल्या कथा मेहता प्रकाशनने मराठीत आणल्या आहेत. मृणालिनी गडकरी यांनी रवींद्रनाथांच्या पंधरा कथांचे मराठीत अनुवाद केले आहेत. वेगवेगळ्या विषयाच्या या कथांमधून रवींद्रनाथांच्या वैशिष्ट्यांचे मनोरम दर्शन घडते. बंगालच्या मातीमधील या कथांमधून बंगाली समाज, त्यातील जातीभेद, गरीब-श्रीमंती भेद, श्रद्धा-अंधश्रद्धा, ढोंगीपणा, माणुसकी यांचे दर्शन होते. पूर्वीच्या काळी बंगालमध्ये जमीनदारांचा दबदबा होता. जमीनदार आणि रयत यांच्यातील नाते गुंतागुंतीचे होते. स्वत: रवींद्रनाथ जमीनदार होते. त्यामुळेच जमिनदारी हा त्यांच्या अनेक कथांचा विषय झालेला आहे. स्त्री शिक्षण, बालविवाह, विधवा विवाह, हुंडा, स्त्री-स्वातंत्र्य या साऱ्यांचे भेदक चित्रण त्यांच्या कथेत अशा काही रितीने मांडले आहे, की तत्कालीन परिस्थिती पाहता त्याचे श्रेष्ठव लक्षात यावे. रवींद्रनाथांच्या साऱ्या कथा या ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आहेत. माणसांचे मन, त्याचे अनेक पदर रवींद्रनाथांनी अतिशय कल्पकतेने या कथांमधून उलगडलेले आहे. ‘निसर्ग’ हा त्याच्या कथेचा स्थायीभाव आहे. माणसाचे निसर्गाशी असलेले नाते त्यांनी छान दाखवून दिलेले आहे. त्यांच्या साहित्यात निसर्गाला अढळपद दिलेले आहे. कवी रवींद्रनाथ तर त्यांच्या प्रत्येक कथांमधून डोकावतात. कथेतील अनेक वर्णने तर आपण एखादी कविता तर वाचत नाही ना असे वाटते. हे काव्यात्मक वर्णन या कथेच्या ओघात येतात, पण त्याला अडथळा ठरत नाहीत. रवींद्रनाथांच्या कथेत माणुसकीला जसे केंद्रस्थान आहे तसेच त्यांच्या कथेत येते या घराचे ‘घरपण’. सामान्य माणूस, संस्कार, हळवेपणा हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्ये आहे. ‘काबुलीवाला, दुर्बुद्धी, अपरिचिता आणि चोरलेले धन या चार कथांमध्ये एक समान सूत्र आहे. या कथांमधून एका पित्याचे आपल्या मुलींबद्दलचे हृदय व्यक्त केले आहे. ‘काबुलीवाला’ या कथेतील रहमत हा अफगाण फेरीवाला संपादकांच्या मिनी या छोट्या मुलीच्या बडबड्या स्वभावामुळे तिच्यासारखाच हळवा होतो. या मिनीमध्ये तो हजारो मैल दूर असलेल्या अफगाणातील त्याच्या मुलीला पाहत असतो. तुरुंगातून सुटून आल्यावर वधुवेशातील मिनी त्याला ओळखत नाही. आपली मुलगीही आपल्याला ओळखणार नाही म्हणून तो हवालदिल होतो. संपादकाचे बापाचे मन कळवळते. रोषणाई, वाजंत्री याला फाटा देऊन तो ते पैसे काबुलीवाल्याला देतो व आपल्या मुलीला भेटून येण्यास सांगतो. ‘दुर्बुद्धी’ या कथेतील बापाला मुलगी गमावल्यानंतर बापाच्या हृदयातील दु:ख जाणवते. मग तो गावातील सर्वच मुलीचा आणि पित्यांचा ‘अपरिचिता’ कथेतील पिता अबोल, पण सुशिक्षित, खंबीर आहे. लाडक्या लेकीला संस्कृतीहीन पैशाचा हव्यास असलेल्या घरात देण्याऐवजी तो लग्न मोडतो आणि नवरदेवाला मंडपातून हाकलतो. ‘चोरलेले धन’ या कथेतील पिता आपल्या लेकीचे प्रेम, मन ओळखतो व तिचा तिच्या आईच्या इच्छेविरुद्ध विवाह घडवून आणतो. बलाई आणि सुटी या दोन कथेत लहान मुले नायक आहेत. ‘बलाई निसर्गपुत्रच आहे. त्याने लावलेले सावरीचे झाड जसजसे मोठे होत जाते. तसतसा तो मोठा होत जातो. परदेशात जाण्यापूर्वी त्याला त्या झाडाचा फोटो हवा असतो, पण शेतातील वाटते येणारे ते झाड त्याचे काका जेव्हा तोडतात, तेव्हा बलाईवर पुत्रवत प्रेम करणारी काकी अबोल होते. ‘सुटी’ या कथेतील फटीक गावात दंगामस्ती करतो म्हणून कोलकात्याला मामा घेऊन जातो, पण शहरातील निसर्गाशिवायच्या वातावरणात तो गुदमरतो. आजारपणात तो मी घरी जातो असे बरळत राहतो. निसर्गात त्याला विलीन व्हायचे असते. ‘संस्कार’ आणि ‘तपस्विनी’ या कथांमध्ये रवींद्रनाथांनी उपहास आणि विनोद यांच्या सहाय्याने समाजातील ढोंगी चालीरितीवर टीका केली आहे. ‘संस्कार’ मधील धुव्रवता ‘खादी वापरून जातीभेदावर पांघरूण घालते’ असे म्हणते. पण प्रत्यक्षात स्पृश्य-अस्पृश्य भेद तिच्या मनातून जात नाही. कथानायक ‘माझ्या बायकोचा नवरा’ अशी स्वत:ची ओळख करून देतो व समाजातील भोंदूपणा, कावा, लबाडी यावर भेदक भाष्य करतो. ‘तपस्विनी’ मध्ये जुने जमीनदार वातावरण आहे. पण नायिकेच्या खिडकीतून बाहेर दिसणारे जग चैतन्याने सळसळणारं आहे. ज्या घरात पतीचे स्थान शून्य आहे, त्याच घरातून पती बेपत्ता होऊन संन्याशी झाल्याचे समजताच तीही संन्याशिनी होते. त्यानंतर ती स्वत:चं स्थान निर्माण करते, पण जेव्हा तिचा पती परत येतो तेव्हा तो एक फिरता विक्रेता बनून येतो. तेव्हा तिला भयंकर धक्का असतो, पण ती संन्याशिनीच राहते. ‘त्याग’ कथेत रवींद्रनाथांनी सिंधुबंदी, जातीभेद, विधवा विवाह या समस्यांचा वेध घेतला आहे. जाती-जातीतच नव्हे तर एकाच जातीतील भिन्न श्रेणीत विवाह होत नसताना कथानायक खालच्या जातीतील तेही विधवेशी विवाह करतो. त्यापायी त्याला घर, वडील आदी पाश तोडावे लागतात. ‘परतफेड’ ही कथाही कुलीनता, मालक-नोकर नात्यातील गुंता आदी समस्यांना तोंड फोडते. आपल्यापेक्षा हीन जातीतल्या मालकाकडे नोकरी करणाऱ्या उच्च कुलीन नोकराच्या पत्नीची घुसमट तिला सहन करावे लागणारे अपमान, मालकाच्या पडत्या काळात गळून पडतात. तेव्हा तिची कुलीनता उच्च कोटीत पोहोचलेली असते. ‘प्रथम तिज पाहता’ ही कथा एका तरुणाची मन:स्थिती स्पष्ट करते. खेडेगावातील सुंदर लावण्याला भुलून हा तरुण सोयरीक करतो, पण जिला त्याने पाहिले असते ती आपल्या जीवनसाथी नसल्याचे विवाहादिवशी लक्षात येताच त्याचे सारे जग अंध:कारमय होऊन जाते. पण जेव्हा एकाक्षणी त्याच्या हृदयातील ‘ती’ तरुणी मुकी आणि अजाण असल्याचे त्याच्या लक्षात येते तेव्हा पत्नी बनून त्याच्या आयुष्यात आलेल्या तरुणीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ‘आजोबा’ या कथेतील नायक गत्वैभवात रमणाऱ्या एका आजोबाची थट्टा करतो, पण त्यांची आई होऊन त्यांना सांभाळणाऱ्या नातीकडून नायकाची कानउघडणी होते, तेव्हा त्याच्यातील हीनता गळून पडते. ‘गुप्तधन’ कथेत मात्र एक आगळवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न रवींद्रनाथांनी केला आहे. संन्याशाची सेवा करणाऱ्या पूर्वजांकडे तो संन्याशी धनप्राप्तीचा एक कागद देतो. त्याच्याच घराण्यातील एकजण त्याचा शोध लावेल. अशी भविष्यवाणी करून तो निघून जातो. स्वत:च्या भावापासून लपवून ठेवलेला तो कागद आताच्या पिढीतील तरुणाकडून हरवला जातो. घरदार सोडून तो तरुण त्या कागदामागे धावतो. अखेर एका जंगलात तो संन्याशी दिसतो. त्याच्यापाठीमागे जात तो तरुण त्या खजिन्याजवळ पोहोचतो. तेथे असलेल्या संन्याशाला तो ठार मारण्याचा प्रयत्न करतो, पण संन्याशी वाचतो. संन्याशाला त्या खजिन्याकडे घेऊन जाणारी गुरुकिल्ली माहीत असते. म्हणून तो तरुण त्याच्या मागे लागतो. अखेर तो संन्याशी त्या ऐहिक ऐश्वर्यातून सहजसुंदर जीवनाचा मार्ग त्या तरुणाला दाखवून देतो. ‘चित्रकार’ या कथेतील चुनीलाल पैशाच्या मार्गाकडे नेणाऱ्या काकाऐवजी आईकडून मिळालेला कलेचा वारसा जोपासतो आणि ‘इंद्रदेवा’ची म्हणजे स्वत्वाची पूजा करतो. त्यासाठी त्याची आईच त्याला त्या मार्गावर नेते. ‘अतिथी’ ही कथाही भावस्पर्शी आहे. या कथेतला नायक तारापद लोभस, सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे. समाजाच्या स्वार्थी बंधनात तो अडकतो. घुसमटतो. पण आपल्या ‘मी’चे दर्शन होताच तो त्यातून मुक्त होतो. रवींद्रनाथ जेव्हा जमीनदारीची देखभाल करण्यासाठी त्यांच्या ‘पद्मा’ या नौकेतून कोलकात्यापासून दूर जात, तेव्हा त्यातून ते गावे, माणसे निरखत. ताल संवेदनक्षम कवीच्या मन:पटलावर ठसा उमटलेल्या क्षुल्लक गोष्टींनी कथेचे रूप घेतले. निसर्गाशी त्यांनी नाते जोडले. या कथेत त्याचा पुरेपूर परिचय येतो. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाचे कथासूत्र याच ‘अतिथी’ कथेवर आधारित आहे. -संदीप अडनाईक ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more