* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
S STORY TAKES PLACE IN THE CITY OF MYSORE. SOMESHWAR, OUR HERO IS AN ARCHITECT WHO HAS LOST HIS WIFE A FEW YEARS BACK. INTENDING TO START ANEW HE SHIFTS HIS BASE FROM MUMBAI TO MYSORE; FROM A WELLSETTLED BUSINESS TO A FRESH START.AMRITA, A MARRIED WOMAN WITH TWO YOUNG CHILDREN STAYS ALONE IN HER FARM HOUSE WITH THE TWO CHILDREN AND IS A LECTURER IN THE COLLEGE. DESTINY BRINGS SOMESHWAR AND AMRITA TOGETHER. THOUGH MARRIED, AMRITA DOES NOT LIVE WITH HER HUSBAND RANGA. RANGA’S SISTER IS AMRITA’S AUNT. AMRITA HAS LOST HER MOTHER WHEN SHE WAS VERY YOUNG. HER AUNT GRADUALLY TAKES POSSESSION OF AMRITA’S HOUSEHOLD AND HER FATHER TOO. SHE CONCEIVES A CHILD FROM HIM. AMRITA AND SOMESHWAR GET TIED UP IN A BOND. BUT THERE ARE TOO MANY HURDLES IN THEIR WAY. THE WORST OF ALL IS HER NATURE. SHE IS TOO HOT TEMPERED AND POSSESSIVE ABOUT HIM. MANY A TIMES, SOMESHWAR DECIDES TO LEAVE HER FOR BETTER, WIND UP EVERYTHING FROM MYSORE AND GO BACK TO MUMBAI. ONE DAY, HE DOES SO. BUT HE COMES BACK TO MYSORE. HOW, WHY, WHEN…………….. READ THIS IN KAATH.
अमृता आणि सोमशेखर यांच्या नात्याच्या माध्यमातून लेखक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. व्यक्तीला आयुष्यात नक्की काय हवे असते? स्त्रीपुरुषांना परस्परांकडून नक्की काय हवे असते? खरे प्रेम म्हणजे काय? मनोविकारांना आरंभ कसा होतो? अशा प्रकारच्या नात्यांना आपण एका साच्यात किंवा विवाहाच्या चौकटीत बसवू शकतो का? असे असेल, तर मग या नात्यांचे भवितव्य काय? अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करायला लावण्यातच या कादंबरीच्या यशाचे खरे गमक आहे! डॉ. अंजली जोशी मानसोपचार तज्ज्ञ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating Starवाचक

    डॉ. एस. एल.भैरप्पा यांची कन्नड कादंबरी, अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे ... डॉ. अमृता आणि सोमशेखर या दोघांची ही गोष्ट आहे , सध्या संदीप रेड्डी वांगा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या चित्रपटांवर वाद सुरू आहे की तो Toxic Masculinity ला promote करतो, Toic femininity काय असू शकते हे अमृताच्या कॅरेक्टर वरून समजून जाईल, तिच्या स्वभावाचे विविध पेलू आपणास पाहायला मिळतात त्याउलट सोमशेखर अगदी शांत संयमी , दोघांची फुलत जाणारी प्रेमकहाणी त्यात नैतिक आणि अनैतिकतेचे पेलू खूप चांगल्या प्रकारे मांडले आहेत. Anxiety, depression, suicidal ideation, sadism, mood swings हे सर्व अमृताच्या character मध्ये दिसून येते ... शेवट अगदी अनपेक्षित आहे नक्की वाचावी अशी कादंबरी... #वाचनवेडा #भैरप्पा ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दखवणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दाखणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी.....! ...Read more

  • Rating StarVIJAY SARAVATE

    तशी कथा अगदी साधी आहे, पण आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या मनोविचार आणि विकार खूप विस्तृत पणे मांडले आहेत. त्यामुळे थोडी पुनरुक्ती आढळते, बाकी उत्त्तम.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more