* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JAPANESE ORCHID
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980981
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
POWERFUL AND YET POIGNANT, THIS THRILLER SPANS THREE CITIES, NEW YORK, TOKYO AND SINGAPORE. TETSUYO AKINICHO, A WEALTHY JAPANESE DNA MOGUL FROM MOST HIGHLY RESPECTED CIRCLES OF NY SOCIETY FINDS HIMSELF EMBROILED IN A BLACKMAIL THAT THREATENS TO TEAR HIS IMPECCABLE REPUTATION TO PIECES. TETSUYO LIVES IN THE SHADOW OF A TERRIBLE FAMILY SECRET WHICH HE THOUGHT WAS WELL HIDDEN, TILL ONE DAY AN EMAIL COMES TO HIM : "YOUR MOTHER IS NOT RESTING IN PEACE. YOU SHOULD BE ASHAMED OF YOUR ANCESTORS. DO PEOPLE KNOW WHERE YOU HAVE COME FROM?" THESE LINES PLUNGE TETSUYO AND HIS LAWYER AKIRA TANAKA INTO AN INTRICATE MAZE OF DAMAGE CONTROL MANOEUVRES INVOLVING PAUL GRIFFIN, A WELL KNOWN AMERICAN PRIVATE INVESTIGATOR AND HIS ASSISTANT, JAPANESE HISTORIAN, MAYUMI ONODERA. THEIR INVESTIGATIONS LEAD TO ONE SHOCKING DISCOVERY AFTER ANOTHER. TETSUYO IS ONCE AGAIN DRAWN BACK TO AN ACHING VOYAGE OF DISCOVERY OF HIS ROOTS & A MYSTERIOUS AND PAINFUL TRAGEDY SURROUNDING THE WOMAN WHO GAVE HIM LIFE... HIS BIOLOGICAL MOTHER. TETSUYO REALIZES THAT NO ONE CAN EVER SHAKE OFF THE PAST, NOT EVEN A POWERFUL MULTI-MILLIONAIRE RIDING HIGH IN HIS WORLD OF SUPER-ADVANCED DNA TECHNOLOGY. THE PAST HE SHARES WITH THE GHOSTS OF SECOND WORLD WAR COME BACK TO HAUNT HIM IN THE FORM OF A FACELESS BLACKMAILER AND TETSUYO IS DRAWN BACK TO CONFRONT THE PLACE WHERE IT ALL STARTED, A JAPANESE CEMETERY IN SINGAPORE AND A TINY, NONDESCRIPT HEAD STONE.
तेत्सुयो अकिनिचो... न्यूयॉर्कमधील एक प्रतिष्ठित, धनाढ्य उद्योजक, डीएनएचा बादशहा. त्याला जगाच्या दुस-या टोकावरून धमक्यांच्या ई-मेल्स येऊ लागतात, ज्यात त्याच्या भयानक कौटुंबिक रहस्याचा उल्लेख असतो. एक असे रहस्य, जे उघड झाल्यास सर्व प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळेल... तेत्सुयोचा वकील, त्याचा गुप्तहेर मित्र आणि एक इतिहासतज्ज्ञ मिळून या रहस्याचे धागेदोरे उलगडत नेऊ शकतील? जपानी ऑर्किडचं रहस्य जगासमोर येईल?

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SANJWARTA 26-7-2010

    देशातील उत्तमोत्तम साहित्यकृती आपले मन घडवतात तर विदेशातील कसदार साहित्यही आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. देशात खुलीकरणाचे वातावरण अनुभवायला मिळायला लागल्यापासून जग हे वैश्विक खेडे बनल्याची जाणीव होत आहे. म्हणून जॅकलीन गोल्ड, अ‍ॅलेक्स पॅटोकोस, जन ग्रिशॅम, स्कॉट गॅ्रहॅम, रेई किमुरा या विदेशातल्या मान्यताप्राप्त साहित्यिकांचे चित्तथरारक लेखन आपला व्यासंग वाढवून जाते. सामान्य जीवन जगत असताना असामान्य अनुभवांचे जास्त कौतुक वाटते. मात्र असामान्य जीवन जगणाऱयांची जीवनवाट जवळून पाहताना आपण कमालीचे अंतर्मुख होतो. कदाचित म्हणूनच बाजारात आलेले काही थरारक आणि चाकोरीबाहेरची अनुवाद आवर्जून तपासून पाहण्याजोगे ठरतात. जेनेटिक संशोधन क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. विज्ञानाच्या रहस्याची उकल करण्यात वर्षानुवर्ष स्वतःला झोकून देणाऱ्या संशोधकांचे स्वतःचेही एक विश्व असते. जेनेटिक शास्त्रात निष्ठेने काम करणाऱ्या तेत्युयोच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आलेले संकटमालिका जॅपनीज ऑर्किड या कादंबरीत वाचायला मिळते. भूतकाळातही भूत याला त्रस्त करतात. त्याच्या आईविषयी काही खासगी गोष्टी माहीत असल्याचे धमक्यांचे मेल येत असतात. आजवरची प्रतिष्ठा, लौकिक उधळून लावण्याचा समोरच्याचा डाव त्याला अस्वस्थ करतो. व्यवसायाने वकील असलेल्या मित्राला तो गतकाळातल्या अशा घटनेचा छडा लावण्याबद्दल सांगतो. त्यातून सुरू झालेले घटनाक्रम आणि समोर येणाऱ्या व्यक्तिरेखा यांचा सुरेख संगम या कथेत वाचायला मिळतो. जॅपनीज ऑर्किड ही तेत्सुयो आर्किनचो या लौकिकप्राप्त धनाढय वैज्ञानिकाची गोष्ट. त्याचा जन्माच्या वेळीच आई स्वर्गवासी झालेली असते. आता इतक्या वर्षांनी तिच्याबद्दल कुणाला अशी काय माहिती आहे ज्यामुळे तेत्सुयो कष्टित होतो. जपनीज ऑर्किड वाचताना जपानी लोकांच्याबद्दल बरच काही समजतं. जपानी लोक काम अगदी निष्ठेने करतात. सेवा देण्यात कुचराई करत नाही. जपानी टॅक्सी डायव्हर, नोकर, वेटर, तुम्हाला उत्तम सेवा देतातच पण दिलेली बक्षिसीही नम्रपणे नाकारतात. न्यूयॉर्क, टोकियो, सिंगापूर ही या कथेतील महत्त्वाची स्थळं, जिमी, पॉल, मायुमी, अकिरा, सॅणडा या पात्रांची कामगिरी... अशा साखळीने जॅपनीज ऑर्किड वाचावे लागते. सॅण्डाने उघड केलेले रहस्य वाचून वाचक अंतर्मुख होतो. लेखिकेच्या मते दुःख हे एकटे असते. तेव्हा बिकट प्रश्न घेऊन समोर येते. तयाला तोंड देण्यासाठी एकट्यानेच सामोरे जावे लागते. दुसरे कुणीही तुमच्यावर कितीही प्रेम करत असले तरी तुमचे दुःख तुम्हालाच सोसावे लागते. दुःख हे मृत्यूसारखेच वैयक्तिक असते. ते एकट्यालाच सहन करावे लागते. जॅपनीज ऑर्किडच्या मूळ लेखिका आहेत रेई किमुरा आणि अनुवादक आहेत स्नेहल जोशी. मूळ जपानी लेखनातला आशय अनुवादिकेने भारतीय पद्धतीत बेमालूम मिसळला आहे. भाषा सोपी आणि ओघवती आहे. वाचताना पुढे काय असेल याची उत्कंठा वाटते. डीएनएवर संशोधन करून नाव मिळवलेल्या वैज्ञानिकालाच त्याच्या जन्माची कहाणी समजून घेण्यासाठी जंग जंग पछाडावे लागते ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना वाचकाला खिळवून ठेवते. ...Read more

  • Rating StarDAINIK PRAJAVANI 1-8-2010

    जेनेटिक संशोधन क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. विज्ञानाच्या रहस्याची उकल करण्यात वर्षानुवर्षे स्वत:ला झोकून देणाऱ्या संशोधकांचे स्वत:चेही एक विश्व असते. अशाच एका जेनेटिक शास्त्रात निष्ठेने काम करणाऱ्या तेत्युयोच्या वयाच्या उत्तरार्धात आलेली संकटमालिका ‘ॅपनीज ऑर्किड’ या कादंबरीत वाचायला मिळते. भूतकाळातली भूतं त्याला त्रस्त करतात. त्याच्या आईविषयी काही खासगी गोष्टी माहित असल्याचे धमक्यांचे मेल येताहेत. आजवरची प्रतिष्ठा, लौकिक उधळून लावण्याचा समोरच्याचा डाव त्याला अस्वस्थ करतो. व्यवसायाने वकील असलेल्या मित्राला तो गतकाळातल्या अशा घटनेचा छडा लावण्याबद्दल सांगतो. त्यातून सुरू झालेले घटनाक्रम आणि समोर येणाऱ्या व्यक्तिरेखा यांचा सुरेख संगम या कथेत वाचायला मिळतो. ‘जॅपनीज ऑर्किड’ ही तेत्सुयो आर्किनचो या लौकिकप्राप्त धनाढ्य वैज्ञानिकाची गोष्ट. त्याच्या जन्माच्या वेळीच आई स्वर्गवासी झालेली असते. आता इतक्या वर्षांनी तिच्याबद्दल कुणाला अशी काय माहिती आहे ज्यामुळे तेत्सुयो कष्टित होतो? हे वाचताना जपानी लोकांबद्दल जपानी लेखिकेकडूनच बरंच काही समजतं. जपानी लोक काम अगदी निष्ठेने करतात. सेवा देण्यात कुचराई करत नाहीत. जपानी टॅक्सी ड्रायव्हर, नोकर, वेटर तुम्हाला उत्तम सेवा देतात पण दिलेली बक्षिसीही नम्रपणे नाकारतात. न्यूयॉर्क, टोकियो, सिंगापूर ही या कथेतील महत्त्वाची स्थळं. जिमी, पॉल, मायुमी, अकिरा, सॅण्ड्रा या पात्रांची कामगिरी. अशा साखळीने ‘जॅपनीज ऑर्किड’ वाचावे लागते. सॅड्राने उघड केलेले रहस्य वाचून वाचक अंतर्मुख होतो. लेखिकेच्या मते ‘दु:ख हे एकटं असतं तेव्हा ते बिकट प्रश्न घेऊन समोर येतं. तेव्हा त्याला तोंड देण्यासाठी एकट्यानेच सामोरं जावं लागतं. दुसरं कुणीही तुमच्यावर कितीही प्रेम करत असलं तरी तुमचं दु:ख तुम्हालाच सोसावं लागतं. दु:ख हे मृत्यूसारखंच अगदी वैयक्तिक असतं. ते एकट्यालाच सहन करावं लागतं. ‘जॅपनीज ऑर्किड’ ही एक अनुवादित कादंबरी आहे. याच्या मूळ लेखिका आहेत रेई किमुरा आणि अनुवादक आहेत स्नेहल जोशी. मूळ जपानी लेखनातला आशय अनुवादिकेने भारतीय पद्धतीत बेमालूम मिसळला आहे. भाषा सोपी आणि ओघवती आहे. वाचताना पुढे काय असेल याची उत्कंठा वाटते. डीएनएवर संशोधन करून नाव मिळवलेल्या वैज्ञानिकालाच त्याच्या जन्माची काहणी समजून घेण्यासाठी जंग जंग पछाडावे लागते ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे. या मध्यवर्ती कल्पनेभोवती लेखिकेने कल्पनाशक्ती वापरून केलेल्या लेखनाला पूर्ण गुण देता येतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more