* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HEAL YOUR HEART WITH EECP
  • Availability : Available
  • Translators : ASHWINI GHAISAS
  • ISBN : 9788184983982
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IF YOU SUFFER FROM OR ARE AT RISK FOR HEART DISEASE, SURGERY AND INVASIVE PROCEDURES ARE NOT YOUR ONLY OPTIONS. THERE IS A NONINVASIVE, SAFE, AND PAINLESS TREATMENT THAT IS CLINICALLY PROVEN TO BE MORE SUCCESSFUL IN REVERSING THE EFFECTS OF THE DISEASE, IMPROVING BLOOD CIRCULATION, AND STRENGTHENING THE CARDIOVASCULAR SYSTEM, ALL FOR A FRACTION OF THE MEDICAL COSTS. THIS GROUNDBREAKING PROCEDURE IS CALLED ENHANCED EXTERNAL COUNTERPULSATION (EECP), AND IT HAS BEEN THE BEST-KEPT SECRET IN MEDICINE-UNTIL NOW.DOCTORS HAVE DISCOVERED THAT INVASIVE PROCEDURES THAT TREAT SPECIFIC ARTERY BLOCKAGES OFFER ONLY A SHORT-TERM FIX FOR THE UNDERLYING PROBLEM: POOR BLOOD FLOW. USING BLOOD PRESSURE CUFFS TO HELP PUSH BLOOD THROUGH THE BODY, EECP PROMOTES THE DEVELOPMENT OF NEW BLOOD VESSELS TO NATURALLY BYPASS CORONARY BLOCKAGES, RESTORING THE FLOW OF HEALTHY, OXYGENATED BLOOD TO THE HEART. AS A RESULT, EECP REDUCES OR ELIMINATES SYMPTOMS SUCH AS CHEST PAIN, FATIGUE, AND SHORTNESS OF BREATH; INCREASES ENERGY AND STAMINA; AND RETURNS HEART PATIENTS TO ACTIVITIES THEY THOUGHT THEY HAD GIVEN UP FOREVER. IN HEAL YOUR HEART WITH EECP, DR. DEBRA BRAVERMAN DISPENSES CRITICAL INFORMATION ABOUT THIS REVOLUTIONARY TREATMENT.EECP PATIENTS ARE LESS LIKELY THAN BYPASS, ANGIOPLASTY, AND STENT PATIENTS TO HAVE A HEART ATTACK OR REQUIRE HOSPITAL STAYS.EECP IS THE IDEAL WEAPON IN THE FIGHT AGAINST HEART DISEASE FOR PATIENTS BATTLING OBESITY, HIGH CHOLESTEROL, HIGH BLOOD PRESSURE, DIABETES, AND MORE.EECP BRINGS NONE OF THE RISKS OF SURGERY OR INVASIVE PROCEDURES AND IS PROVIDED IN AN OUTPATIENT SETTING.EECP IS APPROVED BY THE FDA AND MEDICARE AND COVERED BY MOST PRIVATE INSURERS, AND IT IS APPROPRIATE FOR NEARLY ALL HEART DISEASE SUFFERERS, REGARDLESS OF AGE, SIZE, OR OTHER MEDICAL CONDITIONS.
पेशंटच्या हृदयात अक्षरश: जान भरणारी शस्त्रक्रियाविरहित उपचारपद्धती ई.ई.सी.पी. म्हणजे एनहान्स्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. ई.ई.सी.पी.बद्दल मी यापूर्वी का ऐकले नाही? साशंकता, क्षोभ, आश्चर्य व आनंद अशा संमिश्र भावना मिसळलेला हा प्रश्न हृदयरोगाचे पेशंट व स्नेहीजन सतत आम्हाला विचारत असतात. संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेच्या कामाला चालना देऊन हृदयरोगावर उपचार करणारी ही शस्त्रक्रियाविरहित बाह्य उपचारपद्धती सर्वांना लाभदायक ठरावी. शंभरावर शोधनिबंधांमधून हिचे फायदे र्नििववादपणे सिद्ध झालेले आहेत. अशी ही ई.ई.सी.पी. सर्वांपर्यंत पोहोचावी. बायपास-अँजिओप्लास्टीइतकीच कार्यक्षमता असणारी ई.ई.सी.पी. अनेक हृदयग्रस्तांना माहीत व्हावी हा या अनुवादामागचा मूळ हेतू आहे. ``मी अगदी याचीच वाट पाहत होते. मला एक नवजीवन मिळाल्यासारखं वाटतं आहे. अंजायना पूर्ण गायब झाला आहे. बरं झालं मी ई.ई.सी.पी. घेतली.`` मधुमेह, रक्तदाब व हार्ट पेÂल्युअरने त्रस्त असणाNया चौNयाहत्तर वर्षांच्या मॅडलिन बार्इंचे उद्गार असंख्य हृदयरुग्णांना आशेचा किरण दाखवतील, अशी आशा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DEBRA BRAVERMAN #ASHWINI GHAISAS #HRIDAYVIKAR NIVARAN #हृदयाचे पुनरुज्जीवन करणारे ई.ई.सी.पी. तंत्र #HEALTHCARE & PSYCHOLOGY
Customer Reviews
  • Rating StarDIVYA MARATHI 20-08-2012

    ईसीपीने हृदयाचे पुनरुज्जीवन शक्य... ईसीपीसारख्या तंत्राचा वापर केल्यास हृदयाचे पुनरुज्जीवन शक्य असून, यामुळे निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते असा विश्वास डॉ. नितीन घैसास यांनी व्यक्त केला. निर्मला हार्ट केअर आणि शताब्दी हॉस्पिटलतर्फे आयएमए सभागृह आयोित ईसीपी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ईसीपी तंत्र कसे काम करते, हृदयरोगाच्या बाबतीत ते कसे, सहाय्यकारक आहे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डेबरा ब्रेव्हरमन यांच्या ‘हाऊ टू हील युवर हार्ट’ या पुस्तकाचा डॉ. अश्विनी घैसास यांनी अनुवाद केला. मराठी पुस्तकाचे निवृत्त न्यायाधीश प्रभाकर उमरीकर यांच्या हस्ते या वेळी प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. नियमितपणे व्यायाम केला तर इसीपी उपचार पद्धती अधिक काळ उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे जीवनसत्त्वाची कमतरता तपासून बघणे आवश्यक असून आहाराचे सांभाळणे गरजेचे आहे त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही, इसीपी ट्रीटमेंटच्या थिअरीला वैज्ञानिक मान्यता: जगातील बऱ्याच देशांनी दिलेली आहे. त्यामुळे जवळपास रोगांचे निदान होते. त्यामुळे हा उपचार करून घेण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. हे पुस्तक मी वाचलं असून यातील भाषा शैली ही अत्यंत रसाळ आणि चांगली आहे. डॉ. अश्विनी घैसास म्हणाल्या की, आपल्या शरीरातील सर्व इंद्रिये आणि अवयव सुरळीत कार्य करण्यासाठी सर्वस्वी हृदयाच्या पंपिंगवर अवलंबून असतात. जेव्हा हृदयाचे स्नायू कमजोर होतात तेव्हा हृदयाची शरीराला रक्तपुरवठा करण्याची ताकद कमी होते. या संबंधीचे सगळे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. -डॉ. घैसास ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more