* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW STARBUCKS SAVED MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9789353171414
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN HIS FIFTIES, MICHAEL GATES GILL HAD IT ALL: A MANSION IN THE SUBURBS, A WIFE AND LOVING CHILDREN, A SIX-FIGURE SALARY, AND AN IVY LEAGUE EDUCATION. BUT IN A FEW SHORT YEARS, HE LOST HIS JOB, GOT DIVORCED, AND WAS DIAGNOSED WITH A BRAIN TUMOR. WITH NO MONEY OR HEALTH INSURANCE, HE WAS FORCED TO GET A JOB AT STARBUCKS. HAVING GONE FROM POWER LUNCHES TO SCRUBBING TOILETS, FROM BEING SERVED TO SERVING, MICHAEL WAS A TRUE FISH OUT OF WATER. BUT FATE BRINGS AN UNEXPECTED TEACHER INTO HIS LIFE WHO OPENS HIS EYES TO WHAT LIVING WELL REALLY LOOKS LIKE. THE TWO SEEM TO HAVE NOTHING IN COMMON: SHE IS A YOUNG AFRICAN AMERICAN, THE DAUGHTER OF A DRUG ADDICT; HE IS USED TO BEING THE BOSS BUT REPORTS TO HER NOW. FOR THE FIRST TIME IN HIS LIFE HE EXPERIENCES BEING A MEMBER OF A MINORITY TRYING HARD TO SURVIVE IN A CHALLENGING NEW JOB. HE LEARNS THE VALUE OF HARD WORK AND HUMILITY, AS WELL AS WHAT IT TRULY MEANS TO RESPECT ANOTHER PERSON. BEHIND THE SCENES AT ONE OF AMERICA’S MOST INTRIGUING BUSINESSES, AN INSPIRING FRIENDSHIP IS BORN, A FAMILY BEGINS TO HEAL, AND, THANKS TO HIS UNLIKELY MENTOR, MICHAEL GILL AT LAST EXPERIENCES A SENSE OF SELF-WORTH AND HAPPINESS HE HAS NEVER KNOWN BEFORE.
अत्यंत सधन कुटुंबात जन्मलेले मायकेल गेट्स गिल तडजोडी आणि दुःख यांपासून नेहमीच लांब होते. लग्नानंतरही उपनगरात प्रशस्त घर, पत्नी, चार मुले, जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर नोकरी, सहा आकडी पगार असं सुखी आयुष्य ते जगत होते. त्याच दरम्यान अचानकपणे त्यांना एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. अशा परिस्थितीचा त्यांनी कधीही विचारच केला नव्हता. त्या दृष्टीनं त्यांनी कधी काही तजवीजही करून ठेवली नव्हती. त्याचदरम्यान त्यांचा घटस्फोट झाला. त्यांनी दुसरं लग्नही केलं. परंतु आर्थिकदृष्ट्या मात्र ते सावरू शकले नाहीत. त्याच वेळी त्यांच्या मेंदूमध्ये एक छोटी गाठ असल्याचं त्यांना समजलं. आर्थिक तंगी आणि आरोग्यविम्याअभावी उपचार घेणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु एक दिवस ‘स्टारबक्स’ कॉफी शॉपमध्ये बसलेले असताना तिथल्या व्यवस्थापनाचं काम सांभाळणाऱ्या क्रिस्टल नावाच्या एका कृष्णवर्णीय मुलीनं त्यांना ‘स्टारबक्स’मध्येच नोकरी देऊ केली. ज्या ठिकाणी कॉफी प्यायची त्याच ठिकाणी मायकेल आता लोकांना कॉफी देण्याचं काम करू लागले. गौरवर्णीय मायकेल आता एका कृष्णवर्णीय मुलीच्या आज्ञा पाळू लागले. प्रसाधनगृहाची साफसफाईही करू लागले. स्टारबक्समध्ये काम करणारे सर्वच जण एकमेकांना भागीदार किंवा पार्टनर अशी हाक मारत असत. सर्व जण समान आहेत ही भावना मायकेलमध्येही दृढ झाली. ‘श्रमप्रतिष्ठा’, ‘विनम्रता’ या मूल्यांचं महत्त्व त्यांना समजलं. सहकाऱ्यांमधील आपुलकीनं त्यांच्यात मोठं परिवर्तन घडवून आणलं. जीवन जगण्याची नवी दृष्टी ‘स्टारबक्स’नं त्यांना दिली. आयुष्यात पैसा सर्वकाही नाही, तर त्याशिवायही अनेक गोष्टींनी जीवन समृद्ध करता येतं, हे त्यांना समजलं. जिवाभावाचे मित्र आणि क्रिस्टलसारखी मार्गदर्शिका यांनी त्यांना जगण्याचं बळ मिळालं. गमावलेला आत्मविश्वास त्यांना परत देण्याचं काम ‘स्टारबक्स’नं केलं, हे मायकेल गेट्स गिल मान्य करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HOW STARBUCKS SAVED MY LIFE# MICHAEL GATES GILL# NEELA CHANDORKAR #नीला चांदोरकर#हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाइफ# मायकेल गेट्स गिल
Customer Reviews
  • Rating Starसंतोष रंगापुरे

    मागील आठवड्यात मेहता पब्लिशिंग चा मेसेज आला `How Starbucks saved my life` या पुस्तकाच्या मराठी अनुवादा बद्दल... पुस्तकाचे नाव काहीतरी वेगळे आणि अनोखे वाटलं आणि लागलीच पुस्तक घेऊन आलो आणि काय सांगू मित्रांनो पुस्तक जसे वाचायला सुरुवात केले तसे गुंतत गलो पुस्तकात... एक अद्भुत अनुभव आहे हे पुस्तक वाचणे म्हणजे... छोट्याच पुस्तकात जीवनाचा केवढा गहन अर्थ सांगितला आहे लेखकाने... खरच प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे अप्रतिम पुस्तक... वाचताना कधी टचकन डोळ्यात पाणी आले कळलेच नाही. जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर काम करणार्‍या माईक ला जवळजवळ 25 वर्षांच्या नोकरी नंतर अचानक कामावरून काढले जाते, नेहमीच उच्च वर्तुळात वावरणाऱ्या आणि अशी परिस्थिती उद्भवेल याची कल्पना देखील न केलेल्या माईकला हा खूप मोठा धक्का असतो. नोकरी जाते तसेच घटस्फोट देखील होतो आणि त्यातच मेंदू मध्ये कर्करोगाची गाठ आहे असे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा तर माईक वर अक्षरशः आभाळ कोसळते. भविष्याची कसलीही तरतूद न केल्याने माईक अक्षरशः रस्त्यावर येतो आणि अशाच विमनस्क अवस्थेत असताना क्रिस्टल हि Starbucks मधील मॅनेजर माईकला जॉब ऑफर करते आणि कसलाही विचार न करता माईक हि नोकरी स्वीकारतो. Starbucks मधील नोकरी मध्ये सुरुवातीला धांदरलेला माईक थोड्याच दिवसात रुळतो आणि अनवधानाने मिळालेली हि नोकरी अगदी मनापासून करायला लागतो अगदी मग ते स्वच्छतागृह साफ करण्याचे काम देखील... परंतु नोकरी करता करताच माईकला अनेक गोष्टी गवसत जातात, समोरच्या व्यक्तीला आदराने वागवणे, कुठल्याही कामाला कमी न लेखणे, नव नवीन आव्हाने स्वीकारणे अशा एक नाही तर अनेक गोष्टी माईक शिकत जातो आणि त्यातूनच त्याला जीवनातील खरा आनंद खरे सुख उलगडत जाते. याच नोकरीत त्याला अगदी जीवाभावाचे मित्र भेटतात, मुलांसोबत निर्माण झालेला दुरावा कमी होतो.... अशी कलाकलाने फुलणारी माईकची सत्यकथा आपल्याला जखडून ठेवते आणि खूप काही विचार करायला लावते आपल्या जीवना बद्दल देखील.... मित्रांनो तुम्ही आत्ता जे काही काम करत असाल त्यात तुम्हाला आत्मिक समाधान लाभत आहे का? नसेल तर नक्कीच विचार करा आणि स्वतः ला आवडेल तेच काम करा जेणेकरुन वेळ निघून गेल्यावर हळहळ वाटू नये. पैसा खूप महत्वाचा आहे परंतु सर्वस्व नाही. पैसा, कीर्ती या गोष्टी तुमच्या आंतरिक समाधाना पेक्षा आणि आनंदा पेक्षा नक्कीच जास्त नाहियेत फक्त हि गोष्ट माणसाला वेळ निघून गेल्यावर लक्षात येते.... म्हणुनच म्हणतोय.... जिओ जिंदगी जी भर के... क्या पता कल हो ना हो... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more