* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TODDLER TAMING: A SURVIVAL GUIDE FOR PARENTS
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984361
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 436
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AT LAST HERE IS PRACTICAL ADVICE--MIXED WITH HUMOR--FOR HOW TO COPE WITH THOSE DIFFICULTIES THAT TURN YOUR SWEET BABY INTO A HOLY TERROR, INCLUDING: TOILET TRAINING, TANTRUMS AND OTHER TRICKS, SLEEP PROBLEMS, FIDGETS, AND MORE. FEATURING SPECIAL ADVICE FOR WORKING MOTHERS AND SINGLE PARENTS, TODDLER TAMING STRIVES TO CALM YOUR FEARS, WITH ADVICE THAT REALLY WORKS!
अजाण मुलांना वळण लावणं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या, स्वच्छतेच्या समस्या सोडवणं सर्वच पालकांना कठीण जातं; पण त्यातही नोकरी करणाNया मातापित्यांना तर ती तारेवरची कसरतच वाटते. हे लक्षात घेऊन या पुस्तकात बालकांना संभाळण्याची कला हसत-खेळत शिकवली आहे. आपल्या बालकाचं संगोपन उत्कृष्टरीत्या करण्यासाठी धडपडणाNया सर्व पालकांसाठी हे पुस्तक म्हणजे ‘जादुई चिराग’ ठरेल! विशेषत: अवखळ मुलांचा संभाळ करता-करता ताणतणावानं थवूÂन गेलेल्या पालकांना हे पुस्तक संजीवनी देईल. बालसंगोपनासारखा विषय डॉ. खिस्तोफर ग्रीन यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत अत्यंत खेळकरपणे मांडलेला आहे. यामध्ये आधुनिक जगातल्या नव्या पिढीच्या पालकांना उपयुक्त ठरणारे अनेक मैत्रीपूर्ण सल्ले सापडतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HASATKHELATBALSANGOPAN #TODDLERTAMINGASURVIVALGUIDEFORPARENTS #हसत-खेळतबालसंगोपन #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHRISTOPHERGREEN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 28-05-2017

    एक काळ असा होता, की लहान मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे अन्य पालकांइतकाच मी ही गोंधळून गेलेलो होतो. पंचवीस वर्षांपूर्वी बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण घेताना मला लहान मुलांच्या वर्तनात काडीइतकाही रस नव्हता. आव्हानात्मक प्रसंग हाताळण्याच्या युक्त्याप्युक्त्या माझ्याकडे मुळीच नव्हत्या. इतर सर्वच प्रशिक्षणार्थीप्रमाणे माझीदेखील सहा महिन्यांकरीता मानसोपचार विभागात पाठवणी करण्यात आली. मानसोपचार विभागात या सहा महिन्यात मी बरंच काही शिकलो. इडिपस गंडापासून ते खच्चीकरण करणाऱ्या चिंता, दडपून ठेवण्यात आलेल्या भावना आणि वरकरणी दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यापर्यंत बरंच काही. जागतिक कीर्तीचे बालमानसोपचारतज्ज्ञ असलेले ऑस्ट्रेलियाचे एक श्रेष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक माझे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तसा माझा बहुतेक वेळ इतर मानसोपचारतज्ज्ञांचं आणि मानसतज्ज्ञांचं निरीक्षण करण्यातच जात असे. पण तरीही मलासुद्धा काही केसेस हाताळण्याकरता देण्यात आल्या होत्या. दर आठवड्याला माझे प्राध्यापक या सर्व केसेसची माझ्याबरोबर चर्चा करत असत आणि मला त्यांची अनुभवी मतं देत असत, पण तरीही बालसंगोपनतज्ज्ञ म्हणून मी अजूनही अनभिज्ञच होतो. त्यानंतर अचानक एका खोडसाळ बालकामुळे आणि त्याच्या गोंधळून गेलेल्या त्रस्त पालकांमुळे माझं सगळं विश्वच बदलून गेलं. मग मी मला मिळालेली नवी माहिती घेऊन पुन्हा माझ्या निरीक्षकासमोर बसलो, त्यांनी सगळं काही तपशीलवार ऐकून घेतलं. त्याच्या वडिलांनी मला पुन्हा विचारलं, पण आम्ही त्याचा खोडकरपणा आवाक्यात आणायचा तरी कसा? मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. त्यामुळे मी पुन्हा माझ्या प्राध्यापकांकडे परत गेलो आणि त्यांना सगळी माहिती दिली अन् म्हटलं. आता मात्र ते पालक माझ्यावर चिडायला लागलेले आहेत. आपण मुलाचा खोडसाळ स्वभाव बदलण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? या प्रश्नावर त्यांचं उत्तर काय होतं माहीत आहे? तुला आणखी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मी पुन्हा माझा मोर्चा त्या पालकांकडे वळवला, ते मला सांगत असलेल्या त्यांच्या मुलाच्या खोडकरपणाच्या कथांवर काहीतरी उपाय सापडेल. या आशेवर कित्येक आठवडे उलटले. कित्येक आठवडे निघून गेले आणि तरीही त्या नाठाळ मुलाच्या खोडकरपणात तसूभरही फरक न पडलेला पाहून त्या मुलाच्या आईची सहनशक्ती संपली आणि त्याचा पिताही वैतागला. मी माझं प्रशिक्षण संपवलं आणि विशेषतज्ज्ञांच्या पंगतीत जाऊन बसलो. त्यापुढील तीन वर्षांच्या काळात मला रोजच्या रोज दवाखान्यात आणि वॉर्डात खूपच रुग्णांना तपासावं लागायचं आणि त्यांच्यावर उपचार करावे लागायचे, पण ज्या विमान कर्मचाऱ्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझं खरं कुतूहल जागवलं होतं, ते कुतूहल मला राहून राहून मुलांच्या वागणुकीकडे खेचून घेत राहिलं. अशीच काही वर्षं गेल्यानंतर पालक मला शोधत यायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की मी माझ्या प्राध्यापकांना जे प्रश्न विचारत होतो, त्यांची उत्तर मला सापडलेली आहेत. मग पालकांच्या गटांकडून मला मुलांच्या झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयींबद्दल आणि त्याच्या वागण्याच्या समस्यांवर बोलण्यासाठी आमंत्रणं यायला लागली. लवकरच रेडिओवरही माझी भाषणं सुरू झाली. एके दिवशी एका पित्यानं माझं बोलणं ऐकलं, तो आपल्या मुलामुळे रात्र रात्र जागून अक्षरश: हैराण झाला होता. त्या मुलाचे आभारच मानायला हवेत! पालकांना काय हवं आहे ते मला माहीत आहे असं त्याला वाटत होतं आणि माझं सुदैव म्हणजे तो आंतरराष्ट्रीय प्रकाशक निघाला. त्यानं माझ्या दारात चक्क तळच ठोकल्यावर मी त्याला एक पुस्तक लिहून द्यायचं कबूल केलं. अशा प्रकारे या पुस्तकाचा जन्म झाला. गेल्या दोन दशकात जगात बरीच उलथापालथ झालेली असली, तरी एका गोष्टीत मात्र काहीच बदल झालेला नाही आणि तो म्हणजे बालकांचा व्रात्यपणा. बदलत्या काळाचा मुलांच्या अविचारीपणावर आणि वाट्टेल तशा वागण्यावर काहीही बदल झालेला नाही. स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हटवादीपणा जराही दबला गेलेला नाही. ही मुलं पूर्वीइतकीच चैतन्यानं आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सदाबहार जादूनं रसरसलेली आहेत. त्यामुळे थोडक्यात काय, तर २१ वर्षांपूर्वी पालकांना ज्या काळज्या आणि चिंता सतावत होत्या त्याच आजही त्रास देतच असतात. आधुनिक पालकही आपल्या नखरेल मुलाला जेवूखाऊ घालण्याच्या बाबतीत पूर्वीच्या पालकांइतकेच गोंधळून गेलेले आहेत आणि स्वच्छतेचे अंतहीन धडे देऊन देऊन जेरीला आलेले आहेत. आपल्या झोपेचं खोबरं करत धावपळ करून थकले भागलेले पालक दिवस उजाडायची वेळ होईपर्यंत चिडीला आलेले असतात. आपल्या चिरंजीवांच्या नाठाळ कारवायांनी हादरून गेलेले असतात आणि त्याच्या अगम्य सवयी पाहून हवालदिल झालेले असतात. त्यांच्या चिरंजीवांची बोटं एरवी गोंडस दिसणाऱ्या नाकांमध्ये अखंड खुपसलेली असतात आणि आतल्या चिकट द्रवाच्या तारांमधून ही मुलं आपल्या ‘कलेचं’ प्रदर्शन करत असतात. अशा परिस्थितीत बिचारे पालक जीवघेणा संघर्ष करत राहतात यात काहीच नवल नाही. ‘माझं काय चुकलं?’ असं विचारत राहतात. खरं म्हणजे काहीच चुकलेलं नसतं आणि इतकी तडतड करण्याचीही खरं तर काहीच गरज नसते. तुमचं मूल अगदी नाठाळात नाठाळ असलं, तरी त्यावरही उपाय आहेत. मुलांची बाल्यावस्था आनंददायी व्हायला हवी आणि तुम्हाला सांगतो, माझ्या मदतीनं ते नक्की शक्य आहे. तर मग चला, पाय घट्ट रोवून उभे राहा. बाह्या सरसावा आणि तुमच्या अपत्याच्या बालपणातली गंमत चाखायला तयार व्हा. -डॉ. खिस्तोफर ग्रीन ...Read more

  • Rating Starनंदा गोरे

    बेस्ट book

  • Rating StarLOKPRABHA 13 March

    मुलांना वळण लावणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, त्यांना घडवणं आणि आयुष्यात यशस्वी करणं ही अनेक पालकांसाठी तारेवरची कसरतच असते. पण आपल्यावरची पालकत्वाची जबाबदारी त्यांना मनापासून निभवायची असते. पण नोकरी व्यवसाय सांभाळून पालकत्व निभवायचं आणि तेदेखील हसखेळत, तर ते एक प्रकारचे आव्हानच असते. त्यामुळेच पालकत्वाचं शिवधनुष्य लीलया कसे पेलावे हे सांगणारे एक पुस्तक नव्या पिढीतील पालकांसाठी अत्यंत उपयु्क्त आहे. पालकत्वाचा बाऊ न करता आपल्या मुलांची निकोप वाढ करायची असेल तर हे विक्रमी खपाचे पुस्तक वाचावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more