* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOL GOL RANI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666182
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUR SURROUNDINGS AND THE HAPPENINGS IN THEM ARE PICTURED THROUGH THE STORIES IN THIS BOOK. MALVIKA, WHOSE LIFE IS SHATTERED BECAUSE OF THE BLANK CALLS, ROHAN WHO IS STUCK IN THE WEB OF PYRAMID MARKETING, MOM WHO IS SACRIFICING EVERYTHING JUST FOR PAPA`S FREEDOM…. WE ALWAYS HEAR OR READ ABOUT ALL THESE THINGS. WHEN SOME YESHWANT IS TRUDGING ALONG THE WAY WITH IMMENSE PERSEVERANCE, WE ALSO TRY TO HELP HIM AS MUCH AS POSSIBLE. WE ALSO WITNESS THE FALL OF SOME VERY SUCCESSFUL VIJA UNCLE. EVERY TOWN AND VILLAGE HOUSES PEOPLE LIKE WHIMSICAL APPA, HIS ADJUSTING DAUGHTER-IN-LAW WHO SUPPORTS HER HUSBAND AND HAS A NATURE TO ADJUST ANY WHERE HIS DAUGHTER NILU WHO IS DISTURBED BECAUSE OF HER FAMILY PROBLEMS. THESE STORIES HAVE THEM AS THE CASTS AND THAT IS WHY WE FIND THEM SO FAMILIAR AND DEAR TO US.
आजकाल आपल्या सभोवती घडणा-या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’यातील कथांमध्ये दिसते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजालात रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोडी करणारी ममी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणा-या यशवंतला मदत करणा-यांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नव-याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे त-हेवाईक झालेली आप्पांची मुलगी नीलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्या-फार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळेच या कथा मनाला भावणा-या ठरतात.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 08-01-2006

    हृदयस्पर्शी कथा... आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना अतिशय तरलपणे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी ‘गोल गोल राणी’ या कथासंग्रहात चितारल्या आहेत. पहिल्या शीर्षक कथेतील नायिका जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणीत सापडलेली. बॉसच्या थोबाडीत मारते. नोकरी सोडते. नवा आकाशला हे पटत नाही. त्यांच्यात दरी निर्माण होते. तिला चिटिंग करता येत नाही. गोल गोल राणी, इथे इथे पाणी या चक्रात अडकलेली भावनावश नायिका लेखिकेने रंगवलीय. ‘शुभमंगल’ कथेत लग्नाचं भावविश्व बघणारी नीमा दिसते. सासरची लहान जागा, माणसं जास्त, चित्रकार नवऱ्याच्या कलेवर नीमा भुरळलेली. पती नंदनला यश प्राप्त होण्यासाठी खूप प्रयत्न करते. प्रत्यक्षात एका वेगळ्या वास्तावाला तिला सामोरं जावं लागतं. मूल नाही म्हणून अपमान होतात. तिचे उदात्त विचार, प्रगती, मन हे गुण उंबरठ्याबाहेरच. सर्वांसाठी कष्ट घेते, पण याची जाणीव त्यांना नाही. तिची मातृत्वाची घुसमट, हतबलता ‘शुभमंगल’मधून जाणवते. टुरिस्टसाठी गाड्या भाड्याने देणाऱ्या विजाकाकाची व्यथा ‘ऋणानुबंध’ कथेतून उत्कट मांडलेली. कष्टाने श्रीमंत झालेला नंतर अपघाताने विजाकाकाच्या वैभवाची राखरांगोळी होते. सिग्नलवर दुसऱ्यांच्या गाडीच्या काचा साफ करणारा विजाकाका मन विषण्ण करून जातो. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनासाठी आहे. त्यावर सर्वस्वी अवलंबून राहू नये हे ‘दिशा’ कथेतून लेखिकेने मांडलंय. सांगितलेलं भविष्य खोटं ठरतं. त्याचे विपरित परिणाम नानांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरतात. पण नानी त्यांना सावरतात. तर ‘दिशाहीन’ ही सुद्धा ज्योतिषशास्त्रावर आधारलेली कथा आहे. या कथेत अखेरी ज्योतिष सांगणारे, लोकांना मार्गदर्शन करणारे भाऊसाहेब दिशाहीन ठरलेत, असं चित्रण आहे. ‘कुणी मला सांगाल?’ या कथेत महेश आणि मालकिवाचं भावविश्व सुरेख गुंफलय. मालविका महेशची पत्नी. खेड्यातून शहरात आलेली. लग्नानंतर तिचं जग बदलतं. हे नवीन जग तिला कसं वाटतं? निनावी फोनमुळे तिचं भावविश्व कसं बदलतं? याचं चित्रण सुरेख रेखाटलंय. ‘मृगजळ’ ही सुद्धा व्यथित करणारी कथा. एका डॉक्टरीण बाईचा एकुलता एक मुलगा रोहन कसा बिघडतो व तिचं जीवन कसं उदध्वस्त होतं? याचं चित्र लेखिकेने मन हेलावणारं उभं केलेलं. ‘फूट आणि फूटवेअर’ कथेत जिद्दीने कष्ट करून श्रीमंत बनलेल्या एका मुलाची कथा आहे. जोरात चाललेल्या व्यवसायात वडिलांचा मोह नडला त्यामुळे लहान सीमाच्या जीवनात निर्माण झालेलं वादळ अतिशय भावुकपणे लेखिकेने मांडलेलं आहे. तरुण झाल्यावर तिच्यावर कोणते प्रसंग ओढवतात? आईवडिलांचं न मिळालेलं प्रेम, सहवास. आई रात्र रात्र बाहेर, तर वडील दारूच्या नशेत. वडिलांवर आलेलं संकट आई स्वीकारते पण आईचं संकट सीमा स्वीकारते का? ही कथा सुद्धा उत्कृष्ट मांडलेली. लेखिकेने निवडलेले विषय अन् मांडणी सरस. भाषाशैली उत्तम. उदाहरण द्यायचं तर ‘मानापानावरून रूसलेल्या सासरच्या सावल्या सोबतीला होत्या.’ ‘आनंदाचा बहर किंवा वेदनेचा सूर प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतो.’ ‘माझ्या हातातल्या ब्रशमध्ये नीमाचा स्पर्श, कॅनव्हासला तिचा सुगंध, तर रंगांना तिचा स्वर आहे. चित्र पूर्ण होते ते तिच्या वात्सल्याने!’ अशी वाक्य सहज भावस्पर्शी मनाला सुखावतात. -रमेश उदारे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 12-02-2006

    समाजात आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब या स्वाती चांदोरकर यांच्या संग्रहातील दह कथांमधून दिसते. ब्लॅक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजानात अडकलेला रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोड करणारी ममी, परिस्थितीशी गडणारा जिद्दी यशवंत, विक्षिप्त अप्पा अशी किती तरी पात्रे थोड्याफार फरकाने आपल्याला समाजात पाहायला मिळतात. त्यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 8-1-2006

    कधी काय घडणार, हे आधीच ठरलेलं असते, असे सर्वसाधारण सर्वचजण म्हणतात... जी ती गोष्ट त्या त्या वेळीच घडते. पण माणसाला प्रत्येक गोष्टींची घाई असते. त्या अदृश्य शक्तीचं नियोजन माणूस स्वीकारू शकत नाही ते ह्याच कारणाने. मग चुटपुट लागून राहते. अगदी सहजतेने वधान केले जातं, ‘‘अरेरे, हे आधी घडलं असतं तर...?’’ घडून गेलेल्या गोष्टींवर पश्चाताप करण्याची वेळ माणूस स्वत:च्या आयुष्यात वारंवार आणतो. आजकाल आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’ मधील कथांमध्ये दिसते. भावनांचा होणारा कोंडमारा आणि त्याचे दारूण परिणाम येणाऱ्या बाळांवर किती भयानकपणे होतात आणि एकाबरोबरच कुटुंबातील सगळ्यांनाच त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतात, याचे विदारक चित्र उलगडणारी ‘गोल गोल राणी’ ही कथा चुटपुट लावून जाते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजाळात अडकून संपलेला रोहन, श्रीमंतीच्या हव्यासापायी भरकटलेला पती, पप्पाला वाचविण्यासाठी विलक्षण तडजोड करणारी मम्मी आणि तिची मुलगी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणाऱ्या यशवंतला मदत करणाऱयांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नवऱ्याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे तऱ्हेवाईक झालेली आप्पांची मुलगी निलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्याफार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पहायला मिळतात आणि यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more