* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GABAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988772
  • Edition : 3
  • Publishing Year : 1983
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR WHO IS NOW AN ASSOCIATE PROFESSOR IN THE DEPARTMENT OF EDUCATION AND SOCIAL SCIENCES IN NASHIK BELONGS TO THE NOMADIC JOSHI (ASTROLOGERS LOW IN THE CASTE HIERARCHY) TRIBE IN MAHARASHTRA. GABAL IS HIS AUTOBIOGRAPHY WHICH COVERS HIS CHILDHOOD AND EARLY YOUTH. AS HIS FAMILY HAD NO PERMANENT RESIDENCE, DADASAHEB HARDLY HAD AN OPPORTUNITY TO ATTEND SCHOOL, AND UNTIL THE AGE OF ALMOST SEVEN, HE TOOK TO THE FAMILY TRADITION OF BEGGING AND EARNING HIS LIVELIHOOD. AGAINST ALL ODDS SUCH AS ABJECT POVERTY, SUPERSTITION, DISCOURAGEMENT FROM THE ELDERS IN THE COMMUNITY, DADASAHEB CONTINUED HIS EDUCATION UNTIL GRADUATION. AFTER COMPLETING HIS HIGHER SECONDARY, HE SUPPORTED HIS EDUCATION INITIALLY BY DOING MENIAL JOBS AND LATER ACTING, AND BY SCHOLARSHIP. THE TITLE OPENS A WINDOW ON THE LIFE OF THE DOWNTRODDEN, AND PARTICULARLY THEIR DIALECT.
मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- `कुडमोडे जोशी` या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, त्यांच्या व्यथा, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीवन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GABAL #GABAL #गबाळ #AUTOBIOGRAPHY #MARATHI #DADASAHEBMORE "
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    वाचून डोकं सुन्न करणारा पुस्तक. लेखक दादासाहेब मोरे त्यांना जेव्हा पासून समजायला लागलं, तेव्हा पासून ते ज्या जमातीत जन्मला आले त्या भटक्या जमातीची दुःखी व्यथा, त्यांची समाजात होत असलेली उपेक्षा, त्याचं जीवन हे या पुस्तकात उभं करण्याचं प्रयत्न केलाआहे. मिरज तालुक्यातील बाजार सलगरे शहरवजा खेडेगाव असलेल्या ठिकाणी एका कोंडिबा कुंभाराच्या शेतात ही भटकी जात वर्षातून एकदा नोव्हेंबर ते डिसेंबर एक महिना मुक्कामाला असायचा, दोन काठ्यावर पोती टाकून तयार केलेलं पाल म्हणजेच त्यांच घर. पालासमोर तीन दगड आणून ठेवायचे, रानातून लांकड गवऱ्या गोळा करून आणायचा. आणि आपली चूल पेटवायची. पाला समोर एक मोठा दगड आणून ठेवायचे, आणि त्यावर बसून अंघोळ करायची. बायकांनी देखील तिथंच अंघोळ करायची. त्याना लाज वाटायची नाही, बहुतेक त्यांच्या जीवनाच्या हिशोबात राजेच खातं उघडलं नसावं. त्या पाच एकरात जत्रा भरवल्या सारखी असायची. फक्त दुःख आणि लाचारी यांची देवघेवचं या जत्रेत चालत होती.अश्या पालाच्या जमातीत लेखक जीवन जगत मोठे झाले. दुसऱ्यांना खोटं सांगून त्याच्या कडून एखादं कोंबडी घेऊन खोटं म्हणजे तुझ्या घरात सूख निर्माण करतो, तुझ्या मुलांनी तु़झ ऐकांव असं करतो, तुझ्या संपत्तीत बरकत निर्माण करतो. असे खोटे सांगून त्या बदल्यात एखादी कोंबडी घ्यायची. या समाजाला समजत नाही का..? आम्हाला संपत्तीच्या शिखरावर उंभ करणारा माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार भीक का मागत फिरतो ? सुखी होण्याच्या खोठ्या आशेने समाज अश्या लोकांना कोंबड्या देतो. हे नवलच आहे. ...Read more

  • Rating StarPROF. DATTA JADHAV

    आदरणीय दादासाहेब, आपलं आत्मचरित्र वाचलं. थक्क झालो. मनाला विश्वास बसत नव्हता. एखादा काल्पनिक, जीवनपट वाटत होता. हे सर्व काल्पनिक नसून वास्तविक आहे, याने जगण्याला बळ व अस्तित्व नसणाऱ्याना आत्मभान मिळते. आपल्या सहचरिणी सौ. विमल मोरे यांचे आत्मकथन प्रमतः वाचले, तद्नंतर पुढील आयुष्याबद्दल अगम्य राहिला असता. अशा समाजातील व्यक्ती शिकून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. स्वाभिमानाने हे केवळ भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही आपल्या समाजाला इतका संघर्ष करावा लागतो, हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, त्या केवळ भारतीय संविधानाची योग्य व पूर्णता अंमलबजावणी न केल्यामुळेच. तुमच्या जीवनातील मानका आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. देव दगडात नसतो, तो माणसात असतो. अशिक्षित असूनही आपल्या वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी खूप त्याग केला. स्वतःच्या मुलीच्या लग्नात ते नवीन कपडेही घेऊ शकले नाहीत, हा त्याग पराकोटीचा आहे. जतला शिक्षणाला असताना तुम्ही जत ते इंचलकरंजी केलेला प्रवास आई मुलाचे निस्सिम व प्रखर प्रेम व्यक्त करते. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. लाड, पाटील यांनी तुम्हास आत्मबळ दिले असे गुरुजण आज तुरळक आहेत. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा स्नेहजिव्हाळा, नकोत नुसती नाती. आपल्या घरांना मातीच्या भिंती कदाचित त्या काळात नव्हत्या पण प्रेम, स्नेह, जिव्हाळा, त्याग, विश्वास यांच्या भिंती अभेद्य होत्या. या भिंतीच आज जागतिकीकरणाच्या काळात धूसर झाल्या आहेत. सर्वकाही असूनही जे लोक नशिबाला दोष देतात त्यांच्यासाठी आपले आत्मचरित्र एखाद्या मार्गदर्शकासारखे आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 5-6-2016

    मराठी साहित्यात आत्मकथन हा एक प्रमुख प्रवाह आहे. आत्मकथन हे कित्येकदा आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहण्याच्या इच्छेने केलेले असते तर कधी गत आयुष्यातील घटनांच्या स्मृतींचा, त्यांच्या अवलोकनाचा पट असतो. कधी समाजातील उपेक्षित, शोषित वर्गाचे वेदनमय कथन असते. ‘गबाळ’ हे दादासाहेब मोरे लिखित आत्मकथन म्हणजे ‘कुडमुडे जोशी’ या जमातीचे भटक्या अस्तित्वहीन, पीडित वर्गाच्या पशुतुल्य जीवनाची वेदनामय करुण कहाणी आहे. ‘गबाळ’मध्ये लेखकाच्या बालपणापासून दु:खाची परिसीमा नसलेले जे उपभोग वाट्याला आले व आजही ती जमात तेच दारुण जीवन जगत आहे त्याचे वास्तव चित्रण आहे. भटक्या जीवनाचा अनुभव घेत पोटापाण्याचा कोणताही व्यवसाय न करणारी ही जमात भीक मागून पोट भरते. गावकुसाबाहेर पालं टाकून गावागावातून भीक मागत फिरणे हेच प्राक्तन. समाजातील इतर जमाती यांच्याकडे चोर म्हणून बघून त्यांना पशुतूल्य वर्तणूक देतात. पिंगला पक्ष्याच्या माध्यमातून लोकांना भविष्यकथन करणे व त्याबद्दल भाकरीचे तुकडे मिळवणे हा त्यांचा उद्योग. हे भविष्यकथन म्हणजे समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, रुढी, अशिक्षितपणाचे वास्तव कथन. लेखकाचे वडिलांना आपल्या मुलाने शाळेत जावे, शिकावे व या लाजिरवाण्या अवस्थेतून बाहेर पडावे असे वाटत होते. वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लेखक शाळेत जाऊ शकला. लेखक म्हणतात,‘‘मी भीक मागायला जात होतो व अभ्यासही करत होतो. माझ्या जीवनाचे दोन रस्ते निर्माण झाले होते. मी कोणत्या रस्त्यावरून जाणार होतो ते मलाच माहीत नव्हतं.’’ शिकत असताना लेखकाला अनेक शिक्षकांची, सहृदय व्यक्तींची, आजीची मोलाची मदत मिळत गेली - निंबोणी गावचे गुरुजी, पाटील गुरुजी - पण अनेक वेळा पैशाअभावी शाळा सोडण्याची पाळी आली व ‘हाडप’हाती आलं. भाकरी मागण्यासाठी कधी भगुली घेऊन दारोदार फिरत होतो. शालेय जीवनातून लाचार जीवनात प्रवेश केला होता. आत्महत्या करावी असं वाटत होतं. एस.एस.सी.ला फर्स्ट क्लास मिळवून लेखकाने जिद्दीने यश मिळवलं होतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामपंचायतीत बोटींग मशीनवर, गटार साफ करणे ही कामे केली. महाविद्यालयीन काळात लेखकाच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. गॅदरिंगमध्ये नाटकात कामे करणे, कलापथकात काम करणे यामुळे एका सहृदय व्यक्तीमुळे तेथील गणेशोत्सवात काम व पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविद्यालयातील देवधर सरांमुळे होस्टेलची सोय झाली. शिक्षणाचा व कलेचाही विकास होत होता. अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत, कित्येकदा उपाशीपोटी राहूनही लेखकाने शिक्षण पूर्ण केले. पण त्यांच्या जमातीची परिस्थिती मात्र तशीच होती व आहे. लेखकाने एक दाहक सत्य सांगितलं, गबाळ घेऊन गावोगाव फिरण्याचं. ‘आमच्या जमातीतील प्रत्येक माणूस, रानातच जन्माला येत होता व रानातच मरत होता.’ कुडमुड्या जोशींचं हे निराशादायक चित्र लेखकाने उभं केलं आहे. तरीही त्याच्या मनात एक आशादायक चित्र उभारताना दिसलं. ‘मनात अनेक पहाटा उजाडल्या होत्या. वाट पहात होतो प्रत्यक्ष जीवनात पहाट उगवण्याची.’ ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 2-7-2016

    मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- ‘कुडमोडे जोशी’ या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more