* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GULMOHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667493
  • Edition : 18
  • Publishing Year : DECEMBER 1970
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME SUGGESTS THE FOUNDATION OF THE STORIES. THIS IS AN EXCLUSIVE COLLECTION OF ONLY 8 STORIES BASED ON SOME WHIMSICAL CHARACTERS. EVERY MAIN CHARACTER IN ALL THESE STORIES HAS ONE THING IN COMMON. IN A TRUE SENSE, THEY ARE NOT WHIMSICAL; ACTUALLY THEY HAVE SET THEIR OWN DOCTRINES AND HAVE STUCK TO THEM, NO MATTER WHATEVER HAPPENS. IN ONE OF THE STORIES, THE HERO DIES JUST BECAUSE OF HIS DOCTRINES. THE OTHER STORY IS BASED ON THE MENTALITY OF BEING LAME; IT PROVES THAT MANY A TIMES THOSE WHO ARE PHYSICALLY DISABLED ARE MORE FIRM THAN THOSE WHO ARE PHYSICALLY CAPABLE OF DOING EVERYTHING BUT HAVE A LAME AND LIMP MIND. ONE STORY IS BASED ON THE INSECURITY; HERE THE HEROINE WHO HAD REFUSED SOMEONE WHOM SHE LOVED SO MUCH COMES INTO CONTACT WITH HIM AGAIN. SHE FEELS THAT HE WILL BLACKMAIL HER BUT FAILS TO UNDERSTAND HIM, AT THE END, THOUGH VERY BEAUTIFUL, HER INSECURE MIND SHOWS ITS UGLINESS. EACH AND EVERY STORY HAS SOME SPLENDID FELLING OR OTHER TO SHARE WITH US, TO REVEAL THE VASTNESS AND THE INSULARITY OF THE MIND.
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्यानिळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुहाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसया घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाया फांद्या चुकवीतचुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहानलहान होत होतं.गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्यानिळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुहाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसया घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाया फांद्या चुकवीतचुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहानलहान होत होतं.गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्यानिळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुहाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसया घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाया फांद्या चुकवीतचुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहानलहान होत होतं.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating Starनमिता नितीन आफळे

    वपुंच्या आधी आणि नंतरही कोणीही वपु होणं अशक्यातीत. ज्यांची पुस्तकं पारायणं करुन वाचली तरीही एकीकडे तितकीच कोरी करकरीत आणि त्याच वेळेस अगदी आपलीशी वाटतात, त्या वपुंच्या पुस्तकाचा परिचय देणं हे माझ्या दृष्टीनं सभ्यसभ्य अवमानच खरं तर....... कारण वपु ाचायचे असतात, उद्धृत करायचे असतात, हळव्या क्षणी आठवायचे असतात, रोमान्स करतानाही ते पटतात, कातर वेळी सोबत करतात, घोळणारी वाक्यं तिच्याही मनात, अन् त्याच्याही डोळ्यात..... अहो, वपु तर..... वाचायचे असतात हो !!!! पण आज धारिष्ट्य करणार आहे मी हे. माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. गुलमोहर - कथासंग्रह ज्या कथेच्या नावानं आहे त्या गुलमोहर कथेतले दिवाकरपंत. "आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं कसं सोपं होऊन जातं." असं भाग्य लाभलेले दिवाकरपंत. त्यांचं त्यांच्या लेकीच्या "चक्कर" नवऱ्याच्या वागण्यानं आवारात गुलमोहर असलेल्या बंगल्याचं आयुष्यभर जपलेलं स्वप्न विसरून जाणं आणि आपल्या मुलीला पायावर उभं राहण्यासाठी ती रक्कम ठेवण्याचा विचार करणं. एखाद्या संकटानं दोन जवळच्या व्यक्तींवरही किती वेगळे परिणाम होतात, याचं उदाहरण. "आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दुःख एकच आहे.." गांधारीपण म्हणजे नियतीनं आपल्याला देऊ केलेल्या परिस्थिती आणि माणसांना स्वीकारणं, त्यांच्या पातळीला जाऊन. गांधारी होणं हे आजन्म जाणूनबुजून घेतलेलं दुष्कर असं व्रत आहे. "एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो." "स्वर माणसांची फसवणूक नाही करत कधी. स्वर हा नेहमी सच्चा असतो. आपण तो नीट लावला की तो हजर होतो समोर." किती खरं लिहावं नाही !!! हे वपु !! "एकटा" कथेतला विशा..विश्वनाथ. भूकेपोटी चोरी करण्याच्या कृत्याची क्रूर शिक्षा भोगतोय म्हणून एका हळव्या क्षणी मोकळं होण्याऐवजी आजन्म घेतलेला सल...अनपेक्षित चटका लावणं हे वपु..... "भरती" कथेतल्या उपेंद्र-इरावतीचं लग्नानंतर कित्येक वर्षांनही आकंठ प्रेमात असणं....."या चाकोरीची या देहाला इतकी सवय झालीय की, आता अभिनय उरलाच नाही." असंही युगुल असतं !!! वपुंच्याच कथेतनं पटतं.... "आपल्या नजरेनं पाहणं" म्हणजे काय असावं, याची पराकोटीची परिस्थिती "नजर" कथेतनं वाचली. मालकानं "आपल्या नजरेनं पहावं" या भोळ्या समजुतीनं चक्क आपला एक डोळा त्यांना देणारा आणि कमाल म्हणजे त्याचा गवगवा न करणारा सच्चा कामगार आबा देवकुळे. "दहावा ग्रह" म्हणजे लग्नसंस्थेवरचे भिन्न विचारांचे वडील आणि मुलगा. "उत्तम विचाराची मुलगी हवी" या विचारानं मुलाच्या तोंडून "...विचारांचं साहचर्य कधी मिळालं नाही आणि सौंदर्याचाही उपभोग लुटता आला नाही." हे असं थेट लिहितात ते वपु !!! लगेचच चाचपणी होते मनातल्या मनात गुपचूप....विचारांचं साहचर्य....?? "सर" मधल्या अपरिचित आहेत म्हणून मन मोकळं करणाऱ्या आईचं अगदी आपल्या आसपासच वावरणारं मन .....स्पष्ट आठवतं आणि त्याच वेळेस सगळं सगळं सांगणारी "तारी" आपल्यालाही दिसू लागते आणि तिला पटकन मागे वळून उत्तर देणं योग्य नाही, हेही पटतं !!! "अढळपद" - दिवंगत पत्नीच्या बहिणीशी विवाह झाल्यानंतर पुरुषाची होणारी उलघाल, मनाची आंदोलनं, त्या पत्नीचीही नवी ओळख होण्यासाठी चाललेली धडपड आणि मग मात्र दिलेली प्रांजळ कबुली...पुरुषातला हळवेपणा आणि स्त्रीची सक्षम बाजू वाचावी ती वपुंच्याच लिखाणातनं. "मुक्तछंदा"तल्या मुक्ताचा पाहताक्षणी जडलेला जीव आणि मेव्हण्यापाशी दिलेली "हरवण्याच्या क्षणाची" कबुली....मी फक्त वाहत होते....तसा क्षण एकदाच आला...आणि तो येण्यापूर्वीच गेला...मोहोरण्यापूर्वीच सुकला." "शिळा अहिल्या" तरल भावना, वाटणारा विश्वास आणि समाजमान्यतेचे संकेत....ही कथा समजण्यासाठी पुन्हा एकदा वाचावी लागली मला....तेव्हा साकारली शिळेतून मुक्त होणारी अहिल्या !! "पुरुष" वाचल्यावर चीड संताप आणणारे समाजात उजळ माथ्यानं वावरणारे कितीतरी "बाॅस".... आठवलेच. "शोध" मधला डिप्लोमॅटिक रवींद्रचा नाहीसं होण्याचा प्रसंग !! सगळी उलघाल आणि मिश्किलपणा... "घरोघरी" मधल्या जगाच्या रंगभूमीवरचा प्रेमलताबाईंचा आदर्श संसार वाचून आपणही त्या अभिनयसम्राज्ञीपुढे लवतो नकळतच.... वपुंच्या एका टेलिस्कोपमधनं ते एकंदरीतच किती भावना टिपू शकतात याची कल्पनाही येत नाही. मानवी भावभावनांचा जर स्पेक्ट्रम धरला तर पलीकडून वपुंचं लिखाण असेल तरच ती सप्तरंगांची उधळण दिसेल असं मला कायम वाटतं. त्यापलीकडेही त्यांच्या लिखाणाच्या सहजतेची जादूच वाटते. एकेक प्रसंग नाटकाचा पडदा दूर व्हावा तसा उलगडत जातो. आणि आपण त्या कथेत गुंगून, रंगून जातो. गुलमोहर हा एक कथासंग्रह आहे ज्याचा परिचय देण्याचा मम अल्पमतीनुसार मी तोकडा प्रयत्न केला आहे. ता.क. - चांगली बाब अशी आहे की मी परिचय कसाही दिला असला तरी त्यामुळे वपुंच्या आपल्या मनातल्या स्थानात तिळमात्र फरक होणार नाही कारण ते तर अढळपदी विराजमान आहेत आणि राहतील. वपुमय वाचनाच्या आणि तत्पश्चात लिखाणाच्या मनभरून शुभेच्छा !!! || इति लेखनसीमा || ...Read more

  • Rating StarShailaja Khade-Patil

    आयुष्यातील सुखाधीन तृप्ततेचा आनंद घेताना आपण स्वत:च गुलमोहरातलं तांबड फुल होणं म्हंजे नेमकं काय असतं..हे वेड लावणा-या व.पुं. च्या शब्दांमुळे कळत. याहुनही "दु:खातही एक सौख्य असतं" अशी कधी कधी मनाची विलक्षण अवस्था होऊन, आहे त्या परिस्थितीत, आपल्या आनंदची जागा दुस-याच्या समाधानाला द्यावी इतकी सुप्त, तीव्र त्यागी वृत्ती माणसाची बनते न्हवे तर ती बनावी असचं काहीसं `गुलमोहर` वाचताना होतं. "ज्या माणसात मन नाही त्याला `मनुष्यपण` नाही" असा स्वर व.पुं. आपल्या काळजाचा ठाव घेणा-या कथांमधुन, थेट अंत:करणाच्या तळापर्यंत पोहोचतो तेव्हा मनाला चकवा देणा-या कित्येक गोष्टी आपसुक आठवुन डोळ्यांमध्ये टच्च भरुन येऊन, व थेट पानांवरच़्या शब्दांवर जाऊन ओघळतात..तेव्हा शब्दही माणसांसारखे बोलु चालु लागतात ह्याला म्हणतात लेखणीची ताकद..! आयुष्यातल्या चांगल्या व वाईटाची खुपच साधी, सोप्पी व सरळ व्याख्या या निमित्ताने आपल्याला कळते.."ज्या काही घटनेत आपण स्वत:ला विसरुन जातो ते चांगलं" असं जेव्हा व.पु. बोलुन जातात तेव्हा ऊगाचच मन मारुन, मुटकून जगताना व तत्वांच्या अधिष्ठानात स्वत:ला पारखतानाच्या कसोट्या निव्वळ शुन्य होऊन जातात. एवढ सोप्पय जगणं.. फक्त आपल्याला लालगच्च, मोहोरलेल्या `गुलमोहरासारखं` इतरांना आनंद देणारं, सदोदित टवटवीत पण वेळप्रसंगी स्वत:च्या यातनाही स्वत:शी कवटाळुन, कोसळण्याइतपतची तयारी करत जगता यायला हव..! ©️®️✍️शैलजा खाडे-पाटील, शब्दशैली❤ कोल्हापुर.🤘 ...Read more

  • Rating StarManoj Mohale

    मला असं वाटत कि वपु चे पुस्तक वाचताना ते काय लिहतात आणि ते लिहलेलं समजण्यासाठी माणसात एक वेगळा गुण असावा लागतो! अस मला राहुन राहुन वाटत कारण कोणाला हि वपु समजेल अस नाही आवड आपली आपली 😊 बर मी जेव्हा हे पुस्तक आणलं दोन कथा वाचत असतांना मला जास्त रस वाला नाही.मला वाटलं साल आता हे काही पुस्तक माझ्या पचनी पडणार नाही तरी हि तिसरी कथा वाचली मग काय जसे पत्ते खेळत असताना एक दोन डाव हरल्या नंतर चला तरी तिसरा😉डाव खेळावा म्हणून तिसरी कथा वाचली मग काय मी चाट 😇🤔😁वपु जिंकले होतो नेहमी प्रमाणे माझा सुद्धा वाचायला हुरूप वाढला खर म्हणजे माझी मनापासून वाचायची ईच्छा नव्हती/ मुड नव्हता तरी तिसऱ्या कथे पासुन जे चटक😉😋लागली काही विचारू नका मी तर मस्त मजेत वाचत गेलो पण शेवटी नेहमी प्रमाणे विचारात मी पडलो वपु किती मनातलं लिहतात हे सगळं कुठे तरी घडलं आहे किव्हा घडणार आहे किव्हा घडेल असेल,वाटतं वपु चे विचार काय भन्नाट असतात मला खरच नेहमी म्हणावं वाटत वपु आपण ग्रेट आहात किती मोठा खाऊ तुम्ही आमच्या सारख्या रसिक वाचक वेसनी लोकांना साठी तुमचा अनमोल ठेवा तुम्ही निघुन गेले तुम्ही विचारांच्या किती तरी पुढे होता हे निदान मला आज तरी समजलं v p u you`re really ग्रेट 🙏 म्हणूच तर तुम्ही आम्हा सर्वांचे ग्रेट आहात आणि राहणार आहात... ...Read more

  • Rating Starअरुण घाटे

    लोकविलक्षण माणसांच्या चाकोरीवेगळ्या कथा... व. पु. काळ्यांच्या कथा नेहमी वेगळे, चाकोरीबाहेरचे असे काहीतरी सांगतात. त्यांच्या कथांतून आपणांस भेटणारी माणसेही विलक्षण वरवर पाहायला सामान्य, पण सर्वांहून वेगळी आहेत. प्रत्येक माणसाचे काही लोकविलक्षण असे वे आहे. जगावेगळी निष्ठ आहे. प्रत्येक माणसाची जगाला न पटणारी, सामान्य माणसांपेक्षा वेगळी विचारसरणी आहे. त्यांच्या कथेतील अनुभवही वेगळ्या धाटणीचे काही वेळा अतर्क्य आहेत. त्यांची बांधणी पुष्कळ वेळा योगायोगातून होते. अशी लोकविलक्षण माणसे, केवळ योगायोगच म्हणावा लागेल असे प्रसंग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही भेटत असतात. तथापि आपण अशा काही गोष्टी दुसऱ्यांना सांगून त्यांना त्या पटवणे आपल्याला जमत नाही. व. पु. काळे हे अवघड काम सिद्धहस्तपणे करतात. अर्थात अशी सर्वस्वी वेगळी माणसे, अशा योगायोगाच्या गोष्टी एकत्र भेटल्या तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. व. पु. काळ्यांच्या ‘गुलमोहर’ या नव्या कथासंग्रहातील कथा तर सांगायचं झालं तर ‘एकटा’, ‘दहावा ग्रह’, ‘शिळा अहिल्या’, ‘पुरुष’ इ. गोष्टी पाहाव्यात. ‘एकटा’चा कथानायक विश्वनाथ खायलाप्यायलादेखील पैसा राहत नाही. तेव्हा चोरी करतो एका लहान मुलीच्या हातांतील बांगड्यांची. चोरी करताना त्याचा मुलीच्या तोंडावर हात दाबला जाऊन श्वास कोंडला जातो व ती मुलगी मरते. पोलिसांच्या नजरेला विश्वनाथ खुनी म्हणून सापडत नाही. पण त्याला स्वत:ला तो अपराध पोखरत असतो. (स्वत:च्या हातून खून झालाय हे त्याला योगायोगानंच– पेपर वाचताना एका छोट्याशा बातमीवर नजर गेल्यानं समजतं. – त्याच्या मनावरचं दडपण योगायोगनंच त्याची आई त्या छोट्या मुलीच्या मृत्यूबद्दल बोलते त्यामुळे वाढतं.) आई आत्महत्येची धमकी देते म्हणून विश्वनाथ लग्न करतो. गुणी बायकोच्या स्वभावामुळे त्याच्या मनावरचं दडपण नाहीसं होण्याचा प्रसंग जेव्हा येतो त्यावेळी विश्वनाथला कळतं की आपले हात जिच्या मृत्यूला कारण झाले. तिची मोठी बहीण म्हणजेच आपली पत्नी. ‘दहावा ग्रह’ मध्ये निवेदक आपल्या बहिणीचे लग्न जमवण्यासाठी एका स्थळाची चौकशी करण्यासाठी जातो. तेव्हा त्याची गाठ सांगून आलेल्या मुलीच्या फोटाचा आलबम करणाऱ्या चमत्कारिक माणसाशी पडते. वीस वर्षानंतर आपल्या मुलीसाठी स्थळ पहायला निवेदक जातो, तेव्हा त्याची गाठ त्या चमत्कारिक माणसाच्या मुलाशी पडते. ‘शिळा अहिल्या’ या कथेतील केशवनाना रात्रीच्या वेळी चौपाटीवर फिरायला जातात. तेथे त्याची बहिण योगायोगाने दिसते. ती चाललेली असते आपल्या प्रियकराकडे, केशवनाना तिचा पाठलाग करतात. प्रियकराच्या खोलीपाशी थांबून त्यांचे बोलणे ऐकतात. योगायोगानेच त्यांची बहिण त्यावेळी प्रियकराला सांगते की रिकामपणाचा उद्योग म्हणून तिने डायरी लिहून ठेवली आहे. तिच्यात आपल्या वेदना लिहून ठेवल्या आहेत. केशवनाना ती डायरी वाचतात व त्यांतून मग कथा उलगडते. असे हे योगायोग. लोकविलक्षण व्यक्ती ‘गुलमोहर’, ‘गांधारी’, ‘भरती’, ‘नजर’, ‘मुक्तछंदा’ या कथांमध्ये आपल्याला लोकविलक्षण स्वभावाची माणसे भेटतात. ‘गुलमोहर’ मधले वडिलांचे बंगला बांधण्याचे स्वप्न पुरे करण्याचा ध्यास घेतलेले दिवाकरपंत केवळ त्यासाठी आपले सर्व आयुष्य वेचतात– पण शेवटी त्यांच्या मुलांच्या संसाराची काच तडकते आहे अशी चाहूल लागल्यावर धास्तीने आपणहूनच त्या स्वप्नाचा निरोप घेतात. स्वप्नांचे प्रतीक गुलमोहराचे झाड तोडून टाकतात. ‘गांधारी’ आंधळा नायक आंधळ्याच पण रुपवान मुलीशी लग्न करतो. तिची फसवणूक करणाऱ्या डोळस माणसांपासून पाठवण्यासाठी. ‘भरती’ मधील उपेंद्र व इरावती या दाम्पत्याला मुलं नाही. त्यासाठी इरावती उपेंद्राला सुखी राखण्यासाठी, त्याला आपल्याजवळ राखण्यासाठी रोज एक विलक्षण नाटक खेळते. त्यांतून आपले जीवापाड प्रेम उपेंद्रवर असल्याचे दाखवून, त्याला आपल्याकडे सतत खेचते ठेवून त्याचे लक्ष विचलीत होऊन देवकुळे, ‘मुक्तछंदा’मधली मुक्ता ही अशीच आणखी लोकविलक्षण माणसे. अनोखे प्रसंग आणि लोकविलक्षण माणसे एवढेच काळ्यांच्या कथांचे वैशिष्ट्य नव्हे. त्यांची प्रत्येक कथा वाचकांना काही सांगू इच्छिते. काहीतरी नवे आणि वेगळे. जगण्याची भूमिका. एखादा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत प्रत्येक कथा हे सांगते– जे अर्थातच कथाकारालाच सांगायचं असतं– निरनिराळ्या पात्रांकरवी सांगते. बहुधा पुष्कळशा कथांमध्ये हे सांगणे चपखलपणे बसते. पण काहीवेळा हे सांगणे कथेतील बरीचशी जागा अडवते व कथेने कथापण हरवते. उदाहरणार्थ ‘गांधारी’ ही कथा. ही कथा तर रूढार्थाने कथा होऊच शकत नाही हे एक प्रासंगिक प्रवचन आहे. बहुतेक कथांमध्ये काळे असे कथेतील पात्रांद्वारे स्वत: बोलतात. हा खटकणारा दोष सोडला तर काळ्यांच्या कथा खूपच देखण्या आहेत. ‘शिळा अहिल्या’ मधील ‘अक्का’ कथा पुढे पुढे जाते तशी आपल्या मनावर कब्जा मिळवते व कथासंग्रह वाचून झाला तरी नंतरही दीर्घकाळ मनांत रेंगाळत राहते. ‘मुक्तछंदामध्ये मुक्ताने कथानायकाला दिलेला धक्का हा वाचकांपर्यंत सरळसरळ पोचतो. ‘सर’ ही कथा पावसाळी हवेतल्या दिवसातली हूरहूर मनाला जाणवून देते. ‘अढळपट’मधील पद्मिनी-जी आपल्या नवऱ्याच्या दिवंगत पत्नीच्या प्रतिमेशी पोचायचा आटोकाट प्रयत्न करते– आपल्या मनांत तिच्याविषयी कणव निर्माण करते. ‘अढळपद’ ‘शिळा अहिल्या’ ‘सर’, ‘मुक्तछंदा’ इ. या कथासंग्रहातील खूपच उजव्या कथा आहेत. काळ्यांच्या कथा आकर्षक होतात त्याची आणखीही कारणे आहेत. काळ्यांची शब्दांवर हुकमत आहे. आपल्या शब्दसामर्थ्यांवर वाचकांना पाहवत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्या कथांमधली माणसे जिवंत आहेत. चैतन्यमय आहेत. तुमच्याआमच्याभोवती वावरणारी अशी ती माणसे आहेत. त्यामुळे या संग्रहातील कथा वाचकाला बांधून ठेवतात. हे यश थोडके नाही. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more