* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GROWING UP BIN LADEN
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184982534
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
OSAMA BIN LADEN IS THE WESTERN WORLD’S MOST WANTED TERRORIST. INTENT ON SECRECY AT ALL COSTS, HIS PERSONAL LIFE HAS BEEN SHROUDED IN MYSTERY — UNTIL NOW. FOR THE FIRST TIME, OSAMA FIRST WIFE AND FOURTH SON BREAK THE SILENCE TO REVEAL THE TRUTH ABOUT THE CHARACTER AND LIFE OF A MAN BOTH FEARED AND REVERED AROUND THE GLOBE. OSAMA MARRIED HIS FIRST COUSIN NAJWA WHEN HE WAS JUST 17. HERE SHE DESCRIBES THE QUIET, SERIOUS YOUNG MAN SHE FELL IN LOVE WITH, WHO WOULD TAKE HER FROM A LIFE OF EXTRAORDINARY WEALTH IN SAUDI ARABIA TO A REMOTE MOUNTAINTOP IN AFGHANISTAN. AS HIS SENIOR WIFE, SHE WOULD BEAR HIM ELEVEN CHILDREN AND WATCH HIM BECOME EVER STRICTER, UNTIL HIS GROWING FANATICISM TORE THE FAMILY APART. THEIR SON, OMAR, GIVES A DETAILED ACCOUNT OF HIS CHILDHOOD, VYING FOR HIS FATHER’S LOVE IN A HOUSEHOLD OF MORE THAN 20 BROTHERS AND SISTERS — AND A YOUTH SPENT LEARNING DESERT SURVIVAL SKILLS AND HANDLING KALASHNIKOVS. HERE WE SEE OSAMA THE AUTHORITARIAN HUSBAND AND STERN FATHER, THE ENTREPRENEUR, AND THE LEADER OF A COMPLEX TERRORIST NETWORK. TOGETHER, IN GRIPPING DETAIL, MOTHER AND SON REVEAL THEIR LIFE ON THE RUN — FORCED TO FLEE FROM COUNTRY TO COUNTRY IN RESPONSE TO OSAMA’S INCREASINGLY MILITANT ACTIVITIES — UNTIL THEIR EVENTUAL ESCAPE FROM AFGHANISTAN JUST BEFORE THE TRAGIC EVENTS OF 9/11 THAT WOULD CHANGE THE WORLD FOREVER. NEVER BEFORE HAS OSAMA’S OWN FAMILY GONE BEYOND THE HEADLINES TO SHOW US OSAMA THE MAN. NOW, WITH UNPRECEDENTED ACCESS, AND COMPLETE WITH EXCLUSIVE FAMILY PHOTOGRAPHS, JEAN SASSON, AUTHOR OF THE BESTSELLING PRINCESS: A TRUE STORY OF LIFE BEHIND THE VEIL IN SAUDI ARABIA, TAKES US INSIDE THE SECRET WORLD OF OSAMA BIN LADEN.
११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वल्र्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरू शकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नव्हते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोर्इंग अप बिन लादेन!

No Records Found
No Records Found
Keywords
#GROWINGUPBINLADEN # SAUDIAREBIATILSURUVATICHE DIWAS # AAMCHE KHARTUMMADHALE AAYUSHYA #AAFGANISTHAN # OSAMABINLADENCHEKUTUMB #GHATANAKRAM #ALKAYADAGHATANAKRAM #
Customer Reviews
  • Rating Starबाळ भागवत, मुंबई

    ``ग्रोर्इंग अप बिन लादेन`` या पुस्तकाचा अनुवाद करायची संधी मला दिल्याबद्दल मी मेहता प्रकाशनाचा अत्यंत आभारी आहे. इतक्या मोठ्या संख्येने हजर असणाऱ्या लोकांसमोर नुसते उभे रहाण्याचाही पहिलाच अनुभव. पुस्तक प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरावा असाच अप्रतिम होत. कधी अपेक्षाच केली नव्हती अशा व्यक्तींबरोबर काही काळ घालवता आला. पुस्तक प्रकाशनाचा वर्तमानपत्रातला फोटो आणि सर्वांच्या सह्या घेतलेली पुस्तकाची प्रत या दोन मौल्यवान गोष्टी आयुष्यभर आनंद देणार आहेत. या पुस्तकाचा अनुवाद केल्यापासून कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर नॉन फिक्शन विभागाकडे वळायची सवय लागलेली आहे. `द अफगाण`च्या अर्पण पत्रिकेत लिहिले आहे तेच खरे आहे. तुम्हा दोघांची ओळख झाल्यापासून आयुष्य सुखासमाधानात जाते आहे . मेहता प्रकाशनाच्या सर्व जणांचे कष्ट बघता इतर सर्वांचे आभार किती मानायचे, कौतुक किती करायचे कळत नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG

    ओसामा बिन लादेन हा जागतिक दहशत वादाचा `चेहरा` समजाला जातो. अमेरिकेवरील दहशदवादी हल्ल्यानंतर ओसामाला ठार करण्यासाठी अमेरिका गेली १०वर्षे प्रयत्न करत होती. ज्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. आणि लादेनचा शेवट झाला. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सतावण-य लादेन बद्दल कायमचा एक प्रकारचं औत्सुक्य राहिलेलं आहे. ज्यांच्या शेवटाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते, ज्याचा मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले होते. आणि ज्याला मारण्यासाठी अमेरिका जिवाचं रान करत होती, त्या ओसामानं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याफार प्रमाणात त्याचं व्यक्तिगत जीवन लोकासमोर आलं असलं तरी ओसामा या व्यक्तीबद्दल अजून सविस्तरपणे वाचावसं वाटत असेल तर `ग्रोइंग अप बिन लादेन` हे पुस्तक वाचावयास हवं. ओसामाची पहिली पत्नी नज्वा बिन लादेन यांनी जीन ससन यांच्या मदतीने ओसामाचे आयुष्य शब्दबद्ध केले आहे. ओसामा आणि त्याची अल कायदा दहशदवादी संघटना यांच्याबद्दल आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, पण खुद्द ओसामाच्या कुटुंबीयांनी लिहिलेलं हे पहिलच पुस्तक आणि म्हणूनच वेगळं. ज्या व्यक्तिबद्दल आज प्रत्येकाच्या मनात घृणा, चीड , राग, द्वेष, या भावनांखेरीज काही नाही, या प्रार्श्वभूमीवर त्या व्यक्तीची बायको आणि मुलाने हे पुस्तक लिहण्यात हा पुढाकार घ्यावा, त्याचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करावा, हेच विशेष आहे. आणि ओसामाचा शेवट झाल्यानंतर अल्पावधीतच हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. ओसामाने आपल्या कुटुंबीयाबद्दल बाहेरच्या जगाला काहीही न कळू देण्याची दक्षता घेतली होती तशीच आपल्या कुटुंबीयांपासून अतिरेकी कारवाया लपवून ठेवल्या होत्या. त्यामुळे हे पुस्तक वैयाक्तिक आयुष्यातील घटनांचाच आढावा घेतं, त्याचप्रमाणे धनाढय कुटुंबात जन्मलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीचं क्रूरकर्मा सैतनात कसं रुपांतर होतं, याच चित्रण करतं. मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला आणि सर्वसामान्य आयुष्य जगलेला ओसामा कालौघात कट्टर दहशतवादी बनतो आणि ओसामाच्या हिंसक कारवायांच्या छायेत वाढलेला ओमर मात्र शांततेचा मार्ग अवलंबतो, हा या पुस्तकात अधोरेखित होणारा परस्पर विरोध कोड्यात टाकणारा आहे. वास्तविक ओसामा हा नज्वाच्या आत्याचा मुलगा. म्हणजे तिचा आत्ये भाऊ. महोम्मद आवद बिन लादेन यांच्या बावीस मुलांपैकी अठरावा मुलगा. चौदा वर्षाची नज्वा सोळा वर्षाच्या मृदू, स्वभावाच्या शांत, करारी, धार्मिक आणि रूढीप्रिय अशा ओसामाच्या प्रेमात पडली होती. ओसमाचेही नज्वावर मनापासून प्रेम होते. मुस्लिमांमध्ये नात्यातील विवाहाला विरोध नाही. उलट जवळच्या दोन कुटुंबात घानिष्ठ संबंध निर्माण होतात. म्हणून अशी लग्ने सर्रास होतात. त्यामुळे ओसामाचं आणि नज्वाचं लग्नही झाला झालं आणि टेनिस खेळणा-या, सायकल दामटणा-या, चित्र काढणा-या नज्वाने ओसामाच्या प्रेमाखातर या सा-याला तिलांजली दिली. ओसामाचा प्रेमात आकंठ बुडालेली नज्वा ओसामाच्या आदेशानुसार चढायला लागली आणि त्यात काही गैर आहे असेही तिला वाटत नव्हते. ओसामाचं पूर्व आयुष्य पहिला तरं त्यात दहशतवादाची मुळं सापडत नाहीत. त्याने अर्थशास्त्र आणि मॅनेजमेंट केल्यानंतर वडीलांच्या `सौदी बिन लादेन गृप` या सौदी अरेबियातील अग्रगण्य कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. त्याच्या खाजगी पुस्तक संग्रहालयात अरेबिक आणि इंग्लिश भाषेतील धार्मिक आणि लष्करी विषयांमधील शेकडो पुस्तके होती. तो उत्कृष्ट इंग्लिश बोलत आणि लिहित असे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कुटुंबवत्सल होता. सगळ्या बायकांवर आणि मुलांवर त्याचं प्रेम होतं. मुलांबरोबर घालवायला त्याला फारसा वेळ मिळत नसे. पण जो काही वेळ मिळत असे, त्यात तो अनेक गोष्टी बगण्यासाठी मुद्दाम मुलांना घेऊन जात असे. माहिती देत असे. मुलांनी कणखर आणि शूर बनावे यासाठी तो प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असे. याचबरोबर दुस-या बाजूला मुस्लिम म्हणून जास्तीत जास्त साधे राहायला हवे, आधुनिक गोष्टीचा त्याग करायला हवा, अशा हेकट भूमिकांचा मुलानांही त्रास होत असे. पण त्यातून मुलं त्यांच्या पद्धतीने मार्ग काढून स्वत:ला हवं ते मिळवत असत. बालपणीच्या या आठवणी वाचताना एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की असं असलं तरी मुलांच्या मनात ओसमाविषयी आदर होता, प्रेम होतं. तीच गोष्ट नज्वाची. ओसामाच्या बाहेरचा हालचालींविषयी अनभिज्ञ असण्या-या नज्वाने ओसामा सांगेल तसे जगायचे, ठेवेल तसे राहायचे हे मनाशी निश्चित केले होते. त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला विरोध करत नसे. कमालीच्या बाहेर पतीनिष्ठ आणि आज्ञाधारक. त्यातच एकापाठोपाठ एक मुलांचा जन्म होत गेल्यानंतर मुलांचं संगोपन करण्यात नज्वाचा चार भिंती पलीकडच्या आयुष्याशी संपर्कच तुटला. याच काळात मध्यपूर्वेत होणा-या हालचालीचा ओसमावर परिणाम व्हायला लागला होता. जिहादबद्दल त्याच्या भावना तीव्र होत चालल्या होत्या. अब्दुल्लाह अझामच्या विचारांचा त्याच्यावर पगडा बसत चालला होता. लादेन कुटुंबाची संपत्ती वाढवण्यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीतरी ध्येय निर्माण करावं आणि त्यासाठी प्रयत्न करावेत, या आझमच्या विचरांनी प्रेरित झालेला ओसामा अफगाणिस्थान मधील रशियन आक्रमकांविरूद्ध लढण्यासाठी तयार झाला होता. तिथूनच ओसामा आणि नज्वा यांच्या विचारामधील दरी वाढत गेली होतीच पण कुटुंबवत्सल ओसामाची मानसिकताही बदलत चालली होती. मुस्लीम राष्ट्रावरचा मुस्लीमेतर राष्ट्रांचा प्रभाव नष्ट करणं, या विचाराने तो पछाडला होता. घराबाहेरच्या कारवायांना वेग आला होता. त्याच्या शिकवणुकीवर श्रद्धा बाळगणा-यांच्या संख्येत वेगाने वाढ होत होती. अत्यंत कडवटपणे ते ओसामाचे रक्षण करत असत. त्यामध्ये १९९४मध्ये सौदी सरकारने ओसामा आणि त्याच्या कुटुंबियाचे नागरिकत्व रद्द केले. त्याची मालमत्ता गोठवली. त्याच्या मुलांचा वारसाहक्क काढून घेतला. यात ओसामाने काही कोट्यावधी डॉलर्सची मालमत्ता गमावली होती. श्रीमंतीत लोळणारा ओसामा आर्थिक अडचणीत सापडला होता. पाच बायका वीस मुलं अशा प्रचंड मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्याचावर होती. अशा प्रत्येक वैयक्तिक धक्यावर सौदी अरेबिया आणि अमेरिकेवर दहशतवादी हल्ले चढवण्याची ओसामाची इच्छा तीव्र होत गेली. त्यासाठी त्याने अल कायद्याची लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. या युद्धासाठी त्याने माणसे गोळा करायला सुरवात केली. त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली. डॉ. अयमान अल जवाहिरीचा अल जीहाद गट आणि ओमर आब्दोल रहमानचा अल गम अल इस्लामिया गट यांनीही अल कायदा बरोबर हातमिळवणी केली. ओसामाच्या मनातील सैतनाने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला होता. `उच्चशिक्षित आणि आवाजात बोलणारे माझे वडील असल्या गुंड आणि क्रूर प्रवृतीच्या माणसांच्यात कसे राहू शकतात हा प्रश्न वाढत्या वयाच्या ओमरला त्रास देत होता. जे काय चाललं आहे, ते बरोबर नाही, याची जाणीव व्हायला लागली होती. अशा वातावरणात राहणं नकोसं वाटायला लागलं होतं. पण वय लहान असल्यानं येणारी अगतिकता त्रासदायक ठरत होती. त्यात मोठा भाऊ अब्दुल्ला घर सोडून निघून गेल्यानं वडिलांची गादी चालवायची जवाबदारी आपल्यावर तर येणार नाही, याचं भय होतं. मोठ्या भावाप्रमाणे हे सर्व सोडून जाण्याची इच्छा परत परत मनात डोकवत होती. पण आई आणि लहान भावंड यानां सोडून जाववत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या ओमर ओसामा बरोबर भरकटत आयुष्य घालवत होता, ते एक न एक दिवस हे सगळं सोडायचचं, हे मनाशी ठरवून. आपल्या आयुष्यातील हा चढ-उतारांचा आलेख लोकांसमोर मांडण्याचं धाडस ओमरने आणि नज्वाने या पुस्तकाद्वारा केलं आहे. ओसमासारख्या व्यक्तीची बायको आणि मुलगाच त्याच्या अत्यंत गुप्त ठेवल्या गेलेल्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत आहेत म्हटल्यानंतर या पुस्तकाला एक वेगळं परिमाण अपोआपच लाभतं. एक प्रकरण ओमरचे आणि एक प्रकरण नज्वाचे, आणि मधून मधून जीनने दिलेली जोड असा आकृतिबंध स्वीकारल्यानं माहितीची पुनरुक्ती होऊन पसरटपणा वाढत गेल्याचं जाणवतं. सध्याच्या घाई-गर्दी गडबडीच्या काळात लोकांच वाचन-अवकाश आक्रसत चाललं आहे. मोठ्या दांडग्या पुस्तकांकडे बहुतांशी वाचक पाठ फिरवतात. अशा परिस्थितीत पुस्तकाची पृष्ठसंख्या आटोक्यात ठेवणं गरजेचं झालं आहे. दुस-या महायुद्धाच्या शेवटी विन्स्टन चर्चिल यांनी असं म्हटलं होत ` सर्व थांबल्यावर आपण मागे बघतो.` अत्यंत लहानसहान बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन गुन्हेगार आणि शूर वीरांचा शोध घेतो. कुठे आहेत युद्ध सुरु करणारे खलनायक? माहित पाहिजे आपल्याला. दु:खाने जळफळत असताना , जखमांनी राग अनावर होत असताना, आम्हाला सत्य समजावण्याचा, या गुन्ह्याची जबाबदारी कुणाची आहे, हे शोधण्याचा हक्कच आहे.` हीच भावना हे पुस्तक वाचताना मनाचा ताबा घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more