* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOVERNANCE
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177667745
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORKING OF GOVERNMENT IS JUST A PAPER WORK, OR IT REMAINS LIMITED TO REGISTERING THINGS, THE RULES GET ENTANGLED WITHIN THE RULES ITSELF, THE COMMITTEES WHICH WERE ORIGINALLY FORMED TO RESOLVE PROBLEMS BECOME PROBLEMS THEMSELVES, THE VERY VERY IMPORTANT DOCUMENTS WHICH MAY HARM THE SECURITY OF NATION GET LOST INTO THE HUGE PILES OF FILES AND VISITS TO THE COURTS, THE APPOINTMENTS ON THE PROJECT WORKS BECOME A JOB OF OBLIGATION AND REVEAL THE SHABBIEST FUNCTIONING, THE PROJECTS IN THE PUBLIC DEPARTMENTS BECOME A SHOW BUSINESS BUT IS NEVER REVEALED FULLY BEFORE THE PUBLIC INSTEAD WORKS MORE FOR THE BENEFIT OF THE MINISTERS AND OFFICERS. WHAT IS THE DIFFERENCE BETWEEN CHINA AND INDIA? WHAT IS THE SOLUTION FOR ALL THESE PROBLEMS? THE FIRST AND THE FOREMOST IS THE GOVERNING SYSTEM WHICH WILL MAKE THE PEOPLE COMPETENT. FOR THIS, FIRST WE WILL HAVE TO GO TO THE CORE OF THE PROBLEM, RECOGNIZE IT, RECORD IT AND PRESENT IT BEFORE THE PUBLIC. THIS DOCUMENT PRESENTS A TRUE PICTURE OF THE SITUATION AT THE GOVERNMENT LEVEL BY NONE OTHER THAN THE ONE WHO HAS WITNESSED IT AND HAS DARED TO REVEAL IT. IT ALSO TELLS US THE IMPORTANCE OF CHANGING IT TODAY, AT THIS MOMENT, WITHOUT LOSING A SINGLE MOMENT.
शासनव्यवहार फायलींवर नोंदी करण्यापुरताच उरतो / नियमांमध्ये नियम अडकून पडतात / समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या स्वत:च समस्या बनून जातात / राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकतील इतक्या महत्त्वाच्या बाबीदेखील फायलींच्या ढिगाNयाखाली आणि कोर्टकचेयांच्या फेयांमध्ये हरवून जाऊ शकतात / प्रकल्पांवरील नेमणुकी हे उपकार करण्याचे आणि गचाळ, गबाळग्रंथी कारभाराचे बालेकिल्लेच बनून जातात / सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प सर्वसामान्य जनतेसमोर कधीही खेचले जात नाहीत आणि मंत्री आणि अधिकारी यांची खाजगी कुरणं मात्र बनून राहतात / आपण आणि चीन यांच्यातील फरक / या सर्वांवर उपाय: जनतेला सक्षम करू शकणारी शासनव्यवस्था यासाठीची पहिली गरज, खरी परिस्थिती काय आहे हे खणून काढा, त्या परिस्थितीची संपूर्ण नोंद करा आणि ती नोंद जनतेसमोर ठेवा. आज शासनाची खरीखुरी स्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या व्यक्तीने ती स्थिती उघड करून दाखवण्यासाठी तयार केलेला हा दस्तऐवज. आजची ही परिस्थिती संपूर्णपणे आणि ‘आजआत्ता’ का बदलली पाहिजे हे आग्रहाने सांगणारा हा दस्तऐवज.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ARUN SHOURIE #BHARATI PANDE #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #POLITICS #TRANSLATEDBOOKS
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    शासन व्यवहार... पत्रकारिता स्वातंत्र्यासाठी सातत्याने झगडणाऱ्या ज्येष्ठ इंग्रजी पत्रकारांमध्ये इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटने गौरवलेले ‘अरुण शौरी’ साहित्य आणि पत्रकारिता विश्वामधील ख्यातनाम पद्मभूषण स्वतंत्र बाण्याने आणि कुणाच्याही दबावाखाली न झुकतालिहिणाऱ्या अरुण शौरींनी राजकारण, समाजकारण, अर्थकारणादि विविध विषयांवर लेखन करून ताज्या घडामोडीचे अचूक विश्लेषक म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांच्या निर्गुतवणकीसंबंधीच्या मूलभूत लेखनाने अर्थकारण धुरिणांनाही अंतर्मुख केले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने त्यांना ‘बिझिनेस लीडर ऑफ द इर’ असा पुरस्कार देऊन गौरविले. मॅगसेसे पुरस्कार, दादाभाई नौरोजी पारितोषिक, फ्रीडमटू पब्लिश पारितोषिक.अ‍ॅस्टर पारितोषिक इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर अशा विविध पुरस्कारांनी पत्रकार अरुण शौरी, गौरविले गेले. हिंदुस्थान सरकारने पद्मभूषण देऊन गौरविलेल्या या ख्यातनाम पत्रकाराने एन.डी.ए. सरकारमध्ये निर्गुतवर्तणूक खाते, माहिती आणि प्रसारण खाते अशा महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपदही भूषविले होते. एवंच शासन व्यवहाराशी जागरूक पत्रकार आणि शासकीय पदस्थ म्हणून डोळस नजरेने केलेले निरीक्षण यातून आकाराला आलेले अरूण शौरी लिखित मूळ इंग्रजी पुस्तक ‘गव्हर्नन्स’ भारती पांडे यांनी तितक्याच समर्थ आणि ओघवती, परखड, अचूक, अर्थपूर्ण भाषाशैलीत मराठीत अनुवादित केले आहे. शासन व्यवहार आणि फायलीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकून पडलेल्या नियमांच्या बंधनातून स्नायूक्षयबाधित समित्यांच्या शासकीय प्रशासकीयांच्या नोंदी सर्वसामान्यांसमोर कधीय येत नाहीत. समस्यांची उकल करण्यासाठी नेमलेल्या मार्गदर्शक समित्यासुद्धा बव्हंशी या समस्यांच्या जोडीने होऊन राहिलेल्या अडथळ्यांच्याच नव्या समस्या. या समस्यांच्या जोडीने देशाच्या संरक्षणाला राष्ट्रीय हिताना सुरूंग लावू शकतील अशा महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा या फायलीच्या ढिगाऱ्यामध्ये आणि कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांमध्ये कशा लटकून राहतात, हरवून जातात याचे दर्शन आणि तोलमोल गव्हर्नन्समध्ये सहजच लक्ष वेधून घेते. पर्यावरण नष्ट होतंय? फायलीवरील नोंदी करायला अधिकारी कुठल्या रंगाची शाई वापरू शकतात? प्रश्न साधाच पण मंत्रालय चर्चेसाठी वर्षसुद्धा या विषयासाठी कमी पडावे. हिंदुस्थानी उच्चायुक्तांच्या निवासस्थानाची दुरुस्ती. केवढा ज्वलंत प्रश्न अनिर्णीत राहावा असाच कसा? या तुलनेत सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे, राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षणविषयक महत्त्वाचे प्रश्न, गुप्तहेर खाते, घुसखोर, लोकसंख्येचा बदलता नकाशा, औद्योगिक परवाने, कायदा सुव्यवस्था, अंमलबजावणी, निर्यात नियंत्रण कायदा, निर्गुंतवणूक, शासन व्यवस्था सुधारण्यासाठीच्या अपेक्षित प्रक्रियेचे टप्पे, अर्थव्यवस्था, निर्णय आणि अंमलबजावणी अनावश्यक कामांना पायबंदांतून विकासाची साधना लक्षात आणून देणाऱ्या या गव्हर्नन्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांप्रमाणेच आपण आणि चीन यांच्यातल्या फरकाचा विचार मांडीत उपाय सांगताना जनतेला आज जो राइट टू इन्फर्मेशन माहिती अधिकार मिळाला आहे त्या जनता सक्षम करणाऱ्या शासन व्यवस्थेचा माहितीपूर्ण पाठपुरावा करण्याची पहिली गरज लक्षात आणून दिली आहे. शासन व्यवस्थेच्या डोळस निरीक्षणांतून स्वानुभवातून तयार झालेले गव्हर्नन्स (१) ओळख (२) धाडसी उपक्रम (३) अडथळ्यांची शर्यत (४) एक संस्या (५) एक क्षेत्र (६) एक जीवन मरणाचा प्रश्न (७) खरा धडा अशा सात प्रकरणांतून वाचकांपुढे मांडले आहे. घोषणाबाजीच्या चाकोरीबाहेर येऊन काम आणि सत्ता ही राज्याच्या अधिकाऱ्यांकडून समाजोन्मुख वळवणे कसे आवश्यक आहे ते सांगितले आहे. जनतेला ताकद देणारी कार्यक्षमता, समस्या, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी विकासाची प्रक्रिया सुधारण्याची आवश्यकता स्वरूप बदलाची वेग वाढवण्यात महत्त्वपूर्णता अरुण शौरी इथं सांगून ठेवतात. समस्या तिथल्या तिथे सोडवून टाका. कालापव्यय टाळा. फायली वाढवू नका. स्वत: जाऊन भेटा, समोरासमोर येऊन प्रश्न सोडवणारा निर्णय घ्या व त्याची अंमलबजावणी करा. या मराठी अनुवादामध्ये भारती पांडे यांनी अरुण शौरी यांच्या मूळ इंग्रजी ‘गव्हर्ननस’मधील प्रत्येक अनुभवसिद्ध शासनव्यवस्था दर्शनाला समर्थ भाषाशैली, अर्थपूर्ण मांडणी आणि नेमकेपणाने पुरेपूर न्याय दिला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने अरुण शौरी यांच्या गव्हर्नन्स या अभ्यासनीय इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करून मोलाची कामगिरी केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लालफीतीत अडकलेल्या काळ्या पांढऱ्या तपकिरी रंगांच्या बजबजपुरीत अडकलेल्या शासन व्यवहाराच्या दु:स्थितीचे बोलके दर्शन घडवणारे अर्थपूर्ण मुखपृष्ठ योजून ‘गव्हर्नन्स’चा हा मराठी अनुवाद ग्रंथ प्रथमदर्शनीच वेधक असल्याची ग्वाही दिली आहे. वाजवी किंमत, महत्त्वपूर्ण विषय. स्वच्छ निर्दोष छपाई मराठी वाचकांना आणि ग्रंथालयांना या पुस्तकाकडे खचित आकर्षित करील. -ललिता बापट ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-02-2004

    शासन नावाच्या ‘आंधळ्या’ व्यवस्थेची कथा!... सर्वसामान्या माणसांना ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महापालिकेच्या कारभाराची तोंडओळख असते; राज्य किंवा केंद्र सरकारच्या कारभाराची माहिती फारशी नसते. भारतासारख्या विशाल क्षेत्राचा कारभार हाकणाऱ्या केंद्रीय सरकरच्या व्यवस्थेची माहिती होणे फारच दुरापास्त असते. शिवाय तो विषयही अनेक अर्थाने रूचकर असतो. आपल्या लोकप्रतिनिधींनी तरी तो कितपत कळलेला असतो, याविषयी शंका येते. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी वाजपेयी सरकारामध्ये विविध खात्याचे मंत्र म्हणून काम करताना आलेल्या अनुभवातून कथा ‘गव्हर्नन्स’ या इंग्रजी ग्रंथातून मांडली आहे. भारती पांडे यांनी एका किचकट विषयावरील पुस्तकाचा अनुवाद छान केला आहे. अरुण शौरी हे राजकीय घडामोडीचे विश्लेषण करणारे ज्येष्ठ पत्रकार. भाजप आघाडीचे सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी झाल्यानंतर त्यांनी निर्गुंतवणूक खाते, माहिती आणि प्रसार खाते, नियोजन खाते, माहिती आणि प्रसारण खाते, नियोजन खाते आदीचा कारभार पहिला. हा कारभार पाहताना त्यांच्यातील शोध पत्रकारिता सतत जागी होती. सरकारचे धोरण, राजकारण आणि व्यवहार यांची सांगड घालून काम करताना एक पत्रकार म्हणून तटस्थपणे या व्यवहाराकडे तो पाहत असल्याचे आणि या व्यवस्थेचे विश्लेषण करीत असल्याचे हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवतं. निर्गुंतवणूक खात्याचा कारभार सांभाळताना जे अनुभव आले, त्याचा पूर्ण पाढा वाचतानाच शासनाच्या अंगीकृत असलेल्या हॉटेलचे खासगीकरण करताना जी माहिती पुढे आली, ती वाचली की आपल्या शासनाचा कारभार म्हणजे ‘आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय’ असाच वाटतो. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून थोड्याच अंतरावर असलेले हॉटेल ज्या जमिनीवर उभे आहे, त्या जमिनीची नेमकी मालकी कुणाची? याचे उत्तर सापडत नाही. वाराणसीमधील आयटीडीसीचे अशोक हॉटेलचे खासगीकरण करण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव सुरू केली. १९७६मध्ये या हॉटेलसाठी पर्यटन विकास महामंडळाकडून जागा घेतली होती; मात्र पर्यटन विकास महामंडळानेच ही जागा विकत घेतल्याची कोठे नोंद नाही. ‘आयटीडीसी’ या जागेसाठीचा कर भरते आहे. तरीदेखील ही जागा महसूल खात्याकडे नोंद आहे, ती एका नेपाळी व्यक्तीच्या नावे! पर्यटन विकास मंडळाने ही जागा केव्हा विकत घेतली याचा शोधूनही सापडला नाही. अनेक ठिकाणी अशा हॉटेलची बांधकामे करताना इतरांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे किंवा या हॉटेलवरच्या जागेवर इतरांनी अतिक्रमण केले आहे. या हॉटेलचा आर्थिक कारभारही अजब आणि तोट्यांचा होता म्हणून सरकारने ते न चालविता विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेच सरकार दरबारी नव्हती. प्रत्यक्ष या हॉटेलच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कशा प्रकारचे अडथळे आले आणि शासन यंत्रणा कशी काम करते, याचे खूपच चांगले चित्रण करण्यात आले आहे. ते संतापजनक तसेच मनोरंजनात्मकही वाटते. समजून घ्यावे असे वाटते. त्यामुळे या पुस्तकातील ‘अ कॉरल.... रीफ’ हे प्रकरण थोडे कंटाळवाणे वाटू लागते. मात्र दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचा कारभार कसा चालतो, धोरणात्मक निर्णय घेताना नोकरशाही कशी वागते, त्यांचे हितसंबंध कसे निर्माण होतात, ते जपण्यासाठी त्यांची धडपड कशी चालू असते, याची माहिती डोळ्यांत अंजन घालणारी आहे. देशाचे नियोजन मंडळ म्हणजे एक प्रचंड प्रकरण आहे. अतिरिक्त जबाबदारी म्हणून नियोजन खात्याचे मंत्री अरुण शौरी होते, तेव्हा त्यांनी शासकीय अधिकारीच नियोजन मंडळ म्हणजे एक वाहनतळ, एक गोठा, किंवा एक पांजरपोळ असे वर्णन करतात. म्हणून त्यांनी या प्रकरणास ‘एक वाहनतळ’ असे नाव दिले आहे, ते अधिकच समर्पक आहे. कारण देशाच्या विकासाचे नियोजन कशा पद्धतीने चालते, नियोजन मंडळाची नेमकी भूमिका काय असते आणि कोठे चुकले याचे उत्तर येथे मिळते. पर्यावरणासारख्या गंभीर समस्येकडे सरकारी यंत्रणा कितपत आस्थेने पाहते, यावर प्रकाश टाकला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेच तयार केलेल्या अहवालात विषारी पदार्थ भारतात आणण्यावर घातलेल्या बंदीला न जुमानता आयात केली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे सरकारची बंदी, न्यायालयाची बंदी असे असतानाही हजारो टन टाकाऊ विषारी पदार्थांची आयात होते, याची नोंद शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालातच करण्यात येते, यापेक्षा या कारभाराचा विरोधाभास आणखी काय असू शकतो? बदलती अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, जागतिकीकरण आदी प्रक्रिया पाहता, आपल्या देशाचा कारभार पाहणारी शासन व्यवस्था कशी नसावी, याचा लेखाजोखाच अरुण शौरी यांनी या पुस्तकाद्वारे मांडला आहे. -वसंत भोसले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 28-10-2007

    एखाद्या समस्यवेर अथवा सूचनेवर अंमलबजावणीऐवजी कागदी घोडे नाचविण्याच्या सरकारी पद्धतीवर झगझगीत प्रकाश टाकणारे माजी मंत्री अरूण शौरी यांचे ‘गव्हर्नन्स’ हे पुस्तक परिस्थितीवर भाष्य करणारे आहे. या पुस्तकाचा अनुवाद भारती पांडे यांनी केला आहे. सरकारी लालफितत अडकलेल्या कारभारात कुणाचे प्रश्न मार्गी लागतात आणि कुणाचे मागे राहतात हे पाहणे रंजक तसेच विचार करण्यास भाग पाडणारे आहे.फायलींवर नोंदी करण्यासाठी नेमक्या कोणत्या रंगाच्या शाईचा वापर करावा, हे निश्चित करण्यासाठी सरकारी यंत्रणा एक संपूर्ण वर्ष घेते. या दरम्यान या विषयावर बराचसा काथ्याकूट केला जातो, डोकेफोड होते आणि अखेरीस काळ्या, हिरव्या, निळ्या आणि लाल अशा चारही रंगांच्या शाईचे पर्याय स्वीकारले जातात. एका साध्या शाईची ही कथा, तर जिथे सामान्यांना तातडीने न्याय हवा आहे आणि काही प्रश्नांची तड लावायची असेल, तिथे नेमके काय होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. सरकारी यंत्रणेची ही प्रवृत्ती, हा स्वभाव बदलण्यासाठी शौरी यांनी काही उपायही या पुस्तकात सुचवले आहेत. आज अस्ताव्यस्त पसरलेली शासनव्यवस्था बांधेसूद आणि चोख काम करणारी हवी असेल तर काय करता येईल, याचा अदमास या पुस्तकात घेण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more