* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOSHTI GHARAKADIL
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983616
  • Edition : 8
  • Publishing Year : AUGUST 1990
  • Weight : 160.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 41 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL AROUND US, WE SEE PEOPLE WHO HAVE AGED FOR ALL OUR LIFE. THE NEEM TREE HERE IS ALSO ONE OF THEM. HAS ANYONE SEEN THE TREE WHEN IT WAS YOUNG, IS A DOUBT THAT I HAVE ABOUT IT. IT HAS A HUGE TRUNK. ALL OVER THE TRUNK YOU WILL FIND MANY HARD KNOTLIKE STRUCTURES. IT IS AS IF THE NEEM HAS REACHED A CERTAIN AGE AND IS GOING TO REMAIN LIKE THAT FOREVER. AS IF THE TIME FOR IT HAS STOOD STILL. BUT THE MONTH OF CHAITRA BRINGS SOME CHANGE WITH IT. MANY SHADES OF PARROT GREEN START APPEARING ALL OVER THE AGEOLD NEEM TREE. IT SPREADS A SORT OF AURA ALL OVER. IT SHADES A WONDERFUL LIGHT. AS THE SCORCHING SUN GOES ON ROASTING EVERYONE AROUND, PEOPLE AUTOMATICALLY TURN TOWARDS THE NEEM TREE. ITS SHADOW HAS MESMERIZING EFFECT, THAT OF THE AIR CONDITIONING SYSTEM.
वर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो, तसाच पारावरचा निंब आहे. त्याला तरणा कोणी पाहिला असेल का, याची मला शंका आहे. प्रचंड बुंधा असलेला आणि गुरवाच्या म्हातारीप्रमाणे अंगावर लहान-लहान आवाळे असलेला निंब आपला आहे तसा आहे. निंबाचे म्हातारपण एका विशिष्ट जागी येऊन थांबलेच आहे. चैत्रमासात पुन्हा चमत्कार होतो. म्हाताऱ्या निंबात पोपटी रंगाची पालवी चहू अंगांनी उसळ्या घेऊ लागते. तिच्या रूपाचा अगदी उजेड पडतो. उन्हात तगमग होऊ लागली की, पारावर येऊन बसावे – वाळ्याचे पडदे चोहो बाजूंना सोडले आहेत, असे वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JUNYAGHARACHIAATHVAN#AAMCHAPAAV#PANI#SHALA#PAAR#ODHA#DEOUL#DADA#TATYA#KA#MAZEVADILBANDHU#AAJINE PAHILELACHOR#PAVHANA#
Customer Reviews
  • Rating Starअनिल गवारी

    व्यंकटेश माडगूळकर हे भारतातील एक महान लेखक आहेत. त्यांच्या शब्द चिञांची जादू ईतकी अपूर्व आहे की त्यांच्या लिखाणाची सहज सुंदर शैली आपल्या समोर त्यांच्या कथा वाचकासमोर रंग- रूप आणि गंधासहित उभ्या रहातात. अञे आणि फडके ह्या दोन लेखकांमध्ये कलेसाठी कला ी जीवनासाठी कला हा मोठा वाद होता. हा वाद ह्या दोघांमध्येच मिटला. कारण कलेसाठी कला म्हनणार्यांमध्ये कुणी नंतर पुढे, खासकरून पुढे आलेच नाही. प्रत्येकाला जीवनासाठी कला ह्याच गोटात बरे वाटू लागले परंतु व्यंकटेश माडगूळकर ह्यानी खर्या अर्थानं साहित्यात कला जोपासली. आपली प्रती सृष्टी निर्माण करणारा ईतका महान लेखक मराठीत दुसरा नाही. कला ही फार साधी सोपी आणि सरळ गोष्ट आहे परंतु सहज साध्य होणारी नाही. ह्याची प्रचिती माडगूळकरांचं साहित्य वाचताना येते.आपल्याला आपलं जग साहित्यातून दाखविण्याची अद्भुत किमया यांच्या पाशी आहे. फार मोठ्या कलावंताचं आयुष्य कला भावणेनं होरपळून निघतं. नंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु उर बडवाबडवी फार दिसून येते. ...Read more

  • Rating StarAshutosh Deole

    एका गोष्टीत ग दि मां बद्दल अाठवण सांगितली अाहे ती फारच सुंदर अाहे.

  • Rating StarDilip Mote

    त्यांच्या गावाला पर्वा जाण्याचा योग आला होता आजही रस्त्यावरून बामनाचा पत्रा म्हणून कौलारू मोडकळीस आलेली इमारत दिसते तिथलं सगळं वर्णन आहे त्यात, माडगूळ ता आटपाडी, सांगली.

  • Rating StarSandesh Dhamangaonkar

    व्यंकटेश माडगूळकर यांचा हा एक अतिशय सुंदर असा कथासंग्रह! त्यांनी यात त्यांच्या घराकडील आठवणी वर्णिलेल्या आहेत. पण त्या फक्त त्यांच्यापुरत्याच मर्यादित आहेत, असं वाटतच नाही. खरंतर माझं सगळं लहानपण शहरात गेले आहे. सर्व शहरी संस्कृतीची सवय मला लागली आहे पण मला थोडीफार ओळख ग्रामीण संस्कृतीचीसुद्धा आहे. या पुस्तकातील सगळ्या आठवणी पूर्णपणे ग्रामीण आहेत. माझा वैयक्तिक असा हा अतिशय आवडता कथासंग्रह आहे. कितीही वेळा वाचला, तरी पुनःपुन्हा वाचावा वाटतो. पूर्ण पुस्तक (आणि प्रत्येक कथा) वाचून झाल्यावर मनाला एक प्रकारची हुरहूर लागून राहते. अतिशय सुंदर पुस्तक.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more