* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A LONG WAY HOME
  • Availability : Available
  • Translators : LATA RELE
  • ISBN : 9789353171933
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘A LONG WAY HOME’ IS A MEMOIR WRITTEN BY THIRTY YEAR OLD AUSTRALIAN YOUNG MAN SAROO BRIERLEY. SAROO IS ORIGINALLY AN INDIAN HAILING FROM KHANDVA, MADHYA PRADESH. WHILE TRAVELLING BY TRAIN WITH HIS ELDER BROTHER, HE GETS SEPARATED FROM HIM AND ENDS UP IN AN ORPHANAGE IN KOLKATTA. HE WAS ADOPTED BY AN AUSTRALIAN COUPLE IN 1987. ALTHOUGH HE WAS HAPPILY SETTLED WITH HIS NEW FAMILY IN AUSTRALIA, THE MEMORIES ABOUT HIS PLACE AND FAMILY IN INDIA KEEP HAUNTING HIM. AFTER ALMOST TWENTY FIVE YEARS, ON THE BASIS OF HIS FAINT MEMORIES AND WITH THE HELP OF ‘GOOGLE EARTH’ AND ‘FACEBOOK’, HE DISCOVERS HIS INDIAN HOME; VISITS INDIA AND RE-ESTABLISHES HIS BOND WITH HIS MOTHER AND SIBLINGS. THIS IS A TRUE STORY ABOUT HIS LIFE IN DIRE POVERTY, OF BEING LOST, OF HIS LIFE IN AUSTRALIA, HIS OBSESSION TO FIND HIS ORIGINAL PLACE AND FAMILY, INCESSANT STRUGGLE AND EFFORTS TO SEARCH AND ALSO UPHEAVALS IN HIS MIND WHILE DOING THIS SEARCH! ALL THIS STRUGGLE WAS TO FIND OUT HIS ORIGIN, WHERE HE WAS FROM, WHAT HAPPENED TO HIS BROTHER AND TO LET HIS INDIAN FAMILY KNOW THAT HE WAS STILL ALIVE! THIS IS A REAL LIFE LESSON ON HOW TO FIND A WAY OUT OF A DIFFICULT SITUATION (HOWEVER DAUNTING), BY MAKING MOST OF EACH AVAILABLE OPPORTUNITY, BY DETERMINED CONTINUOUS EFFORTS WITHOUT GIVING UP BEFORE REACHING THE DESTINATION.
घरपरतीच्या वाटेवरती... ही सरू ब्रायर्ली या तीसवर्षीय ऑस्ट्रेलियन मुलाने लिहिलेली आत्मकथा आहे. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकात्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दाम्पत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे, त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#A LONG WAY HOME# GHAR PARTICHA VATEVARTI# REHABILITATION CENTRE# LATA RELE# SAROO BRIERLEY# #सरू ब्रायर्ली# ‘अ लाँग वे होम’# घर परतीच्या वाटेवरती#ऑस्ट्रेलिया# टॅस्मेनिया# होबार्ट# खांडवा # बुरहानपूर# कोलकाता#कलकत्ता#नवजीवन# इंडियन सोसायटी फॉर स्पॉन्सरशिप अँड अडॉप्शन (इस्सा)#गुगल अर्थ#फेसबुक# दत्तकविधान# दत्तक केंद्र# अ‍ॅडॉप्शन सेंटर# लता प. रेळे
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 07.12.19

    एका मुलाचे हृदयस्पर्शी, भावस्पर्शी अनुभवकथन… आत्मकथन किंवा अनुभवकथन हा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. कथनकाराचं जीवन जवळून अनुभवण्याचा आनंद हा साहित्यप्रकार देतो. सर्वसाधारणपणे वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झाली, की माणसं आत्मकथन किंवा अनुभवकथनाचा मार्ग अुसरतात; पण एखाद्या व्यक्तीचं जीवन इतकं वादळी किंवा जगावेगळं असतं, की तारुण्यातच त्याला असं वाटतं, की आपल्या जीवनातील अनुभव लोकांसमोर मांडावेत. तीसवर्षीय सरू ब्रायर्लीलाही असंच वाटलं आणि त्याने आपले अनुभव ‘अ लाँग वे होम’मधून मांडले. हे अनुभव मराठीत अनुवादित केले आहेत लता प. रेळे यांनी ‘घरपरतीच्या वाटेवरती...’ या शीर्षकासह. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकत्त्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दांपत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे. त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे. या अनुभवकथनाच्या शेवटी सरू लिहितो, ‘कसंही पाहिलं तरी, माझं भारतात परत येणं व माझ्या आई-भावंडांचं जीवन डोळ्यांनी पाहणं, हा वैयक्तिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणारा अनुभव आहे. विशेषतः मी माझ्या बहीण-भावाकडे बघतो, तेव्हा कुटुंबावर व नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनाचं मला कौतुक वाटतं. शब्दांत सांगणं कठीण आहे; पण मला वाटतं, की उपनगरात अलिप्तपणे राहून व वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देता देता आपण पाश्चिमात्य देशांत काहीतरी हरवून बसलो आहोत.’ सरूचे हे विचार चिंतनीय आहेत. त्याचं कुटुंबाविषयीचं प्रेम मनाला स्पर्शून जाणारं आहे. सरूचं हे आत्मकथन मुळातून वाचण्यासारखं आहे. लता रेळे यांचा अनुवाद उत्तम. ...Read more

  • Rating StarSwapna Limaye

    भुसावळ जवळील "बुरहानपूर" वरुन एक ५वर्षाचा मुलगा हरवतो, अनवाधनाने ट्रेन ने कोलकाता ला येतो. तेथे काही दिवस उघड्यावर काढून बालसुधारग्रुह-अनाथाश्रम तिथुन थेट अॉस्ट्रेलियातील दाम्पत्याकडे दत्तक म्हणून जातो..... समज आल्यावर गुगल अर्थ च्या मदतीने आठवतील त्ा खाणाखुणा वरून आपलं जुनं घर शोधून काढतो. २५वर्षांनी आईला भावंडांना भेटतो सगळंच अनाकलनीय......आणि विशेष म्हणजे बाकी मुलं मोठी होऊन दुसरीकडे रहायला जातात पण त्याची आई "कधीतरी माझा मुलगा परत येईल, त्याला हे घर सापडले पाहिजे" ही श्रध्दा ठेवून तिथेच राहते.. आईशी जुळलेली नाळ तुटत नाही, मातीची ओढ असते म्हणतात ते उगाच नाही........ सलाम त्या विधात्याला... त्या सरु ब्रायली ची ही गोष्ट ...Read more

  • Rating StarLOKMAT MANTHAN

    एका मुलाचे हृदयस्पर्शी, भावस्पर्शी अनुभवकथन… आत्मकथन किंवा अनुभवकथन हा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. कथनकाराचं जीवन जवळून अनुभवण्याचा आनंद हा साहित्यप्रकार देतो. सर्वसाधारणपणे वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू झाली, की माणसं आत्मकथन किंवा अनुभवकथनाचा मार्ग अनसरतात; पण एखाद्या व्यक्तीचं जीवन इतकं वादळी किंवा जगावेगळं असतं, की तारुण्यातच त्याला असं वाटतं, की आपल्या जीवनातील अनुभव लोकांसमोर मांडावेत. तीसवर्षीय सरू ब्रायर्लीलाही असंच वाटलं आणि त्याने आपले अनुभव ‘अ लाँग वे होम’मधून मांडले. हे अनुभव मराठीत अनुवादित केले आहेत लता प. रेळे यांनी ‘घरपरतीच्या वाटेवरती...’ या शीर्षकासह. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकत्त्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दांपत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ` व ‘फेसबुक`च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे. त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे. या अनुभवकथनाच्या शेवटी सरू लिहितो, ‘कसंही पाहिलं तरी, माझं भारतात परत येणं व माझ्या आई-भावंडांचं जीवन डोळ्यांनी पाहणं, हा वैयक्तिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणारा अनुभव आहे. विशेषतः मी माझ्या बहीण-भावाकडे बघतो, तेव्हा कुटुंबावर व नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या पारंपरिक दृष्टिकोनाचं मला कौतुक वाटतं. शब्दांत सांगणं कठीण आहे; पण मला वाटतं, की उपनगरात अलिप्तपणे राहून व वैयक्तिक स्वातंत्र्यावर भर देता देता आपण पाश्चिमात्य देशांत काहीतरी हरवून बसलो आहोत.’ सरूचे हे विचार चिंतनीय आहेत. त्याचं कुटुंबाविषयीचं प्रेम मनाला स्पर्शून जाणारं आहे. सरूचं हे आत्मकथन मुळातून वाचण्यासारखं आहे. लता रेळे यांचा अनुवाद उत्तम. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more