* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980486
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL AROUND US WE CAN SEE THE SPACE WITH WHICH SCIENCE IS MAKING PROGRESS IN ALL AREAS OF LIFE TODAY. THIS HAS FURTHER ENABLED TO MAKE OUR LIFE BETTER IN MANY WAYS. WE ARE ENDURING LESS PAIN OWING TO THE INVENTIONS. YET, THERE ARE A HUGE NUMBER OF THINGS AND ELEMENTS OF WHICH SCIENCE SEEMS TO FIND NO EXPLANATION. THERE MIGHT BE AN ANSWER SOMEWHERE BUT RIGHT NOW ALL WE ARE CLUELESS ABOUT THEM. THIS HAS FURTHER GIVEN RISE TO MANY WRONG ASSUMPTIONS AND MISCONCEPTIONS. WE AS HUMAN BEINGS ALWAYS GET CARRIED AWAY WITH MYSTERIES AND INDULGE US INTO THOUGHTS RELATED TO THIS VAGUENESS. MRS. GOGATE IS A WELL-KNOWN SCI-FI WRITER. HER MYSTERIES ALSO HAVE THE SAME CAPACITY OF CAPTIVATING THE MINDS OF HER READERS.
आजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुवंÂ आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाNया कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढकथा वाचकाला खिळवून ठेवतात.
पुणे मराठी ग्रंथालय राजेंद्र बनहट्टी पुरस्कार २००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
GHAR #SHUBHADA GOGATE #LANDGA #CHITR #VAT #VAHI #NANDITA DIVAKAR AMIT #ARCHANA #SAMITA #DIDIRAJE #GOVINDA #ROHIT #RAVI
Customer Reviews
  • Rating StarLOUKIK LOKASHA 20-9-2009

    कधी काळी मराठी साहित्यात गूढ कथांना खूपच मागणी होती. कोणत्याही दिवाळी अंकात एखादी गूढकथा असल्याशिवाय अंकाला परिपूर्णता येत नाही असे समजले जाई. विशेषत: रत्नाकर मतकरी यांची गूढकथा असलेल्या दिवाळी अंकाला प्रचंड मागणी असे. अलीकडच्या काळात गूढकथेविषयी औत्ुक्य काही प्रमाणात कमी झाली आहे हे खरे असले तरी याच काळात शुभदा गोगटे यांचे घर हे पुस्तक याच गूढकथा घेऊन आलेले आहे. मागच्या पन्नास वर्षात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. माणसाची पावले चंद्रावर पडली. आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रातली प्रगती विचार करण्याच्या पलीकडची आहे. मानवी स्वभाव, मानवी विचार याबद्दलही संशोधन झाले. डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा पाया घातला. आज मानसशास्त्रातही प्रचंड प्रगती झाली आहे. माणसाचे जगणे, जगण्याचा उद्देश याबद्दल असंख्य ग्रंथ बाजारात दिसतात. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला माणसाच्या मनाचा अचूक वेध घेता आलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण सर्वश्रुत आहे. जगातल्या एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्याशी मिळत नाही. मानवी स्वभावाचेही तसेच असते. एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसाच्या स्वभावाशी जुळत नाही. माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आजच्या या प्रगतकाळातही काही माणसांना विज्ञानाच्या पलीकडे खूप काही असते असे वाटत असते. माणसाचा जन्म, त्याची वाढ आणि मृत्यू याचे चक्र अटळ असले तरी मृत्यूनंतरही एक वेगळे जग असते असा समज असलेली किंवा त्या दृष्टीने विचार करणारा एक मोठा वर्ग समाजात असतो. भारतीय माणसालाच गूढतेचे आकर्षण आहे असे नाही. जगभरातील माणसे रंगरुपाने वेगळे असू शकतात परंतु त्यांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रातूनही गूढकथा साहित्यांना चांगली मागणी असते. माणसाला जन्मापासून मृत्यूची भीती असते. कोणताही सजीव आयुष्यातला बहुतांशी वेळ मृत्यू कशाला म्हणता येईल त्याच विचारात घालवतो. बऱ्याच लोकांना मृत्यूनंतरचे जग कसे असेल, भारतीय परंपरेत तर पुनर्जन्माला खूपच महत्त्व दिले जाते. भारतीय तत्वज्ञान किंवा वैज्ञानिक परंपरा कोणताही सजीव ८४ लाख योनीचक्रातून फिरतो असे सांगत असते. माणसाला पुनर्जन्म मिळाला तर तो कशाचा असेल याबाबतही चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर शुभदा गोगटेंच्या या पुस्तकाकडे बघता येईल. या पुस्तकात असलेल्या पाचही कथातून माणसाला अमूर्त असे काही तरी दिसत असते. कथातील पात्रे आहेत त्यांच्यासोबत गूढतेची सावली आहे. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कधीकधी कथानकातील काही घटनांना विज्ञानाचा पाया असल्याचे जाणवते. गूढकथेसाठी काही शब्द ठरलेले आहेत. भाषा विशिष्ट पद्धतीची पाहिजे. पात्रनिर्मिती करताना प्रचंड कल्पकता दाखवावी लागते. एक भासमान जग प्रत्यक्षपणे उभे करणे सोपे नसते. या कामात शुभदा गोगटे या यशस्वी झाल्या आहेत असे म्हणावे लागेल. गूढकथांना साहित्यिक मूल्य असते का या प्रश्नाबद्दल चर्चा करण्याचे कारण नाही. अशा कथा वाचणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची तशी गरज आहे. हे लोक गूढकथा फक्त एकाचवेळी वाचतात असे नाही तर एकच पुस्तक अनेक वेळाही वाचतात आणि त्यातून त्याना मानसिक स्तरावर त्यांना पाहिजे असते तसे समाधान मिळते. या बाबींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. वास्तववादी साहित्य लिहिणे काहीसे सोपे असते. दैनंदिन आयुष्यात दिसणारी माणसे, घडणाऱ्या घटना यांच्याविषयी कथेची फ्रेम तयार झाली की आतील त्रुटीच्या जागा कल्पनेने भरून काढायच्या असतात. गूढकथेबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. अशा कथातील जवळपास सर्व पात्रे काल्पनिक असतात. गूढकथा लिहिताना प्रचंड अशा कल्पनाशक्तीच्या वापर करावा लागतो. हे सर्व जमले तरच कथा जमते अन्यथा वाचक दहा-वीस ओळी वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवून मोकळा होतो. ‘घर’मधील कथा खूपच चांगल्या आहेत. वाचक एकदा पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण करूनच बाजूला ठेवतो ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more