* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GARUDZEP
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985078
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1974
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KINGS ARE EAGLES YOU SAID.EAGLES DO NOT BUILD NESTS ON THE GROUND; THEY BUILD THEM HIGH UP IN THE CREVASSES OF THE MOUNTAINS. ONCE HER FLEDGLINGS DEVELOP WINGS, THE FEMALE EAGLE PUSHES THEM OUT OVER THE EDGE OF THE NEST. ONLY THE ONES WITH STRONG WINGS SOAR AND RETURN THEY ARE TRUE EAGLES. IF THE KING IS INDEED AN EAGLE HE WILL RETURN TO THE NEST. OTHERWISE, ONE WILL HAVE TO SADLY CONCLUDE THAT THIS HOUSE NEVER GAVE BIRTH TO AN EAGLE. - THE HUNTER WHO WOULD CATCH THIS EAGLE IN HIS NET IS YET TO BE BORN!
‘‘तू राजांना गरुड म्हटलंस. गरुडाची घरटी जमिनीवर नसतात. ती उंच कडेकपारी असतात. गरुडाच्या पिलांना पंख फुटले की, गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते. जी पिलं पंखांचं बळ घेऊन माघारी घरट्यात येतात, तीच गरुडांची पिलं ठरतात. राजे गरुड असतील, तर आपल्या पंखांच्या बळावर माघारी घरट्यात येतील. नाहीतर या घरात गरुड जन्मलाच नव्हता, असं म्हणावं लागेल. —आणि या गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे!’’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarTejas Yadav

    #गरुडझेप गरुडाची घरटी जमिनीवर नसतात . ती उंच कडेकपारी असतात . गरुडांच्या पिलांना पंख फुटले की , गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते . जी पिलं पंखांच बळ घेऊन माघारी घरट्यात येतात , तीच गरुडाची पिलं ठरतात . राजे गरुड असतील , तर आपल्य पंखाच्या बळावर माघारी घरट्यात येतील . नाही तर या घरात गरुड जन्मालाच नव्हता , असं म्हणावं लागेल . गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे . दोन लेखकांच्या लेखणीत उभारलेल अप्रतिम नाटक ते म्हणजे गरुडझेप . किती फरक आहे , मिर्झाराजे जयसिंग हे एक शिवभक्त , आणि छत्रपती शिवाजी महाराज ही एक शिवभक्त , शिव उपासक . एकीकडे श्रींच राज्य उभाराव म्हणून शिवरायांनी करंगळी कापून रक्ताचा अभिषेक शिवलिंग वर केला . दुसरीकडे हेच श्रींच राज्य उध्वस्त करण्या करिता मिर्झा शिवरायांच्या पारिपत्यासाठी कोटिचंडीच अनुष्ठान करतो . मिर्झा राजपूत असून देखील महाराणा प्रताप ओळखू शकले नाही , महाराजांच्या प्रत्येक कृती तून महाराणा प्रतापांची छबी दिसायची . शिवरायांनी मिर्झाराजाला सांगितल दिल्ली सिंहासनावर तुम्ही बसा तुमच्या साठी आमची समशेर रणांगनात गाजेल पण मिर्झा ह्या अमिशाला भोवला नाही . औरंगजेबाला बादशाह बनविण्यास मिर्झाराजांचा मोलाचा वाटा होता . ज्या औरंगजेबाची इमानदारीशी चाकरी केली त्याचा कडून जालिम विष मिर्झाला भेटल . आग्रा भेट - इथ एक डायलाॅग सांगावसा वाटतो कुठल्या चित्रपटातील आहे माहित नाही . पण फेमस डायलॉग होता . #अपनी_गली_में_कुत्ता_भी_शेर_होता_है . पण इथ औरंगजेबाच्या दरबारात रुद्रस्वरूप झालेले महाराज पाहून एक गोष्ट जाणवली #शेर_हर_जगह_शेर_होता_है . औरंगजेब हिंदूस्थान चा बादशाह त्याच्या समोर आवाज चढवून बोलायची कोनाची हिंमत नव्हती , दरबारातील सरदार ही खाली मान , खाली नजर करुन , तोंडाला रुमाल धरुन बादशाह समोर बोलत . आणि परत जाताना मुजरा करुन माघे पावल टाकत जात . तख्ताकडे पाट करुन जायची रित नव्हती हिंम्मत ही नाही . अशा औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याच वाढदिवसा दिवशी महाराज त्याची खिल्लत उधळवून लावतात , त्याच्या नजरेत नजर घालून बोट दाखवून त्याला खड़े बोल सुनावून , दरबारातून संभाजी राजांचा हात धरुण तख्ताकडे पाट करून जातात . किती ते धाडस , किती तो स्वाभिमान . ज्याला औरंगजेब पहाडका चुहा म्हनायचा तो पहाड़ी चुहा नसून पहाड़ी वाघ होता त्याची डरकाळी त्यानी सर्व त्याच्या सरदारांनी पाहिली . ज्या औरंगजेबाच्या तावडीतून त्याचा बाप , भाऊ सुटले नाही . अशा औरंगजेबाच्या कैदेतून शिवाजी महाराज बाळराजांना व सर्व मावळ्यांना घेऊन सुखरुप पोहचले . सर्व गेलेल राज्य शिवरायांनी परत मिळवल . गरूडझेप नाटक बरच काही शिकवत . जर कुठल्याही मराठी माणसाला विचारल की तुला कोण होयच आहे ? तर उत्तर एकच पाहिजे , ज्या क्षेत्रात जाईन तिथला शिवाजी होयचा आहे , सर्वोच्च होयच आहे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more