* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FREEDOM AT MIDNIGHT
  • Availability : Available
  • Translators : MADHAV MORDEKAR
  • ISBN : 9788171617463
  • Edition : 11
  • Publishing Year : JANUARY 1977
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :MAHATMA GANDHI COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FREEDOM AT MIDNIGHT TAKES THE READERS BACK IN TIME, WHEN INDIA WAS ON THE VERGE OF OBTAINING FREEDOM FROM THE BRITISH RAJ. THE AUTHORS START OFF BY THROWING LIGHT ON THE APPOINTMENT OF LORD MOUNTBATTEN AS THE NATION`S FINAL VICEROY. THIS BOOK ALSO COMPRISES OF INTERVIEWS WITH A NUMBER OF WITNESSES TO THESE EVENTS, INCLUDING LORD MOUNTBATTEN. THE AUTHORS ALSO DELVE ON THE PARTITION OF INDIA AND PAKISTAN ON THE BASIS OF RELIGIOUS DIFFERENCES, ALONG WITH THE VIOLENCE THAT FOLLOWED. THEY MOVE ON TO TALK ABOUT THE FURY OF BOTH MUSLIMS AND HINDUS INCITED BY THEIR COMMUNAL LEADERS. THEY ALSO TALK ABOUT THE LARGEST ATROCITY IN THE INDIAN HISTORY, AS MILLIONS OF INNOCENT PEOPLE WERE PULLED OUT OF THEIR DWELLING PLACE AND WERE FORCED TO TRAVEL BY FEET, OXCART, OR TRAIN, TO THE PLACE ASSIGNED TO THEM BY THEIR RELIGIOUS GROUP. SEVERAL MIGRANTS FELL PREY TO THE BLOODTHIRSTY EXTREMISTS FROM BOTH THE RELIGIOUS GROUPS. THIS BOOK ALSO DOCUMENTS SEVERAL HEART-RENDING STORIES DURING THAT PERIOD. FREEDOM AT MIDNIGHT ALSO PROVIDES A DETAILED ACCOUNT ON THE EVENTS THAT LED TO MAHATMA GANDHI`S ASSASSINATION BY NATHURAM GODSE. THE READERS ARE ALSO TOLD ABOUT THE LIFE AND INTENTS OF JAWAHARLAL NEHRU, INDIA`S FIRST PRIME MINISTER AND MUHAMMAD ALI JINNAH, A STRONG PAKISTANI LEADER.
`भारतावर राज्य करण्याची जबाबदारी ब्रिटिश वंशावर नियतीने कशी काय सोपवली हे एक अतक्र्य, अगम्य असे गूढच आहे.` —रुड्यार्ड किपलिंग `भारतातील ब्रिटिश सत्तेवर आपण आपल्याच हाताने उदक सोडत आहोत. आपण आपल्याच हाताने हा धोंडा पायावर पाडून घेत आहोत. त्यातून होणारी हानी आपल्या दृष्टीने अंतिम व आपल्या एकूण अस्तित्वाला धोक्यात आणणारीच ठरेल. यथावकाश, आपल्याला जगातील एक किरकोळ प्रतीची सत्ता बनवणा-या एका प्रक्रियेची ती सुरुवातच ठरणार यात मला तर शंका वाटत नाही.` — विन्स्टन चर्चिल हाऊस ऑफ कॉमन्स मधील एका भाषणात फेब्रुवारी१९३१ `नियतीशी आपण अनेक वर्षांपूर्वी एक करार केलेला होता. आज तो क्षण आला- आपल्या वचनबद्धतापूर्तीचा. त्या वेळी केलेली आपली ती प्रतिज्ञा आज पूर्ण होत आहे... आजच्या या दिवशी, जेव्हा घड्याळात मध्यरात्रीचा टोला पडेल, त्या वेळी जग झोपेत असेल एकीकडे पण आपल्या भारतात मात्र प्रत्येक जण एका नव्या जीवनाचा व स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी जागा असेल. इतिहासात असा एखादा क्षण येतो, पण तोही क्वचितच! त्या क्षणी आपण `जुने जाऊ द्या मरणालागुनि` म्हणत एका नव्या वळणावर पदार्पण करतो. तो क्षण असतो एका युगान्ताचा, राष्ट्रात्म्याच्या जागृतीचा - ज्याचा आवाज सतत दाबून धरण्यात आलेला होता - हुंकार कानी पडण्याचा हा एक अलौकिक क्षण आहे.` —जवाहरलाल नेहरू १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताच्या घटना समितीसमोर भाषण करताना
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FREEDOMATMIDNIGHT #FREEDOMATMIDNIGHT #फ्रीडमअ‍ॅटमिडनाईट #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MADHAVMORDEKAR #माधवमोर्डेकर #DOMINIQUELAPIERRELARRYCOLLINS "
Customer Reviews
  • Rating StarNivedita Zende

    नुकतच वाचून संपवलं.. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाल्यापासून गांधीहत्या पर्यंतचा प्रवास याच्यामध्ये रेखाटलेला आहे. माझ्या सारख्या पिढीला जर स्वातंत्र्य आणि फाळणी या दोन गोष्टींविषयी जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्त अतिशय उत्तम आहे. लेखकांनी लिहितांना अतिशय त्रयस्थपणे ह्यात सगळं मांडलेलं आहे परंतु भारतीय म्हणून तुम्हाला तितकं त्रयस्थ म्हणून पाहता येत नाही. काही गोष्टी अगदी तुमच्या आत जाऊन भिडतात आणि मानसिक त्रास ही देतात. Best seller पुस्तकं आहे म्हणून सहज घेतलं होतं वाचायला, पण हे पुस्तक बेस्ट सेलर का आहे याचे उत्तर स्वतः हे पुस्तक देतं. इतिहास आणि तथ्य याची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक.. ...Read more

  • Rating StarB. S Kale

    1946 ते 1948 या काळात घडलेल्या घटनांचे सविस्तर विवेचन यात येते.लॉर्ड माउंटबॅटन यांचे कार्य, महात्मा गांधी,पंडित नेहरू, बॅ. जिना, पाकिस्तान ची निर्मिती, संस्थानिक व त्यांची संस्थाने, सरदार पटेल या सर्वांच्या कार्यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. फाळणी्या वेळी झालेला नरसंहार व गांधीजींचा खून याबद्दल विस्तृत माहिती आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more