* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FROM RUSSIA WITH LOVE
  • Availability : Available
  • Translators : VIJAY DEODHAR
  • ISBN : 9788177664799
  • Edition : 2
  • Publishing Year : 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 362
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :IAN FLEMING COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NAME: JAMES BOND; HEIGHT: 183 CMS; WEIGHT: 76 KG; BUILD: MEDIUM; EYES: BLUE; HAIR: BLACK; SCARS ON RIGHT CHEEK AND LEFT SHOULDER, EXPERT IN GUNMANSHIP, EXCELLENT BOXER, EXCELLENT IN KNIFE THROWING; DOES NOT DISGUISE, KNOWS FRENCH AND GERMAN LANGUAGES FLUENTLY. A CHAIN SMOKER; SMOKES SPECIAL CIGARETTES WITH THREE GOLDEN RINGS. VICE: LOVES DRINKING BUT NOT AN ADDICT; LOVES WOMEN. THERE IS A FILE ON JAMES BOND, CONTAINING ALL THE INFORMATION ABOUT HIM, JUST LIKE ALL THE SECRET SERVICE AGENTS THROUGHOUT THE WORLD. THE RUSSIAN SECRET SERVICES SMARSH TARGETS BOND, THEY WANT TO KILL HIM. THEY SELECT THE RUSSIAN BEAUTY QUEEN TATIANA ROMANOV FOR THIS ASSASSINATION. HER JOB IS TO MAKE JAMES BOND COME WITH HER FROM ENGLAND TO ISTANBUL. THE NEXT STEP OF THE PROJECT WAS TO BE COMPLETED BY HER SUPERIORS. JAMES BOND WILLINGLY ENTERS THE TRAP SET UP BY SMARSH. HE HAS TWO BAITS FOR HIMSELF IN THIS DANGEROUS GAME, ONE THE BEAUTIFUL TATIANA AND THE OTHER RUSSIA`S SPECTER CENTER. THE END OF THIS GAME IS CRYSTAL CLEAR. DEATH OF JAMES BOND!
नाव : जेम्स बाँड, उंची : १८३ सें. मी. वजन : ७६ किलोग्रॅम्स, सडसडीत बांधा, डोळे : निळे, केस : काळे, उजव्या गालावर आणि डाव्या खांद्यावर ओरखड्याचे वण, तालीमबाज, पिस्तुलबाजीमध्ये निष्णात, उत्तम मुष्टीयोद्धा, सुरे फेकण्यात तरबेज, वेषांतर करत नाहीे, फ्रेंच आणि जर्मन भाषा येतात, धूम्रपानाचं जबरदस्त व्यसन (तीन सोनेरी रिंगांच्या खास सिगरेटस् ओढतो), दुर्गुण : मद्यपान करतो पण अति मद्य घेत नाही, स्त्रियांचा मोह. जगामधल्या प्रत्येक मोठ्या देशातल्या गुप्तचरखात्यामध्ये ब्रिटिश सीव्रेÂट एजंट जेम्स बाँड याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मौजूद आहे. स्मर्श या रशियन गुप्तचर संघटनेनं जेम्स बाँडला लक्ष्य बनवलं : त्याचा वध करण्यासाठी. जेम्स बाँडला मोहिनी घालण्यासाठी त्यांनी तातिआना रोमानोवा या रूपसुंदर तरुणीची निवड केली. जेम्स बाँडला इंग्लंडहून इस्तंबूलपर्यंत खेचून आणणं आणि त्याला आपल्या मोहजालात अडकवणं हे तिचं काम होतं. पुढला सगळा पाताळयंत्री कट तिचे वरिष्ठ घडवून आणणार होते. स्मर्शनं लावलेल्या या सापळ्यात जेम्स बाँडनं आपण होऊन प्रवेश केला. या घातकी खेळामध्ये भुरळ पाडणारी तातिआना आणि रशियनांचं स्पेक्टर यंत्र ही दोन प्रमुख आमिषं होती. आणि - आणि या भयंकर खेळाचा शेवट अगदी निश्चित होता. तो म्हणजे जेम्स बाँडचा मृत्यु...! फ्रॉम रशिया विथ् लव्ह. डेली मेल, संडे टाइम्स या वृत्तपत्रांनी गौरवलेल्या इयान फ्लेमिंगच्या या जबरदस्त कादंबरीचा हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FROMRUSSIAWITHLOVE #FROMRUSSIAWITHLOVE #फ्रॉमरशियाविथलव्ह #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYDEODHAR #IANFLEMING "
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    स्मर्षं ही रशियन गुप्तहेर संघटना इतर देशातील गुप्तहेरांना ठार मारायचे काम करते . त्यासाठी त्यांचा एक खास मारेकरीही आहे . यावेळी त्यांनी निवड केलीय ती ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसमधील जेम्स बॉण्डची . सुंदर तरुणी हा जेम्सचा कच्चा दुवा आहे हे त्यांना माहीत हे . म्हणूनच त्यांनी रोमनोवा या सुंदर रशियन तरुणीची निवड केली. तिने जेम्सला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून इस्तंबूलपर्यंत खेचून आणण्याची कामगिरी सोपवली आहे .जेम्सने या जाळ्यात स्वतःहून प्रवेश केला त्यासाठी दुसरीही कारणे होती .पुढे काय होईल ....???? ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 28-08-2005

    बाँडप्रेमीसाठी उत्कंठावर्धक... जगभरातल्या साहसकथाप्रेमी वाचकांचा प्रेक्षकांचा हीरो म्हणजे बाँड; जेम्स बाँड झिरो झिरो सेव्हन जेम्सपट हा त्यांच्या आवडीचा विषय इयान फ्लेमिंग यांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ या कादंबरीचा मराठीतल्या जेम्स बाँडप्रेींसाठी विजय देवधर यांनी अनुवाद केला आहे. लेम्स बाँडला जाळ्यात पकडून त्याचा खात्मा करण्यासाठी स्मर्श ही रशियल गुप्तहेर संघटना तातिआना रोमानोवा या सुंदरीची निवड करते. जेम्स बाँडला इंग्लंडहून इस्तूंबूलपयंत आणायचं आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात गुरफटून ठेवायचं हे तिचं काम. एकदा तो इस्तंबूलला आला की पुढची सगळी तजवीज तिचे वरिष्ठ पार पाडणार अशी योजना असते. जेम्स बाँड स्मर्शच्या या जाळ्यात स्वत:हून कसा गुरफटतो आणि का आणि या खेळाचा शेवट काय? बाँडप्रेमींसाठी ही कादंबरी उत्कंठावर्धक आहे. -वैशाली चिटणीस ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more