* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FARASI PREMIK
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177664522
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2004
  • Weight : 300.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY OF A WOMAN WHO HAS TRAVELLED FAR AWAY FROM HER MOTHERLAND TO A DISTANT CITY IN SEARCH OF LOVE AND FREEDOM. THIS STORY IS ABOUT A BENGALI GIRL, NEELANJANA MANDAL. SHE MARRIES KISHANLAL WHO OWNS A RESTAURANT AND COMES TO STAY WITH HIM IN PARIS. SHE FINDS HERSELF CAGED IN KISHANLAL`S EXCLUSIVE PARIS APARTMENT. SHE REALIZES THAT AFTER MARRIAGE SHE HAS BECOME A MERE PUPPET IN KISHANLAL`S HANDS. SHE IS NO MORE THAN A SERVANT TO FINISH THE CHORES AND THEN AT NIGHT TO SATISFY HIS LUST. SHE CHOKES WITH THIS REALIZATION. SHE IS LOOKING FOR CHANGE FROM THIS DULL LIFE OF A PRISONER. SHE MEETS BENOYAR DUPONT. A VERY HANDSOME, FAIR, BLUE EYED FRENCH. NEELA FALLS IN LOVE WITH HIM. HE INTRODUCES HER TO THE STREETS, CAFES, ART GALLERIES OF PARIS. HE OPENS A UNIVERSE IN FRONT OF NEELA. SHE GETS INVOLVED IN HIM, THEY COME TOGETHER. SLOWLY, SHE REALIZES THAT EVEN DUPONT IS THE SAME LIKE HER HUSBAND. HE ALWAYS GIVES PREFERENCE TO HIMSELF. HE LOVES ONLY HIM AND NOT HER. SHE GIVES A FULL STOP TO THEIR RELATIONSHIP WHEN SHE REALIZES THAT SHE HAS TO KEEP HER FEELINGS ASIDE WHILE BEING WITH HIM. BUT THIS FULL STOP UNFOLDS A NEW BEGINNING FOR HER, SEARCH OF HER OWN SOUL. THIS NOVEL RELATES THE STRUGGLE AND EFFORTS OF A WOMAN, HER MINDSET IN THIS MALE CHAUVINIST SOCIETY WHILE KEEPING HER ALIVE.
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी. `फरासि प्रेमिक` ही कथा आहे, नीलांजना मंडल या बंगाली तरुणीची. उपाहारगृहमालक असणाऱ्या किसनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोनेरी पिंजऱ्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशाआकांक्षा पूर्ण होणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण आणि शयनेषु रंभा... एवढंच तिचं स्थान पाहून तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत निघालेल्या आयुष्यातून कुठं मोरपिशी वाट फुटतेय का? यासाठी नीला आतुर असते आणि अशा वेळी तिच्या आयुष्यात येतो बेनॉयार ड्यूपॉट... गोरापान, निळ्याशार डोळ्यांच्या राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्याप्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पेरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो... नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात... हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशाआकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे, त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे... आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो... धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवास्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 29-08-2004

    मायभूमीच्या दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि लढ्याची ही कहाणी आहे– नीलांजन या बंगाली तरुणीची. उपहारगृह मालक असणाऱ्या किशनलालशी तिचा विवाह झाल्यानंतर ती पॅरिसमध्ये येते. पॅरिसमधल्या किशनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोेरी पिंजऱ्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशा-आकांक्षा पूर्ण होणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण एवढंच तिचं स्थान राहतं. तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत असतानाच तिला गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा राजबिंड तरुण भेटतो. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते... हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. धाडसी कल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवस्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 03-10-2004

    अस्तित्वाची कहाणी!... ‘फरासि प्रमिक’ (फ्रेंच प्रेमिक) ही तसलिमा नासरीन यांची नवी कादंबरी. मूळच्या या बंगाली कादंबरीचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. तसलिमा यांच्या आजवरच्या वेगळ्या धाटणीच्या लिखाणाप्रमाणे ही कादंबरीही आपले भिन्न अस्तित्व दाखवन देते. नीलांजना मंडल ही एक सुशिक्षित बंगाली तरुणी वाढलेले वय, झालेला प्रेमभंग आणि घरातले वडिलांचे वर्चस्व, त्याखाली दबलेली आई अशी तिची पार्श्वभूमी. त्यावरचा उपाय म्हणजे भावाच्या मित्राने फ्रान्समध्ये राहणाऱ्या किशनलालचे सुचवलेले स्थळ. हा भिन्नप्रांतीय नवरा, त्याचे आचार-विचार आणि जीवन यांची सांगड नीलाशी घातली जाते. फ्रान्सला पोचल्यावर विमानतळावर आलेल्या आठवणी, नंतरची पार्टी, किशनचे वागणे यातून या नववधूचे पुढेच जीवन, गृहकृत्यदक्ष होण्याची धडपड - त्यातला फोलपणा पुढे येतो. किशनचे रासवट वागणे आणि एकूणच परिस्थितीला कंटाळून ती घर सोडते. नीला सुशिक्षित असली तरी या शिक्षणाला फारसा वाव नाही. फ्रेंच भाषेचे प्रस्थ आणि युरोपियनाव्यतिरिक्त व्यक्तीवरचा अविश्वास ठिकठिकाणी डोकावून जातो. भावाच्या मित्राचे घर, नंतर ऑफिसमधील मैत्रिणींचे घर - तिचे भिन्न जीवन याचे अनुभव नीलाला येतात. या टप्प्यावर आजारी आईसाठी ती कोलकत्याला येते. माहेरचे वातावरण, आईबद्दलच्या दाटून आलेल्या भावना ती गेल्यावर आलेले कोरडेपण व्यक्त होत राहते. भोवतालच्यांचे केवळ कर्तव्य म्हणून वागणे, वडिलांची एकाधिकारशाही, भावाचे अप्पलपोटेपण या साऱ्याची चीड तिला येते. माँने ठेवलेल्या पैशांची पुंजी आणि तिच्या आठवणी साठवत नीला फ्रान्सला परतते. याच परतीच्या प्रवासात नीलाला तिचा फ्रेंच प्रेमिक भेटतो. बेनॉयर ड्यूपॉन्टशी झालेली ओळख पुढे वाढतच जाते. एका भक्कम आधाराची गरज असलेली नीला त्याच्यात एकरूप होऊ पाहते. पॅरिसमधल्या रस्त्यांवर, कलादालनांत, संग्रहालयात फिरताना त्याच्यासोबत जीवनाचा आस्वाद घेते. काव्य, संगीत, कला, वाचन अशा आवडी जोपासू पाहते. पत्नी, मुलगी आणि नीला अशा तिढ्यात बेनॉयर अडकलेला असतो. नीलाला प्राधान्य देते तिच्याकडे राहतो. मात्र नीला त्याची हाकलपट्टी करते. खरं तर या संपूर्ण कादंबरीभर तसलिमा नासरीन यांची छाया आहे. ती तशीच ठेवण्यात सुप्रिया वकील यशस्वी झाल्या आहेत. तसलिमा यांचे स्वाभिमानी, अभिमानी विचार, बंगालीप्रेम आणि विचारीपणा यांचे प्रतिबिंब नीलाच्या व्यक्तिमत्त्वात दिसते. फ्रान्समध्ये प्रवेशताना विमानतळावरचा प्रसंग असो किंवा कोलकत्तामध्ये आईची भेट, त्या त्या प्रसंगांना भाषा, आशय, विषय यातून उठाव आला आहे. निवडक ठिकाणी परदेशातही केला जाणारा वंशभेद जाणवून जातो. जवळपास सारी कथा फ्रान्समध्ये घडल्याने तिथले स्थानिक संदर्भ, रीतीभाती, जीवनमान, खानपान यांचे चित्रण सूक्ष्मपणे टिपले आहे. नीलाचे इतरांना समजून घेणे, किशनच्या हॉटेलमधील भारतीयांशी ममत्वाने वागणे, मित्राच्या भावाने केलेल्या विटंबनेने हबकून जाणे हे लेखन नीलाचे व्यक्तिमत्त्व दाखवते. नीलाचे वागणे सुरुवातीला वाहवत चालल्यासारखे वाटते. बेनॉयरशी तिची मैत्री, सलगी, त्याच्यासाठीच जीव टाकणे याचा अर्थ शोधतानाच ती त्याला तोडून टाकते. वडील, भाऊ, मित्र, किशन किंवा बेनॉयर यांची जातकुळी एकच आहे. ‘‘ते कुठल्याही देशातले असले तरी वर्चस्व गाजवतात. स्वत:वर प्रेम करतात.’’ या निष्कर्षाशी नीला येऊन थांबते. एकदा हे कळल्यावर ती बेनॉयरमध्ये गुंतत नाही. स्वत:ला सिद्ध करू पाहते. हे करताना विविध प्रसंगांतील चर्चातून अनेक कलावंत, नामवंत, विचारवंत यांचा सहज परिचय आपल्याला देऊ पाहते. प्रकरणांना दिलेली इंग्रजी, फ्रेंच, मराठी काव्यात्मक शीर्षके उत्सुकता वाढवतात. मुखपृष्ठावरील कुत्रीच्या रेखाटनास संदर्भ अधेमधे लागत शेवटी खऱ्या अर्थाने लागतो. त्यासाठी कादंबरी वाचायला हवी. ‘फारसि प्रेमिक’ नावावरून रोमँटिक प्रेमकथा वाटेल. पण अगदी तसं नाही. अतिशय ताकदीने मांडलेल्या या कादंबरीत स्व-अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एकीच्या मनोवस्थाचं वेधक चित्रण येतं. मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची ही कहाणी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more