* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF A SOLDIER
  • Availability : Available
  • Translators : VINITA JOGLEKAR
  • ISBN : 9788184986822
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ON 12 MAY 2009 MARGARET EVISON`S SON LIEUTENANT MARK EVISON OF 1ST BATTALION, THE WELSH GUARDS, DIED OF WOUNDS SUSTAINED WHILST LEADING A PATROL IN HELMAND PROVINCE. HAILED A HERO, MARK`S DEATH WAS A NATIONAL SACRIFICE, HIS GRAVE TO BE ONE OF MANY IN THE IDENTICAL, ORDERED ROWS IN A MILITARY CEMETERY. BUT TO HIS MOTHER MARGARET IT WAS THE MOST INTIMATE OF GRIEFS. IN DEATH OF A SOLDIER, SHE ATTEMPTS TO RECONCILE HER OWN UNANSWERABLE SENSE OF LOSS WITH THE IDEA THAT HER SON DIED FOR A GOOD CAUSE. WITH HER, WE CONFRONT THE HORROR OF HIS DEATH AND WITNESS HER STRUGGLE TO SEE EPITHETS SUCH AS `HEROIC` AND `NOBLE` AS MORE THAN A MASK TO HIDE THAT UGLINESS. INCLUDED IN THE BOOK IS MARK`S DIARY, KEPT WHILE HE WAS IN AFGHANISTAN AND DELIVERED TO MARGARET AT HOME SOME WEEKS LATER. WIDELY QUOTED SINCE ITS DISCOVERY, IT CONTAINS THE THOUGHTS OF A SENSITIVE YOUNG OFFICER AND SERVES AS A POIGNANT REMINDER OF THE TERRIBLE HUMAN COST OF THE WAR IN AFGHANISTAN. DEATH OF A SOLDIER IS AN EXTRAORDINARILY POWERFUL TRIBUTE TO MARK AND A TESTAMENT TO MARGARET`S GREAT LOVE FOR HIM. IT PAINTS A PORTRAIT OF MARK`S SHORT BUT ACCOMPLISHED LIFE, BRINGING HIS EXTRAORDINARY CHARACTER INTO RELIEF AND UNDERLINING THE LOSS SUFFERED BY ALL WHO KNEW HIM. WHILST THIS IS A BOOK ABOUT THE NATURE OF GRIEF, IT IS ALSO THE STORY OF A MOTHER`S STRUGGLE TO UNDERSTAND HOW AND WHY HER SON CAME TO DIE, AND AS SUCH IT TOUCHES ON ISSUES OF PUBLIC INTEREST. AS MARGARET ELOQUENTLY DEMONSTRATES, THAT MIXTURE OF THE PERSONAL AND POLITICAL IS WHAT UNIQUELY CHARACTERISES THE DEATH OF A SOLDIER. ARTICULATE, REVEALING AND AT TIMES ALMOST UNBEARABLY MOVING, THIS IS AN IMPORTANT REFLECTION ON LOSS, WAR AND OUR RESPONSIBILITES TO THOSE WE SEND TO FIGHT.
सद्यस्थितीत बिनतारी यंत्रणा, पाणी, अन्न आणि वैद्यकीय उपकरणं या सगळ्याचीच येथे कमतरता आहे. या असल्या मोहिमांमध्ये मनुष्यबळाची नेमकी उणीव असते. अत्यंत धोकादायक भागांत दोन आठवडे पुरेल इतकच पाणी, अन्न आणि वैद्यकीय सामग्री घेऊन एखाद्या प्लॅटूनला पाठवणं, हे अगदी लाजिरवाणं आहे. ज्या दुखापती होतील त्यावर मी औषधोपचार करूच शकणार नाही आणि सैनिकांचे बळी जातील. खरंतर ते टाळता येऊ शकतील. हे म्हणजे आम्ही डोंबाऱ्यासारखं दोरावरून चालणंच आहे. योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आम्ही दोरावरून पडण्याची शक्यताच जास्त! भिंतीवर डोक आपटून घेण्यासारखंच आहे हे! मला हे सगळं फारच भयानक वाटतंय; म्हणजे इतक की, भीतीनं मी आजारीच पडेन. आज रात्री मी मॉमजवळ हे सगळं बोलेन आणि त्यानंच कदाचित मला थोडा उत्साह येईल....

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKASAINIKACHAMRUTYU #DEATHOFASOLDIER #एकासैनिकाचामृत्यू #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VINITAJOGLEKAR #MARGARETEVISON "
Customer Reviews
  • Rating StarDr.Pramod Bankhele

    हे पुस्तक मार्गारेट एव्हीसन च एकटीच नव्हे ,त्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलांच्या मातांच्या भावनांचं सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करणार आहे.या पुस्तकामुळे एक प्रश्न मात्र मनात येतोच युद्धात किंवा लष्करी कारवाई मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाचा सर्व स्तरातून दुखवटा व्यक्त केला जातो कुटुंबाला मदत ही केली जाते.आणि ते योग्य ही आहे पण लष्कराला कमीदर्जाच्या किंवा अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे जर सैनिक गमवावे लागत असतील त्यांचं काय? फार उत्तम म्हणून गौरवलेला "रंग दे बसंती" या चित्रपटात ही हाच प्रश्न उपस्थित केलाय,खर तर बुलेटप्रूफ जॅकेट्स,बर्फाळ प्रदेशात वापरण्याची साधन इत्यादी दर्जाहीन असल्यानं आपण किती सैनिक गमावले?चांगलं अन्न योग्य पुरेश्या आणि तात्काळ उपलब्ध असणारी आरोग्य व्यवस्था जर सैनिकांना मिळत नसतील तर वीर गती प्राप्त झालेल्या सैनिकांना पुष्पचक्र वाहताना यांचे हात कसे थरथरत नाहीत?संरक्षणासारख्या गोष्टीतील त्रुटी दाखवणं म्हणजे देशद्रोही ठरवलं जाण असली भिकार मानसिकता जिथे असेल तिथं बोलायचं तरी कुणी? सामान्यांच्या करावर संरक्षणाच्या नावाखाली देश लुटणार्यांना शाहिद झालेल्या सैनिकांच्या नाव घेताना लाज ही वाटत नाही.म्हणून म्हणतो हे पुस्तक फक्त मार्गारेट च नाही ते जगातील सर्व सैनिकांच्या मातांच ,कुटुंबीयांच आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी युद्धखोरी करणाऱ्या मुळे त्रासलेल्या सगळ्या बाधितांच आहे. ...Read more

  • Rating StarSAMNA 3-7-16

    ११ सप्टेंबर २००१ या दिवशी ओसामा बिन लादेनच्या अल कायद्याने अमेरिकेत हाहाकार उडवला. अल कायद्याच्या उच्चशिक्षित इस्लामी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त केले. याला उत्तर म्हणून अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तान आणि मग इराकवर ल्करी हल्ला चढवला. तेव्हापासून अमेरिकेची इस्लामी दहशतवादाविरुद्धची आंतरराष्ट्रीय लढाई चालू झाली. ती आजही चालूच आहे. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात आणि इराकमध्ये गुंतून पडलेले आहे. अफगाणिस्तानातली तालिबानची राजवट आणि इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट अमेरिकेने संपवली. पण म्हणून तिथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. अतिरेकी सतत घातपाती हल्ले करत असतात आणि त्यात निरपराध नागरिक, सैनिक मरत असतात. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये उतरलेल्या सैन्यांमध्ये अमेरिकेसोबतच तिच्या दोस्त राष्ट्रांचेही सैनिक आहेत. लेफ्टनंट मार्क एव्हिसन हा असाच एक ब्रिटिश सैन्यातला एक अधिकारी. अगदी तरुण, अवघ्या २६ वर्षांचा लेफ्टनंट मार्क अफगाणी अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार झाला. लेफ्टनंट मार्क एव्हिसनची आई मार्गारेट एव्हिसन ही मानसोपचार समुपदेशक आहे. मानसिक व्याधीने ग्रासलेल्या लोकांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे हेच तिचे काम आहे. त्यामुळे मानवी मन हेच तिच्या अभ्यासाचे क्षेत्र आहे. आपल्या पोटच्या मुलाच्या अशा हकनाक मृत्युमुळे तिचे स्वत:चेच मन गलबलून गेले आणि त्यातून ‘डेथ ऑफ ए सोल्जर’ या पुस्तकाची निर्मिती झाली. दोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सॅण्डहर्स्ट या लष्करी महाविद्यालयातून मार्क एव्हिसन बाहेर पडला. लगेच त्याला वेल्श गार्ड या पथकात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. अफगाणिस्तान हाजी अलेम या ठाण्यावर प्लॅटून कमांडर म्हणून तो कार्यरत होता. ९ मे २००९च्या सकाळी अतिरेकी लपलेल्या ठिकाणांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करताना तो जबर जखमी झाला. वैद्यकीय उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. अशी अनेक कोवळी पोरे रोज फुकट मरतायत. इस्लामी अतिरेक्यांनी संपूर्ण आधुनिक जगाविरुद्धच युद्ध पुकारलंय आणि त्यात अशी पोरे हकनाक बळी जातायत. मार्गारेट एव्हिसनचे हे पुस्तक म्हणजे अशा पोरांच्या आयांच्या विव्हल मन:स्थितीची प्रातिनिधिक कहाणीच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more