* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRUSHES, CAREERS AND CELL PHONES
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184984149
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BLUE DENIM, SNAZZY SUNGLASSES, AN EVOLVING LINGO, FRENETIC TEXT MESSAGING AND HOURLY SOCIAL NETWORK UPDATES...THE PLEASURE OF CELEBRATING YOUTH BRINGS THE PRESSURES OF EXAMS, FOREGOING DREAMS FOR SENSIBLE CAREERS, PEER AND PARENTAL EXPECTATION AND STILL LOOKING COOL! AND FOR THE PARENTS OF TEENAGERS IS THE UNCERTAINLY-ARE YOU “GIVING SPACE” OR BEING CARELESS, IMPARTING VALUES OR BEING DICTATORIAL, ENCOURAGING AMBITION OR BUILDING BURDENSOME EXPECTATION? THERE IS SO MUCH TO TALK ABOUT -A FOR ALCOHOL, APPEARANCE,AMBITION, B FOR BABIES, BRACES, BOYFRIENDS, D FOR DADS, DREAMS AND DRUGS, E FOR EMBARRASSMENT, G FOR GROWING UP, GENDER DIVIDE, GIRLFRIENDS, J FOR JEALOUSY, P FOR PIMPLES, M FOR MUMS, MEN , R FOR RUNNING AWAY, S FOR SUICIDE, T FOR TEACHERS, V FOR VALENTINE\`S... THE BOOK CAPTURES THE NUANCES OF PARENT -TEENAGER COMMUNICATION IN A SERIES OF SNAPPY CONVERSATIONS. A PERFECT GIFT FOR ANYONE GROWING UP... AND FOR ANYONE STANDING BY TO WATCH!
समर्पक शब्दांत दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडणारं हे मंजिरी गोखले जोशी यांचं पुस्तक समयोचितदेखील आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी प्रास्ताविकात वडील पिढीच्या डोळेझाकीला जमिनीत तोंड खुपसून बसणाNया शहामृगी वृत्तीची उपमा दिली आहे. असहायतेतून आलेली ही शहामृगी वृत्ती कमी करायला हे पुस्तक एखाद्या वाटाड्याप्रमाणे दिशादर्शन करू शकेल, असा मला विश्वास वाटतो. – अरुण टिकेकर संपादक, लेखक यश-अपयश, जराशी मजा आणि मद्यपान करून गाडी चालवणं, निरुपद्रवी शॉर्टकट्स आणि फसवणूक... या साNयातील सीमारेषा किती पुसट असते नाही! स्वप्नांनी भरलेलं भविष्य आणि आवेशपूर्ण तरुण मन, संताप, पळून जाणं, मादक द्रव्यांचं सेवन आणि हिंसाचाराकडे किती चटकन वळतं! आपण मुलांशी फक्त बोललो असतो आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे फक्त त्यांचं ऐवूÂन घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं टीनएजर्सच्या पालकांना कितीदा वाटलं असेल? सगळ्या आईबाबांना आपल्या मुलांना जे सांगावंसं वाटत असतं तेच या पुस्तकात अतिशय खुसखुशीत शैलीत सांगण्यात आलं आहे. – किरण बेदी माजी आयपीएस अधिकारी ही मुलं सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा विभिन्न वातावरणात वाढली असूनसुद्धा त्यांची मते फारशी वेगळी नाहीत! हा आगळा उपक्रम आता मराठी वाचकापर्यंत पोचत आहे, ह्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. – दिनकर रायकर संपादक, लोकमत मनात उभारणारी प्रेमभावना, उच्चशिक्षण, व्यवसायाची निवड आणि हाती सतत बाळगलेला सेल फोन! मुलांवर तणाव असतो परीक्षेचा, इतर मुलांसारखं ‘वूÂल’ दिसण्याचा आणि पालकांच्या अपेक्षांचा. असे अनेक प्रश्न कौशल्याने हाताळणारं हे पुस्तक किशोर व युवा अवस्थेत असलेल्या प्रत्येकाने जरूर वाचावं, आणि त्यांचा हा प्रवास कौतुकाने पाहणाNयांनीसुद्धा! – गिरीश कुबेर संपादक, लोकसत्ता
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKSANGU #CRUSHESCAREERSANDCELLPHONES #एकसांगू #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #MANJIRIGOKHALEJOSHI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 15-05-2019

    ‘क्रशेस करिअर्स अ‍ॅण्ड सेलफोन्स’ या मंजिरी गोखले-जोशी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी केलेला मराठी अनुवाद ‘एक सांगू?’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व विश्वसुंदरी सुश्मिता सेन यांची या पुस्तकाला प्रस्तावनाआहे. (सुश्मिता सेन या स्वत: दोन दत्तक मुलींच्या ‘सिंगल मदर’ आहेत.) तसेच, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची मराठी अनुवादाला प्रस्तावना आहे. आई आणि मुलं यांच्यातील मनमोकळा संवाद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. सगळ्या आई-बाबांना आपल्या मुलांना जे सांगायचं असतं तेच या पुस्तकात अतिशय हलक्याफुलक्या व खुसखुशीत शैलीत सांगण्यात आलं आहे. हे पुस्तक विशेषत: टीनएजर्सनी वाचावे असे आहेच, पण ते पालकांसाठीही उपयुक्त ठरू शकेल. कारण या पुस्तकात पालक व मुले या दोन्हीही बाजू प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. हे पुस्तक जरी उपदेशाचे चार शब्द अशा भूमिकेतून आहे. तरी त्यात मुलांबद्दलची अपार माया, काळजी व त्यांच्या भल्याची चिंता या गोष्टी ठळक व्यक्त होतात. टीनएजर्सशी संबंधित अनेक विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक आई व मुलांच्या नात्याचे अनेक पदर उलगडते आणि मुलांना संवादासाठी प्रवृत्त करीत त्यांना `We are always there for you` असा धीरही देते. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात चर्चिल्या गेलेल्या विविध मुद्द्यांच्या संदर्भात विविध देशांतल्या टीनएजर्सनी लिहिलेली मतेही दिली आहेत. आई व मुलांमधला हा संवाद आवर्जून वाचण्यासारखा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more