* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHILE TRAVELING ABROAD IN DIFFERENT PARTS OF THE WORLD, THE AUTHOR HAS FOUND A LOT OF PERSONALITY IN DIFFERENT STAGES OF SOCIETY. IT WAS THE TRIBAL PEOPLE FROM THE AFRICAN NATION OF A PROGRESSIVE NATION, OR SITTING ON THE ROADSIDE, FROM BOOT-POLISHING COMPANIES TO HIGHLY SKILLED PROFESSIONALS. THE STORY OF A PERSON WHO CAME OUT OF THE `ONE FRIEND ...` WAS REALIZED THROUGH THE OBSERVATION OF SUCH A PERSON, HE BELIEVES IN SUPERSTITION THE FOREIGN COUNTRY, THE DIVERSE CULTURE OF THE COUNTRY MEN. IN THAT CASE, THE WRITER IS TAKING THE READER TO THE WORLD IN REMOTE AREAS AND TO BRING A STRANGE WORLD TOUR. SOME STORIES WILL SHOCK READERS, SOME ARE SO SORRY! SOME ARE INTROVERTERS. ALTHOUGH THE STORIES IN THIS AREA HAVE BEEN UNFOLDED IN DIFFERENT PARTS OF THE WORLD, EVEN IF THEY FOUND THE ICONS OF MANTRAS FROM THE BEGGARS OR MINISTER MINISTERS, EVEN IF THEY ARE CONFUSED WITH SUCH CRIMES, OPPRESSION AND POLITICS, THERE IS A COMMON THREAD IN THIS MATTER - THE AUTHOR HAS GIVEN HIS EXPERIENCE IN SIMPLE AND SIMPLE LANGUAGE. THE HONEST EFFORT TO PRESENT IN A DRAMATIC AND EXCITING STYLE!
जगाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास नि वास्तव्य करत असताना लेखकास समाजाच्या विविध स्तरातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटल्या. त्यात आफ्रिकेतील आदिवासी ते एखाद्या प्रगत राष्ट्राचे अध्यक्ष किंवा रस्त्याच्या कडेला बसून बूट-पॉलिश करणाऱ्या पोऱ्यापासून ते अतिधनाढ्य व्यावसायिक अशा विभिन्न स्तरातील लोक होते. अशा व्यक्ती, परदेशात आलेले मनोरंजक, अनुभव देशोदेशींची वैविध्यपूर्ण संस्कृती, चालीरिती, श्रद्धा-अंध:श्रद्धा यांच्या निरीक्षणातून साकार झाल्या ‘एक होता मित्र...’मधील साऱ्या कथा! त्या वाचताना लेखक वाचकास जगाच्या दुर्गम भागात नि अनोख्या विश्वात फेरफटका मारून आणण्यासाठी घेऊन जात आहे, असा भास व्हावा. काही कथा वाचकांस चकीत करतील, तर काही व्यथित! काही आहेत मिश्कील, तर काही अंतर्मुख करणाऱ्या . यातील कथानके जरी जगाच्या वेगवेगळ्या भागात उलगडत गेली असली, जरी त्यात भिकाऱ्यांपासून धनिकांची किंवा मंत्र्यांपासून मांत्रिकांची व्यक्तिचित्रे आढळले, जरी त्या गुन्हेगारी, अत्याचार ते राजकारण अशा विषयांभोवती गुंफल्या असल्या, तरी या वैविध्यात एक समान धागा आहे – लेखकाने आपले अनुभव साध्या व सोप्या भाषेत पण नाट्यमय नि उत्कंठावर्धक शैलीत मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKHOTAMITRA #EKHOTAMITRA #एक होता मित्र #SHORTSTORIES #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 13 MARCH

    चार देश भटकल्यावर चार नवी ठिकाणं कळतात, तसेच चार नवी माणसंदेखील कळतात. मग ते त्या देशातील उच्चभ्रू असोत. की अतिधनाढ्य व्यावसायिक असोत, की एखाद्या गावात भेटलेला साधा गरीब खेडूत असो. लेखकाला स्वत:च्या व्यवसायानिमित्ताने घडलेल्या जगभ्रमंतीच्या दरम्यान अाच शेकडो लोकांशी परिचय झाला. त्यांचं जीवन त्यानं एका वेगळ्याच चष्म्यातून अनुभवलं आणि तेच रंजक पद्धतीनं कागदावर उतरवलं. त्यातील काही अनुभव गमतशीर आहेत, तर काही मनाला चटका लावून जाणारे तर काही अंतर्मुख करायला लावणारे. त्यामुळेच हे लेखन म्हणजे केवळ प्रवासवर्णन न राहता त्या त्या समाजाचा आरसाच बनून गेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला तत्कालीन राजकीय आणि सामाजिक बदलाची डूबदेखील मिळाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more