* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GODS OWN OFFICE
  • Availability : Available
  • Translators : SUNITA KATTI
  • ISBN : 9789387789531
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
JAMES JOSEPH WAS IN HIS LATE THIRTIES, WELL ENSCONCED IN HIS JOB AS A DIRECTOR WITH MICROSOFT, WHEN HE DECIDED TO TAKE A FAMILY VACATION IN ALUVA, KERALA. HIS SIX-YEAR-OLD DAUGHTER TASTED A JACKFRUIT FROM A TREE IN THEIR OWN YARD AND REMARKED, DADDY, THIS IS SO DELICIOUS. I WISH I COULD EAT THE FRUITS FROM THIS TREE EVERY YEAR. PART MEMOIR, PART HOW-TO, THIS IS HIS AMAZING STORY OF STARTING OUT FROM THE BACKWATERS OF KERALA, BECOMING A CORPORATE CAPTAIN IN AMERICA AND THEN FINDING A WAY TO HAVE A SUCCESSFUL CAREER WHILE WORKING OUT OF HIS VILLAGE IN KERALA. THIS BOOK ALSO CONTAINS TIPS AND TECHNIQUES FOR ANYONE FRUSTRATED WITH LIVING IN CITIES. HOW DO YOU SET UP A HOME OFFICE? HOW DO YOU INTEGRATE WITH THE LOCAL COMMUNITY? WHERE DO YOUR KIDS GO TO SCHOOL? HOW DO YOU CONVINCE YOUR COMPANY TO GIVE YOU THIS OPPORTUNITY? GOD S OWN OFFICE MAY WELL INSPIRE YOU TO TRANSFORM YOUR LIFE.
" नोकरी करणाऱ्या विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लांब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – ‘देवाजीचं ऑफिस’ हे पुस्तक. जेम्स जोसेफ यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या मुलींचं शालेय जीवन, जोसेफ यांचं कौटुंबिक जीवन याचंही अगदी हलक्याफुलक्या शैलीत ते वर्णन करतात. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाNऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंच समाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जोसेफ यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यासाठी ते एक उदाहरण आहेत. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#GOD’S OWN OFFICE# JAMES JOSEPH# CHENNAI# PIRAVOM ROAD# SAN FRANCISCO# A GREAT PRESIDENT# SHIVARATRI# TOM FRIEDMAN# KERALA# TURTLE# MINDA INDUSTRIES# 3M # GLOBAL MANAGER# WARWICK# US# SUPPLY CHAIN# VIENNA# UK# MICROSOFT #गॉड्स ओन ऑफिस# देवाजीचं ऑफिस# जेम्स जोसेफ# सुनीता कट्टी# पिरवोम रोड# सॅन फ्रान्सिस्को# केरळ# थोर राष्ट्रपती# शिवरात्र# टॉम फ्रीडमन# कासव# उंच उडी# आधारफळी# मिंडा इंडस्ट्रीज# थ्री एम. कंपनी# जागतिकीकरण# ग्लोबल मॅनेजर# व्हिएन्ना# अमेरिका# व्हिसा# बूट कॅम्प# सप्लाय चेन कन्सलटंट# वॉरविक# इंग्लंड# मायक्रोसॉफ्ट
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DEVAJICHE OFFICE by James Joseph केरळमधल्या खेड्यातून मायक्रोसॉफ्टच राष्ट्रीय पातळीवरचं काम करणाऱ्या जेम्स जोसेफ या अवलियानं त्याची कहाणी या पुस्तकात मांडली आहे. वर्क फ्रॉम होम हि कल्पना हळूहळू रुजत असताना जॅम्सनं केरळमधल्या खेडेवजा शहरात जाण्याचानिर्णय घेतला. वेगवेगळे अडथळे पार ाडत त्यानं तिथून काम केलं. त्या सगळ्या अनुभवांविषयी त्यानं लिहिलं आहे. दोन भिन्न गोष्टी अशा प्रकारे सांधत असताना उध्दभवणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याबाबत काही कानमंत्रही त्यानं दिले आहेत. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्याना पुस्तक रंजक वाटेल.व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक... नोकरी करणाऱ्या, विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लाब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जेम्स जोसेफ यांचं ‘गॉड्स ओन ऑफिस’ हे पुस्तक. ‘देवाजीचं ऑफिस’ या शीर्षकासह त्याचा अनुवाद केला आहे सुनीता कट्टी यांनी. जेम्स यांना पाच भावंडं. ते सहावे. ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईला कॅन्सर झाला आणि त्याच वेळेला वडिलांना अपघात होऊन ते कोमात गेले; पण तीन महिन्यांनंतर ते कोमातून बाहेर आले. जेम्स यांच्या आईचं मात्र निधन झालं. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी सहाही मुलांना वसतिगृहात ठेवलं. जेम्सच्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांनी या सहाही भावंडांना भक्कम मानसिक आधार दिला. जेम्स इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्यांच्या वडिलांना परत अपघात झाला आणि ते कोमात गेले; मात्र या वेळेला ते कोमातून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. जेम्सची आणि त्यांच्या पत्नीची ओळख कशी झाली आणि त्यांचं लग्न कसं झालं, याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. आपल्या मुलींबद्दलही ते बोलतात. एकूण त्यांचं विवाहपूर्व जीवन असो किंवा विवाहानंतरचं, त्यांच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे घट्ट स्नेहबंध जाणवत राहतात. आपल्या गावाविषयीची, तेथील लोकांविषयीची त्यांची आपुलकी लक्षात येते. जेम्स यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. या पुस्तकाच्या शेवटी जेम्स यांनी घरातून काम करायची इच्छा असेल तर कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात याचं मार्गदर्शन केलं आहे. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंचसमाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जेम्स यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण आहेत. साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. अर्थातच त्याचं श्रेय जेम्स यांच्याबरोबर सुनीता कट्टी यांनाही द्यायला हवं. तेव्हा घरातून काम करण्याच्या या प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हायला सगळ्यांना नक्कीच आवडेल ज्यांना घरातून काम करायची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. ...Read more

  • Rating Starसकाळ २९.०७.२०१८

    केरळमधल्या खेड्यातून मायक्रोसॉफ्टच राष्ट्रीय पातळीवरचं काम करणाऱ्या जेम्स जोसेफ या अवलियानं त्याची कहाणी या पुस्तकात मांडली आहे. `वर्क फ्रॉम होम` हि कल्पना हळूहळू रुजत असताना जॅम्सनं केरळमधल्या खेडेवजा शहरात जाण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळे अडथळे पार ाडत त्यानं तिथून काम केलं. त्या सगळ्या अनुभवांविषयी त्यानं लिहिलं आहे. दोन भिन्न गोष्टी अशा प्रकारे सांधत असताना उध्दभवणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याबाबत काही कानमंत्रही त्यानं दिले आहेत. विशेषतः माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेल्याना पुस्तक रंजक वाटेल. ...Read more

  • Rating StarSHABDARUCHI - JULY 2018

    व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल साधण्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक... नोकरी करणाऱ्या, विशेषत: मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या लोकांचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामात जातो. त्यात ऑफिसमध्ये जाणं आणि परत घरी येणं या वेळेचाही समावेश असतो. ऑफिस घरापासून लाब असेल, तर जाण्या-येण्यात माणूस दमून जातो. त्याला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. तो अन्य कोणत्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही; पण घरात बसून जागतिक दर्जाच्या कंपनीबरोबरही किती सहजपणे काम करता येतं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे जेम्स जोसेफ यांचं ‘गॉड्स ओन ऑफिस’ हे पुस्तक. ‘देवाजीचं ऑफिस’ या शीर्षकासह त्याचा अनुवाद केला आहे सुनीता कट्टी यांनी. जेम्स यांना पाच भावंडं. ते सहावे. ते दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईला कॅन्सर झाला आणि त्याच वेळेला वडिलांना अपघात होऊन ते कोमात गेले; पण तीन महिन्यांनंतर ते कोमातून बाहेर आले. जेम्स यांच्या आईचं मात्र निधन झालं. आईच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी सहाही मुलांना वसतिगृहात ठेवलं. जेम्सच्या आईच्या माहेरच्या नातेवाईकांनी या सहाही भावंडांना भक्कम मानसिक आधार दिला. जेम्स इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्यांच्या वडिलांना परत अपघात झाला आणि ते कोमात गेले; मात्र या वेळेला ते कोमातून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. जेम्सची आणि त्यांच्या पत्नीची ओळख कशी झाली आणि त्यांचं लग्न कसं झालं, याबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. आपल्या मुलींबद्दलही ते बोलतात. एकूण त्यांचं विवाहपूर्व जीवन असो किंवा विवाहानंतरचं, त्यांच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे घट्ट स्नेहबंध जाणवत राहतात. आपल्या गावाविषयीची, तेथील लोकांविषयीची त्यांची आपुलकी लक्षात येते. जेम्स यांनी या पुस्तकाद्वारे स्वत:चे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन, इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये चांगल्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर जोसेफ यांना भारतात केरळमध्ये आपल्या मूळ गावी परतावे, असे वाटू लागले. म्हणून त्यांनी त्यासाठी काय पूर्वतयारी केली, आपल्या छोट्याशा गावातून त्यांनी काम कसे सुरू केले, त्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, त्यांच्या निसर्गसंपन्न गावातील त्यांचं दैनंदिन, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन कसं आहे इ. बाबींचं निवेदन जोसेफ यांनी या पुस्तकातून केलं आहे. हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चं भावविश्व कसं जपावं आणि ते व्यापक कसं करावं, याचंही जाता जाता मार्गदर्शन करून जातं. जोसेफ यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यामुळे तिला व्यवसायाबरोबरच सेवाभावही जपता येतो. त्यांच्या पत्नीची डॉक्टरीची पदवी परदेशातील असल्यामुळे भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यात तिला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर जोसेफ यांनी केलेली मात, याचाही उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भातील जे जे उल्लेख या पुस्तकात आले आहेत, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, की घरातून काम करताना ते कुठेही ढेपाळत नाहीत. उलट त्यांचा कामाचा वेग वाढलेला आहे. घरातून काम करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, घरातून काम करतानाही आपल्या सहकाऱ्याशी कसं जोडलेलं रहावं, याबद्दलही ते सांगतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे जगभरातील लोकांशी बसल्या जागी संपर्क साधून काम कसं करता येऊ शकतं, हे या पुस्तकावरून समजतं. घरातून काम करतानाही ऑफिसइतक्याच कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे, असा मूलमंत्रही या पुस्तकातून मिळतो. या पुस्तकाच्या शेवटी जेम्स यांनी घरातून काम करायची इच्छा असेल तर कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात याचं मार्गदर्शन केलं आहे. एकूणच, घरातून काम करतानाचं तुमचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवन कसं असतं, याचं अगदी साध्या, सोप्या भाषेत निवेदन या पुस्तकात केलं आहे. मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना (विशेषत: मॅनेजर लेव्हलच्या) अशी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर परदेशस्थ भारतीय परत भारतात येऊ शकतात, अशी सूचनाही जोसेफ यांनी केली आहे. जोसेफ यांनी या पुस्तकात सुरुवातीला नमूद केलं आहे, ‘मोठा मासा बनून मोठ्या जलाशयात राहणं आणि लहान मासा बनून लहान तलावात राहणं, या दोन्ही गोष्टी मनाला सारखंच समाधान देतात. पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जेम्स यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण आहेत. साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. अर्थातच त्याचं श्रेय जेम्स यांच्याबरोबर सुनीता कट्टी यांनाही द्यायला हवं. तेव्हा घरातून काम करण्याच्या या प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हायला सगळ्यांना नक्कीच आवडेल ज्यांना घरातून काम करायची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. –अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more