* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF HUSSY
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789386888334
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ABOUT THE BEST THAT CAN BE SAID OF WEALTHY MAGGIE BAIRD IS THAT INSIDE HER MIDDLE-AGED BODY, THERE STILL BEATS THE HEART OF A BEAUTIFUL TART. SO WHEN HER CAR CATCHES FIRE WITH MAGGIE IN IT, THERE ARE FIVE LIKELY SUSPECTS RIGHT ON THE PREMISES OF HER LUXURIOUS HIGHLANDS COTTAGE. LOCHDUBH POLICE CONSTABLE HAMISH MACBETH HAS TO QUESTION MAGGIE`S TIMID NIECE AND FOUR FORMER LOVERS, ONE OF WHOM MAGGIE HAD INTENDED TO PICK FOR HER HUSBAND. ALL FIVE ARE EQUALLY POOR -- WITH AMPLE MOTIVE AND OPPORTUNITY TO MONKEY WITH MAGGIE`S CAR. NOW TO FIND THE KILLER, THE ASTUTE LAWMAN MUST APPLY HIS EXTRAORDINARY INSIGHT INTO HUMAN NATURE. BUT WHEN THE EVIDENCE APPEARS TO POINT TO THE WRONG PERSON ENTIRELY, HAMISH MUST DIG DOWN DEEP TO STOP THE REAL MURDERER`S ESCAPE.
लॉचढभ या स्कॉटिश गावचा इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ हा आपल्या प्रेमळ व उमद्या स्वभावामुळे गावातल्या लोकांना अतिशय लाडका असतो. हॅमिशच्या कारकिर्दीत लॉचढभमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटल्यामुळे त्यांची बदली जवळच्या स्ट्रॅथबेन शहरात केली जाते. साहजिकच लॉचढभचे लोक नाराज होतात. गावात अलीकडेच राहायला आलेली मॅगी बेआर्ड हॅमिशला परत आणण्यासाठी नामी शक्कल लढवते. गावात गुन्हे घडत असल्याच्या खोट्या तक्रारी करून ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना भंडावून सोडते. अखेरीस हॅमिशची बदली पुन्हा लॉचढभला होते. कॅन्सरच्या दुखण्यातून नुकत्याच बऱ्या झालेल्या ऑलिसन कर्र या आपल्या भाचीसोबत मॅगी गावातल्या एका आलिशान हवेलीत राहत असते. मध्यमवयीन श्रीमंत मॅगी बेअर्ड ही आज जरी लठ्ठ व बेढब दिसत असली तरी तरुण वयात ती अतिशय सुंदर व आकर्षक दिसत असे. चारित्र्याने बदनाम असलेल्या मॅगीने त्या काळात अनेक धनाढ्य व्यक्तींची रखेल होऊन भरपूर माया गोळा केलेली असते. आपले हरवलेले लावण्य पुन्हा प्राप्त करण्याच्या विचाराने मॅगी झपाटून जाते. तारुण्य व सौंदर्य परत मिळवण्याच्या इष्र्येने ती अज्ञातस्थळी निघून जाते. काही दिवसांनी मॅगी जेव्हा आपल्या घरी परतते, तेव्हा तिचे बदललेले रूप पाहून सारे जण थक्क होतात. आपण लग्न करणार असल्याचे मॅगी जाहीर करते व आपला जीवनसाथी निवडण्यासाठी ती एके काळच्या तिच्या चार प्रियकरांना आपल्या हवेलीत येण्याचे आमंत्रण देते. मॅगी कोणाशी लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना एक विचित्र घटना घडते. मॅगीच्या गाडीला अचानक आग लागते आणि त्या आगीत गाडीसकट मॅगीही भस्मसात होते. हा अपघात की घातपात असा पेच इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथसमोर उभा राहतो. संशयाची सुई अर्थातच मॅगीची भाची ऑलिसन कर्र व मॅगीचे तरुणपणाचे चार प्रियकर यांच्यावरून फिरू लागते. पाचही जण कफल्लक असतात व मॅगीच्या संपत्तीवर प्रत्येकाचाच डोळा असतो. मॅगीच्या गाडीत स्फोट घडवून आणण्याची संधी पाचही जणांना असते. एरवी सुस्त व आळशी असणारा हॅमिश हातात खुनाची केस येताच एका वेगळ्या रूपात सामोरा येतो. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, उत्तम व्यवहारज्ञान व मानवी मनाचा अचूक वेध घेण्याची विलक्षण क्षमता लाभलेल्या हॅमिश मॅक्बेथ मॅगीच्या खुनाचे रहस्य आपल्या अनोख्या पद्धतीने उलगडत जातो.

No Records Found
No Records Found
Keywords
#AHAMISHMACBETHMYSTERY#DETECTIVESTORIESINMARATHI#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more