* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DEATH OF A CAD
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789386888358
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CRIME & MYSTERY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN PRISCILLA HALBURTON-SMYTHE BRINGS HER LONDON PLAYWRIGHT FIANCÉ HOME TO LOCHDUBH, EVERYONE IN TOWN IS DELIGHTED... EXCEPT FOR LOVE-SMITTEN HAMISH MACBETH. YET THE AFFAIRS OF HIS HEART WILL HAVE TO WAIT. VILE, BOORISH CAPTAIN BARTLETT, ONE OF THE GUESTS AT PRISCILLA`S ENGAGEMENT PARTY, HAS JUST BEEN FOUND MURDERED - SHOT WHILE ON A GROUSE HUNT. NOW WITH SO MANY TITLED PARTY GUESTS AS PRIME SUSPECTS, EACH WITH THEIR OWN REASON FOR SNUFFING OUT THE DESPICABLE CAPTAIN, HAMISH MUST SMOOTH RUFFLED FEATHERS AS HE INVESTIGATES THE CASE... AND CATCH A KILLER, BEFORE THEY FLY THE COOP!
लॉचडभ हे स्कॉटलंडमधील एक छोटंसं गाव. त्या गावातील कर्नल हालबर्टन- स्मिथ आणि मेरी हालबर्टन- स्मिथ यांची तरुण, सुंदर मुलगी प्रिसिला हालबर्टन- स्मिथ ही लंडनमध्ये फॅशन पत्रकार म्हणून काम करत असते. लंडनमध्ये तरुण नाटककार हेन्री विदरिंगशी तिची भेट होते. हेन्री आणि प्रिसिला एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात. प्रिसिला हेन्रीला घेऊन लॉचडभला येणार आहे, हे समजल्यावर प्रिसिलाचे आई-वडील तिचं आणि हेन्रीचं लग्न ठरल्याच्या आनंदात पार्टीचं आयोजन करतात. याच गावातील तरुण पोलीस इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ हाही प्रिसिलावर प्रेम करत असतो. प्रिसिला आणि हेन्रीसाठी ज्या पार्टीचं आयोजन केलेलं असतं, त्या पार्टीसाठी बरेच लोक जमलेले असतात. त्यांच्यात कॅप्टन पीटर बार्टलेट नावाचा माणूस असतो. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी पीटर आणि अन्य काही जण शिकारीसाठी जाणार असतात; पण दुसऱ्या दिवशी सकाळी पीटरचा मृतदेह जंगलात सापडतो. हॅमिशच्या मते तो खून असतो. पीटरचा खून झाला आहे, हे हॅमिश कसं सिद्ध करतो आणि खुन्यापर्यंत कसा पोहोचतो, प्रिसिला आणि हेन्रीचं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ‘डेथ ऑफ अ कॅड’ ही कादंबरी वाचली पाहिजे.

No Records Found
No Records Found
Keywords
#AHAMISHMACBETHMYSTERY#DETECTIVESTORIESINMARATHI#
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    इंग्लंडमधील प्रसिद्ध नाटककार आपल्या नियोजित पत्नीसमवेत स्कॉटलंडमधील छोट्याश्या खेडेगावात तिच्या आईवडिलांना भेटायला येतो . तिच्या आईवडिलांनी त्यांच्या स्वागतासाठी एक मेजवानी आयोजित केलेली असते. गावातील काही मान्यवरही त्याठिकाणी हजर असतात. हॅमिश मॅकबेथहा आगंतुक पोलीस इन्स्पेक्टरही हजर असतो. पण दुसऱ्या दिवशी त्यातील एका पाहुण्यांचा खून होतो. हजर असलेल्या प्रत्येक माणसावर संशय घेतला जातो . प्रत्येकाला त्याचा खून करायची संधी आणि कारण असते . अतिशय नाईलाजाने हॅशिमला त्या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना देण्यात येते . तेव्हाच दुसराही खून होतो.काय आहे त्यामागचा हेतू ?? कोण करतंय खून?? मोठ्या कौशल्याने हॅशिम खुन्याला शोधून काढतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more