* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE TRANSLATOR
  • Availability : Available
  • Translators : AJIT KULKARNI
  • ISBN : 9788184983449
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"I AM THE TRANSLATOR WHO HAS TAKEN JOURNALISTS INTO DANGEROUS DARFUR. IT IS MY INTENTION NOW TO TAKE YOU THERE IN THIS BOOK, IF YOU HAVE THE COURAGE TO COME WITH ME." THE YOUNG LIFE OF DAOUD HARI-HIS FRIENDS CALL HIM DAVID-HAS BEEN ONE OF BRAVERY AND MESMERIZING ADVENTURE. HE IS A LIVING WITNESS TO THE BRUTAL GENOCIDE UNDER WAY IN DARFUR. "THE TRANSLATOR" IS A SUSPENSEFUL, HARROWING, AND DEEPLY MOVING MEMOIR OF HOW ONE PERSON HAS MADE A DIFFERENCE IN THE WORLD-AN ON-THE-GROUND ACCOUNT OF ONE OF THE BIGGEST STORIES OF OUR TIME. USING HIS HIGH SCHOOL KNOWLEDGE OF LANGUAGES AS HIS WEAPON-WHILE OTHERS AROUND HIM WERE TAKING UP ARMS-DAOUD HARI HAS HELPED INFORM THE WORLD ABOUT DARFUR. HARI, A ZAGHAWA TRIBESMAN, GREW UP IN A VILLAGE IN THE DARFUR REGION OF SUDAN. AS A CHILD HE SAW COLORFUL WEDDINGS, RACED HIS CAMELS ACROSS THE DESERT, AND PLAYED GAMES IN THE MOONLIGHT AFTER HIS WORK WAS DONE. IN 2003, THIS TRADITIONAL LIFE WAS SHATTERED WHEN HELICOPTER GUNSHIPS APPEARED OVER DARFUR`S VILLAGES, FOLLOWED BY SUDANESE-GOVERNMENT-BACKED MILITIA GROUPS ATTACKING ON HORSEBACK, RAPING AND MURDERING CITIZENS AND BURNING VILLAGES. ANCIENT HATREDS AND GREED FOR NATURAL RESOURCES HAD COLLIDED, AND THE CONFLAGRATION SPREAD. THOUGH HARI`S VILLAGE WAS ATTACKED AND DESTROYEDHIS FAMILY DECIMATED AND DISPERSED, HE HIMSELF ESCAPED. ROAMING THE BATTLEFIELD DESERTS ON CAMELS, HE AND A GROUP OF HIS FRIENDS HELPED SURVIVORS FIND FOOD, WATER, AND THE WAY TO SAFETY. WHEN INTERNATIONAL AID GROUPS AND REPORTERS ARRIVED, HARI OFFERED HIS SERVICES AS A TRANSLATOR AND GUIDE. IN DOING SO, HE RISKED HIS LIFE AGAIN AND AGAIN, FOR THE GOVERNMENT OF SUDAN HAD OUTLAWED JOURNALISTS IN THE REGION, AND DEATH WASTHE PUNISHMENT FOR THOSE WHO AIDED THE "FOREIGN SPIES." AND THEN, INEVITABLY, HIS LUCK RAN OUT AND HE WAS CAPTURED. . . . "THE TRANSLATOR" TELLS THE REMARKABLE STORY OF A MAN WHO CAME FACE-TO-FACE WITH GENOCIDE- TIME AND AGAIN RISKING HIS OWN LIFE TO FIGHT INJUSTICE AND SAVE HIS PEOPLE.
पुस्तकाचा लेखक सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी आहे. वंशाने तो ‘झॅघावा’ आहे. ‘झॅघावा’ ही डारफर मधील भटकी जमात. अरब आणि आफ्रिकन या दोन्ही वंशाचे लोक डारफर मध्ये गेली हजारो वर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण गेली काही वर्षे डारफर प्रांतात भयंकर वंशविच्छेद सुरू आहे. वंशाने स्वत:ला ‘उच्च’ समजणाऱ्या अरब वंशीयांना त्यांचे मूळ आफ्रिकन बांधव नकोसे झाले आहेत. सत्ताधारी अरब आणि त्यांना पाठिंबा देणारे माथेफिरू; हे मूळ आफ्रिकन वंशीयांना त्यांच्याच भूमीतून हाकलून देत आहेत. मूळ रहिवाश्यांच्या गावांवर आणि वस्त्यांवर हल्ले करून त्यांना जिवे मारण्यात येत आहे. स्त्रियांवर आणि कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. लाखो विस्थापितांचे लोंढेच्या लोंढे शेजारील चॅड या राष्ट्रात आश्रय घेत आहेत. दुर्देवाने तथाकथित आधुनिक जगाला या घडामोडींचा मागमूसही नाही. पुस्तकाचा लेखक स्वत: या सर्व परिस्थितीचा बळी ठरला आहे. त्याचे कुटुंबही या अत्याचारातून सुटलेले नाही. आपल्या इंग्रजीच्या ज्ञानामुळे त्याला ‘बीबीसी’, ‘एनबीसी’ या वृत्त वाहिन्या आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने पाठविलेल्या चौकशी दलांसाठी ‘दुभाष्या’ म्हणून काम करण्याची संधी मिळली. त्या संधीचा उपयोग करून डारफरमधील परिस्थिती या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने जगासमोर मांडली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DUBHASHYA #THETRANSLATOR #दुभाष्या #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AJITKULKARNI #DAOUDHARI "
Customer Reviews
  • Rating Starशुचिता फडके

    नुकतंच दुभाषा हे पुस्तक वाचण्यात आलं. सुदान राष्ट्रातील सत्य अशा घटनेवर आधारित हे पुस्तक आहे. ती घटना अजुनही भूतकाळ न होता वर्तमान काळातच आहे. हा विशेष दखल घेण्याजोगा मुद्दा. शिवाय मूळ पुस्तकाच्या आशयाला कुठेही धक्का न लागू देता केलेला चपखल अनुवाद हाअनुभवण्याजोगा आहे. अनुभवण्याजोगा कारण पुस्तक केवळ वाचलं जात नाहीत तर ते अनुभवलं जातं. मूळ प्रतिभासंपन्न सत्यकथेला मराठीत उतरवताना भाषेचं अवडंबर न माजवता चपखलरित्या संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. अनेकदा असं वाटतं, की आपण तिथेच आहोत सारं काही प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. सत्यकथेची ताकद इतकी जबरदस्त आहे, की आपला दृष्टिकोन बदलायला त्यामुळे नक्कीच मदत होते. हे पुस्तक वाचून मला तरी स्वत:ची वैचारिक भूमिका अधिक प्रगल्भ व सजग झाली आहे. हे जाणवतंय. मेहता प्रकाशनामुळे घरबसल्या इतर कुठलीही भाषा न शिकतादेखील देश-विदेशीची सुख-दु:ख, संस्कृती, आचार-विचार हे सारं आपल्यापर्यंत पोहोचतंय ही एक विशेष उल्लेखनीय बाब आहे. माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा संस्कार होईल तो याच पुस्तकातून. एक अतिशय सुंदर कलाकृती. वास्तवात आणणाऱ्या ‘दुभाष्याचे’ शतश: आभार. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 2-10-2015

    मानवी परिस्थिती आणि जीवन यांच्याकडे पाहण्याची एक शैली अस्तित्ववादाशी निगडित आहे. माणसाच्या परिस्थितिविषयी, मानवी अस्तित्वाच्या स्वरुपाविषयी आणि माणसानं कसं जगावं याविषयी काही मूलभूत प्रश्न अस्तित्ववादी उपस्थित करतात. हे वाचा-बोलायला ठीक वाटतं, पण मुळत आपल्या अस्तित्वावर घाला पडतो, भवताल बेचिराख होऊ लागतो, तेव्हा मग फार फार आतून गलबलून येतं... कासावीस वाटतं नि आपण जिवंत का आहोत, असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न दाऊद हॅरीला पडला नि त्यानं अनुभवकथन केलं ते ‘द ट्रान्सलेटर’ या पुस्तकाच्या माध्यमातून. त्याचा हा अनुवाद केलाय अजित कुलकर्णी यांनी. ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या लक्षवेधी मुखपृष्ठापासून हे अनुभव कथन लक्षवेधी ठरतं. दाऊद हॅरीच्या कथनाचं सारं सारच जणू या रेखटनातून प्रतिबिंबित होतं. पाठोपाठ येतो तो दाऊदचा फोटो नि त्याची संक्षिप्त ओळख. मग वाचता येतात ते या पुस्तकाविषयीचे अभिप्राय. खुद्द दाऊदची प्रस्तावना नि अनुवादकाच्या दोन शब्दांनी मूळच्या अरब कथनाविषयी आपल्याला कोणत्या क्लेशदायी अनुभवांना सामोरं जावं लागणार याची उत्सुकता वाढते. जेमतेम चारेक पानांचं एक एक प्रकरण असलं तरीही त्यातल्या मजकुरामुळं नि त्यातल्या अर्थवाही शब्दांनी हलून जायला होतं. हॅरी हा सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी. वंशानं तो तिथल्या झेंघवा या भटक्या जमातीचा प्रतिनिधी. अरब नि आफ्रिकन वंशाचे लोक डारफरमध्ये गेली हजारो वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते, पण गेली काही वर्ष डारफरमध्ये भयंकर असा वंशविच्छेद सुरु आहे. वंशानं स्वत:ला उच्च समजणाऱ्या अरब वंशियांना मूळ आफ्रिकन बांधव नकोसे झालेत. आफ्रिकनांना त्यांच्याच भूमीतून हाकलले जातेय. गाव-वस्त्यांवर हल्ले करुन त्यांना क्रूरपणं मारण्यात येतंय. अशा वेळी प्रथम बळी पडतो तो स्त्रिया नि लहान मुलींचा. दाऊदला भेटणाऱ्या-दिसणाऱ्या प्रत्येकीची हकिगत वेगळी आहे. वृद्धांचा गाव न सोडण्याचा निर्धार नि त्यापायी त्यांचा हकनाक मृत्यु वाचून हळहळ वाटते. निर्वासितांच्या छावण्यांतली, सीमाभागांतील अनेकांच्या कहाण्या वाचून सुन्न व्हायला होतं. स्वत: दाऊद नि त्याचं कुटुंबही या साऱ्या अत्याचारांचा बळी ठरलेय. मात्र आपलं दु:खं मागं सारुन त्यानं आपल्याला येणाऱ्या इंग्रजीच्या बळावर इतरांसाठी शक्य तो मदतीचा हात पुढं केलाय. वृत्त्तपत्र, दूरचित्रवाहिनी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दुभाष्याची भूमिका बजावत त्यानं आपलं काम सुरु ठेवलंय. इतक्या भयानक दु:खाच्या प्रवाहातून जाताना नि इतकी भयाण परिस्थिती अनुभवूनही दाऊदची भाषा सौम्य आणि संयम आहे. ना कुठं दु:खाचं प्रदर्शन ना शोकाचं अवडंबर. तथाकथित आधुनिक जगाला या साऱ्या उलथापालथींचा फारसा मागमूस नाही, हे जाणवल्यावर तो सल जणू दुभाष्याच्याच भूमिकेतून दाऊद हे कथन करतो. ही क्लेशकारक कहाणी असली तरीही दाऊदची दुर्दम्य आशा नि इच्छाशक्ती आपल्यालाही नकळत बळकटीच देऊन जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more