* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL BHAG 2
  • Availability : Available
  • Translators : USHAPRABHA PAGE
  • ISBN : 9788184989984
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SHE NURTURED YOU FROM A HELPLESS INFANT TO A SUCCESSFUL ADULT. SHE CALMED YOUR FEARS AND DRIED YOUR TEARS. SHE PRAISED YOU WHEN YOU NEEDED ENCOURAGEMENT AND PUSHED YOU WHEN YOU NEEDED MOTIVATION. SHE WAS YOUR NURSE, YOUR MAID, YOUR COACH, YOUR CHAUFFEUR, YOUR TEACHER AND YOUR FRIEND. SHE WAS THERE FOR YOU AND LOVED YOU NO MATTER WHAT. SHE HAS THE MOST REWARDING, YET MOST DIFFICULT JOB IN THE WORLD. SHE IS YOUR MOTHER. THIS POIGNANT COLLECTION OF STORIES FOR AND ABOUT THE MOST IMPORTANT WOMAN IN OUR LIVES FEATURES CHAPTERS ON LOVE, BECOMING A MOTHER, MOTHERS AND DAUGHTERS, MIRACLES, SPECIAL MOMENTS, LETTING GO AND MORE. IT IS A DELIGHTFUL ANTHOLOGY THAT WILL TOUCH AND WARM THE HEARTS OF READERS OF ALL AGES AND FROM ALL WALKS OF LIFE.
’चिकनसूप फॉर द मदर्स सोल’ या पहिल्या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि वाचकांच्या मागणीनुसार या दुसर्या भागाची निर्मिती करावी लागली. मातेची ममता, आईचं प्रेम हे या जीवसृष्टीतील चिरंतन मूल्य आहे. आईच्या ममतेची आणि आईची तुलना अगदी कशाशीच, कोणाशीच होऊ शकत नाही, अशा आशयाची एक आफ्रिकन म्हण आहे. या भागातील कथा मातेचं प्रेम, धैर्य, तिच्यातील शहाणपण यांवर प्रकाश टाकतात. काही कथांतून मातांचंही उद्बोधन केलं आहे. आईच्या प्रेमातील विलक्षण ताकद मुलाच्या येऊ घातलेल्या मृत्यूवरही मात करते - मग ते पोटचे मूल असो वा दत्तक घेतलेलं - हे वाचून आपण थक्क होतो. आईची आयुष्यातील भूमिका इतकी महत्त्वाची की ती नवी आयुष्यं घडवत असते. म्हणूनच मुलांच्या जडणघडणीमध्ये मुलांवर केवळ पैसा नाही, तर मुलांसाठी तुमचा वेळ देणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांना तुम्ही सर्वांत मोठी वंशपरंपरा कोणती देता, तर आनंदी आठवणी. आई-मुलांमधील भावबंधाची जाणीव मुलांना तेव्हा होते, जेव्हा तुम्ही तुमची मुलं वाढविता, हे जीवनातील एक लहान पण अत्यंत महत्त्वाचं तत्त्व छोट्या-छोट्या कथांमधून वाचकांपर्यंत पोहोचते, तर मातृत्वाची जबाबदारी ही मुलाच्या लंचबॉक्समधूनही कशी दिसते, त्याबद्दलच्या हृद्य कथाही यात आहेत. आईच्या प्रेमाची पक्व अवस्था आजी झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून आजी-आजोबांच्या ममतेचं महत्त्वही या कथांमधून अधोरेखित होतं. एकूणच मानवी जीवनातील आईच्या प्रेमाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे जाणून आईचे प्रेम, ममता हे मूल्य जाणून घ्यायची शिकवण या कथांमधून नक्कीच मिळते आणि याची वाचनीयता त्यामध्येच आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHEMOTHERSSOULBHAG3 #CHICKENSOUPFORTHEMOTHERSSOULBHAG2 #चिकनसूपफॉरदमदर्ससोलभाग३ #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #USHAPRABHAPAGE #JACKCANFIELD #जॅककॅफिल्ड "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more