* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHALISHINANTARCHI VATCHAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667066
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FORTIES` IS A VERY IMPORTANT MILESTONE IN EVERYBODY`S LIFE. DR. SUBHASH REVEALS HERE THE VARIOUS IMPORTANT ASPECTS RELATED TO THIS AGE GROUP. THE `FORTIES` ARE ALSO RESPONSIBLE FOR MANY CHANGES IN OUR BODY, SOUL AND MIND. HE DISCUSSES THIS IN DETAIL ALONG WITH THE OTHER TOPICS SUCH AS MENOPAUSE, HEART DISEASE, CANCER, DIABETES, ETC. WHILE DOING SO HE SKIPS THE DIFFICULT TECHNICAL PART OF EACH OF THE TOPICS AND MAKES THEM VERY SIMPLE TO UNDERSTAND. THIS SIMPLICITY MAKES IT POSSIBLE TO FOLLOW THE GUIDELINES HE HAS PROVIDED TO AVOID THE DANGERS OF CONTACTING THESE DISEASES. HE ALSO TALKS ABOUT THE REMEDIES FOR THESE DISEASES. HE ELABORATES THEM WITH THE EXAMPLES FROM DAY-TO-DAY LIFE.THE SALIENT FEATURE OF THIS BOOK IS THE SECTION DEVOTED TO HEART DISEASE ALONG WITH ITS VARIOUS TESTS, SURGERIES, THE NATURE OF SURGERIES, ETC.HE VERY DELICATELY HANDLES THE SENSITIVE TOPIC OF `SEX AFTER FORTIES` WHICH IS HARDLY DISCUSSED. HE PROVIDES VITAL INFORMATION ABOUT MAINTAINING PEACE IN FAMILY, AVOIDING OLD-AGE HOMES, ETC. HE GIVES DETAILED INFORMATION ABOUT THE OLD-AGE HOMES, ADAPTATION PROCEDURE, WILL, EYE-DONATION, BODY-DONATION, ETC. MAKING IT VERY SIMPLE TO UNDERSTAND THESE TECHNICALLY DIFFICULT TOPICS. THIS BOOK IS THE ONLY OF ITS TYPE FOR THE `OVER FORTY` AGE GROUP. IT WILL SURELY MAKE THEIR LIFE EASIER TO LEAD.
‘चाळिशी’ हा माणसाच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा का मानला जातो, हे सांगून डॉ. सुभाष दांडेकर यांनी या पुस्तकात, चाळिशीनंतरच्या आयुष्याशी अत्यंत निगडित अशा अनेक महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवर उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. चाळिशीनंतर होणारे शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार, कर्वÂरोग, मधुमेह अशा अनेक विषयांचे सविस्तर विवेचन करून, लेखकाने या विविध विकारांवरील उपचारांचे नेमके स्वरूप, त्यांतील तांत्रिक क्लिष्टता टाळून स्पष्ट केले आहे. वाचकांना त्यांच्या रोजच्या अनुभवविश्वातील उदाहरणे देत देत या सर्व गोष्टी लेखकाने पटवून दिल्या आहेत. हृदयविकाराच्या विविध चाचण्या, शस्त्रक्रिया, त्यांचे स्वरूप यांचे त्यांनी केलेले स्पष्टीकरण हे तर या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. ज्या विषयांवर कुटुंबात, समाजात उघड बोललेही जात नाही, असा ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ हा नाजूक विषयीही त्यांनी कौशल्याने हाताळला आहे. ‘कौटुंबिक स्वास्थ्यासाठी काय करावे’, ‘वृद्धाश्रम टाळण्यासाठी काय करावे’, याविषयी मोलाची चर्चा करताना त्यांनी वृद्धाश्रमांविषयीची मौलिक माहिती दिली आहे. दत्तकविधान, मृत्युपत्र, स्वेच्छामरण, देहदान, नेत्रदान या एरवी त्यांतील तांत्रिकतेमुळे क्लिष्ट वाटणाNया विषयांची माहितीही त्यांनी वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत आणून ठेवली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #डॉ.सुभाष दांडेकर #DR.SUBHASH DANDEKAR #HEALTHCARE & PSYCHOLOGY#चाळिशीनंतरची वाटचाल #CHALISHINANTARCHI VATCHAL #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-09-2002

    समाधानी वृद्धत्वाची पूर्वतयारी... जुन्या काळी मोठी माणसे देवाकडे चांगली शंभर वर्षे आयुष्य मागायची आशीर्वादही तसाच द्यायची तेव्हा ते शंभर वर्षांचे आयुष्य स्वावलंबी, समाधानी असावे अशीच त्यांची इच्छा होती; पण आरोग्यसंपन्न शंभर वर्षाचे आयुष्य जगायचे तर ास प्रयत्न हवेत. सकस आहार, योग्य व्यायाम, विश्रांती स्वच्छता, आजारावरील उपचार याबरोबरच मानसिक आरोग्यही हवे. साताऱ्याच्या डॉ. सुभाष दांडेकर यांनी अशा समाधानी वृद्धपणाची तयारी चाळीशीपासूनच करायला हवी असे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या घरात चार पिढ्या समाधानाने नांदत आहेत. फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांनी अनेक कुटुंबाचे आयुष्य जवळून पाहिले आहे. चाळिशी हा व्यक्तीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सुमारास अनेक शारीरिक, मानसिक व कौटुंबिक बदल घडत असतात. त्याची जाणीव ठेवून पुढच्या आयुष्याचे नियोजन करावे लागते. पुढील आयुष्याशी अत्यंत निगडित अशा अनेक महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषयावर लेखकाने उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह अशा अनेक विषयांवर सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. स्वेच्छामरण, दत्तकविधान, मृत्युपत्र यातली कायद्याची गुंतागुंत सोप्या भाषेमुळे कळते. देहदान, नेत्रदान, यासाठी मनाची तयारी करणे आवश्यक आहे. ओघवती भाषा व रोजच्या माहितीतील उदाहरणे याने विषय सहज सुलभ झाला आहे. सामाजिक व कौटुंबिक समस्यांवर विशेष मार्गदर्शन केले आहे. उघड बोलता न येणारा चाळिशीनंतरचे कामजीवन हा नाजूक विषय लेखकाने विशेष कौशल्याने हाताळला आहे. लग्न झाल्या क्षणापासून पूर्ण अनोळखी कुटुंबाला आपले म्हणायचे, सर्वस्व द्यायचे यापेक्षा मोठा त्याग तो कोणता? हा नित्याचा व्यवहार झाल्याने त्या त्यागाचे मोठेपण कुणालाच जाणवत नाही. पण पतीने तरी आपल्या पत्नीचा हा मोठेपणा जाणावा व तिचे मनही जाणून घ्यावे, स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते. उतारवयात तर ती फक्त माताच असते. कामवासना ही फार मोठी ऊर्जा आहे. तिला चांगल्या मार्गाने वळवणे हेही उत्तम पुरुषार्थाचे लक्षण आहे. साठीनंतर स्त्रिया मुले, नातवंडे, देवधर्म यात गुंततात. त्यांना पतीची फारशी गरज भासत नाही. हेच कारण असेल का की स्त्रिया वैधव्य आल्यानंतरही कित्येक वर्षे समाधानाने जगतात. याउलट पुरुष पत्नी निधनानंतर उदास होतो. आजारी होतो. पत्नीच्या पश्चात तो मनाने खचतो. पुरुष मानसिकदृष्ट्या पत्नीवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. कौटुंबिक कलह, चिंता करण्याची वृत्ती, नेहमी सगळ्यांनी आपलेच ऐकावे असा अट्टाहास यामुळे वृद्ध व्यक्ती अनेक घरातून नकोशा होतात. तसे होऊ नये म्हणून काय करता येईल याविषयी तरुणांना व वृद्धांना मार्गदर्शन केले आहे. श्रवणातील दोष व विस्मृती यामुळे कुटुंबात अनेक गैरसमज कसे निर्माण होतात हेही उदाहरणाने स्पष्ट केले आहे. चाळिशीनंतरची वाटचाल सुखासमाधानाची व्हावी म्हणून अनेक महत्त्वाच्या विषयावरची चर्चा एकत्र आणणारे हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. -रजनी वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 05-05-2002

    चाळीशी सुखाने पार करण्यासाठी... चाळीशी या निर्णायक टप्प्यावर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन करणारे विवेचन करणारे डॉ. सुभाष दांडेकर यांचे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चाळीशीनंतर होणारे शारीरिक बदल, ऋतुनिवृत्ती, हृदयविकार कर्करोग, मधुमेह अशा अनेक विषयांचे विवेचन सविस्तर केले आहे. लेखकाने या विकारांवरील उपचारांचे नेमके स्वरूप, त्यातील तांत्रिक क्लिष्टता टाळून स्पष्ट केले आहे. वाचकांना त्यांच्या रोजच्या जीवनातील उदाहरणे देत या गोष्टी पटवून दिल्या आहेत. दत्तकविधान, मृत्युपत्र, स्वेच्छामरण, देहदान आणि नेत्रदान या गोष्टींची माहिती ही लेखकाने वाचकांच्या आकलनाच्या कक्षेत आणून मांडली आहे. चाळीशीनंतरची वाटचाल सुखाची करण्यासाठी चर्चा घडविणारे हे मराठीतील एकमेव पुस्तक असे म्हणावे लागेल. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, LOKRANG 26-05-2002

    चाळिशी? डोन्ट वरी!... ‘चाळिशीनंतरची वाटचाल’ हे डॉ. सुभाष दांडेकर यांचे पुस्तक. या पुस्तकात वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कोणकोणते शारीरिक बदल होतात, ते बदल लक्षात घेऊन काय काळजी घेतली पाहिजे, उतार-वयात होणारे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती दक्षता घेली पाहिजे, अशी विविध माहिती देण्यात आली आहे. मेनोपॉज, स्त्रियांना होणारे कर्करोग, मोतीबिंदू, हृदयविकार, मधु-मेह, मूत्रविसर्जन संस्थेचे विकार या संदर्भातील माहिती लेखकाने दिली आहे. उतारवयात निर्माण होणारे कौटुंबिक कलह, ते टाळण्याचे मार्ग, वृद्धाश्रमात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांची माहिती, स्वेच्छा-मरण, दत्तकविधान, मृत्युपत्र, नेत्रदान, देहदान आदी विषयही लेखकाने हाताळले आहेत. वृद्धत्वाची चाहूल लागणार हे लक्षात घेऊन मनाची तयारी कशी करावी, दिनचर्या कशी ठेवावी, आदींची चर्चाही या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 19-05-2002

    परिपूर्ण सुखी उत्तरायुष्यासाठी आवश्यक पूर्वतयारी… सातारचे एक नामवंत डॉ. सुभाष दांडेकर यांचे ‘चाळिशीनंतरची वाटचाल’ हे पुस्तक चाळिशीचा टप्पा ओलांडणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त वाटेल. ‘लाईफ बिगिन्स अ‍ॅट फॉर्टी’ असे सध्या मानतात. कारण चाळिशीचा हा टप्पा हा ता पूर्वीसारखा वार्धक्याचा आरंभबिंदू राहिलेला नाही. तो साठीकडे झुकत आहे. तरीही चाळिशीनंतरचे आयुष्य हे अनेक दृष्टींनी वेगळे ठरतेच. डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चाळिशी हे आयुष्यातील एक संदर्भकेंद्र असून शारीरिक, मानसिक व कौटुंबिक बदलांची जाणीव ठेवून उर्वरित आयुष्याचे नियोजन करण्याची गरज प्रकट केली आहे. डॉ. दांडेकर यांनी वृद्धाश्रम व नेत्रपेढी या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. सरदेसाई त्यांना समाजाचे भूषण म्हणतात आणि या पुस्तकात शारीरिक व्याधींप्रमाणेच सामाजिक व कौटुंबिक समस्यांबाबत केलेले मार्गदर्शन महत्त्वाचे आहे याकडे लक्ष वेधतात. चाळिशीआधीचा काळ हा उमेदवारीचा असतो. त्यानंतर नोकरीधंद्यात स्थिरता येते. प्रमोशन्स मिळणे व व्यावसायिक प्रगती होणे हे पुढच्या काळातच सुलभ जाते. आजवरचा अनुभव यासाठी उपयुक्त ठरतो. चाळीशी ते साठी हा आयुष्यातील काळ वर्तमानावर पकडे ठेवून भविष्यकाळ आश्वासक ठरवण्याचा असतो. आपले उत्तरायुष्य आनंदमय करण्यासाठी आवश्यक ती बैठक चाळिशीतच साधावी लागते. या पुस्तकातील आरंभीच सात प्रकरणे मेनोपॉज, स्त्रियांचे रोग, मोतीबिंदू, हृदयविकार, मूत्रसंस्थेचे विकार, मधुमेह यांची चर्चा करतात. चाळिशीनंतरच्या कामजीवनाच्या मर्यादा व पथ्ये यांची कल्पना स्वतंत्र प्रकरणात देण्यात आली आहे. कौटुंबिक कलह कसे टाळावेत हे सांगून वृद्धाश्रमातील वास्तव्य व आर्थिक नियोजन याबद्दलही मार्गदर्शन केले आहे. उत्तरायुष्यात जोपसण्यासारखे छंद, दत्तकविधान, मृत्युपत्र, मरणोत्तर देहदान व नेत्रदान करण्याची पूर्वयोजना यांचीही माहिती देण्यात आली आहे. एकूणच आपल्यासाठीनंतरच्या जीवनाची सर्वकष रूपरेखा ठरवण्याच्या दृष्टीने आपली मानसिक तयारी करून घेणारे हे पुस्तक आहे. चाळिशीचा काळ हा एका परीने उत्साहाचा, स्वप्नपूर्तीचा व भरभराटीचा काळ असतो. साठीनंतरचा काळ हळूहळू सर्वच क्षेत्रांतून लक्ष कमी करण्याचा व निवृत्तीकडे जाण्याचा असतो. चाळिशीतच या साठोत्तरी आयुष्याचे नियोजन केले तर शारीरिक, आर्थिक मानिकस संतुलन उत्तम राहू शकते व शेवटचे दिवस गोड ठरू शकतात. परंतु चाळिशीत चुकीच्या सवयींच्या व व्यसनांच्या आहारी गेले, आर्थिक उधळपट्टी केली, तडजोडीचे हीन मार्ग स्वीकारले तर मात्र उत्तरायुष्याचे एकूणच गाडे रूळावरून घसरत आणि वार्धक्य ही शिक्षा ठरते. ज्येष्ठपण हे बिनचेहऱ्याचे व बिनकण्याचे होते. डॉ. सुभाष दांडेकर यांनी मोजक्या शब्दांत चाळीशीनंतरच्या वैद्यकीय समस्यांचे स्वरूप नेमके सांगून त्याबाबतच्या उपाययोजनांची दिशा सुचित केली आहे. मात्र वैद्यकीय सल्ला घेऊनच पुढे पाऊल टाकावे, असे पुन्हा पुन्हा बजावले आहे. हृदयविकाराची पूर्वसूचना मिळते, तशी लक्षणेही अनेक असतात. चरबी वाढू न देणे, धुम्रपान न करणे, चिडचिड टाळणे, तणावमुक्त राहणे, अंजायनाचा त्रास असेल तर नायट्रोग्लिसरीनच्या गोळ्या सतत जवळ ठेवणे, मधुमेह व रक्तदाब काबूत ठेवणे हे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच हार्टअ‍ॅटक आल्यानंतरचे उपचार व शस्त्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन केले आहे. चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत डॉ. दांडेकर यांनी अनेक सूचना दिल्या आहेत. पुरुष लैंगिकदृष्ट्या कधीच म्हातारा होत नाही. कामभावना अखेरपर्यंत राहते. शीघ्रपतन व ताठरता याबद्दलच्या समस्या काहींना त्रस्त करतात. स्त्रियांची कामभावना या वयात थोडी कमी होते. हे पुस्तक चाळिशीतल्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचायला हवे; त्यामुळे उत्तरायुष्यातील बऱ्याच समस्या वेळीच लक्षात येऊन त्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची मानसिकता तयार होईल. दत्तकविधान, मृत्युपत्र, देहदान, नेत्रदान, स्वेच्छामरण याबद्दही आपल्या मनोधारणा निश्चित करण्यासाठी या पुस्तकातील विवेचन परिणामाकारक ठरेल. चाळिशीनंतरची वाटचाल, ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more