* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COLLEGE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667387
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS A CRITICAL COMMENT ON PREVAILING EDUCATION SYSTEM AND IS REPRESENTATIVE OF THE STATE OF AFFAIRS IN THE FIELD OF EDUCATION ALL OVER THE COUNTRY. IT IS IN A WAY AN ASSESSMENT OF THE SYSTEM PUTTING A QUESTION MARK ON THE ALL ROUND DEVELOPMENT OF THE STUDENT AND OUR FUTURE GENERATION – THE BACKBONE OF THE NATION. IT IS IRONICAL THAT WHEREAS THE STUDENT SHOULD BE IN THE FOCUS AND THE CENTRE HE IS MARGINALIZED TOTALLY AND SO IS SEEN IN THIS NOVEL.
`या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणाऱ्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एक्स्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्याथ्र्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे, ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर?` ‘तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो- तुमचं करियर पाहा.’ सध्याच्या महाविद्यालयाीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामथ्र्यशाली कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #COLLEGE #MANASI #ADNYAT #CHHAYA MAHAJAN #
Customer Reviews
  • Rating Starनि. द. अटकेकर

    मानवी मनाचे व विशेष करून स्त्री मनाचे आपण फार प्रभावी व नेमके चित्रण केले आहेत. आपण स्वत: प्राध्यापकी पेशात असल्याने आपल्याला त्या पेशातील ताणतणाव, त्यातील गमती, एकमेकांवर कुरघोड्या करण्याची वृत्ती, ज्ञानदानातील आनंद या सर्वाची नेमकी जाण आहे. लिखाणाून प्रकर्षाने आपले सुसंस्कृत व परिपक्व मन दिसून येते. आपण कोठेही निराशावादी सूर लावला नाहीत. सर्व प्रसंगाना सामोरे जाताना आपल्या अभ्यासू व सुजाण मनाची प्रचिती येते. आपल्या कादंबऱ्यातून एका उच्चविद्याविभूषित स्त्रीच्या दृष्टीकोनातून प्रकटलेले कॉलेज विश्व पण मला तेवढेच महत्त्वाचे वाटते व त्याबरोबर मनातील सूक्ष्म आंदोलने आपण फार नेमकेपणाने मांडली आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 05-11-2006

    महाविद्यालयातील ‘राजकारण’… कोणत्याही महाविद्यालयात असतं तसंच वातावरण असणाऱ्या शिवापूरच्या महाविद्यालयातलं वातावरण या कादंबरीत लेखिकेने मांडलं आहे. सुमती सुखटणकर या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. झुऑलॉजीच्या विभाग प्रमुख म्हणून त्यांना ज्या समस्यांनासामोरे जावे लागते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा आलेख महाविद्यालयातील राजकारणाभोवती गुंफुन कॉलेजचे लिखाण केलेले आहे. आशा वाकडे नावाच्या प्राध्यापिका सुखटणकर यांच्याच शिफारशीने त्यांच्या विभागात पार्टटाईम म्हणून येतात आणि सुखटणकर यांना कॉलेजमधील राजकारणाचे भयंकर दर्शन घडते. लपवाछपवी, बनवेगिरी करत ‘थ्रू प्रॉपर चॅनेल’ सुममीमार्फत पूर्णवेळ होण्याच्या तयारीत असणाऱ्या या वाकडेबाईमुळे जे काही राजकारण घडते त्याचे सविस्तर वर्णन लेखिकेने केले आहे. रिमा डिसिल्व्हा या इंग्रजीच्या विभागप्रमुख सुमतीची मैत्रिण. प्राचार्य ग्रामीण भागातून आलेले. त्यातून संस्थाचालकांच्या गळ्यातील ताईत. संस्था आणि प्राध्यापक यांच्यात ताळमेळ घालून हा अप्पलपोट्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी देतो. रिमा आणि सुमती त्यांच्या विभागाच्या प्रमुख झाल्या, त्या त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर. पण संस्थाचालकांच्या वशिल्याने महाविद्यालयात नव्याने घेतलेल्या मर्जीतल्या प्राध्यापकाची वर्णी हळूहळू कशी पूर्णवेळ म्हणून लावली जाते. हा या कादंबरीचा मूळ विषय. या अनुषंगाने सुमती, तिचा नवरा जयंत, मुलगा रोहन, परदेशात राहणारा भाऊ दिलीप, आई, सामाजिक कार्य करणारी मैत्रिण जयू या व्यक्तिरेखा कादंबरीच्या ओघात येतात. प्राचार्यांनी सुमतीच्या विभागात दोन नव्या जागा निर्माण करण्यासाठी राजकारण सुरू केले. त्यांच्या मर्जीतल्या विसपुते नावाच्या माजी विद्यार्थ्यालाच प्राध्यामक म्हणून ते घेतात आणि त्याला पूर्णवेळ करण्यासाठी अनेक हिकमती करतात. वर्कलोड असताना प्राचार्यांच्या अनुपस्थितीत विभाग प्रमुख या नात्याने सुमतीने पारमार नावाच्या एका गरजू आणि गरीब विद्यार्थ्याला प्राध्यापक म्हणून नेमले. प्राचार्यांना हे कळताच त्यांच्या रागाचा पारा चढतो. सुमतीला मग ते घालून पाडून बोलणे सुरू करतात. पारमारच्या शिकवण्यावर विद्यार्थी नाराज आहेत, अशी तक्रार आल्याचे सांगून सुमतीवर दडपण आणायला सुरुवात करतात. सुमतीच्या विभागातील एका प्राध्यापकाला प्राचार्य सुमतीच्या नकळत शिष्यवृत्ती मिळवून देऊन त्यांना वर्षभरासाठी बाहेरगावी पाठवतात. त्यामुळे नवीन जागा भरण्याची गरज भासते. याच काळात सुमतीला एनएसएसच्या कॅम्पसाठी आठवडाभर बाहेरगावी पाठवून तिच्या अनुपस्थितीत मर्जीतले दोन नवीन प्राध्यापक रुजू करून घेण्यात ते यशस्वी होतात. या प्रकारचा सुमतीला त्रास सुरू होतो. सुमतीला विभागाकडे फारसे लक्ष देता येऊ नये म्हणून हळूहळू विविध कमिट्या तिच्यावर लादल्या जातात. सुमती मैत्रिण रिमाला प्रथम याचा संशय येतो. माटे नावाच्या दुसऱ्या कॉलेजातील प्राध्यापिकेकरवी सुमतीची ओळख काढून वाकडे नावाच्या नव्या प्राध्यापिकेची जागा निर्माण करण्यामागे प्राचार्यांचाच कट आहे. हे ती दाखवून देते. सुमतीने नेमलेल्या परमारवर आरोप आणि मर्जीतल्या अर्धवेळ प्राध्यापकांना कमिट्यांवर नेमण्यात येऊ लागले. कमवा आणि शिका योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त कार्यक्रमात बाहेरच्या विद्याथ्र्यांना बक्षिसे दिल्याचे जगजाहीर होताच ते प्रकरण सुमतीवर ढकलण्याचा प्रयत्न होतो. या काळात सुमती सुट्टीवर गेल्याचे पाहून प्राचार्य नवीन पर्यावरणाचा प्रकल्प तिच्या विभागाला जोडून वर्कलोड निर्माण करतात. सुमतीने तात्पुरती नेमणूक दिलेल्या परमारला काढून टाकले तर वाकडे आणि विसपुते या प्राचार्यांच्या मर्जीतल्या दोन प्राध्यापकांना कायम करता येऊ शकते म्हणून बाहेरगावी गेलेले प्राध्यापक परत येताच परमारला काढून टाकण्यात येते. गरीब परमार कॉलेजमध्येच आत्महत्या करतो. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागते. पोलीस तपास सुरू होतो. या चौकशीत कॉलेजचे बिंग बाहेर पडू लागते. चटर्जीना मुद्दाम शिष्यवृत्ती देऊन बाहेरगावी पाठवणे, त्यापूर्वी विसपुते आणि वाकडे यांच्यासाठी तात्पुरती जागा करणे, एक वर्ष आधी असूनही केवळ मर्जीत नसल्यामुळे परमारला काढून टाकणे, चटर्जी परत येताच वर्कलोड वाढला म्हणून विसपुते-वाकडे यांना सहा महिन्यांची ऑर्डर देणे, त्यासाठी रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे या गोष्टी बाहेर पडतात, प्राचार्याचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत, हे पोलीस संस्थाचालकांना दाखवून देतात सर्वांचे धाबे दणाणतात. अधिक तपासात वाकडे केवळ एम.एस्सी असल्याचे आणि विसपुते याच्यावर कॉलेजचा माजी विद्यार्थी असताना कॉपीप्रकरणात पकडल्याचे निष्पन्न होते. परमारने लिहिलेली पोलिसांच्या हातात पडताच सारेच गोत्यात येतात. सुमतीने त्यांचे बिंग पोलिसांसमोर फोडू नये म्हणून तिला आलेली परदेशी शिष्यवृत्तीची ऑफर संस्था तिला स्वीकारायला लावतात आणि प्राचार्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू होते. -संदीप आडनाईक ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 14-01-2007

    किंचित हादरा देणारी कादंबरी… कादंबरीचे नाव ‘कॉलेज’... कोणाच्याही मनात झिंग आणि नशा निर्माण व्हावी असं. काही नॉस्टॉल्जियात शिरतील. २००६ नंतरच्या दशकातला ऐवज यात सापडेल असं कुतूहल काहींच्या मनाला स्पर्श करेल. मात्र या कादंबरीत तरुणाईचा जल्लोष नाही. तरणांच्या ‘कॉलेज’ला त्यांच्या ‘कॉलेज जगण्या अनुभवण्याला स्पर्श करावा असा या कादंबरीचा हेतूच नाही. झूओलॉजीच्या विभागप्रमुख असणाऱ्या प्रौढ, विवाहित, हुशार प्राध्यापिकेच्या बुद्धीला – मनाला, संस्थेच्या प्राचार्य – कार्यकारिणीने, मारलेल्या डंखाची ही हकीकत आहे. कॅनव्हास आहे कॉलेज – प्राध्यापकांचे गट प्रत्येकाचे स्वभाव. त्यांच्या बऱ्यावाईट दांभिक वृत्ती. अर्धवेळासाठी काम द्या म्हणून डोळ्यात पाणी घेऊन येणारी आणि पुढे ज्यांनी काम दिलं त्यांच्याच डोळ्यातलं पाणी काढणारी वाकडे नावाची बाई. कथानक फिरतं ते या लबाड स्त्रीने खेळलेल्या खेळीभोवती. सुमती सुखटणकर या विभागप्रमुख. सरळ स्वभावाच्या पण थोडं बहुत राजकारण कळूनही स्वत:ला आक्रसून घेत. आपल्या हतबलतेचा आलेख काढणाऱ्या. त्यांची सहाध्यायी इंग्रजीची प्राध्यापिका रीमा - तिचं बुद्धीचापल्य स्पष्टवक्तेपणा याची भुरळ सुमतीवर आहे. दुसऱ्या बाजूला जयू नावाच्या अपंगासाठी आयुष्य वेचणाऱ्या मैत्रिणीबद्दलचं कौतुक... मात्र स्वत:कडे बुद्धीहुशारी असूनही असावी तेवढी तडफ-ठामपणा नसल्याने कधी पतीचा आधार कधी रीमाच्या शब्दांचा प्रभाव यातून कॉलेजमध्ये प्रचंड मानसिक गुंतवणूक केलेली सुमती... ती ज्या गोष्टी, प्रसंगांनी कोलमडून जाते त्याबाबी तात्कालिक डिप्रेशन देणाऱ्या असतीलही. परंतु तिच्या मनावर सर्वच गोष्टींचा परिणाम खोलवर होतो. तिचं प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी धास्तावणं, इतरासमोर काय व किती बोलावं याबद्दलचं दडपण. तिचं हेच ‘भिडस्तपण’ कादंबरीभर विखुरलेलं आहे. तिला समजावून घेणारे, समजावून सांगणारे तिची प्रखर बुद्धीमत्ता मान्य करतात, पण जगण्यातल्या व्यवहार्य भागाचं तिला आकलन होत नाही म्हणून अस्वस्थ होतात. तिच्याविरुद्ध चालणाऱ्या कारस्थानात अग्रभागी असणाऱ्या वावडेबाई व त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले प्राचार्य यांचे सुमतीच्या आयुष्यावर होणारे थेट परिणाम याच सूत्रातून कादंबरी पुढे सरकते. विद्यार्थ्याच्या कलाकलाने वागणाऱ्या वाकडेबार्इंना शिकवण्यासाठी तास दिले जातात. सर्व अ‍ॅक्टिविटीज दिल्या जातात. याचा अर्थ त्यांच्यात थोडीतरी क्षमता असणारच. त्यांचा अदृश्य जाच परमारच्या आत्महत्येला कारणीभूत ठरतो. असं दाखवून वाकडे नावाची खलवृत्ती. तिच्या लोचटपणाचा कळसाध्याय मांडण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे. या कादंबरीत कॉलेजमधल्या डिपार्टमेंटला भ्रष्ट प्राध्यापकामुळे झालेला संसर्ग, खच्चून भरलेल्या तपशीलासकट येतो. जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या प्राध्यापकांना गृहीत धरणं इथंपासून ते एनएसएसच्या कार्यक्रमातून उघड होणारा भीषण भ्रष्टप्रकार... २१ प्रकरणांतून एक शृंखलाच वाचकांसमोर उलगडली जाते. लेखिकेची तडफड, घुसमट कादंबरीतल्या प्रत्येक पृष्ठावर व्यक्त होते. एखाद्या व्यक्तीचं खच्चीकरण करणारी यंत्रणा त्या व्यक्तीच्या विकासाबरोबरच समांतर रेषेत निर्माण होत असते. त्या व्यक्तीला तो सुगावा लागूनही ती काही करू शकत नाही. त्या होरपळीत घर तुटतं. नातलग निघून जातात. उरतं ते रितेपण. प्रश्न निर्माण करणारं रितेपण. ज्यांच्यासाठी मानसिक गुंतवणूक केली ते विद्यार्थी कुणा दुसऱ्यालाच डोक्यावर घेणार. आपण जीवघेण्या खेळाचे केवळ साक्षी... असा आशय कादंबरीतून व्यक्त होतो. अर्थात ज्या विद्यार्थ्याचा कॉलेजच्या पटावर अंतर्भाव असतो त्यांच्या संदर्भात ही कादंबरी खूप थोड्या प्रमाणात व्यक्त होते. स्टाफरूम -प्राध्यापक-संस्थाचालक-कार्यकारिणी आणि प्राचार्य याभोवती फिरताना नायिकेचं घर - तिची मानसिक - भावनिक जडणघडण यांना कवेत घेतलं जातं. त्यामुळे हा संघर्ष बहुपदी होत नाही. कादंबरीचा आवाका शीर्षकाला लक्षात घेऊन केला असता तर ही निराळी कादंबरी ठरली असती. गेल्या दशकातले येऊ घालणाऱ्या दशकातले असे अनेक प्रश्न आज कॉलेजविश्वात आहेत. कॉलेजच्या अंतर्गत राजकारणात अर्थ पूर्ण वेळ काम करणाऱ्याचं शोषण नॅक मुळे निर्माण झालेला व्यवस्थापनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. या सर्वांत भरडून निघणारा प्राध्यापक त्यांची ससेहोलपट पाहणारा, जाणणारा विद्यार्थी हा कादंबरीतला एक प्रमुख घटक ठरणं आवश्यक होतं. भिंगाखाली सगळ्याच समस्या पाहत गेल्याने त्या खूपच मोठ्या वाटत जाऊन सुमती सुखटणकर दुरावते. असं या कथानकाचं केंद्र बनल्याने कादंबरी पसरट वाटते. यातल्या व्यक्तिरेखा ठळक आणि संवाद (क्वचित ठिकाणी) जगण्याच्या शक्यत निर्माण करणारे झाले असल्याने ती क्वचितच वाचनीय ठरते. कादंबरीचे अप्रतिम मुखपृष्ठ ही जमेची बाजू. मूल्यहिनतेचा सर्वकष आलेख या कादंबरीत काही ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. तर काही जागा रिक्त ठेवल्याने कादंबरीचं अधुरेपण ठसतं. कॉलेज पॉलिटिक्सच्या एका प्रबळ भागाचं सूक्ष्म विदारक दर्शन हे या कादंबरीचं यश. २००० नंतरच्या दशकात कॉलेजसंबंधी निर्माण झालेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा नसलेला समावेश हे अपयश. कॉलेजच्या कोणत्याही डिपार्टमेंटला तिथल्या कार्यपद्धतीला तळहातावर ठेवत केलेली ही मीमांसा वाचकाला थोडासाच हादरा देते. -वृंदा भार्गवे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more