* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHITAK
  • Availability : Available
  • ISBN : 9788190779128
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1975
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE IS A WHOLE WORLD OUT; NOT OF THE SO CALLED LITERATE AND MIDDLE CLASS PEOPLE BUT OF THOSE WHO ARE DOWN TRODDEN, THERE ARE FARMERS, WORKERS, LABOURERS, DRIVERS, CLEANERS, MECHANIC, PROSTITUTES...; THEY ALL LEAVE WITH THEIR INSULTS, THEIR POVERTY, AND THEIR INSECURITIES; STILL THEY HAVE THE SPIRIT TO FIGHT ALL THESE ADVERSITIES IN THEIR LIVES. THIS WORLD HAS INSPIRED THE AUTHOR. THE STORIES IN THIS BOOK ARE BASED ON ALL SUCH PEOPLE, OF THEIR AFFLICTION AND ALSO OF THEIR HAPPY MOMENTS. CHITAAK WILL HELP YOU TO REALIZE THAT THE BASE OF RURAL STORIES IS NOT ALWAYS THE RURAL LANGUAGE. THE FARMERS SPEAK THE LANGUAGE IN NORMAL TONE AND STYLE TOO; AT THE SAME TIME THERE ARE OTHER PEOPLE WHO HAS THE RURALITE ACCENT TO THEIR SPOKEN SKILLS.
सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही पदोपदीच्या अपमानांचे व दु:खांचे हालाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाया शेतकरीकामकरीमजूरड्रायव्हरक्लीनरमेकॅनिक वारयोषिया आदि पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेच जग लेखनाची प्रेरणा व शक्ती... ‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या ह्याच जगातील लोकांच्या, रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही. चाकोरीबद्ध ग्रामीण वाङ्मय वाचून ग्रामीण बोली खेड्यापाड्यातील केवळ शेतकरीच नित्य बोलत असतो असा जो समज सर्वसामान्य मराठी वाचकांत रूढ झाला आहे, त्याला ‘चिताक’मुळे छेद जायला हरकत नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही, पदोपदीच्या अपमानांचं व दु:खांचं हलाहल पचवीत नियतीशी चिवटपणे झुंजत जगणाऱ्या शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते, जोगतिणी, वारयोषिता आदी पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे. हेचजग श्री. महादेव मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. समाजाच्या तळागाळातील हे जग... ‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या याच जगातील लोकांच्या... त्यांच्या ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही... या संग्रहास महाराष्ट्र शासनाचा १९७५-७६ सालचा राज्यपुरस्काराचा सन्मानही प्राप्त झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया आपल्या गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात, त्याला ‘चिताक’ म्हणतात. कोल्हापूर-राधानगरी भागात हे ‘चिताक’ आजही आढळते. ...Read more

  • Rating Star SAKAL SAPTRANG 8-3-2009

    ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया गळ्यात विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात. या दागिन्याला ‘चिताक’ असे म्हणतात. जुन्या काळातील हा दागिना कोल्हापूर-राधानगरी भागातील स्त्रियांच्या गळ्यात आजही आढळतो. महादेव मोरे यांच्या कथासंग्रहाचे नाव हेच आहे. मोर हे त्याच भागातील (निपाणी) असल्याने त्या भागातील एका खणखणीत शब्दाचे शीर्षक त्यांनी त्या संग्रहाला दिले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वर्षी ही दुसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. मोरे हे विपुल लेखन करणारे लेखक आहेत. आजवर त्यांचे सतरा कथासंग्रह (एक अनुवादित, एक निवडक), तितक्याच कादंबऱ्या (एक अनुवादित), एक ललित लेखसंग्रह आणि व्यक्तिचित्रांचे तीन संग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘चिताक’ या शीर्षकाची एकही कथा या संग्रहात नाही. मात्र, सर्व कथांचा मिळूनच हा एक कथादागिना (चिताक) आहे, असा अर्थ घेता येईल. एकंदर वीस कथा संग्रहात आहेत. मोरे यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. ग्रामीण भाषेतील विविध अर्थसंपन्न शब्दांनी लगडलेली अशी ही शैली वाचकाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. सुशिक्षित, पांढरपेशाच्या छोट्या जगाबाहेरही एक जग असते. शेतकऱयांचे, कामकाऱयांचे, मजुरांचे, जोगत्यांचे, वारयोषितांचे... या जगातील माणसे पदोपदी अपमान, मानहानी, वंचना, उपेक्षा, दु:खे यांचे हलाहल पचवीत नियतीशी झुंज देत जगत असतात. मोरे यांच्या लेखनाची मुख्य प्रेरणा आहे ती या जगातील माणसांचीच. ‘चिताक’मधून त्यांनी याच माणसांची सुख-दु:खे, कथा-व्यथांचे चित्रण केले आहे. हा कथासंग्रह ग्रामीण भागातील वाचकांना आपल्या मातीतील वाटेल; तर शहरी भागातील वाचकांना दैनंदिन जीवनाहून एका वेगळ्याच जगाचे दर्शन घडवेल. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 19-4-2009

    साहित्यातून जे बहुपेडी जीवनानुभव व्यक्त होतात, त्यातून अनेक अनुभवांचे ज्ञान मिळून आपले जीवन संपन्न बनते. शहरातल्या लोकांना ग्रामीण जीवनाचे तर खेड्यातल्या लोकांना शहरी जीवनाचे आकर्षण कायम असते. चिताक या ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रया गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात त्याला `चिताक` म्हणतात. कोल्हापूर, राधानगरी भागात हे चिताक आजही वापरतात. पांढरपेशा जीवनाशी जवळीक साधू पाहणारे त्यात आपली जागा पक्की करून त्यात अस्तित्व टिकवू पाहणारी शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते आदी पददलित लोकांचं विशाल असं जग, तेच मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. माणूस आपल्या जीवनात आनंद शोधत असतो. ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळका या कथातून वेगळाच अनुभव देतात. माणसाच्या सुखाच्या शोधाची ही धडपड कथांना एक वेगळेच परिमाण देते. भजी हांदलली, गाडी लहडून गेली, बोंबडी मारला, दवडणे, परतडमदी अशा प्रकारच्या वेगळ्या रचना मराठीचा वेगळा बाज व्यक्त तर करतातच पण त्यातून त्यांचा जीवनानुभव जास्त भिडतो. विविध कष्टांची कामं करत आयुष्य जगणाऱ्या मोरेंना आपल्या अवतीभवती जी कथाबीजं मिळाली तीच त्यांनी फार सुंदर फुलवली असं या कथातून जाणवतं. माणसांची हतबलता त्याला कसं जीवन जगायला भाग पाडते, हे मांडताना काही वेळा त्यातूनही जीवन जगतांना क्षणाक्षणाला आनंदाचा शोध मनोहारी वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more