* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL: TRUE LOVE
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9789386342010
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CSS TRUE LOVE WILL WARM THE HEART AND UPLIFT THE SPIRIT OF ANY READER WHO IS LOOKING FOR, OR HAS FOUND, HIS OR HER SOULMATE. STORIES OF DATING, ROMANCE, LOVE, AND MARRIAGE, WITH ALL THEIR UPS AND DOWNS, WILL ENCOURAGE, INSPIRE, AND AMUSE READERS. EVERYONE LOVES A GOOD LOVE STORY. AND WE ALL LOVE STORIES ABOUT HOW THE LOVE STARTED AND BLOSSOMED. THIS FUN NEW BOOK ABOUT DATING, ROMANCE, LOVE, AND MARRIAGE, WILL MAKE YOU LAUGH AND MAKE YOU CRY, AND IS GUARANTEED TO INSPIRE YOU TO RENEW THAT SEARCH FOR YOUR SOUL MATE OR OPEN YOUR HEART A LITTLE MORE TO THE ONE YOU ALREADY HAVE. READ ABOUT HOW COUPLES MET, WHEN "THEY KNEW", GOOD AND BAD DATES, PROPOSALS, MAINTAINING THE RELATIONSHIP, SECOND CHANCES, AND ALL THE OTHER UPS AND DOWNS OF LOVE, ROMANCE AND MARRIAGE.
‘प्रेम’ ही एक उदात्त भावना आहे. आई-वडील-मुलं, मित्र-मैत्रिणी, भावंडं यांच्यातील प्रेम अशी प्रेमाची अनेक रूपं असतात; पण नवरा-बायको यांच्या नात्याला आणखी एक पदर असतो तो म्हणजे प्रणयाचा. शारीर आणि आत्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं हे प्रेम असतं. तर नवरा-बायकोमधील प्रेमाची विविध रूपं ‘चिकनसूप फॉर द सोल -ट्रू लव्ह’ मध्ये अधोरेखित केली आहेत. प्राधान्याने विवाहोत्तर टप्प्यावरच्या या कथा आहेत. विवाहानंतरचे बदल स्वीकारताना कराव्या लागणा-या तडजोडी ‘प्रेम सदाबहार ठेवताना’ या विभागात चितारल्या आहेत. ‘खNया प्रेमाचे शिकलेले धडे’ या विभागात छोट्या छोट्या गोष्टींतूनही परस्परांवरचे प्रेम दर्शवता येते, हे अधोरेखित करणाNया कथा आहेत. तर ‘सदासर्वदा हसत राहा’ या विभागात लग्नावरचं खुसखुशीत भाष्य आहे. ‘मनापासून दिलेल्या भेटवस्तू’ या विभागात उत्कट प्रेमाची साक्ष असलेली भेट पत्नीला देणाNया पतीच्या कथा आहेत. त्यात लग्नाच्या बाविसाव्या वाढदिवशी पत्नीला बावीस कवितांची भेट देणारा पती आहे, तर आपला अंत जवळ आलेला असताना बायकोला कुत्र्याचं पिल्लू भेट देणारा वॅÂन्सरग्रस्त पतीही आहे. ‘चिरकाल टिकणारं प्रेम’ या विभागातील कथा फारच हृदयस्पर्शी आहेत. पती विंÂवा पत्नी मृत्यूच्या वाटेवर असताना विंÂवा दोघंही शारीरिकदृष्ट्या विकलांग असताना विंÂवा दोघांपैकी एक शारीरिकदृष्ट्या परावलंबी असतानाही दोघांमधील प्रेमाचा असलेला अतूट बंध, परस्परांविषयीचा पराकोटीचा जिव्हाळा आणि शरीरापलीकडे पोहोचलेलं परिपक्व प्रेम याचं हृद्य दर्शन घडविणाNया या कथा आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CHICKENSOUPFORTHESOULTRUELOVE #JACK CANFIELD #MARK VICTOR HANSEN #AMY NEWMARK #KRISTI YAMAGUCHI #DATING #ROMANCE #LOVE #MARRIAGE #HEARTWARMING STORIES #USHA MAHAJAN
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more