* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL FAMILY MATTERS PART 2
  • Availability : Available
  • Translators : REVATI SAPRE
  • ISBN : 9789386342034
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
READERS WILL BE AMUSED, COMFORTED, AND ENCOURAGED BY STORIES ABOUT “NUTTY” FAMILIES JUST LIKE THEIR OWN, AND REALIZE WE ALL HAVE THE SAME FAMILY MATTERS AND WHAT REALLY MATTERS IS FAMILIES. A QUIRKY AND FUN HOLIDAY BOOK, AND A GREAT BRIDAL SHOWER OR WEDDING GIFT! NEARLY EVERYONE THINKS THEIR OWN FAMILY IS “NUTTY" OR AT LEAST HAS ONE OR TWO NUTS. WITH 101 STORIES OF WACKY YET LOVABLE RELATIVES, FUNNY FOIBLES, AND HOLIDAY MELTDOWNS, CHICKEN SOUP FOR THE SOUL: FAMILY MATTERS IS OFTEN HILARIOUS AND OCCASIONALLY POIGNANT.
‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. या कौटुंबिक जगण्याचा परिपाक म्हणजे ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’. चिकन सूपच्या या भागातील कथा पाच विभागांत विभागल्या आहेत. ‘थोडासा विचित्रपणा’ या विभागात कुटुंबातील एखाद्या विचित्र व्यक्तीविषयीच्या, तिच्या खटकणाNया वर्तनाविषयाच्या कथा आहेत. ‘मुलं ती मुलंच’ या विभागात लहान मुलांवर वेंÂद्रित कथा आहेत. त्यात लहान मुलांची स्वभाववैशिष्ट्यं, त्यांच्या गमतीजमती अधोरेखित केल्या आहेत. ‘रस्त्यावरच्या गमतीजमती’ या विभागात रस्त्यावर कुटुंबाच्या बाबतीत घडलेल्या गमतीजमतींचं चित्रण आहे. गाडी चालवताना नवNयाची झालेली फजिती, गाडीत भावंडांची भांडणं इ. मनोरंजक अनुभव या कथांतून वाचायला मिळतात. ‘फारसे गंभीर नाही’ या विभागात मृत्यूसारख्या गंभीर प्रसंगीही काही न पटणाNया तरी आवश्यक असलेल्या गोष्टी कशा कराव्या लागतात विंÂवा घडतात याचं चित्रण आहे. ‘आयुष्याची गंभीर बाजू’ या विभागात अर्थातच जीवनात घडणाNया गंभीर गोष्टी आणि त्याचा संबंधित व्यक्तीवर आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांवर होणारा परिणाम दर्शविणाNया कथा आहेत. अगदी साध्या साध्या प्रसंगांतून कुटुंब या संस्थेवर अगदी हलक्यापुÂलक्या स्वरूपात भाष्य करणाNया या कथा आहेत.या कुटुंबकथा असल्या तरी विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा या कथांतून भेटतात आणि नात्यांचा बहुरंगी गोफ या कथांतून सहजपणे विणला जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHESOULFAMILYMATTERSPART2 #CHICKENSOUPFORTHESOULFAMILYMATTERSPART2 #चिकनसूपफॉरदसोलफॅमिलीमॅटर्स-भाग२ #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #REVATISAPRE #JACKCANFIELDMARKVICTORHANSEN #जॅककॅफिल्डमार्कव्हिक्टरहान्स "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more