* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHHANDATUN VIDNYAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662924
  • Edition : 11
  • Publishing Year : OCTOBAR 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SCIENCE IS A COMPULSORY SUBJECT IN TODAY`S EDUCATION SYSTEM. BUT MANY A TIMES WE FIND THAT CHILDREN ARE NOT ABLE TO GRASP IT PROPERLY. WHAT IS THE REASON BEHIND THIS? WE TEACH SCIENCE THROUGH BOOKS. CHILDREN DO NOT GET A CHANCE TO LEARN IT THROUGH EXPERIMENTS. THIS BOOK WILL GIVE THEM A CHANCE TO LEARN ABOUT THE MAIN PRINCIPLES OF SCIENCE IN A PLAY WAY. AT THE SAME TIME, THEY WILL BE ABLE TO CREATE SOMETHING INTERESTING AND INFORMATIVE. THIS BOOK WILL HELP TO INCREASE THE SCIENTIFIC ASPECT OF EVERY YOUNG MIND. THE VARIOUS EXPERIMENTS WILL SHOW THE HOLLOWNESS BEHIND MANY SO CALLED MYSTERIES AND BLIND FAITH. THEY WILL ALSO PROVIDE AN OPPORTUNITY TO FIND OUT SOLUTIONS ON SOME BASIC PROBLEMS. THIS BOOK THOUGH IS DESIGNED FOR THE SCHOOL GOING CHILDREN WILL BE EQUALLY INTERESTING FOR THE PARENTS AND GRANDPARENT OF THE CHILDREN.
`छंदातून विज्ञान` यामध्ये एकूण ६२ प्रयोगाची माहिती आहे. हवा व पाणी, प्रकाश, ऊर्जा, चुबकतत्व, विद्युत आणि इतर सहा शीर्षकाखाली वर्गीकृत केलेली आहे. हवा व पाणी यांच्या सहायाने मजेदार भिंगरी, पानी पिणारा राक्षस, चमच्याचे चक्र, जादूचे पाणी, हवेने वजन उचलणे, उष्णतेने घसरणारा पेला, पाण्याने वजन वर उचलणे इत्यादी प्रयोगाचे सचित्र वर्णन लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केले आहे. दैवी चमत्काराच्या मागे विज्ञान कसे आहे जसे भस्म काढण्याचा प्रकार, आगपेटीच्या साहाय्याशिवाय आपोआप धूर कसा निघतो जाळ कसा तयार होतो हे `बुवांची माया` या प्रयोगात बाल वाचकांचे मन वेधून घेते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHHANDATUNVIDNYAN #CHHANDATUNVIDNYAN #छंदातूनविज्ञान #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MATRUBHUMI 08-03-1994

    विद्यार्थ्यांच्या शोधक बुद्धीला चालना देणारे पुस्तक... प्रस्तुत पुस्तक हे लेखकाचे सहावे पुस्तक आहे यामधे एकूण ६२ प्रयोगाची माहिती हवा व पाणी, प्रकाश, ऊर्जा, चुंबकत्व, विद्युत आणि इतर सहा शीर्षकाखाली वर्गिकृत केलेली आहे. हवा व पाणी यांच्या सहाय्यानेमजेदार भिंगरी, पाणी पिणारा राक्षस, चमच्याचे चक्र, जादूचे पाणी, हवेने वजन उचलणे, उष्णतेने घसरणारा पेला पाण्याने वजन वर उचलणे इत्यादी प्रयोगाचे सचित्र वर्णन लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत केलेले आहे. दैवी चमत्काराच्या मागे विज्ञान कसे आहे जसे भस्म काढण्याचा प्रकार, आगपेटीच्या सहाय्या शिवाय आपोआप धूर कसा निघतो जाळ कसा तयार होतो हे ‘बुवांची माया’ या प्रयोगात बाल वाचकांचे मन वेधून घेते. एका पदार्थाची प्रतिमा डोळ्यात उमटली म्हणजे तिची संवेदना आपल्या मेंदूत १/१० सेकंद टिकते आणि ह्याच वेळी जर दुसरी प्रतिमा उमटली, तर दोन्ही प्रतिमांचा एकत्र परिणाम होवून जी नवीन प्रतिमा तयार होते ती पाहिल्याचा आपणास भास होतो ह्यालाच शास्त्रीय भाषेत दृष्टीसातत्य असे म्हणतात याचेच आधारे पंख फडफडवणारा पक्षी, चांदीचा चमचा फसवे डोळे, विलक्षण सायफन इत्यादी प्रयोगाची माहिती विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणारी आहे. उर्जा आणि तीही गतीजन्य उर्जाच्या आधाराने वेगवेगळी कार्ये कशी पार पाडल्या जातात उदा. नाण्याला सुईच्या टोकाने छिद्र कसे पाडल्या जाते, थर्माकॉलची नाव पाण्यात आपोआप कशी चालू शकते, काही पदार्थात शक्ती भरल्यास जसे ताणलेली स्प्रिंग, ताणलेले रबर, वरुन पडणारा चेंडू, वरुन खाली वाहणारे पाणी, पीळ दिलेले रबर ह्या गोष्टीत साठविलेल्या ऊर्जेच्या सहायाने पळणारे विमान तयार करणे, बूमरॅग उडविणे, आज्ञाधारक चेंडू, कवायती, विदुषक इत्यादी प्रयोगाची लेखकाने दिलेली माहिती विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणारी आहे. चुंबकाचा उपयोग करुन दिशादर्शक बाहुली, झोका घेणारा चेंडू, जागरुक जवान, मजेदार कुत्रा, फिरणारे मासे, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, आपोआप चालू होणारा पंखा, इत्यादी मजेदार उपकरणे व खेळणी अतिशय कमी खर्चात कशी तयार केल्या जावू शकतात याची माहिती बाल वाचकांना अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. लोखंड निकेल ह्या धातूंना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात, त्यावर विद्युत प्रवाहाच्या सहायाने बदलणारा रोधक, इलेक्टोप्लेटिंग, भुताचे प्रकरणे पेटवा काडी लावा दिवा, सफरचंदाची चोरी, पळणारे घोडे, सौर गाडी आदी प्रयोगाची दिलेली माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टी वाढीस लागते. या व्यतिरिक्त बिनविजेची घंटी, जाड पुठ्याचा धावपटू, आकाश पाळणा, पाण्याची कारंजी उडविणे, शिशीत ढग तयार करणे आदी प्रयोगही मनोरंजक आहेत. ह्या पुस्तकात वैज्ञानिक तत्वावर आधारलेली उपकरणे कशी तयार करावीत ह्याची माहिती तर आहेच पण त्याचबरोबर अंधश्रद्धा व हातचलाखी यांचे मागेसुद्धा विज्ञानच आहे हे सिद्ध करुन दाखविले आहे. सोपी भाषा व चित्रात्मक माहिती, आकर्षक बांधणी यामुळे सर्वस्तरातील वाचक, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more