* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHALA JANUN GHEU YA UPAYUKTA KANMANTRA
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9788177668049
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N/A
साध्या किरकोळ समस्या घरगुती उपायांनी घरच्या घरी सोडवता येऊ शकतात. अशा वेळी उपयुक्त ठरतील असे कानमंत्र या पुस्तकात सापडतील. पण हे घरगुती उपाय डॉक्टरांना पर्याय नक्कीच नसतात. गंभीर समस्या असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाणेच योग्य असते. पण तिथे पोहोचेपर्यंत तात्पुरती उपाययोजना करायला काहीच हरकत नसते. यातले साधेसुधे कानमंत्र आजमावून, आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारायला वाचकांना मदत होऊ शकेल अशी आशा वाटते.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 29-04-2007

    सर्वांसाठी सर्व काही… मेहता पब्लिशिंग हाऊसने चला जाणून घेऊया या ग्रंथ मालिकेत सौंदर्याचे रहस्य आणि उपयुक्त कानमंत्र अशा दोन पुस्तिका अलीकडे प्रकाशित केल्या आहेत. सध्या सौंदर्याबद्दल युवक आणि युवती विशेष काळजी घेतात. सौंदर्य स्मार्टनेस आणि बुद्धिचे तज या गोष्टींचा संगम व्यक्तिमत्त्वात अपेक्षित असतो. प्रत्येक युवतीला आपण गोरेपान आणि सुंदर दिसावे असे वाटते. सौंदर्य खुलवण्यासाठी आणि चेहरा गोरा होण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती दूरदर्शन वाहिन्यावर दाखवल्या जातात, पण अशी क्रिम लावून सात-आठ दिवसात गोरे होता येत नाही. शिवाय अशा काही सौंदर्य प्रसाधनात रसायनेही वापरली जातात. त्याचा प्रतिकूल परिणाम त्वचेवर होतो हे लक्षात घेऊन सौंदर्याचे रहस्य या पुस्तिकेत मंजुषा आमडेकर यांनी सौंदर्यासाठी उपाययोजना आणि गोरेपणासाठी सोप्या आयुर्वेदिक औषधांचा खजिना खुला केला आहे. सौंदर्यासाठी वापरावयाच्या बऱ्याचशा वस्तू घरातच आणि शहरातच मिळतात, हे या पुस्तकातील औषधे वाचून लक्षात येते. केस वाढण्यासाठी रिठे, आवळा, शिकेकाई, संत्र्यांची साल, लिंबाची साल, मसूर डाळ, चहाची पावडर, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने, मेथी कोरफड, आल्याचा रस खूप उपयोगी पडतो. हे या पुस्तकात कृतीसह सांगितले आहे. चारोळीची पावडर, काकडीचा रस, जवसाचे तेल, पपईचा लगदा, लिंबाची साल, त्वचेचा रंग उजळण्यासाठी उपयोगी पडते. अशी अनेक औषधे या पुस्तकात दिली आहेत. घरात अनेकवेळा समस्या उद्भवतात तेव्हा काय करावे? याचे उपयुक्त कानमुंत्र या पुस्तिकेत आमडेकर यांनी दिले आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज आठ ग्लास पाणी प्या, उजव्या कुशीवर झोपण्याने घोरणे थांबते, पेरु खाण्याने पोट साफ राहते, लिफ्टचा वापर करण्याऐवजी जिने चढावेत त्यामुळे उत्साह वाढतो. लहान मुलांना कडू औषधे देताना मधातून द्यावीत. रोज दीर्घश्वसन करावे. गाईचे दूध आणि मध हे दोन्ही पदार्थ सौंदर्यासाठी आवश्यक आहेत. असे अनेक कानमंत्र या पुस्तिकेत आहेत. वाचकांनी दोन्ही पुस्तके आपल्यासाठी विकत घेवून संग्रही ठेवायला हवीत. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more