* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHULBHULAIYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666496
  • Edition : 16
  • Publishing Year : DECEMBER 1978
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION OF STORIES BY VA PU IS MAINLY A FANTASYBASED. SINCE LAST 20 YEARS, VA PU HAS BEEN WRITING. ALL HIS PAST STORIES WITH A COMMON BASE OF FANTASY ARE INCLUDED UNDER THIS TITLE. THEY GIVE US THE MESSAGE TO ENJOY LIFE IN TODAY`S WORLD IN A SUGAR COATED WAY. WHATEVER CONDITIONS WE ARE, IN WHATEVER SITUATIONS WE ARE THOUGH. THE WHOLE CREDIT GOES TO THE SWEET COVER AND NOT THE FANTASY. VA PU HAS THE ABILITY OF CAPTURING PEOPLE WITH HIS TEASING WORDS FULL OF HUMOUR. THE STYLE HE USES IS THAT OF A NARRATION, WHICH CREATES INTEREST IN READING THESE STORIES ADDING TO THE PLEASURE. VA PU BELIEVES IN THE GOODNESS OF A MIND. HE IS SCARED OF THE CONTROVERSIES OF LIFE; AT THE SAME TIME HE IS SURE THAT DESTINY HAS SOME PLANS FOR EVERYONE. THAT IS WHY HE ENJOYS GLORIFYING THE CHARACTERS, THE INCIDENTS UNKNOWINGLY STRENGTHENING THE FOUNDATION OF HOPE IN A HUMAN MIND. HIS WRITING AWAKENS THE FAITH IN LIFE ONCE MORE MAKING US LOVE OUR LIFE, ENJOY OUR LIFE, AND LIVE OUR LIFE. WHAT ELSE DOES AN AUTHOR NEED?
भुलभुलैय्या` हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचाफॅण्टसीजचासंग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅण्टसीजपैकीनिवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत याची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही, याचे श्रेय या कथांना दिलेल्या `फॅण्टसी`च्या अवगुंठनात आहे. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साया व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा काळातनकळत दृढ होते. जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते? शंकर सारडा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarPritam Katkar

    आज वपु. च अंकीन एक पुस्तक वाचून झालं. हा अवलिया जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जे आपलं नाही, जे आपल्या हातात नाही, ते सोडण्याच धारिष्ट मला वपु. नी दिलं. ही सत्ये सरळ सांगता आली नसती असे नाही. पण ती तशी सांगितली तर आपल्या मरगळलेल्या मनांना त्या शब्ामधील गुळगुळीत पणाकडे काही जाणवले नसते. भुलभुलैय्या तील काही निवडक शाश्वत सत्य जी मला भावली ती खालीलप्रमाणे.... १) विजयी होण्यापेक्षा यशस्वी रीतीने झुजण्यालाही महत्व आहे. २)पराभव कबूल करायचा नसला की मनुष्य चिडतो. ३) सगळ्यांना सन्मार्ग दाखविणारा माणूस पण अंतर्यामी दुःखी असू शकतो, हे कुणाला समजत नाही. ४)विचार तरी स्वतःच्या मालकीचे असावेत. ५)दुःख, बंधने, नैराश्य, अपघात यामुळे माणसाचे पाय जमिनीवर राहतात, त्याचे माणूसपण त्यामुळे सिद्ध होते. *अशी अनेक शाश्वत सत्ये वपु. नी भुलभुलैय्या ह्या त्यांच्या कथासंग्रहात सांगितली आहेत.. ...Read more

  • Rating StarPritam Katkar

    आज वपु. च अंकीन एक पुस्तक वाचून झालं. हा अवलिया जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जे आपलं नाही, जे आपल्या हातात नाही, ते सोडण्याच धारिष्ट मला वपु. नी दिलं. "भुलभुलैय्या" हा वपु. काळे यांच्या चमत्कारप्रधान 17 कथाचा- फॅन्टसीजचा संग्रह. त्याच्या फॅन्सीचे स्वरूप हे वैचित्र्यपूर्ण तर आहेच, पण त्याद्वारे जीवनविषयक काही शाश्वत सत्याचा उच्चारही त्यांना करायचा आहे. ही सत्ये सरळ सांगता आली नसती असे नाही. पण ती तशी सांगितली तर आपल्या मरगळलेल्या मनांना त्या शब्दामधील गुळगुळीत पणाकडे काही जाणवले नसते. भुलभुलैय्या तील काही निवडक शाश्वत सत्य जी मला भावली ती खालीलप्रमाणे.... १) विजयी होण्यापेक्षा यशस्वी रीतीने झुजण्यालाही महत्व आहे. २)पराभव कबूल करायचा नसला की मनुष्य चिडतो. ३) सगळ्यांना सन्मार्ग दाखविणारा माणूस पण अंतर्यामी दुःखी असू शकतो, हे कुणाला समजत नाही. ४)विचार तरी स्वतःच्या मालकीचे असावेत. ५)दुःख, बंधने, नैराश्य, अपघात यामुळे माणसाचे पाय जमिनीवर राहतात, त्याचे माणूसपण त्यामुळे सिद्ध होते. *अशी अनेक शाश्वत सत्ये वपु. नी भुलभुलैय्या ह्या त्यांच्या कथासंग्रहात सांगितली आहेत.. फॅन्टसीच्या रुपात नव्या नितीकथाच जणू वपु सादर करत आहेत. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    कोणीही पहिल्यांदाच वाचनाला सुरवात करायची असे ठरविले कि मी भूलभुलैयाचे नाव सुचवितो.व.पु. च्या निखळ आनंद देणारा फॅन्टसी कथासंग्रह . वाचकाला हसत खेळत गुंतवून ठेवणाऱ्या या कथा .कुठेही ओढून ताणून आणलेला विनोद नाही .कमरेखालील वाक्ये नाहीत .रोजच्या जीवनात वगणे बोलणे असलेल्या घटनांत एखादी फॅन्टसि घुसली कि काय करमणूक होते हे पुस्तक वाचूनच कळेल.एकापेक्षा एक अप्रतिम कथा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more