* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHARATIYA SAHITYIK
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668445
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF WE WANT TO MAINTAIN OUR POSITION IN THIS GLOBALIZATION, THEN WE HAVE TO TAKE SPECIFIC CARE OF OUR LANGUAGE, CULTURE AND LITERATURE. OTHERWISE, WE WILL NOT BE ABLE TO HAVE INDIVIDUAL EXISTENCE IN THIS WORLD. TODAY, OUR LITERATURE IS AIMING AT ACQUIRING KNOWLEDGE AT THE WORLD LEVELS. THERE IS NOTHING WRONG IN THIS, BUT WE MUST ALSO WIDEN THE HORIZONS OF OUR KNOWLEDGE, LITERATURE, CULTURE, AND LANGUAGE. THE AIM OF OUR LITERATURE FOR THE 21ST CENTURY SHOULD BE CREATING ALL INDIA ACADEMY SOCIETY. FOR THIS, WE NEED TO HAVE A CONSOLIDATED FORM OF INDIAN LANGUAGES AND LITERATURE. THIS CAN BE ACHIEVED ONLY IF WE HAVE THE BASIC KNOWLEDGE OF THE INDIAN LANGUAGES AND LITERATURE. THIS CAN BE FULFILLED BY READING THIS BOOK. INDIA IS A MULTI-LINGUISTIC, AND MULTICULTURAL COUNTRY, AND THIS BOOK WILL HELP YOU TO UNDERSTAND IT BETTER.
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील. जागतिक स्तरावरील ज्ञानाचे संपादन हे आज आपल्या समग्र भाषा व साहित्य व्यवहाराचे उद्दिष्ट होऊ पाहत आहे. ते उद्दिष्ट साध्य करताना आपणापुढे भारतीय ज्ञान, साहित्य, संस्कृती, भाषा जपण्याचे व ते सारे समृद्ध करण्याचेही आव्हान आहे. अखिल भारतीय अकादमीक समाजनिर्मिती हे एकविसाव्या शतकातील आपले साहिाQत्यक लक्ष्य आहे. त्यासाठी भारतीय भाषा व साहित्याचे एकसमन्वायी, समेकित (CONSOLIDATE) रूप तयार करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता प्रत्येकात भारतीय भाषा व साहित्याची समृद्ध जाण हवी. अशी जाण ‘भारतीय साहित्यिक’ हे पुस्तक तुमच्यात निर्माण करील. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशात ‘भारतीय साहित्यिक’सारखं पुस्तक आपल्या संग्रही असणं म्हणजे भारतीयतेचं स्पंदन आपल्या हृदयाशी जपण्यासारखंच!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #DR.SUNILKUMARLAVATE #डॉ.सुनीलकुमारलवटे #भारतीयसाहित्यिक #BHARATIYASAHITYIK
Customer Reviews
  • Rating StarSAKAL 16-12-2007

    डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस भारतीय साहित्यिकांचा आस्वादक शैलीत परिचय घडविला आहे. यात हिंदू, उर्दू, मराठी, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांतील साहित्यिकांचा समाेश आहे. यात सर्वाधिक जास्त असे चौदा साहित्यिक हिंदीतील आहेत.‘सकाळ’ (कोल्हापूर आवृत्ती) मध्ये यातील बहुतेक लेख प्रकाशित झाले आहेत. यातील लेख बहुधा प्रासंगिक कारणांनी लिहिलेले आहेत. तरीही ते लेखकाचे जीवन, व्यक्तित्व आणि साहित्यविशेष यांचे नेमकेपणाने दर्शन घडवतात. स्वत: लेखक हिंदीचे प्राध्यापक असल्यामुळे हिंदीतील लेखकांवरील लेख अधिक अभ्यासपूर्ण उतरले आहेत. त्यात लेखकांच्या कलाकृतींची ओळख घडवून देताना वाचकांना लेखकाचे वाङ्मयीन परंपरेतील स्थान लक्षात आणून देण्याची भूमिकाही आहे. ‘‘मैथिलीशरण गुप्तांची साहित्यसाधना ही एकविसाव्या शतकातील भारताला अंतर्मुख होण्याची एक संधी आहे,’’ हे डॉ. लवटे यांचे भाष्य मार्मिक आहे. यात महादेवी वर्मा, अमृता प्रीतम, निर्मल वर्मा, यू.आर.अनंतमूर्ती अशा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकारांबरोबर पटकथाकार डॉ. राही मासूम रझा, परदेशी हिंदी कवी ओदोलेन स्मेकल, रस्त्यावरचा रंगकर्मी सफदर हाश्मी, ‘मराठी कबीर’ नारायण सुर्वे अशा महत्त्वाच्या लेखकांचाही समावेश आहे. डॉ. लवटे यांची संवेदनशीलता विविध विचारसरणींच्या साहित्यिकांचे वाङ्मयीन कर्तुत्व जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता धारण करू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र ‘भारतीय साहित्यिक’ या शीर्षकाखालील पुस्तकात सुधाकर प्रभूंचा समावेश खटकतो. खरे तर यात इतर भारतीय भाषांमधील राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण स्थान असलेले काही साहित्यिक समाविष्ट करायला हवे होते. त्यांच्या अनुवादित साहित्याबाबतची सूचीही दिली असती तर पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले असते. आहे त्या स्वरूपात हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांची जिज्ञासा वाढवणारे आणि अनुवादकांना मार्गदर्शक ठरणारे म्हणून महत्त्वाचे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more