* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WOMEN IN INDIAS FREEDOM STRUGGLE
  • Availability : Available
  • Translators : VASANTI PHADKE
  • ISBN : 9788177663600
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK THE WOMEN UNDERTOOK DURING THE FREEDOM FIGHT WAS A BIT EXTENDED FORM OF THEIR USUAL WORK. BUT A FEW OF THESE WOMEN WERE NOT SATISFIED WITH IT, THEY THREW OFF THE LIMITS OF THE TRADITIONS AND STOOD AGAINST THE SECONDARY POSITION OFFERED TO THEM. THEY MIXED THEIR ROLES AS NATIONALIST AND FEMINIST. THEY DID NOT WANT ANY POST OR POWER, THEY SERVED THEIR MOTHERLAND UNSELFISHLY. THEY GAVE A NEW DIMENSION TO THE NATIONAL FREEDOM MOVEMENT ON REGIONAL AND NATIONAL LEVEL. THIS CALLED FOR THE ENTHUSIASM ON A WIDE LEVEL, REGIONAL AS WELL AS STATE. THE HURDLES OF LOCATION, CLASS, CASTE, GENDER AND RELIGION WERE OVERCOME FAST. IT ALSO UNDERLINED THE DEVOTION OF PEOPLE IN THE LIGHT OF EQUALITY, SOCIAL JUSTICE, SECULARISM, AND NATIONALISM. THIS SAME DEVOTION THEN WAS SIPPED THROUGH TO THE CORE OF EVERY INDIAN AND GAVE A BOOST TO THE CONCLUDING NATIONAL FREEDOM MOVEMENT.
स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत आणि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले, आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला प्रथमच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी मोठ्या संख्येने स्थानिक व प्रादेशिक स्तरावर उत्साह दिसून आला. त्यामुळे प्रदेश, वर्ग, जाती, लिंग व धर्म यांचे अडसर भारतीय इतिहासात दीर्घ कालांतराने दूर झालेले दिसले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा सर्वत्र हळूहळू झिरपून चळवळीला मार्गदर्शक ठरली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #NAWAZ B. MODI #VASANTI PHADKE #भारतीयस्वातंत्र्यलढ्यातीलस्त्रिया #WOMENININDIASFREEDOMSTRUGGLE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (KOLHAPUR) 13-04-2003

    स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरलेली भावनिष्ठा... भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग, कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत णि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले; आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला स्थानिक व प्रादेशिक स्तरावर नेण्याचे महत्त्वाचे काम स्त्रियांनी केले. प्रदेश, वर्ग, नाती, लिंग व धर्म या दीर्घकालीन अडसरीचा गुंता उलगडण्याचे काम या चळवळीद्वारे स्त्रियांनी साध्य केले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरली. भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या दोन दिवशी ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका (असा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात विविध अभ्यासकांनी सादर केलेले शोधनिबंधाचे संपादन परिसंवाद संचालिका डॉ. नवाझ मोदी यांनी या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषा अनुवाद वासंती फडके यांनी केला. पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात राष्ट्रीय चळवळीतील क्रांती स्त्रियांच्या योगदानाविषयी माहिती आहे. येसूबाई सावरकर, कल्पना, क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या व अरुणा असफअली आणि कॅप्टन सेहगल यांच्याविषयक लेख आहे. दुसरा विभाग महात्मा गांधीनी विविध चळवळीत भाग घेऊन बजावणाऱ्या स्त्रिया व त्यांचा चळवळीवर झालेला परिणाम विषयावर आधारित आहे. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल स्वातंत्र्य आणि गुजरातमधील तळ सत्याग्रही कार्यकर्त्या अवंतिकाबाई गोखले यांच्यावर आहेत. प्रत्येक लेखाच्या संदर्भग्रंथाची सूची मराठीत दिली. महत्त्वाच्या विषयावरील अनुवाद मराठी भाषेत आणून प्रकाशकाने साहित्यात मोलाची भर घातली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-12-2004

    स्त्रियांची ‘ऐतिहासिक कामगिरी’... मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या काळात ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका या परिसंवादाचं आयोजन केलं होतं. वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यात आपले निबंध सादर कले. या शोधनिबंधाचं संपादन विभाग प्रमुख डॉ. नवाझ मोदी यांनी केलं आणि इंग्रजीतून एक ग्रंथ सिद्ध केला. याच पुस्तकाचा कराठीत अनुवाद ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रिया’ या शीर्षकाखाली वासंती फडके यांनी केला आहे. डॉ. य. दि. फडके यांनी या परिसंवादात केलेल्या बीजसंभाषणासह हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. स्त्री सहभागाच्या चार वेगळ्या पायऱ्या कल्पून तसे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांना ‘राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान’, ‘महात्मा गांधीच्या चळवळीतील स्त्रियांचा सहभाग’, ‘अल्पसंख्याक स्त्रियांचे योगदान’ आणि ‘परदेशी स्त्रियांचे चळवळीतील योगदान’ अशा स्वरूपाची शीर्षक आहेत. त्यावरून त्याला विभागातील लेखांची कल्पना येऊ शकते. इतिहासलेखनात ‘स्त्रियांची कामगिरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षिली, विकृत स्वरूपात मांडली गेली आणि मर्यादित केली गेली’, अशी खंत डॉ. य. दि. फडके यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या भागात क्रांतिकारी स्त्रियांच्या संदर्भातील लेखांचा समावेश आहे. त्यामध्ये येसूबाई सावरकर यांनी थेट चळवळीत सहभाग न घेताही पार पाडलेल्या कामगिरीचं चित्र उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मांडलं आहे. कल्पना दत्त, अरुण असफअली, कॅ. सहगल यांची कामगिरी कौतुकास्पद खरी पण चापेकर बंधूंच्या बायकांची कहाणीही त्यांच्या वेदना समोर मांडणारी आहे. चापेकर बंधूंच्या फाशीनंतर या स्त्रियांचे हाल झाले. त्यांना परंपरागत हिंदू विधवांचे जिणं जगावं लागलं. चार भिंतीआड राहिलेली या स्त्रियांची वेदना चटका लावून जाते. महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया सहभागी झाल्या. सूतकताई, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालाची होळी, मिठाचा सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले गेले. त्यात स्त्रिया सामील होत्या. सामान्य स्त्रियांची संख्याही यात लक्षणीय होती. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल, अवंतिकाबाई गोखले अशा अनेक स्त्रियांबद्दलचे यातील लेख त्यांच्या कामगिरीचा सखोल वेध घेणारे आहेत. ब्रिटिशांशी जिद्दीने लढणाऱ्या आणि वेगवेगळ्या स्तरांवरील क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या या स्त्रियांची कामगिरी मोलाची होती यात शंकाच नाही. तर पेरीन कॅप्टन, तैयबजी कुटुंबातील स्त्रिया, मिठूबेन पेटिट, खिलाफत चळवळीतील महिला, दलित स्त्रिया अशा अल्पसंख्याक गटातील स्त्रियांचा सहभागाचे मूल्यमापन करणारे लेखही महत्त्वाची माहिती पुरवतात. त्याचप्रमाणे मीराबेन (मॅडेसीन स्लेड), भगिनी निवेदिता, दक्षिण आफ्रिका व गोवा मुक्ती आंदोलनातील स्त्रिया, अ‍ॅनी बेझंट अशा मूळच्या परदेशी असलेल्या स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोलही ऐतिहासिक आहे. या सर्वांबद्दलचं या पुस्तकातील लेखन स्वातंत्र्याच्या आंदोलनातील या स्त्रियांची उज्ज्वल कामगिरी अधोरेखित करतं. प्रीता नीलेश, रोहिणी गवाणकर, उषा ठक्कर, लीला पटेल, मृदुला देवस्थळे, यास्मीन लुकमानी, अभिनया गायकवाड अशा अनेकांचे लेख खात आहेत. संशोधकांना, वाचकांना, अभ्यासकांना उपयुक्त असं हे लेखन तरुण पिढीलाही मार्गदर्शक ठरेल असं आहे. २१ व्या शतकातील भारताची उत्तरोत्तर विकासांच्या पथावरून होणारी वाटचाल या सर्व आणि इतर असंख्य अनामिक स्त्रियांच्या विना शक्य झाली नसती ही जाणीव हे लेखन मनात जागी करतं. स्त्रियांचा हा वाटा यापुढच्या इतिहासाला दुर्लक्षित करता येणार नाही. -नंदिनी आत्मसिद्ध ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more