* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184986518
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VOTED AS “INDIA’S MOST ADMIRED” AND “MOST TRUSTED WOMAN” KIRAN BEDI IS A RECOGNISED FACE IN INDIA. SHE HAS BEEN A RECIPIENT OF PRESTIGIOUS DECORATIONS, MOST NOTABLE BEING, THE RAMON MAGSAYSAY AWARD IN GOVERNMENT SERVICE, AND THE PRESIDENT’S POLICE MEDAL FOR GALLANTRY.
भ्रष्टाचार, भारतीय शासनकारभाराच्या यंत्रणांत इतका खोलवर झिरपला आहे, की सामान्य माणसाचा सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला आहे. इथली राजकीय, तपासविषयक व कायदा यंत्रणा संपूर्णत: दुरुस्त झाल्याशिवाय भ्रष्टाचाराचा हा प्रचंड फैलावलेला आजार बरा होणार नाही.आज आपल्याला, आपल्या अवतीभोवती काय दिसतं? फक्त लूटालूट प्रचंड लूटालूट... आपण आकड्यावरची शून्यं मोजू शकणार नाही इतकं याचं भयंकर स्वरुप आहे...आणि राष्ट्रकुल स्पर्धेतला प्रकार उघडकीस येऊ लागला तेव्हा मला त्या प्रकारचा भयंकर त्रास होऊ लागला. त्याविरोधात उठवणा-या आवाजात मीही सहभागी होऊ लागले. आता हा आवाज आज खूप मोठा झाला आहे. कधीकधी तो फार कर्कश होतो.. पण मुद्दाम नाही, परिस्थिती भाग पाडते. पण हे सगळं चाललं आहे ते एकाच उद्देशासाठी ... सुराज्य भारत घडवण्यासाठी ... आपल्या सर्वांना समृद्ध आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षितता देणारा अधिक चांगला भारत घडवायचा आहे. या लेखसंग्रहामागची प्रेरणा तीच आहे.जर भ्रष्टाचारी लोक त्यांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात तर त्यांचा बळी ठरणारे आपण सर्वजण आपल्या स्वत:साठीच का एक होऊ शकत नाही? ‘बी द चेंज!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#9TH JUNE #I DARE #ITS ALWAYS POSSIBLE #WHAT WENT WRONG AND WHY #MAJAL DARMAJAL #AS I SEE STRIYANCHE SAKSHAMIKARAN #AS I SEE BHARTIYA POLICE SEVA #AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN #BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION #KIRAN BEDI #SUPRIYA VAKIL #आय डेअर #इट्स ऑलवेज पॉसिबल #व्हॉट वेंट राँग अ‍ॅण्ड व्हाय #मजल दरमजल #अ‍ॅज आय सी...-स्त्रियांचे सक्षमीकरण...#भारतीय पोलीस सेवा...#नेतृत्व आणि प्रशासन...#भ्रष्टाचाराशी लढा #किरण बेदी #सुप्रिया वकील
Customer Reviews
  • Rating Starलोकप्रभा, 30 मार्च २०१८

    किरण बेदी या नावाची ओळख म्हणजे धाडसी शूर अशीच आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. त्यांचा हाच प्रयत्न लोकांना नेहमी प्रेरणा देणारा ठरला आहे. ‘भ्रष्टाचाराशी लढा’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक वाचकांसाठी पे्ररणादायी ठरेल यात शंा नाही. जर भ्रष्टाचारी लोक त्यांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात तर त्यांचा बळी ठरणारे आपण सर्व जण आपल्या स्वतःसाठीच का एक होऊ शकत नाही? असा सवाल करत किरण बेदी यांनीच त्याचे उत्तर या पुस्तकातून लिहिले आहे. सुप्रिया वकील यांनी अगदी सोप्या साध्या भाषेत अनुवाद केला आहे. खNया अर्थी हा लेखसंग्रह प्रेरणादायी ठरेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more