* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAUTHAKURANEER HAAT
  • Availability : Available
  • Translators : MEDHA TASKAR
  • ISBN : 9788184983111
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A FICTION, THE VERY FIRST NOVEL SCRIPTED IN 1883 BY RAVINDRANATH TAGORE, AT THE AGE OF 22. THIS NOVEL HAS THE BACKGROUND OF ROYAL FAMILIES AND THE RITES AND RITUALS FOLLOWED BY THEM. THIS IS A STORY OF THE ROYAL FAMILY OF KING PRATAPADITYA AND HIS SON UDAYADITYA. THE FORMER IS A SHREWD KING READY TO TAKE ANY ACTION SO AS TO MAINTAIN THE DECORUM OF BEING A KING; WHEREAS THE LATER BELIEVES IN BEING A JUST AND KIND HUMAN BEING, COMPASSIONATE AS WELL. THE KING TAKES ALL THE ACTIONS THAT HE CAN TO PREVENT UDAY FROM BEING A NORMAL HUMAN BEING. HE WANTS HIS SON TO LEARN THE IMPORTANCE OF BEING RUDE AND CRUEL IF NEEDED. UDAY’S SISTER VIBHA IS MARRIED TO RAMCHANDRARAI, ANOTHER KING. BUT HE IS INSULTED MANY TIMES AT THE HANDS OF KING PRATAP. HE GOES BACK TO HIS KINGDOM WITHOUT VIBHA, HIS NEWLYWED WIFE. HE SENDS MESSAGES FOR HER TO COME AND JOIN HIM BUT SHE REFUSES TO JOIN HIM AS HER BROTHER IS UNDER IMPRISONMENT. THIS IS A STORY OF THE TRUE LOVE OF A BROTHER AND A SISTER AND THEIR UNCLE. THEY ALL ARE BRUTALLY TREATED AT THE HANDS OF THE KING WHO BELIEVES ONLY IN KNIGHTHOOD AND NOT KINDNESS.
प्रत्येक दीर्घ नि:श्वासावर विस्तृत टीका आणि स्पष्टीकरणे दिली जात होती. विभेला हे सगळे आणखी सहन होईना, म्हणून ती निसटून बागेत आली होती. सूर्य आज ढगांआडूनच उगवला होता, ढगांआडच अस्तास गेला होता. दिवस कधी मावळला आणि संध्याकाळ कधी झाली, ते समजले नाही. संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सोनेरी रेषा उमटली होती, पण दिवस मावळताना ती विरून गेली. अंधार घनदाट होऊ लागला होता. दशदिशा झाकोळून गेल्या होत्या. ओळीने असलेल्या सुरूच्या दाट बनांतून फांद्यांच्या वर इतका अंधार दाटला की, फांद्या एकमेकींत मिसळून गेल्या अन् सहस्र लांबलचक पायांवर भार देऊन प्रचंड विस्तृत नि:स्तब्ध अंधार त्यावर रेलला आहे, असे वाटत होते. हळूहळू रात्र होऊ लागली. राजवाड्यातले दिवे एकेक करून मालवले गेले.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
  • Rating Starदर्शना चाफेकर १६.०२

    पुस्तकाच्या नावाने आणि त्यावरील चित्राने मनं वेधून घेतलं. कवर पेज पाहताच वाचायला सुरूवात केली. विशेष हे कि रवींद्रनाथ टागोरांची ही पहिली कादंबरी पण त्यांच्या नंतरच्या लेखनाच्या मानाने दुर्लक्षत राहिली. आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते रवीं्रनाथ टागोर यांना आपण `विश्वकवी` म्हणून ओळखतो. पण त्या बरोबरच ते तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते. कादंबरी खुप छान आहे. स्वतःच्या आंतरिक सामर्थ्याच्या बळावर वाटचाल केली नाही तर माणूस आखीव चौकटीतील बाहूली बनून राहतो. एक अन्यायी, अत्याचारी, निष्ठूर राजा. सत्ताधीशाला आई-वडिल, बायको, मुलं असे कोणते ही नाते विश्वसनीय नसते. सत्ता हेच सर्वकाही आणि त्या जोरावर तो सगळ्यांना हातातील बाहूली बनून ठेवतो. जो बंड करेल त्याला शिक्षा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more