* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAI BAYKO CALENDER
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663570
  • Edition : 14
  • Publishing Year : DECEMBER 1971
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
    V.P. KALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WITHIN HALF A SECOND THE NEWS REACHED PATOLE`S CONDOMINIUM AND THE WHOLE FOURSTOREYED INFRASTRUCTURE WAS SHAKEN AS IF FROM AN EARTHQUAKE. THERE WERE 65 BLOCKS ON EACH FLOOR, SO IN ALL THE FOUR FLOORS HAD 260 BLOCKS, ALL THE MEMBERS FROM EACH AND EVERY BLOCK STARTED RUNNING TOWARDS RAMAKANT LAGHATE`S RESIDENCE. SINCE MANY YEARS, NOTHING SO EXCITING HAD HAPPENED IN THE BUILDING AND THERE WAS NO POSSIBILITY OF ANYTHING EXCITING HAPPENING IN THE NEAR FUTURE. THIS IS A PECULIARITY OF VA PU`S STORIES; THEY START WITH A SHOCK AND GIVE US ANOTHER ONE AT THE END, THE STORY IT SELF AT ITS HEIGHT THROUGHOUT THE BOOK. EVERY COMMON MAN FEELS THAT SOMETHING EXCITING SHOULD HAPPEN IN HIS OR HER LIFE. WITH THIS AS A CLUE, VA PU HAS CLEVERLY WOVEN THE STORIES. EACH AND EVERY STORY HAS A VERY SPECIAL PLOT, WHICH FURTHER HEIGHTENS THE SUSPENSE MAKING IT EXCITING AS WELL AND GIVES A SHOCK AT THE END. WHY DO WE GET SO ENGULFED IN ALL THOSE STORIES? ANSWER IS SIMPLE. IT IS VA PU`S NATURAL, HEARTTOHEART, AND YET NAUGHTY STYLE AND THE FRESHNESS OF THE TOPICS.
‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more