* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BONOBO HANDSHAKE
  • Availability : Available
  • Translators : SHARMILA PHADKE
  • ISBN : 9789386745248
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A YOUNG WOMAN FOLLOWS HER FIANCÉ TO WAR-TORN CONGO TO STUDY EXTREMELY ENDANGERED BONOBO APES-WHO TEACH HER A NEW TRUTH ABOUT LOVE AND BELONGING. IN 2005, VANESSA WOODS ACCEPTED A MARRIAGE PROPOSAL FROM A MAN SHE BARELY KNEW AND AGREED TO JOIN HIM ON A RESEARCH TRIP TO THE DEMOCRATIC REPUBLIC OF CONGO, A COUNTRY REELING FROM A BRUTAL DECADE-LONG WAR THAT HAD CLAIMED THE LIVES OF MILLIONS. SETTLING IN AT A BONOBO SANCTUARY IN CONGO`S CAPITAL, VANESSA AND HER FIANCÉ ENTERED THE WORLD OF A RARE APE WITH WHOM WE SHARE 98.7 PERCENT OF OUR DNA. SHE SOON DISCOVERED THAT MANY OF THE INHABITANTS OF THE SANCTUARY-APE AND HUMAN ALIKE-ARE REFUGEES FROM UNSPEAKABLE VIOLENCE, YET BONOBOS LIVE IN A PEACEFUL SOCIETY IN WHICH FEMALES ARE IN CHARGE, WAR IS NONEXISTENT, AND SEX IS AS COMMON AND FRIENDLY AS A HANDSHAKE. A FASCINATING MEMOIR OF HOPE AND ADVENTURE, BONOBO HANDSHAKE TRACES VANESSA`S SELF-DISCOVERY AS SHE FINDS HERSELF FALLING DEEPLY IN LOVE WITH HER HUSBAND, THE APES, AND HER NEW SURROUNDINGS WHILE PROBING LIFE`S GREATEST QUESTION: WHAT ULTIMATELY MAKES US HUMAN? COURAGEOUS AND EXTRAORDINARY, THIS TRUE STORY OF REVELATION AND TRANSFORMATION IN A FRAGILE CORNER OF AFRICA IS ABOUT LOOKING PAST THE DIFFERENCES BETWEEN ANIMALS AND OURSELVES, AND FINDING IN THEM THE SAME EXTRAORDINARY COURAGE AND WILL TO SURVIVE. FOR VANESSA, IT IS ABOUT FINDING HER OWN PATH AS A WRITER AND SCIENTIST, FALLING IN LOVE, AND FINDING A HOME. "
"व्हॅनेसा वुड्सनं २००९ मध्ये एका देखण्या प्रियमेटॉलॉजिस्ट- ( चिम्पांझी, बबून्स, बोनोबो इत्यादी एप जातीच्या प्रायमेट्सचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ) ब्रायन हेरसोबत- लग्न करायचं ठरवलं, जो आजवरच्या सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धडपडत होता. असं नेमकं काय आहे ज्यामुळे आपण ‘मानव’ बनलो? त्याला विश्वास असतो की या प्रश्नाचं उत्तर कॉन्गोमध्ये- फ्रान्सपेक्षा आकारानं तिप्पट मोठं जंगल असणाऱ्या आणि सतत युद्ध सुरू असतं, तिथंच मिळेल, कारण बोनोबो फक्त कॉन्गोमध्येच राहतात. व्हॅनेसा त्याच्यासोबत अनाथ बोनोबोंचं आश्रयस्थान असलेल्या किन्शासा अभयारण्यात राहायला जाते. जंगलातील प्राण्यांना मारून त्यांचं मांस बेकायदा विकण्याचा व्यवसाय करणारे जंगलचोर (बुशमीट ट्रेडर्स) बोनोबोंना ठार मारतात आणि त्यांची अनाथ पिल्लं पाळीव प्राणी म्हणून विकतात. तिथून त्यांची सुटका करून त्यांना ‘लोला’मध्ये आणलं जाण्याआधीची अवस्था दारुण असते. काळ्या जादूकरता आवश्यक म्हणून त्यांची बोटं आणि अंगठे कापून नेलेले असतात. काही हद्दपार झालेले लोक या पिल्लांचा आपल्या घरामध्ये मुलांप्रमाणे सांभाळ करतात. तिथं व्हॅनेसाला स्वतःचा शोध लागतो. बोनोबो हे पुरुषांवर फारसा विश्वास टाकत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर, व्हॅनेसानं सगळे चाचणी-प्रयोग पार पाडावेत, अशी अपेक्षा केली जाते, आणि मग हळू हळू बोनोबो आणि तिच्यात एक सखोल प्रेमाचा बंध निर्माण होतो. त्या परिसराच्या प्रेमात तर ती पडतेच; शिवाय नवऱ्यावरच्या प्रेमाचाही तिला नव्यानं साक्षात्कार होतो. सहजीवनाचा अर्थ तिला खऱ्या अर्थानं उलगडतो. "

No Records Found
No Records Found
Keywords
BONOBO HANDSHAKE# VANESSA WOODS# CHIMPANZEE# BALUKU# BRIAN# ZAINABO# FOUFOU# Z00 #CLAUDINE# MOBUTU# ISIRO# TATANGO# MICKENO# ANGOLA# KINSHASA# KABILA# JACQUES# KIKONGO# SEMENDWA# OLETI# MAMA ESPERANCE# SUZY# SKIPPY# KATAKO# MALOU
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-05-2019

    आत्मानुभवाचे प्रांजळ कथन... मराठीत अनुवादित झालेल्या जागतिक साहित्यातून सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा विविध विषयांची माहिती मिळत जाते. अशीच माहिती ‘व्हेनेसा वुड्स’ यांच्या ‘बोनोबो हॅन्डशेक’ या इंग्रजी पुस्तकाच्या शर्मिला फडके यांनी ‘बोनबो – एक शांतिदूत’ या शीर्षकाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक म्हणजे व्हेनेसा वुड्सची आत्मकथा आहे. जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर अकल्पित नोकरी मिळाल्यावर त्याच कामात रममाण होऊन परंतु सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन चरितार्थ चालविण्यासाठी नव्हे, तर एका दुर्लक्षित मुक्या प्राण्याच्या जीवनासाठी संबंधित ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा व प्रवासाचा हा आलेख आहे. अनेक लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर लेखिकेला युगांडाच्या बुन्दागो जंगलातील चिम्पांझीची गणना करण्याची नोकरी मिळते आणि येथूनच तिच्या वेगळ्या विश्वातील जीवनाला सुरुवात होते आणि याचवेळी जैववैद्यकीय क्षेत्रातील अनुभव संशोधक ब्रायन याच्याशी तिची गाठ पडते. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कालांतराने विवाहबद्धही होतात. त्यांचे व्यक्तिगत जीवन आणि संशोधन असा त्यांचा समांतर प्रवास सुरू होतो. या प्रवासात त्यांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्यांच्यावर अनेक संकटेही ओढावतात. परंतु त्यांनी त्यावर मात करून आपले कार्य सुरू ठेवले आहे. हे सर्व शब्दबद्ध करताना लेखिकेने कधी तटस्थपणे, तर कधी परिस्थितीशी समरस होऊन प्रसंगचित्रण केले आहे. ब्रायन आणि व्हेनेसा यांनी मर्कट जातीमधील अनेक प्रजातींचा अभ्यास केला आहे. यातूनच वेगवेगळ्या देशांतील माकडांची वेगवेगळी रूपे, आफ्रिकेत आढळणाऱ्या चिम्पांझीच्या प्रजाती, कान्गोमधील चिम्प्स, चिम्पांझी व बोनोबो यांची सविस्तर माहिती लेखिकेने करून दिली आहे. आपला पती ब्रायन यांच्यासह केलेल्या संशोधनातून व्हेनेसा वुड्सने माकडांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे जीवन, त्यांच्या भावना, त्यांच्या वासना, त्यांचा दिनक्रम, विशिष्ट क्रियेनंतर त्यांनी त्यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया अशा सर्वच बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला शब्दरूप दिले आहे. याशिवाय आफ्रिकेतील जंगलातील प्राणी व त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनावर होणारे चांगले-वाईट परिणाम, तसेच त्या प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनुषंगिक बाबींचाही येथे परामर्श घेतला आहे. ‘देशविदेशात प्राणीमित्र संघटना कार्यरत असूनही काही विशिष्ट प्राण्यांची दखल घेतली जात नाही’ अशी खंतही येथे व्यक्त केली आहे. माकडांमधील ‘बोनोबो’ ही जात नष्ट होत असताना त्याची ओळख जगाला व्हावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या ध्येयवेड्या ब्रायनशी विवाह केल्याने, त्याच्यासह केलेल्या सहप्रवासात सोसाव्या लागलेल्या यातनांना लेखिकेने येथे शब्दरूप दिले आहे. संशोधन आणि व्यक्तिगत जीवन असा समांतर प्रवास करताना लेखिकेला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसे भेटली आहेत. त्यामुळे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून, उच्चपदस्थ, सत्ताधीश, राजकारणी यांच्यापर्यंत सर्वच स्तरावरील व्यक्तींच्या व्यक्तिवैशिष्ट्यांची माहिती येथे करून दिली आहे. यामध्ये तिचा पती ब्रायन, त्याचा सहकारी रिचर्ड आणि बोनोबोच्या पिल्लांचा सांभाळ करणाऱ्या ‘येवोनो’, ‘हेन्रिएट’ व ‘एस्पोरान्स’ या ‘मामा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे ठळकपणे साकार झाली आहेत. शिवाय मालूचे प्राणिचित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आत्मकथनातून काही प्रदेशात घडत असलेली अमानवी कृत्ये, लढाया, मानवतावादापासून दूर गेलेली संस्कृती प्राण्यांच्या निवारागृहांचा माणूसच करीत असलेला वापर अशा बाबींवर प्रकाश टाकला आहे आणि तरीही या परिस्थितीत नेल्सन मंडेला व महात्मा गांधी यांच्या विचारांची कास धरून मानवतावादी धोरणाचा अवलंब करत आपण नि:स्वार्थीपणे इतरांना मदत करण्याची वृत्ती जोपासत असल्याचे म्हटले आहे आणि याचा प्रत्यय या आत्मकथनातून येत राहतो. म्हणूनच लेखिकेचा हा प्रवास समजून घेताना, ‘बोनोबो’ या माकडांच्या एका प्रजातीचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करून त्याला एका शांतीदूताचे स्थान मिळवून देणाऱ्या व्हेनेसा वुड्सचे हे आत्मकथन एकदा अवश्य वाचावे असे आहे. – कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    आफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more