* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANJARYACHE GHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663235
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :YASHODHARA KATKAR BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HOUSE, A DEFINITE FORM GIVEN TO SPACE BY MAN. HUMANS BUILT HOUSES ON EARTH AND STARTED RESIDING IN THEM. SINCE THEN, OUR DWELLING HAS HAD A SPECIAL PLACE IN OUR MINDS. THE STRONG RELATION BETWEEN A HOUSE AND A PERSON HAS EVER SINCE BEEN PRESENT STRENGTHENING IN EACH ERA. FOR THE SAKE OF PROTECTION, MAN FIRST BUILT A CLAY HOUSE. TO PROTECT THE SOUL, MAN CONSIDERED HIS BODY AS THE ABODE. SINCE THEN, THE SOUL HAS BEEN SUPPORTING THE BODY. THE HOUSE HAS ALWAYS HELPED TO SUSTAIN ON EARTH WHEREAS THE SOUL HAS HELPED TO REMAIN FIRM. WITHOUT HOUSE AND SOUL, A PERSON BECOMES HELPLESS. HENCE, A HUMAN MIND ALWAYS SEEKS A HOUSE AND THE SOUL. A HOUSE ENVELOPES US FROM WITHIN AND FROM OUTSIDE. HENCE A HOUSE HAS EXTREMELY IMPORTANT PLACE IN OUR LIFE. LIKEWISE, THE IMAGES OF HOUSE ARE VITAL FOR US, BE IT OUR PHYSICAL SURROUNDING OR OUR IMAGINARY WORLD. (AN EXCERPT FROM ‘GHARACHI ADIPRATIMA ANI NATSAMRAT MADHIL GHAR’-PROF. GANGADHAR PATIL; NATSAMRAT-SAMIKSHA-EDITED BY PROF. G. T. PATIL) "
घर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर मानवी मनात `घर करून` राहू लागले. आणि त्याच क्षणी या घराचे आणि मनाचे अगदी पहिले नाते जुळले - आणि युगायुगातून ते वाढत राहिले. मानवाने आपल्या देहाच्या रक्षणासाठी मातीचे घर बांधले आणि आपल्या आत्म्या च्या निवासासाठी स्वतःच्या देहाचेच घर उभारले. या देहामन्दिरातच मानवी आत्म्याला पहिला निवास मिळाला. तेव्हापासून मानवी आत्मा माणसाला आधार देत आला आहे. या अनंत अवकाशाच्या पोकळीत घराणेच माणसाला आधार दिला. घराप्रमाणेच आत्मा हा माणसाला दुसरा आधार लाभला. घराशिवाय व आत्म्याशिवाय माणूस निराधार, परत्मा होईल. पोरका, एकाकी पडेल. म्हणूनच माणसाला जशी घराची एक मूलभूत ओढ असते. तशीच त्याला आपल्या आत्म्याची, स्वस्था ची पण मूलभूत ओढ असते. घर हे माणसाला आतून व बाहेरून ओढीत व वेढीत असते. म्हणून मानवाच्या भावस्रुष्टीत व प्रतीकस्रुष्टीत मनाला व आत्म्याला साकार करताना-या घराच्या आदिबंधरूप प्रतिमांना महत्वाचे स्थान आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BANJARYACHEGHAR #BANJARYACHEGHAR #बंजाऱ्याचेघर #SHORTSTORIES #MARATHI #YASHODHARAKATKAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 09-01-2005

    यशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यतून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे. घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत. कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात. परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत. चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो. -प्रा. शिवाजी पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 23-03-2003

    स्त्री मनाचा गुंता उकलणारं ललित लेखन... ‘घर’ या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचं पुस्तक आहे ‘बंजाऱ्याचे घर’. यशोधरा भोसलेंनी ते लिहिलं. पुस्तकात ‘घर’ विषयाची एक कथाही आहे. शेवटी ‘कुणी घर देता कां घर?’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल ेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत. ‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं! घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!! ‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द! दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं ते कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही! कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे. ‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय. पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचं दिव्य पार केल्यानंतर मिळालेलं हे घर लेखिकेला आपली जागा, आपलं जग मिळवून देत. या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्पक, शीर्षकं या पुस्तकाचं आगळं वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरुवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटनं पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचं गहिरंपण चित्रकारांनी असं चित्रित केलंय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही. ‘बंजाऱ्याचे घर’मधील ‘पत्ता हरवलेलं घर’ ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैशिक संबंधांची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणं औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेनं संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवं होतं. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधांची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते. ...Read more

  • Rating StarJyotsna Aphale

    हे पुस्तक वाचले आहे अप्रतिम

  • Rating StarSharmila Phadke

    माझं अत्यंत आवडीचं पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk