* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AWA MARU - TITANIC OF JAPAN
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788184981636
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ON THE 1ST OF APRIL 1945, A JAPANESE HOSPITAL SHIP THAT HAD BEEN GIVEN SAFE PASSAGE BY THE ALLIES, IN THE DEAD OF NIGHT, WAS MISTAKEN FOR A MILITARY VESSEL AND TORPEDOED BY THE AMERICAN SUBMARINE QUEENFISH.IT SANK WITHIN MINUTES TAKING ALMOST ALL OF THE 2007 PASSENGERS TO THEIR WATERY GRAVES. THIS IS THE GRIPPING STORY OF THE AWA MARU, THE LITTLE KNOWN TITANIC OF JAPAN.FOLLOW THE JOURNEY OF KYOKO TANAKA, WHOSE PARENTS AND BROTHER HAD BEEN PASSENGERS ON THE AWA MARU AS SHE SET SAIL ON HER OWN VOYAGE OF DISCOVERY. SHE TRAVELS FROM JAPAN TO SINGAPORE IN SEARCH OF THE TRUTH AND A PIECE OF HER HISTORY AND MAKES POIGNANT AND TOUCHING DISCOVERIES OF THE LIVES OF HER PARENTS AND SOME OF THE OTHER FAMILIES AS THEY PREPARED TO BOARD THE AWA MARU. THE LIVES OF THE DOOMED PASSENGERS OF THE AWA MARU AND THE EVENTS OF THAT HORRIFIC NIGHT WHEN THEY PERISHED ARE ALL TOLD IN THIS BOOK AS NEVER BEFORE.
जगात दुस-या महायुद्धाचा वणवा पेटलेला... जपाननं सिंगापूरमधली ब्रिटिशांची सत्ता उलथवून तिथे आपले हातपाय पसरलेले... परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याच्या सत्तेचा हा सूर्य ढळू लागला. सिंगापूरमधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेनं, त्यानंतर उसळणा-या सुडाग्नीच्या दहशतीनं प्रचंड हादरले! जीव वाचवण्यासाठी, जपानला पळण्यासाठी जिवाचा आटापिटा करू लागले. जपाननं सिंगापूरमधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी ‘आवा मारू’ नावाची बोट पाठवली. या बोटीला अमेरिकेकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळालेली होती. परंतु एकच बोट आणि जपानी असंख्य! बोटीत जागा मिळवण्यासाठी सारे जिवाच्या आकांतानं धडपडू लागले. अखेर, दोन हजार ‘निवडक भाग्यवंतां’ना घेऊन बोटीनं २८ मार्च १९४५ या दिवशी सिंगापूर सोडलं. परंतु १ एप्रिलच्या त्या भयाण रात्री काही वेगळंच घडलं!... कुठे गेले हे सारे लोक?... तीन दशकांनंतर क्योको तानाका झपाटल्यासारखी कुठे गेली? कुठे गुंतले होते तिच्या आयुष्याचे अदृश्य धागे?... आजवर साहित्यकृतीत शब्दबद्ध न झालेली दुस-या महायुद्धाच्या काळातली ही सत्य घटना आणि काळजाचा थरकाप उडवणारे त्यातले तपशील वाचकांनीही अनुभवावेत... रेई किमुरांनी ‘आवा मारू’ या बोटीच्या वास्तव घटनेभोवती इतक्या कसबीपणानं कल्पित कथानकाचा एक दुपेडी गोफ विणला आहे, की ती घट्ट वीण वाचकालाही त्यात ओढून घेते. अतिशय उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे लेखन, पुस्तक वाचून संपवलं तरी वाचकाला पकडून ठेवतं!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या पाणबुडीने जपानी प्रवासी असलेले एक निमलष्करी जहाज हलगर्जीपणाने नष्ट केले होते व २५०० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. ही एक खरी घटना. त्याभोवती या जपानी लेखिकेने एक कथा चपखलपणे गुंफली. पण खरंचकिती कुटुंबांची होरपळ झाली असेल. एक जपानी मुलगी , क्योको. तिची आई चिएको शेवटच्या क्षणी तिला एक रहस्य सांगण्याचा प्रय्तन करते. मुलीला एक जुना फोटो मिळतो . तो सिंगापुरचा असतो. प्रचंड उतसुकतेपोटी ती पती च्या पाठिंब्यामुळे सिंगापूरला रवाना होते. एक जुनापुराणा फोटो या व्यतिरिक्त तिच्याकडे काही असत नाही. सिंगापूरच्या जपानी समिती मध्ये ती जाते. तिथे शोध घेताना काही धागेदोरे हाती लागतात . त्यातून तिला समजतं की जिला ती इतकी वर्षे तिची आई समजत होती ती तिची आई नाही आहे. आता मात्र तिला धक्का बसतो. मग पुढचा प्रश्न कि ती कोणाची मुलगी आहे ? तिचे आई वडिल कोण ? आता ते कुठे आहेत? टॅक्सीमधून प्रवास करताना तिला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापूरमधे असलेल्या “जपानी वसाहती बद्दल कळतं,, ती तिथे पोहोचते आणि नवीनच कोडी तसेच धूसर आठवणी सोबत घेऊन येते. अजून काही खटपटीनंतर जपानी समिती कडून तिला एक यादी मिळते,,, ती यादी असते,,,,, अशा लोकांची कि जे दुसऱ्या महायुद्ध शेवटच्या टप्प्यात असताना सिंगापुरहून जपानला आपल्या मायदेशी परतण्याच्या आशेने एका “आवा मारू” नावाच्या जहाजावर चढले होते. या जहाजाला चीनच्या जवळ समुद्रात जलसमाधी मिळते. या यादीमुळे तिला कळतं कि आपल्याला एक भाऊ ही आहे. आता ती पुन्हा एकदा आपल्या जुन्या जपानी वसाहतीतल्या घराला भेट देते. तिथे तिची बालमैत्रीण जी या सर्व इतिहासाची साक्षीदार आहे. ती (मेइलिन) कथा सांगते , तेव्हा तिला सर्व उलगडा होतो..,,,,,, तिचे वडिल (शिगे) जपानी सेनेमधील गुप्तहेर असतात. त्यांना सिंगापूरमधे पाठवल्यावर ते गरोदर पत्नीसहित येतात , जिला आपला थंड जपान सोडून यायचे नसते. तिथे येताना प्रवासात त्यांची एका जपानी कुटुंबासोबत ( तनाका कुटुंब) मैत्री होतो ती कायम टिकते. सिंगापूरच्या उष्ण हवामानाशी जुळवून घेत, जपानच्या आठवणीत झुरत इतर अनेक जपानी लोकांना सोबत घेऊन वसाहत वसवतात. कुटुंब वाढवतात. सवादा आणि तनाका कुटुंबीय यांचे संबंध दिवसेंदिवस गहिरे होतात.वसाहतीला ते अगदी जपानचं प्रतिरूप करतात. हे करताना चिनी वंशाचा स्थानिक कल्पक हुशार सुतार या कुटुंबाच्या संपर्कात येतो. वसाहतीसाठी मदत करताना तो त्यांचाच होऊन जातो. त्याची मुलगी मेइलिन या मुलांसोबत वाढते , खेळते. क्योको , तिचा भाऊ आणि मेइलिन हे कायम एकत्र खेळतात. चिएको आणि मोरी क्योको ला आपल्या मुलासारखेच प्रेम करतात. कारण तिला मूल नाही. ४ वर्षांनी दोस्त राष्ट्रांची सरशी व जपानची पिछेहाट सुरू होते मासाको (शिगेची पत्नी )कुटुंबाची चिंता करत जपानला जाण्यासाठी पाठपुरावा करत राहते. अचानक एके दिवशी बातमी कळते कि “आवा मारू“बोट जपानी लोकांना घेऊन जपानला चालली आहे.या बोटीला दोस्त राष्ट्रांचे अभय आहे व ती बोट सुखरूपपणे जपानला पोहोचणार आहे . जीवाचे रान करून मासाको तिथे सावादा आणि तानाका या कुटुंबांसाठी जागा मिळवते. मेइलिन व तिच्या सुतार वडिलांना हे लोक परत जाणार म्हणून अपरिमित दुःख होते. ( नंतरच्या आयुष्यात पण त्यांना वाटत राहते कि हे लोक कधीतरी परततील.) असंख्य आशा , स्वप्नं घेऊन दोन हजारांहून अधिक माणसे बोटीवर चढतात. प्रवास सुरू होतो. सर्व आलबेल असताना दूरवर एक धडाका होतो, अमेरिकी पाणबुड्या सर्वत्र असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून सगळे प्रवास करत असतात.त्यांचा आशेचा किरण एकच असतो. त्यांचा कॅप्टन , ज्याची यशस्वी सफरींची नोंद आहे. एक गरोदर स्त्री जिचा नवरा आर्मीत आहे ती निराशावादी बोलत राहते. मासाको अजून घाबरते पण मुळची ती खंबीर आहे. अचानक काही कारणाने बोटीचा ठरलेला रस्ता बदलतो. जपानी आर्मीवाला आणि शिगे दोन्ही घाबरतात. इथेच फासे फिरतात. अमेरिकी पाणबुडीकडून निष्काळजीपणा प्रदर्शित होतो. संदेश चुकीचा वाचला जातो. आणि जे नको व्हायला होतं ते होतं,,, पाणतीर डागले जातात. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, एक भयानक शेवट!!!! आशाआकांक्षा, स्वप्नं, वर्तमान , भविष्य सगळ्यांचा चक्काचूर! या विनाशातून क्योको (मासाको शिगेची मुलगी)आणि चिएको वाचतात. चिएको तिला मुलीप्रमाणे वाढवून मोठी करते,,, पण एक भळभळणारी जखम उराशी घेऊन. क्योको ऐकून सुन्न होते,, स्वतः ला सावरते,, मेइलिन ला उराउरी भेटते परत आपल्या आधीचे आयुष्य सुरू करते. आपल्या पतीला हे काही न सांगण्याचा निर्णय घेते. दरवर्षी टोकियोतील झोजोजी मंदिराच्या आवाजातील एका कोपरयात विसावलेल्या स्मारकाला मात्र नित्य भेट देते. एक प्रकरण वर्तमान आणि एक प्रकरण भूतकाळ लिहिला आहे. वर्तमानात क्योको चे आताचं जीवन तिचा सिंगापुरमधील शोधप्रवास दाखवलाय. भूतकाळात शिगे , मासाको सवादा ( क्योको चे खरे आई वडिल)आणि चिएको,मोरी तनाका यांचा सिंगापूर निवास, जहाजगमन , जलसमाधी हा प्रवास दाखवला आहे. बोटीवर जे काही घडते ते कोणालाच माहिती नाही. चिएको क्योको ला जपानमध्ये वाढवते. मेइलिन ला उशीरा कळतं बोट बुडल्याचं. तिचे वडील घराची काळजी घेतात. सिंगापूरवासियांचा जपानवर रोष असल्यामुळे मेइलिन व तिच्या वडिलांना समाजरोष सहन करावा लागतो. जपानी समिती ने मात्र शक्य तेवढी माहिती , कागदपत्रे जपून ठेवली आहेत. (((((((((सवादा कुटुंब—- शिगे व मासाको. त्यांची दोन मुले क्योको व तिचा भाऊ तनाका कुटुंब—- मोरी व चिएको जी क्योको ला आयुष्यभर सांभाळते. चिनी सुतार व मुलगी मेइलिन))))) पाणबुडीच्या कॅप्टन वर काही विशेष कारवाई झाली नाही. युद्धाचे असे किती साइडइफेक्ट्स असतील आणि युद्ध संपल्यानंतर कितीकाळ अस्तव्यस्त असेल सर्व! ‘विनाशकाले विपरीत बुदधी ‘हेच खरं पूर्वकाळातील राक्षसांचा पुनर्जन्म होतो की काय जाणे? सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarUttara Bhadkamkar Pandit

    ही कादंबरी, छान आहे

  • Rating StarMauli Pandhare

    aplya purvajachi kahani shodhnare pustak ahe .read everyone

  • Rating StarNeelakshi M Patil

    Apratim pustak

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more