* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A NEW EARTH
  • Availability : Available
  • Translators : NILIMA JOSHI
  • ISBN : 9789387319974
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ECKHART TOLLE`S A NEW EARTH WILL BE A CORNERSTONE FOR PERSONAL SPIRITUALITY AND SELF-IMPROVEMENT FOR YEARS TO COME, LEADING READERS TO A NEW LEVELS OF CONSCIOUSNESS AND INNER PEACE. TAKING OFF FROM THE INTROSPECTIVE WORK THE POWER OF NOW, WHICH IS A NUMBER ONE BESTSELLER AND HAS SOLD MILLIONS OF COPIES WORLDWIDE, TOLLE PROVIDES THE SPIRITUAL FRAMEWORK FOR PEOPLE TO MOVE BEYOND THEMSELVES IN ORDER TO MAKE THIS WORLD A BETTER, MORE SPIRITUALLY EVOLVED PLACE TO LIVE. SHATTERING MODERN IDEAS OF EGO AND ENTITLEMENT, SELF AND SOCIETY, TOLLE LIFTS THE VEIL OF FEAR THAT HAS HUNG OVER HUMANITY DURING THIS NEW MILLENNIUM, AND SHINES AN ILLUMINATING LIGHT THAT LEADS TO HAPPINESS AND HEALTH THAT EVERY READER CAN FOLLOW.
एकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत याची त्याला जाणीव होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागतं. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचं त्यांना भान नसतं. ज्यांना हे भान असतं त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. बुद्ध, जीझस आणि अन्य अनाम आत्मे मनुष्य चेतनेच्या बहराची उमलण्याची साक्ष आहेत. त्यांनी मनुष्यजातीला दिलेल्या संदेशांचे आज विकृतीकरण झाले आहे. मनुष्यजातीची मनोरचना यांत्रिक झाली आहे. तिच्या जडतेतून चैतन्याचा प्रकाश आरपार जाऊन ती पारदर्शक होईल का? नाम, रूप, व्यक्तिमत्त्व, अहं यांच्या पिंजऱ्यातून ती मुक्त होईल का? या आंतरिक परिवर्तनाची गती कशी वाढवता येईल? अहं केंद्रित अशा चेतनेच्या प्राचीन काळापासून असलेल्या स्थितीला कसं ओळखायचं? नव्याने उदित होत असलेल्या मुक्त चेतनेची तरी खूण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सृष्टिविकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणं आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EARTH# ECKHART TOLLE# EGO BETTER LIFE# SPIRITUALITY# RELIGION# TRANSFORMATION# INNER BODY# FORGETFULNESS# PEACE# HUMANITY# MATERIALITY# TRUE IDENTITY# PAIN-BODY# HAPPINESS# PARENTING# A NEW EARTH# AVANI EK NAVI# NILIMA JOSHI# मानवी चेतना# आध्यात्मिकता# धर्म# अहंता# अहंकार# तादात्म्यता# अस्तित्व# व्यथाशीर# भावना# स्वरूपाचा शोध# जागृत चेतना# मानवाचा स्थायीभाव# शांती# आतील अस्तित्वाची जाणीव# नवी चेतना# नवी धरा# मनुष्य जातीची विकृती# स्वामित्वाचा भ्रम# नीलिमा जोशी# अवनी एक नवी# एकहार्ट टोले# अ न्यू अर्थ#
Customer Reviews
  • Rating StarlOKPRABHA - 24-09-2021

    स्व-शोधाचा मार्ग... मन एकाग्र करण्यात षड् रिपूंमुळे अडचणी येतात. या षड् रिपूंमधील एखादा विकारसुद्धा माणसाला शांतता, स्वस्थता आणि आरोग्य लाभू देत नाही. हे सर्वच विकार मानवाच्या ठायी मोठ्या प्रमाणात असतील, तर त्याचे जीवन नरकयातनांनी भरून जाते, यात शंकच नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांना दूर सारणे सोपे नसले, तरी ते अशक्य नक्कीच नाही. ‘अवनी एक नवी’ या पुस्तकात लेखक एकहार्ट टोले हेच सांगू पाहतात. चेतना जागरणाचा प्रारंभ करण्यास आणि स्वत:चा शोध घेण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते. पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. ज्याला इथे संवाद म्हटले आहे. या वेगवेगळ्या संवादांत मनुष्याच्या दु:खाचे मूळ म्हणजेच षड् रिपू आणि त्यांच्याशी निगडित प्रसंग मांडले आहेत. त्यातून संदेश दिले आहेत. अस्मिता म्हणजे ‘मी पणा’ची जाणीव. परंतु, मीपणा हे आध्यात्मिक दृष्टीने अज्ञान आहे. आपण जेव्हा मी या शब्दाचा उपयोग करतो, तेव्हा बहुतेक वेळा आपला अहंकारच बोलत असतो. प्रत्येक व्यक्तीचा अहंकार स्वतंत्र असतो, असे लेखक सांगतात. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे मूळ अहंकारात आहे. ‘अहंकार असतो तरी कसा?’ याचा सविस्तर ऊहापोह करत लेखकाने अहंकाराची विविध रूपं आपल्यासमोर उलगडली आहेत. ‘अहंकाराची व्याधी रूप’, ‘अहंकार आणि कीर्ती’, ‘व्याधिग्रस्त अहंकार’, ‘अहंकारासहित कर्म आणि अहंकाररहित कर्म’ अशा कित्येक पाठांतून आपल्यातील अहंकाराची जाणीव, ओळख लेखकाने करून दिली आहे. अहंकार दूर करण्यासाठी महत्त्वाची आहे ती जाणीव, स्वत:ची, स्व-अस्तित्वाची. मानवाला एकदा आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, त्याचं अवधान जागृत झालं, की स्वत:तील दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत, याचे आकलन त्याला होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागते. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचे त्यांना भान नसते. आपण सदाचारी होण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जोवर चेतनेचे परिवर्तन होत नाही. तोपर्यंत प्रयत्न यशस्वी होत नाहीत. ज्यांना हे भान असते त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. ही जाणीव जागृत करण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी केले आहे. त्याचीही शिकवण पुस्तकात ओघाने येते. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, चिनी अध्यात्म, जे. कृष्णमूर्ती आणि खिस्त साधना या सर्वांचे संदर्भ लेखकाने दिले आहेत. त्यातून त्यांचा इतर धर्मांचा सखोल अभ्यास दिसून येतो. जुन्या काळापासून जपलेल्या आणि जागृत असलेल्या प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीरातल्या नकारात्मक भावनांना लेखकाने व्यथाशरीर हे नाव दिले आहे. हे सांगतानाच लेखक आपल्या अशांत मनातील वेदना संपवण्याचा मंत्र देतात. सृष्टी विकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणे आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पुस्तकाचा अनुवाद नीलिमा जोशी यांनी केला आहे. लेखकाचे मुद्दे अथवा प्रेरणा तितक्याच प्रभावीपणे आणि परिपूर्ण शब्दांत त्यांनी मांडल्या आहेत. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-07-2018

    सध्याच्या धावपळीत जगात आपण नको तितका विचार करतो, नको तेवढ्या गोष्टींच्या मागे धावतो आणि जगण्यातील निखळ आनंद हरवून बसतो. लोक आपल्याला काय म्हणतील? मित्र, कुटुंब आणि शेजारच्यांच्या तुलनेत आपण कुठे, कसे आहोत, याचा विचार करतो आणि आत खोलवर कुठेतरी आपल्याल चिंता वाटते, की जसे आपण इतरांच्या दृष्टीत असायला हवे, तसे नाही आहोत की काय? हे पुस्तक स्वत:चा शोध घ्यायला लावते. प्रसन्नतेचे आणि मुक्तपणे जीवन जगायला लावण्याची सवय त्यामुळे लागेल. ‘जाऊ या उन्नत जगाकडे’ हा मंत्र लेखकाने अधोरेखित केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more