* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PEARLS OF CHILDHOOD
  • Availability : Available
  • Translators : DR.VINAYA DHARWADKAR
  • ISBN : 9788184984989
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 199
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN JUNE 1939, SHORTLY BEFORE HER 11TH BIRTHDAY, VERA GISSING ESCAPED FROM OCCUPIED CZECHOSLOVAKIA, LEAVING BEHIND HER PARENTS, FAMILY, AND FRIENDS, TO SPEND SIX YEARS IN BRITAIN. THROUGHOUT THE WAR YEARS, VERA KEPT A DIARY, RECORDING HER DAY-TO-DAY EXPERIENCES, HER LONGING FOR HER PARENTS, HER HOPES, AND HER PRAYERS FOR THE FREEDOM OF HER COUNTRY. BY THE TIME SHE RETURNED TO PRAGUE TO SET UP HOME WITH HER AUNT IN 1945, SHE KNEW THAT BOTH HER PARENTS HAD DIEDXHER MOTHER IN BELSEN, HER FATHER ON A DEATH MARCH. SHE CAME BACK TO ENGLAND IN 1949 AND HAS LIVED THERE EVER SINCE. THE MEMORIES AND EMOTIONS REKINDLED BY A REUNION OF THE CZECH SCHOOL IN WALES WHERE SHE WAS EDUCATED ENCOURAGED VERA TO GO BACK TO HER DIARIES AND THE LETTERS FROM HER PARENTS THAT SHE HAD NOT TOUCHED FOR 40 YEARS, RESULTING IN THIS POWERFUL AND MOVING ACCOUNT OF THE LIFE OF ONE CHILD GROWING UP IN EXTRAORDINARY CIRCUMSTANCES.
दुस-या महायुद्धाचा काळ जून, १९३९. व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच, अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून व्हेरा सहा वर्षं ब्रिटनमध्ये राहते. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सुरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशाआकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना... असे सगळे ती डायरीत टिपत जाते. १९४५मध्ये ती मायदेशात परतते तेव्हा तिचे आई-वडील मरण पावलेले असतात. ती इंग्लंडला परतते; तेव्हा तिच्या मनात पुन्हा त्या आठवणी, त्या भावना आणि तो काळ जागृत होऊ लागतो. आणि ती पुन्हा वळते तिच्या डायरीकडे.... प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढणा-या एका मुलीची ही करुण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलनं म्हणजे हे ‘आठवणींचे मोती’!
संगमनेर इतिहास संधोधन मंडळातर्फे `अनंत फंदी साहित्य पुरस्कार २०१४`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 01-06-2018

    महायुद्धाच्या अशाही आठवणी... होलोकास्ट अर्थात ज्यूंचा नरसंहार, दुसऱ्या महायुद्धातील एक काळा इतिहास. हिटलरच्या सत्तापिपासू वृत्तीतून जन्माला आलेला हा प्रकार इतका भयंकर होता की, नाझी फौजांनी जिंकलेल्या प्रत्येक प्रदेशातील जनता भयभीत होत असे. १९३९ सालीझेकोस्लोव्हाकियावर जर्मन फौजांनी कब्जा मिळवला तेव्हा तेथील लोकांमध्येदेखील हीच भावना होती. डायमंड कुटुंबीय त्यांपैकीच एक. नाझींच्या हाती लागून छळछावणीत अडकून पडण्याची, तेथेच प्राण गमावण्याची भीती त्यांनाही होतीच. हजारो बालकेदेखील याच भीतीच्या छायेत होती. पण एका सद्गृहस्थाने प्रचंड मेहनत करून त्यांपैकी ६६९ बालकांना थेट ब्रिटनला नेले. त्यापैकीच एक म्हणजे व्हेरा गिसिंग. म्हणजेच या पुस्तकाची लेखिका. झेकोस्लोव्हाकियात असताना नाझींचा हल्ला, तेथून निघून ब्रिटनला आल्यानंतर नव्या कुटुंबातील वास्तव्य, तेथील पुढील आयुष्य असा सारा प्रवास लेखिकेने या पुस्तकात मांडला आहे. हा केवळ लेखिकेचा प्रवास नाही. तिच्या वाट्याला आलेले दु:ख हे त्याकाळच्या संपूर्ण समाजाचे चित्रण आहे. लेखिकेने जरी स्वत:चा प्रवास मांडला असला तरी त्यात केवळ स्वत:च्या दुखण्याखुपण्याला प्राधान्य दिलेले नाही. व्हेराने तिच्या ब्रिटनमधील सुरुवातीच्या वास्तव्याच्या साऱ्या नोंदी रोजनिशी स्वरूपात मांडून ठेवल्या आहेत. ब्रिटनमध्ये ती तिच्या दत्तक आई-वडिलांबरोबर राहत असली तरी तिची मूळची ओढ तशीच आहे. झेक भाषा, तिचे मूळ गाव याची ओढ तिला सतत छळत असते. देश सोडून आई-वडिलांपासून ताटातूट झालेली मुलगी काय विचार करते याचे प्रत्यंतर तिच्या डायरीत दिसून येते. नंतरच्या काळात तिचा आई-वडिलांबरोबरचा पत्रव्यवहारदेखील या पुस्तकातून उलगडत जातो. व्हेराने तिचे हे सारे अनुभव, रोजनिशी, पत्रे सारे पुस्तकरूपाने १९८८मध्ये ‘पल्र्स ऑफ चाइल्डहूड’ या नावाने प्रकाशित केले आणि यामुळेच ज्या व्यक्तीने त्या ६६९ बालकांना वाचवले तो माणूसदेखील प्रकाशात आला. त्याचे नाव होते निकोलस विन्टन. तो ब्रिटनमधील एक शेअर व्यावसायिक होता. व्हेरा ही त्याने सुटका केलेल्या बालकांतील पहिली ‘मुलगी’. पुढे ती सर्व ६६९ बालके ही विन्टनची मुले म्हणून ओळखली जाऊ लागली. विन्टनला नंतर अनेक मानसन्मान मिळाले. व्हेराची ही कथा अशा साऱ्या आठवणींचा एक मस्त कोलाज आहे. दु:खातून सुखद स्मृतींना जन्म देणारी ही सत्यकथा आहे. –राधिका कुंटे ...Read more

  • Rating Star SAMNA 5-1-2014

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व्हेराचा अकरावा वाढदिवस जवळ आलेला असतानाच अचानक तिला तिचा प्रिय देश सोडून जावं लागतं. आपलं कुटुंब, आई-वडील आणि मित्रमैत्रिणी यांना सोडून सहा वर्षे ब्रिटनमध्ये राहिली. ब्रिटनमधल्या वास्तव्याच्या काळात व्हेरा डायरी लिहायला सरुवात करते. आई-वडिलांपासून झालेली ताटातूट, त्यांच्या आठवणी, तिच्या आशा, आकांक्षा, इच्छा आणि देशासाठी तिने केलेल्या प्रार्थना... सर्व डायरीत टिपते. महायुद्ध संपल्यावर ती पुन्हा मायदेशी परतते आणि त्यामागच्या आठवणी, भावना तो काळ जागृत होतो. ती पुन्हा डायरीकडे वळते... तिचीच ही करूण, हृदय हेलावणारी भावनिक आंदोलने म्हणजेच ‘आठवणींचे मोती’. ‘आठवणींचे मोती’च्या मूळ लेखिका व्हेरा गिसिंग मराठी अनुवाद केलाय डॉ. विनया धारवाडकर यांनी. व्हेरा गिसिंग यांनी विविध इंग्रजी प्रकाशकांकडे भाषांतरकार, संपादक म्हणून काम केले. तसेच बालसाहित्यही लिहिले आहे. महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये असताना लिहिलेल्या डायऱ्यांवर आधारित ‘पर्ल्स ऑफ चाइल्डहूड’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजेच ‘आठवणींचे मोती’. दुसऱ्या महायुद्धात बालपणीच कुटुंबाशी ताटातूट झालेल्या ‘व्हेरा गिसिंग’ लेखिका या ज्यू मुलीचा भावपूर्ण प्रवास आहे. हे पुस्तक अमेरिका, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया आणि जर्मनी येथे प्रकाशित झाले आहे. जपानी भाषेतही ते अनुवादित झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेला ‘ऑल माय लव्ह वन्स’ हा चित्रपटही बनविला गेला आहे. माता-पिता नाझींच्या छळछावणीत मृत्युमुखी पडल्यानंतरचा प्रवास डोळ्यात अश्रू उभे करणारा ठरतो. त्या युद्ध काळात जी निष्पाप बालके त्यांच्या घरापासून तोडली गेली, त्या सर्वांचीच ही कहाणी ठरू शकते. ब्रिटनने त्या बालकांना आश्रय दिला, मदत केली आणि त्यांना समजूनही घेतले हे विशेष. सदर पुस्तकात व्हेराच्या कुटुंबाची, घराची, शाळेची, शहराची छायाचित्रेही यात समाविष्ट केलेली आहेत. यात एकूण आठ प्रकरणे आहेत. दोन विभागात ती दिलेली आहेत. लेखिकेचा हा दुःखदायक प्रवास डॉ. विनया धारवाडकर यांनी अतिशय संवेदनशीलतेने साध्या, सोप्या भाषेत मांडलेला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही सत्यकथा मराठीकरण करताना कुठेही बटबटीत वाटत नाही. उलट त्यातील जिवंतपणा प्रत्ययास येतो, ही डॉ. विनया धारवाडकर यांच्या भाषाशैलीची पोचपावती ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more