* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ASHRU ANI HASYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665246
  • Edition : 6
  • Publishing Year : 1941
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I STARTED STORYWRITING IN 1925. THE NEXT 1213 YEARS I WAS WRITING STORIES AS AND WHEN TIME WOULD PERMIT. DURING THOSE YEARS I WAS TEACHING IN A SCHOOL.`` "TODAY, WHILE GOING THROUGH THE 13 STORIES INCLUDED IN THIS BOOK "ASHRU AND HASYA`, MANY A THOUGHTS ARE SURFACING MY MIND. MOST OF THESE STORIES ARE WRITTEN DURING MY 15 YEARS` STAY IN SHIRODA. WHILE GOING THROUGH THEM I AM RECOLLECTING MY STAY AT SHIRODA, WHICH I HAD ALMOST FORGOTTEN. IT WAS A SMALL VILLAGE, HAVING NATURAL BEAUTY, BEAUTIFUL ATMOSPHERE, THOSE VILLAGERS WHO UNKNOWINGLY HAD ENLIGHTENED MY MIND FOR A STORY, MANY SWEET AND SOUR INCIDENCES, THESE ALL HAVE A SPECIAL PLACE IN MY MIND. TODAY, AT THIS STAGE I CAN EVEN EYE "THE KHANDEKAR` DURING THOSE DAYS WITH A NEUTRAL MIND. 1925 WAS THE PEAK PERIOD FOR MARATHI SHORT STORIES, I WAS AN ACTIVE MEMBER, BUT BY 1940 THIS GOLDEN ERA OF MARATHI SHORT STORIES HAD COME TO AN END.``
१९२५ साली मी कथालेखनाला प्रारंभ केला.तेव्हापासून पुढे बारातेरा वर्ष,शाळेच्या धबडग्यातून जशी सवड मिळेल,तशी मी गोष्टी लिहित असे....." "अश्रू आणि हास्य " संग्रहातल्या तेरा गोष्टी चाळतांना माझ्या मनात विविध विचारतरंग निर्माण होत आहेत.या बहुतेक गोष्टी मी शिरोड्याला असतांना लिहिल्या असल्यामुळे त्या वाचतांना ;कालोदरात लुप्त झालेले माझे पंधरावीस वर्षांपूर्वीचे जीवनच जणू काही माझ्या डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभे राहत आहे.त्या चिमुकल्या खेडेगावातला सुंदर निसर्ग,माझ्या कथांचे कळत नकळत स्पुर्तिस्थान होणारी तिथली आंबटगोड माणसे,अनेक स्वादिष्ठ व खारटतुरट घटना,इतकेच नव्हे, तर आज ज्याच्याकडे मी तटस्थपणाने,किंबहुना कठोर टीकाकाराच्या दृष्टीने पाहू शकतो,असा त्या वेळचा कथाकार खांडेकर,या सर्वांविषयीच्या आठवणी माझ्या या विचारतरंगाबरोबर अंतर्मनातून वर येत आहेत......." "मी कथा लिहिल्या ,तो काळ मराठी लघुकथेच्या पहिल्या बहराचा होता.तो बहर १९४० च्या आसपास संपला."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #अश्रू आणि हास्य
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आशयापेक्षा अभिव्यक्तीला महत्त्व… ‘अश्रू आणि हास्य’ हा वि. स. खांडेकर यांचा कथासंग्रह पुनर्मुद्रित स्वरूपात १९९५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील कथा १९३० ते ४० या दशकातल्या आहेत. १९२५ ला त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. त्यावरून या कथा उमेदवारीच्या काळाल्या आहेत, हे स्पष्ट होते. सामान्यत: एका पुस्तकाला पुरतील एवढ्या कथा उमेदवारीच्या काळातल्या आहेत, हे स्पष्ट होते. सामान्यत: एका पुस्तकाला पुरतील एवढ्या कथा संग्रहित करून सात-आठ कथासंग्रह झाले. त्यात बऱ्या वाईट, रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या आणि लाथाडलेल्या सर्व कथा एकत्रित होत गेल्या. असे खांडेकर म्हणतात. त्यांची विशिष्ट पद्धतीनं जुळणी करून ‘कालची स्वप्ने’ ‘आजची स्वप्ने’, ‘चंदेरी स्वप्ने’ आणि ‘अश्रू आणि हास्य’ असे चार कथासंग्रह त्यांनी सिद्ध केले. ‘अश्रू आणि हास्य’ हा कथासंग्रह प्रथम १९४१ मध्ये प्रसिद्ध झाल्याची नोंद आहे. त्याला जोडलेल्या ‘दोन शब्द’ खाली ११ मे १९४९ हा दिनांक नोंदलेला आहे. तो द्वितीयवृत्तींचा असावा आणि आता प्रसिद्ध झालेले पुनर्मुद्रण (तिसरी आवृत्ती) असावे. त्याला प्रकाशकांनी मात्र द्वितीय आवृत्ती म्हटले आहे. या कथासंग्रहात पूजास्थान (१९३०), तीन नंबरची खुर्ची (१९३१), मुके प्रेम, हवालदाराचां सत्याग्रह, करुण कथा (१९३२), सुपारीचे खांड, माया, मुकटा आणि फॅन्सी पातळ (१९३४), शिकार, जुना कोट, दोन चित्रे (१९३६), मिस कांचन, देव कुठे आहे? (१९४०) अशा १३ कथा आहेत. त्या कालक्रमानुसार छालेल्या नसल्या तरी खांडेकरांनी ‘दोन शब्द’ मध्ये मांडलेल्या काही विधानांचे परीक्षण करण्यासाठी वरील कालबद्ध मांडणी केली आहे. आपल्या कथासंग्रहात ‘अश्रू’चे (गंभीर कथांचे) प्रमाण जास्त असून, ‘हास्या’चे (खेळकर विनोदी कथांचे) प्रमाण कमी आहे, असे ते म्हणतात. हास्यात्मक कथा म्हणून ‘सुपारीचे खांड’, ‘हवालदारांचा सत्याग्रह’, ‘करुण कथा’, ‘मिस कांचन’ आणि ‘दोन चित्रे’ यांचा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उर्वरित कथांना अश्रूपूर्ण (गंभीर कथा) मानावे असे सुचवले आहे. त्यांची कथनसूत्रे तपासली, तर त्यांतल्या काही हलक्या-फुलक्या आशयाच्या आणि खेळकर मांडणीच्या (हास्याचा आत्मा असलेल्या) अशा वाटतात. ‘मिस कांचन’ या कथेत नटीऐवजी स्वयंपाकिणीचा सत्कार वर्णन केला आहे. अप्सरा पिक्चरचे मालक भय्यासाहेब मुंबईहून मॅनेजर भगवंतरावांना फोनवरून मिस कांचन येत असल्याचे कळवतात. प्रत्यक्षात ती मुंबईतच पळवली जाते आणि नटी होण्याची हौस असलेली स्वयंपाकीण गावात पोहोचते. तिचे स्वागत, सत्कार, मुलाखत आदी सोपस्कार भगवंतराव घडवून आणतात. ‘सुपारीचे खांड’ या कथेत निर्व्यसनी मास्तर धोतर नेसण्यासाठी कमरेवर सुपारीचा वापर करतो. ते रहस्य बनवले आहे. बढतीसाठी ‘हवालदार’ गावात नाटकाचं पोस्टर डकवणाऱ्यास, संतती प्रतिबंधक गोळ्या मागवणाऱ्या भलंभटजीला आणि त्याच्या बायकोला छळतो. ‘करुण कथे’च्या शोधात विठ्ठलरायांच्या जीवनातली धमाल वर्णन केली आहे. ‘दोन चित्रे’मध्ये एकाच चित्रकाराने रेखाटलेल्या दोन चित्रांच्या निमित्ताने सरदार इंगळ्यांनी केलेले संस्कृतीवरील भाष्य आहे. ज्या कथांना खांडेकर अश्रूपूर्ण (गंभीर कथा) म्हणतात; त्यातरी त्यांच्या कोटिबाज शैलीमुळे वाचकांवर गांभीर्याचा, परिणाम उणावतो. ‘मुके प्रेम’ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर एक महिन्याने कामावर हजर झालेल्या पोस्टमनचा पहिला दिवस वर्णन केला आहे. त्याच्या दु:खाबद्दल कुणीही सहानुभूती दाखवत नाही. शेवटी तो आपल्या मुक्या मुलाजवळ ते व्यक्त करतो. ‘माया’ कथेतले वडील आपल्या उपवर मुलीला स्थळ शोधल्याची व लग्न ठरवल्याची खोटी आशा पत्र लिहून लावतात. आपल्या या कृतीचं समर्थनंही करतात. ‘देव कुठे आहे?’’ या कथेत ‘चिमण्यात देव आहे सांगणारे बाबा बाळ्याला जप्तीच्या कामगिरीवर घेऊन जातात. जप्तीग्रस्त माणसांमध्ये ‘देव’ बाबांना दिसत नाही. त्यामुळे देव चिमण्यात आहे आणि माणसात नाही, अशी बाळ्याची समजूत होते. ही चमाकृती दाखवून ही कथा संपते. आपल्या कथांमधून निरनिराळे प्रयोग करण्याची क्षमता खांडेकरांनी दाखवली आहे. ‘तीन नंबरची खुर्ची मध्ये सं. सौभद्र नाटकाच्या कथानकाचा वापर आहे. ‘मुकटा आणि फॅन्सी पातळ’ या कथेत महाराष्ट्रकवी यशवंताचे काव्यगायन व त्यांच्या प्रतीक्षा’ व ‘आई’ या कवितांचा उपयोग समर्थकपणाने केला आहे. ‘करुण कथा’मध्ये न. चिं. केळकरांच्या ‘सविंकल्प समाधी’चा साभिप्राय उल्लेख आहे. ‘शिकार’मधील पती-पत्नी प्रत्यक्ष बोलण्याऐवजी ‘डायऱ्या’वाचून परस्परांना जाणतात. ‘माया’मध्ये पत्रलेखन आहे. त्यांची प्रयोगशीलता काळानुरूप स्वागतार्ह वाटते. तथापि सर्वच कथांमधील ‘वास्तव’ मात्र आजच्या कथेच्या वाचकाला तकलादू वाटण्याची शक्यता अधिक आहे. १९२५ ते १९४० या काळाला खांडेकरांनीही मराठी कथेचा पहिला बहर म्हटले आहे. त्यातली त्यांची कथा सखोल जीवनदर्शन घडवत नाही. त्यांच्या जोडीला त्या काळात ना. सी. फडके, य. गो. जोशी आदी कथाकारही लेखनप्रवृत्त झाले होते. त्या सर्वांच्या कथांचे स्वरूप समान आणि मर्यादाही सारख्याच आहेत. वास्तविक याच काळात दिवाकर कृष्ण कथालेखन करीत होते. त्यांच्या आणि खांडेकरांच्या कथांमध्ये कुठलाही अनुबंध अथवा देवाणघेवाण दिसत नाही. पाश्चात्त्य साहित्यात कथालेखन हा धंदा झाल्याचे खांडेकरांनी म्हटले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या कथेवर झाला असावा, असे वाटू लागते. या काळात य. गो. जोशी ‘शेवग्याच्या शेंगा’ ‘वहिनींच्या बांगड्या’ यांसारख्या आशयसंपन्न कथा लिहित होते. त्यांची दखल खांडेकरांच्या कथेने घेतलेली दिसत नाही. प्रारंभीच्या ‘दोन शब्द’मध्ये खांडेकरांनी आपल्या कथालेखनाची वैशिष्ट्ये व वाटचाल आणि काही कथांच्या जन्मकथा सांगितल्या आहेत. इथे ते संपन्न आशय, प्रभावी जीवनदर्शन आणि कथात्मक गुणवत्तेची जेवढी तरफदारी करतात ती त्यांच्या संग्रहातल्या प्रत्यक्ष कथांमध्ये आढळत नाही. आशयापेक्षा अभिव्यक्तीच्या पिंजऱ्यात त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतल्याचा भास होतो. आपणच आपल्या कथांचे ‘कठोर टीकाकार’ झालो आहोत असे ते १९४९ मध्ये म्हणत असले, तरी ‘दोन शब्द’मध्ये कथांची भलामण केली आहे. नुसता ‘चमकृती’ हा मुद्दा पटविण्यासाठी मुद्दाम ओ हेन्रीच्या ‘दि कॉप अँड दि अ‍ॅन्थेम’ या कथेचा विस्तृत आशय विशद केला आहे. मराठी कथेच्या पहिल्या बहरातील कथांचे परीक्षण आजचे कथा निकष लावून करणे यथोचित होणार नाही. कारण साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व समकालीन समाजातून घडत असते. व्यक्तीच्या विकासाला मर्यादा असतात आणि समष्टीचा विकास अव्याहत होत राहतो. म्हणून या कथासंग्रहातले मानवी संबंध, भावनाभिव्यक्तीच्या पद्धती, मूल्यसरणी या गोष्टी आज तकलादू वाटतात, असे म्हणण्याऐवजी कालानुरूप वाटतात असे म्हणणे श्रेयस्कर आहे. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more