* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANGAT PANGAT
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454928
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A WONDERFUL COLLECTION OF HUMOUR BASED STORIES BASED ON DAY-TO-DAY HAPPENINGS ALL AROUND US, LEAVING US IN A CONTEMPLATIVE MODE, MAKING US THINK, PONDER, LAUGH AND YET, BE SERIOUS. THE WORD PUNS MEET US IN EVERY ARTICLE. HIS EXCLUSIVE STYLE OF QUOTING A SERIOUS MATTER IN A WONDERFULLY UNDERSTANDABLE WAY IS BEYOND OUR IMAGINATION. HE MAKES US SEE THE OTHER SIDE WHICH MIGHT BE DARKER AT TIMES. ONCE WE START READING ANY OF HIS WRITINGS THEN IT BECOMES IMPOSSIBLE TO DIVERT OUR ATTENTION TO ANY OTHER THING. HE HAS TILL DATE PENNED DOWN ON EVERY TOPIC THAT WE CAN THINK ABOUT, RATHER HE HAS EXPRESSED VIEWS ON SUBJECTS WHICH WE MIGHT NEVER HAVE CONSIDERED TO BE WRITABLE OTHERWISE. A FEW TO NAME HERE ARE: GUIDANCE FOR WRITING OR BEING A WRITER, ABILITY AND ELIGIBILITY, STORIES OF GHOSTS AND WANDERING SOULS, ADDICTION OF ASTROLOGY, OUR NAMES, THOUGHTS ABOUT TRUTH, PATRIOTISM… BUT FAKED, PERSONALITY DEVELOPMENT CLASSES, A TEACHER’S ROLE AND POSITION, TYPES OF TEACHERS OR MENTORS, THE POST OF EDITOR (OR EDITORIAL POST…), DREAMS, GRAVEYARD, MADNESS LINED WITH PASSION AND FASCINATION, WORSHIP, PRACTISE FOR EXERCISE, DOG-CAT, DOCTOR, COMMON MEN LIKE YOU AND ME, HOTEL, DONKEY-MONKEY, WAR, BARBER… THE LIST IS ENDLESS. YOU NAME THE TOPIC AND FIND THAT HE HAS ALREADY GOT SOMETHING FOR YOU. HIS WRITINGS ARE LIKE AN EXTREMELY TASTE-SAVOURING ASSORTED PLATE WITH A PINCH OF SALT AND PEPPER; ENTERTAINING US, AMUSING US AND MAKING US THINK, AT LEAST FOR A WHILE.
‘अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात. कोटी (शाब्दिक), लेखनासंबंधीचं मार्गदर्शन, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी लागणारी माणसाची पात्रता, लायकी, भुताखेतांच्या गोष्टी, भविष्याचा नाद, नाव (माणसाचं), सत्याविषयीचं भाष्य, पोकळ देशभक्ती, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, मास्तरांची बाजू, गुरुजींच्या विविध तऱ्हा, संपादक पद, स्वप्नं, फाशी, मंदिर, स्मशान, वेड अर्थात ध्यास, देवपूजा, खानावळ, व्यायामाची तालीम, कुत्रं–मांजर, डॉक्टर, सामान्य माणसं, देशी हॉटेल, गाढव-माकड, लढाई, न्हावी इत्यादी विषयांवर मिरासदारांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत लेख लिहिले आहेत. अर्थातच ते विनोदी अंगाने लिहिलेले आहेत. त्यांचे उपहासात्मक विनोद वाचकाला खळखळून हसवतात. हे लेख रंगतदार किस्से आणि आठवणींमुळे रंजक झाले आहेत. एकदा वाचायला घेतल्यावर हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. तेव्हा हे वाचनीय विनोदी पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे आणि त्यातील किश्श्यांमधून निर्माण होणाऱ्या विनोदाचा आस्वाद घेतला पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANGATPANGAT #ANGATPANGAT #अंगतपंगत #SHORTSTORIES #MARATHI #D.M.MIRASDAR #द.मा.मिरासदार "
Customer Reviews
  • Rating Star मानसी सरोज

    आज द. मा.मिरासदार यांचं `अंगतपंगत` नावाचं पुस्तक वाचून झालं.विविध विषय हाताळत त्या संबंधीच्या आठवणी किंवा हलके फुलके किस्से विनोदी शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.समग्र लेखन विनोदी नाही.ज्या ठिकाणी भावनिक किंवा वैचारिक विचार मांडायचे आहेत त्यावर विोद करणे शक्य नाही असे स्पष्ट दिसते. हे पुस्तक म्हणजे दैनंदिन जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण शब्दांकित करू शकतो याचे रास्त उदाहरण आहे.कुठेही ताणून केलेला विनोद नाही किंवा दाबून आणलेल्या दर्दी भावना नाहीत.सरमिसळ करत वाचकांच्या समोर आणलेले हे विषय वाचताना असे वाटते की "अरेच्या! हा असा किस्सा तर आपण देखील अनुभवला आहे" म्हणजेच लेखकाचे लेखन हे वाचकाच्या मनाला सहज भिडणारे आहे. माणूस, देशभक्ती, देवपूजा, संपादक,स्मशानभूमीतल्या कहाण्या, शूटिंग, दैव, गाजलेली ग्रंथ, देशी हॉटेल्स, भुतंखेतं, देवपूजा,तालीम इ. असे एकूण ३४ विषय वेगवेगळ्या लेखांत दिसतात. १४४ पानांचा हा ललित लेखसंग्रह वाचताना आपण लेखकाचे भाष्य समोरासमोर ऐकतो असेच वाटते. विनोदी लेखक म्हणून मिरासदार नावाजले असले तरी गंभीर लेखन करताना देखील ते तितक्याच उच्च प्रतीची भावना देऊन वाचकास खिळवून ठेवतात यात त्यांचे यश आहे. काही प्रसंगामुळे लेखकाचा मनमिळावुपणा, हजरजबाबीपणा अन सामान्य माणूस म्हणून जगण्याचा बाणा सहजपणे जाणवतो.अतिशय चांगले वाचनीय पुस्तक...नवोदित लेखकांनी तर नक्कीच वाचावे असे!! ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-07-2017

    द.मा. मिरासदार यांची पुस्तकं म्हणजे आनंदठेवाच फुकट आणि अंगतपंगत या त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अंगतपंगत हे त्यांनी लिहिलेल्या एका सदराचं पुस्तक आहे. भविष्याच्या नादापासून डॉक्टरांपर्यंत अनेक विषयांवर त्ांनी खुशखुशीत भाष्य केलं आहे. फुकट या संग्रहात कथांचा समावेश आहे. त्यात काही भाषांतरित कथा आणि दमांच्या काही कथांचा समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more