* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANAHAT
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989458
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“INDEED, IT IS NOT FUNDAMENTAL THAT THE SON OF A KING SHOULD BECOME A KING HIMSELF. LOOK AT US. THE GREAT SAGE VEDSHASTRI IS OUR FATHER! BUT WE, HIS TWO SONS… COULD WE FOLLOW HIS STEPS? ONE HAS STUDIED THE VEDAS AND IS TRAINING YOUNG MINDS FOR THE SAME WHILE THE OTHER… WHAT IS HE BUSY IN? HE IS ROAMING AIMLESSLY WITH HIS FLUTE. THE SON OF THE GREAT VEDSHASTRI HAS DEVOTED HIS LIFE TO MUSIC.” “THE ONE WHO UNDERSTANDS SCIENCE BUT FAILS TO JUDGE PEOPLE IS NOTHING LESS THAN A DIM-WITTED PERSON. HAVEN’T WE BOTH LEARNT IT? THE ONLY DIFFERENCE IS YOU TEACH IT TO OTHERS WHILE I PRACTISE IT MYSELF.” ‘THE PRINCIPLE OF SOUL!’ WHAT WILL IT BE? DOES MY MIND AND DIALECT NOT UNDERSTAND IT? OF COURSE, I UNDERSTAND IT, FEEL IT. I AM COMPLETELY AWARE OF IT. THE PRINCIPLE OF MY SOUL IS ‘SWARA’. I DO NOT KNOW WHAT MY GOAL IN LIFE IS, I DO NOT KNOW HOW TO ACHIEVE IT BUT THE ‘SWARAS’ RIP ME APART. I CANNOT STUDY THIS. FOR ME THE STUDY IS ‘SWARAS’ OF THE MUSIC MAESTRO. THE CLOUDS HAVE FALLEN APART. THE SKY IS CRYSTAL CLEAR, THE SUN RAYS ARE PENETRATING MY UNBEATEN MIND DEEPLY, MAKING IT TRANSPARENT LIKE THE PURE ‘SWARA’, CARRYING ME WITH IT TO THE UNBEATEN.
‘‘राजाचा पुत्र हा राजाच झाला पाहिजे, यह जरुरी नहीं है। आपल्या दोघांना बघ! वेदशास्त्री! एक महान योगी, परंतु त्यांची दोन मुलं – एक वेदाभ्यास अध्ययन करून आज अनेक शिष्यांना विद्या दान करतो आहे आणि एक? बीन लेके घूम रहा है। यहाँ-वहाँ! वेदशास्त्र्याचा पुत्र बडे उस्ताद!`` ‘शास्त्रज्ञोप्यलोकज्ञो मूर्खतुल्यः’ अर्थात्, जो शास्त्र जाणतो; पण लोकपरीक्षा जाणत नाही, तो मूर्खासारखा होय! आपण दोघंही हे शिकलो आहोत. फर्व इतनाही है, तू आज ते इतरांना शिकवतोस आणि मी ते प्रत्यक्षात उतरवतो. आत्मतत्त्व? माझं आत्मतत्त्व कोणतं आहे? ते माझ्या मनाला आणि वाणीला समजत नाही का? पण मला समजतं. मला जाणवतं. आता मला पूर्णत्वानं जाणवतं. माझं आत्मतत्त्व सूर आहेत. मला लक्ष्य समजलं नाही... मला त्याचा भेद समजत नाही... पण स्वर मला भेदून जातात. मी नाही या अध्ययनासाठी. माझं अध्ययन म्हणजे बडे उस्तादांचे सूर. ढग बाजूला झाले आहेत. मळभ गेलं आहे. स्वच्छ निर्मळ सूर्यकिरणं... थेट माझ्या मनाच्या अनाहतपर्यंत पोहोचणारी.... पारदर्शक करणारी.... त्या शुद्ध स्वरासारखी... मला अनाहतमध्ये उतरवणारी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANAHAT #ANAHAT #अनाहत #FICTION #MARATHI #SWATICHANDORKAR #स्वातीचांदोरकर "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more