* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AN EYE FOR AN EYE
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980219
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 235.00 gms
  • Pages : 150
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SAYEED NEVER DOUBTS THE INNOCENCE OF LATIFA, THE BEAUTIFUL VILLAGE GIRL HE BROUGHT TO THE CITY AS HIS WIFE. BUT THERE IS NO WAY HE CAN SAVE HER FROM HER FATE.SET IN THE DESERT KINGDOM HE PORTRAYED SO VIVIDLY IN MIRAGE, BANDULA CHANDRARATNA TELLS THE TRAGIC STORY OF SAYEED AND LATIFA; THE LITTLE GIRL WHO PICTURES HER MOTHER LOST IN THE DESERT; THE FATHER WHO TRAVELS TO THE CITY TO RETRIEVE THE BODY OF HIS DAUGHTER. AND THROUGH IT ALL RUNS THE DISTANT ECHO OF LATIFA`S OWN STORY, THE TRUTH THAT LIES BEYOND THE TRAGEDY. A FINE ACHIEVEMENT, AS MOVING IN ITS EVOCATIONS OF INTENSE GRIEF AS IT IS HEARTENING IN ITS DEMONSTRATIONS OF UNSOLICITED, TOTALLY ALTRUISTIC ACTS OF KINDNESS.FRANCIS KING, LITERARY REVIEW CHANDRARATNA WRITES WITH THE BRACING CLARITY AND AUSTERITY OF A CHILLY DESERT DAWN... WRITTEN WITH A QUIET, UNAFFECTED GRACE AND SYMPATHY THAT COMPEL BOTH ATTENTION AND ACCLAIM BOYD TONKIN, INDEPENDENT A LITTLE MASTERPIECE DORIS LESSING, TLS
खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी लग्न करून सईद तिला शहरात घेऊन आला. तिच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल त्याला कधी स्वप्नातही शंका आली नाही; पण तो तिला वाचवू मात्र शकला नाही. एका सुडाने पेटलेल्या जिवाचा स्वत:शी आणि आजूबाजूच्या रानटी प्रवृत्तींशी चाललेला संघर्ष, त्याच्या मनाचा उडालेला गोंधळ या सगळ्यांना बंडूला चंद्ररत्ना मोठ्या नजाकतीने हात घालतात. आपली आई वाळवंटात हरवली असल्याची कल्पना करणारी छोटी मुलगी, चांगुलपणाने सईदच्या बिकट प्रसंगी त्याला निरपेक्ष मदत करणारे त्याचे मित्र, आपल्या मुलीचा दगडांनी ठेचलेला मृतदेह स्वत: शहरात जाऊन घेऊन येणारे समंजस वडील, हे सगळे तपशील कथेत सुसंगत भर घालतात. लतीफाच्या दु:खान्त जीवनकहाणीचा पडसाद कांदबरीवर उमटत राहतो तरी वस्तुस्थिती मात्र शोकांतिकेच्या पलीकडे जीवंतच राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ANEYEFORANEYE #ANEYEFORANEYE #अ‍ॅनआयफॉरअ‍ॅनआय #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #BANDULACHANDRARATNA "
Customer Reviews
  • Rating StarDAILY TARUN BHARAT 13-9-2010

    श्रीलंकेत जन्मलेल्या बंडुला चंद्ररत्ना यांनी सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘मिराज’ इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीतील कथानक ‘अॅन आय फॉर अॅन आय’ या कादंबरीत चालू राहते. मिराज कादंबरीच्या वेळी थोड्या कारणासाठी त्यांचे बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येणे हुकले असले, तरी कमिटीतील अनेक परीक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २०००मध्ये लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने जेव्हा या पुस्तकाची पेपरबॅक स्वरूपातील आवृत्ती काढली, तेव्हा ती त्या वर्षीच्या समीक्षकांच्या दृष्टीने सर्वाेत्कृष्ट कादंबरी ठरली. सौदी अरेबिया येथील हॉस्पिटलमध्ये काही वर्षे काम करत असताना बंडूला चंद्ररत्ना यांनी पाहिलेले, अनुभवलेले आखाती देशातले जनजीवन तिथली राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, सामाजिक रूढी, चालीरीती हे अतिशय अस्सलपणे आणि अपरिहार्यपणे त्यांच्या लेखनात आलेले आहे. अनेक लोक आखाती देशात नोकरी धंद्यानिमित्त, पर्यटनासाठी जाऊन येतात. त्यांच्याकडून आपल्याला तिथल्या जीवनाबद्दलचे तुटक तुटक तपशील समजत असतात, पण तिथे राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नंतर त्याकडे अलिप्तपणे पाहून ते कादंबरी रूपात आपल्यापुढे आल्यामुळे, सर्व काही सुसंगत समजल्यासारखे वाटते. मुख्य कथा आहे सौदी अरेबियातील न्याय पध्दतीची व त्यामुळे होणा-या परिणामांची कोर्टाची सुनावणी होऊन लतीफाला व्यभिचारी ठरविण्यात आले. हुसैन हाशमीला रंगेहाथ पकडले होते. लतीफला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. हुसैन हाशमीला शिरच्छेदाची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांची अंमलबजावणी होणार होती आणि ते पाहण्यासाठी अथांग जनसमूह लोटला होता. हुसैनने आपला मित्र सईदचा विश्वासघात केला होता. त्याचीच शिक्षा त्याला शिरच्छेदाच्या रूपाने मिळत होती. अब्दुल रेहमानच्या आजोबांच्या मते, हाशमी जमातच वाईट वर्तणुकीची कचराच ही जमात म्हणजे मूळ रक्तातच खराबी असलेली. लतीफाला दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षेचाही अंमलबजावणी झाली आणि तिचा पती सर्वार्थाने कोसळून गेला. लतीफाच्या मुलीला लैलाला-सईदच्या दयाळू अंत:करणाचा मित्र, अब्दुल मुबारकने सांभाळले आहे. अलफौजींचा विश्वास आहे की चांगले हे नेहमीच वाईटावर विजय मिळवते. अब्दुल मुबारक त्यांना अरबांचे औदार्य आणि प्रेमळपण यांचे मूर्तिमंत आदर्श प्रतीक वाटतो. त्यांना वाटते आपले राज्यकर्ते जर त्यांच्यासारखे असते तर... पण ते सगळेच स्वार्थी आहेत. संपूर्ण अरब देशाला लागलेला कलंक आहेत ते. सईदचा बालपणीचा मित्र यासेर त्याला भेटतो आणि त्याच्या सांगण्यावरून सईदचे मन बायकोच्या वधाचा सूड घ्यायच्या कल्पनेने पेटून उठते. यासेरच्या मते, मानवी संस्कृतीच्या संपूर्ण इतिहासात घडला नसेल असा दुराचार आणि नीतिभ्रष्ट व्यवहार आपल्या इथे चालू आहे. व्यसनाधीन बादशहा आणि त्यांचे शेकडो नातेवाईक जनतेची संपत्ती लुबाडत आहेत. सगळीकडे झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. मुतव्वा म्हणजे सरकारचे नोकर आहेत. आता तुझा न्याय तू स्वत:च मिळवला पाहिजेस. त्या झोपडपट्टीतल्या ज्या लोकांनी तुझ्या बायकोवर झालेल्या अन्यायाचा बदला घे. सईद, लक्षात ठेव. ‘अॅन आय फॉर अॅन आय’, असे ओरडत यासेरने तो खंजीर उंचावला. हवेत नाचवला आणि मग सईदच्या हातात दिला. विचारांच्या भोवNयात आवार्त घेणाऱ्या मनानेच सईदने खंजीरासह मुतव्वाच्या झोपडीकडे प्रयान केले. मुतव्वा वयस्कर चेहरा, पांढरी दाढी आणि लाल चौकड्यांचा गन्ना सईदला स्पष्ट दिसला. सईदने खंजिराचा हात वर उचलला आणि आता धावत जाऊन खंजीर खुपसणार, तोच पाठीमागून एक मुलगी धावत आली. त्याला घराकडे ओढू लागली. सईदने खंजीर म्यानात घालून खिशात ठेवला. पुढे गेल्यानंतर खंजिराच्या साहाय्याने खड्डा खणला. आणि खंजीर खड्ड्यात पुरून टाकला. घरी गेल्यावर मित्राला म्हणाला, ‘हो, आता मी आनंदात आहे.’ सौदी अरेबियातील अमानुष उपचार पध्दती, वेशभूषा, खान-पान चाली रीती या सर्वांचे दर्शन अनेक लहान मोठ्या प्रसंगातून कादंबरीत चित्रित झाले आहे. एक मोठा अॅल्युमिनियमचा थाळा, त्यात भाताचा मोठा ढीग आणि चिकन रस्सा होता. ते सगळेजण त्या एकाच थाळ्यातून सावकाश, शांतपणे जेवत होते, हे आज वाचतानासुध्दा विचित्र वाटते. लेखकाची साधी सोपी भाषा, कुठलेही अलंकार घालून न सजवता वाचकांपुढे येते. पण त्यातून अधोरेखित झालेले वास्तव अचंबित करते. विचार करायला भाग पाडते आणि वाटते हेच या कादंबरीचे बलस्थान आहे. याच कारणाने सुनंदा अमरापूरकर यांना या कादंबरीचा अनुवाद करण्यास प्रवृत्त केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more